"शाखा मजबूत झाल्या शिवाय संघटनेची ताकद वाढत नाही" - कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मेटीखेडा : "कम्युनिस्ट पक्षात कष्टकऱ्यांच्या संघटनात्मक शक्ती ला खूप महत्त्व आहे.कारण कष्टकऱ्यांचे राज्य निर्माण करायचे असेल तर कष्टकऱ्यांच्या संघटनेची फळी मजबूत असली पाहिजे.संघटना ताकदवान पाहिजे असेल तर शाखा मजबूत पाहिजेत. शाखेला ताकदवान बनवायचे असेल तर त्यात निरंतरता असली पाहिजे, त्यात जिवंतपणा येण्यासाठी सातत्याने कार्य सुरू पाहिजे. त्यासाठी शाखा सदस्यांनी वैचारिकता वाढविली पाहिजे", असे आवाहन कळंब तालुका अधिवेशन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन म्हणून बोलताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांनी केले.

माकपचे कळंब तालुका अधिवेशन मेटीखेडा येथील कोलाम समाज चावडी येथे घेण्यात आले. या अधिवेशनात तालुका सचिव म्हणून कॉ. सदाशिव आत्राम यांची पुनश्च एकमताने निवड करण्यात आली.

या अधिवेशनाचे कामकाज अध्यक्ष मंडळ कॉ. रमेश मीरासे, कॉ. निरंजन गोंधळेकर व कॉ. कवडू चांदेकर यांनी पाहिले. सर्वप्रथम शहिदांना व पक्षातील तसेच पुरोगामीचळवळीतील नेते व कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले. यानंतर तालुका सचिव कॉ. सदाशिव आत्राम यांनी तीन वर्षाचा अहवाल मांडला. त्यावर अनेक कार्यकर्त्यांनी त्यावर आपली मते मांडली व त्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली. 
 या अधिवेशनात १३ सदस्यीय तालुका कमिटी निवडण्यात आली. त्यामधून कॉ. सदाशिव आत्राम यांची पुनश्च एकदा सर्वानुमते निवड करण्यात आली.

या अधिवेशनात कॉ. शामराव जाधव यांनी क्रांतिकारी गीते सादर करून उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये जोश जागविला होता. या अधिवेशनाला कळंब तालुक्यातील अनेक गावातील निवडक स्त्री पुरुष प्रतिनिधी यांनी भाग घेतला.

अडेगांव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

झरी : नारी शक्ती गृप,अडेगांव 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तालुक्यातील अडेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले समीरदादा लेनगुळे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले रत्नमालाताई बोधे (अहिल्याबाई होळकर समिती सदस्य) उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहूणे म्हणून संजयभाऊ, आत्राम (ग्रामपंचायत सदस्य), सदस्य (जि.प. शाळा व्यवस्थापन समिती अडेगांव) तसेच सिताराम पिंगे, अंकीत डोहे, शरद काळे, ममता माहूरे, प्रिया मांडवकर, संध्या टेकाम, तसेच देवतळे मॅडम, व नगराळे मॅडम या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानजोती सावित्रीबाईं फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली, यांनतर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर इतिहास अभ्यासक समीरदादा लेनगुळे यांचे जाहीर व्याख्यान झाले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शुभम राऊत यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या अखेरीस संतोश पारखी, प्रणल गोंडे, राहूल पाचभाई, राजू चौधरी या सर्वांनी उपस्थित सर्व मान्यवर, व नागरीकांचे तसेच नारीशक्ती संघटने चे आभार मानले. व सर्व गावकऱ्यांच्या उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम पार पडला.


भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मंगी (ता.राळेगाव) येथे शाखा स्थापन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

राळेगाव : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमीत्य शाखा बांधणी अभियानांतर्गत राळेगाव तालुक्यातील मंगी या गावात शाखा स्थापन करण्यात आली.याप्रसंगी गावात रॅली काढुन पक्षाच्या नामफलकाचे जेष्ट नेते काॅ.गुलाबराव उमरतकर यांचे हस्ते उद्घाटन‌ करण्यात आले. 

झालेल्या सभेत काॅ.अनिल हेपट,काॅ.अनिल घाटे,काॅ.बंडु गोलर,अथर्व निवडिंग,राहुल रामटेके,राळेगाव तालुका सचिव काॅ.प्रविण आडे यांनी मार्गदर्शन‌ केले.याप्रसंगी पक्षाची शाखा स्थापन करुन शाखा कौंसील निवडण्यात आली. 

त्यामध्ये शाखा सचिव शत्रुघ्न सोयाम,सहसचिव रुपेश पेंदाेर,मनोहर मांडोकर,कोषाध्यक्ष गणपत वडसकर,सदस्य बाबाराव सखाराम, दिपक पेंदोर,सखाराम तोडासे,मनोज कोवे,गणपत वडसकर,दुर्गा पेंदोर,चंद्रकला सोयाम,निर्मला कोवे,ज्याेती पेंदोर,मंगला वडसकर, कचराबाई वडसकर,शोभा माडवकर, पार्वताबाई वडसकर,रामाजी वडसकर,संतोष अरके,वैशाली अरके,जिजाबाई मेश्राम,प्रल्हाद मेश्राम यांचा समावेश आहे.

वणी गोळीबारातील हुतात्म्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे अभिवादन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : महागाई म्हटले की सर्वसामान्य लोकांचे बजेट बिघडवणारी भयानक परिस्थिती असते आणि त्यामुळे त्रस्त जनता महागाईला भस्मासुरच मानत असते म्हणून जनता वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून त्याचा प्रतिरोध सुद्धा करीत असते. अश्याच प्रकारचा उद्रेक वणी मध्ये झाला आणि त्याला थांबविण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला आणि ह्या गोळीबारात सात जणांचा बळी गेला. ही घटना वणीचा इतिहासातील काळा दिवस ठरली. ह्या गोळीबारात बळी ठरलेल्या हुतात्म्यांना वणी येथील त्यांचा स्मारकावर पुष्पहार व फुले वाहून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने अभिवादन करण्यात आले.
सन १९७४ साली महागाईचा भस्मासूर जनतेसमोर उभा ठाकला होता आणि त्याचा विरोध जनता करीत होती. वणी येथे सुद्धा कृती समिती स्थापून २ जानेवारीला महागाईचा विरोध करण्यासाठी आंदोलनाचा दिवस ठरला. परंतु वणी पोलिसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांना अटक करून घेतल्याने आंदोलनासाठी जमलेल्या लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. जनता स्वयं स्फुर्तीने पोलीस स्टेशन कडे निघाले. जनतेमध्ये प्रचंड रोष होता. जनतेचा रोष बघता पोलिसांनी नेतृत्वांना सोडून दिले. त्यामुळे जनतेचा रोष कमी झाला परंतु काही असामाजिक तत्वांनी जाळपोळ करण्यास सुरुवात केली होती त्याला पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला परंतु जनता जुमानत नाही हे पाहता पोलिसांनी आंदोलन कर्त्यांवर गोळीबार केला आणि ह्यामध्ये ७ जणांचा बळी गेला. 
ह्या १९७४ मधील आंदोलनाच्या नेतृत्वातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. शंकरराव दानव हे एक होते. कॉ. दानव ही घटना आठवूनच शहारून जात असत. ते दरवर्षी ह्या हुतात्म्यांच्या स्मारकावर जाऊन श्रद्धांजली वाहून त्यांना अभिवादन करीत असत. मागील वर्षी ३१ जानेवारीला त्यांचे निधन झाले असले तरी त्यांचा पश्चात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने खंड न पडू देता पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी व किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके, कॉ. विष्णू दानव तसेच पेंटर मधुकर ह्यांनी स्मारकावर जाऊन गोळीबारातील हुतात्म्यांना अभिवादन केले.

देवधरी शिवारात बिबट्याची दहशत,कोलाम शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून पाच बकऱ्याची शिकार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

पांढरकवडा : देवधारी शिवारात कोलाम समाजाचे शेतकरी लाखामा लक्ष्मण तुमकोड यांच्या मालकी हक्काच्या शेतात पाळीव जनावरे घेवून राहतात दिनांक 3/१/२०२५ रात्री अचानक बिबट्या वाघाने पाच बकरी वर हमला करुन पाचही बकऱ्या ची शिकार केली असल्याचा धक्कादायक प्रकार देवधरी भागात घडल्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले. 
या वेळीं शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांना महिती मिळताच त्यांनी कार्यकर्त्याचा ताफा घेवून घटनास्थळी भेट घेतली व कोलाम समाजाच्या शेतकऱ्यांना जगण्याचा जोर दिला शामादादा कोलाम ब्रिगेड चे कृष्णा मडावी यांनी घटना स्थळावरून वन रक्षक वंदना मेश्राम यांच्याशी संपर्क साधून महिती दिली व वन विभागाकडून पंचनामा करुन पुढील कारवाई करण्याचे आश्वासन वन रक्षक वंदना मेश्राम यांनी दिली.
जंगलाला लागून आसलेल्या शेतकऱ्याच्या जमिनी सुरक्षित कश्या राहतील,शेतकऱ्याच्या पाळीव जनावर सुद्धा सुरक्षित राहावे यासाठी लवकरच वन परिक्षेत्र अधिकारी यांची भेट घेवून तुम्हाला सुद्धा लवकरच आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सौ इंदिरा बोंदरे यांनी दिले यावेळी सौ गिर्जाबाई लाखमा तूमकोड यांनी इंदिरा बोंदरे यांचे तोंड भरून कौतुक करुन कोलाम समाजाच्या सुखा दुःखात सहभागी होत राहा संपूर्ण कोलाम समाज शामादादा कोलम ब्रिगेड च्या पाठीमागे उभा राहण्याची समाजाला विनंती केली त्यावर सौ इंदिरा बोंदरे यांनी कोलाम समाजाला संघटित होण्याचे आव्हान केले.