सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
कळंब : राज्यात सामाजिक संघटना खुप आहेत. मात्र, सर्व सामान्यांसाठी धाऊन येणारी संघटना म्हणजे 'मानवी हक्क सुरक्षा परिषद' आहे, असे प्रतिपादन मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांनी केले.
गुरुवारी दिनांक ३ एप्रिल रोजी राळेगाव व कळंब तालुका शहर कार्यकारिणी गठित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
मानवी हक्क सुरक्षा परीषेदेची महिला व पुरुष कार्यकारिणीची निवड ही चिंतामणी देवस्थान कळंब येथे दिनांक ३ एप्रिल रोज गुरुवारी करण्यात आली आहे. कळंब तालुका अध्यक्षपदी कविश्वर गेडाम यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी अशोक उमरतकर, गजानन राऊत सचिवपदी, देवानंद भुजाडे कोषाध्यक्षपदी, विरेंद्र चव्हाण प्रवक्तेपदी, ज्ञानेश्वर फूलझेले संपर्क प्रमुखपदी, , विशाल वाघ संघटकपदी, तर बसवेश्वर माहुलकर सह संघटकपदी यांची निवड करण्यात आली आहे.तर कळंब तालुका महिला अध्यक्षपदी स्वाती धवणे तर उपाध्यक्षपदी सौ.दुर्गाताई वाघाडे, तर सचिवपदी सौ. प्रेमिला लोनकर, मनिषा येलकर कोषाध्यक्षपदी, ममता गेडाम सहसचिवपदी, ज्योती नाईक सह कोषाध्यक्षपदी,यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवड मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे केली आहे.
यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे कार्यकारी सदस्य, परशुराम पोटे , नानासाहेब बोनगिरवार सदस्य महाराष्ट्र प्रदेश, अमोल कुमरे अध्यक्ष मारेगाव तालुका, हुसकुले यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे संचालन व आभार अशोक उमरतकर यांनी केले.