वणी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँके कडून प्रधानमंत्री विमा योजनेतील लाभार्थ्यांच्या वारसांना धनादेश वाटप

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शासनाच्या विविध समाज उपयोगी योजनांपैकी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ज्या मध्ये खातेदारचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख पर्यंत विमा सुरक्षा आहे त्या करिता खातेदाराचे वय 18 ते 70 असणे आवश्यक आहे व त्या करिता दरवर्षी मात्र 20 रुपये हफ्ता भरावा लागतो तसेच ज्या खायदाराचे वय 18 ते 50 आहे त्या करिता प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असून या मध्ये वर्षाला 436 रुपये विमा हफ्ता भरावा लागतो यात खाते धारकांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाखाचा सुरक्षा कवच उपलब्ध आहे. 

वरील दोन्ही योजना केंद्र शासनाच्या असून विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वणी मार्फत त्या युद्ध पातळीवर राबवण्यात येत असून जास्तीत जास्त खातेदारांचा विमा काढण्यात आला आहे. ज्या खातेदारकांचा विमा अद्याप काढण्यात आला नाही त्यांनी शाखेत येऊन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शाखा प्रबंधक श्री. अभिजीत ओळंबे यांनी केले आहे. 

विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वणी येथील खातेदार कविता मारोती भगत यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याने त्यांचे वारस मारोती दौलत भगत यांना व सुशीला शंकर बोबडे यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे वारस गणेश शंकर बोबडे यांना व इतर अनेक कुटुंबाला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत लाभ प्राप्त झाला असून विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा प्रबंधकांच्या हस्ते प्रत्येकी दोन लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. तसेच या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील जास्तीत जास्त खातेदारांनी घेण्याचे आवाहन बँक कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले आहे. यावेळी शाखा प्रबंधक श्री. अभिजीत ओळंबे, बँक मित्र श्री. विजय लाडे, तसेच बँकेचे इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

सौ इंदिरा बोंदरे यांनी तहसील कर्यालात बंद करुन घोषणा बाजी केल्यामुळे प्रशासनात तारांबळ

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

पांढरकवडा : राखीव वन गठीत करतांना बिगर सातबारा शेतकऱ्याच्या कब्ज्यातील जमिनी सुरक्षित राहतील याची खबरदारी महसूल व वन विभागाने घ्यावी अश्या मागणी साठी उपोषण करुन सुध्धा दखल न घेतल्यामुळे बिगर सातबारा शेतकरी संघटना व शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी कोलाम समाजाच्या लोकांना घेवून तहसील कार्यालयामध्ये तहसीलचा दरवाजा बंद करुन आंदोलनात्मक भूमिका घेवून आपला रोष व्यक्त केला.

कोलाम समाज सुद्धा माणूसच आहे जनावर नाही याची दखल घेवून लोकप्रतिनिधी सहित प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा कोलाम समाज एकदा पेटला तर त्याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील. कारण शामादादा कोलाम ब्रिगेड च्या वतीने कोलाम समाज परिवर्तनाचे कार्य सुरू असुन कोलाम समाजावर तीळा एव्हाडा सुध्धा अन्याय सहन केल्या जाणार नाही, असा इशाराही प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी दिला. आपला रोष व्यक्त करतांना म्हणाल्या की सुदैवाने आपल्या जिल्याला प्रा अशोक उईकें यांच्या रूपाने आदिवासी मंत्री लाभलेले आहेत परंतू त्यांनी आदिवासीं मधील सर्व घटकांना समानतेची वागणूक देणे गरजेचे असताना कोलाम समाज बद्दल भेदभावाची वागणूक मिळत असल्याचा आम्हाला अनुभव मिळत असल्याचा आरोप करून त्याचा खुलासा मी स्वतः त्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढून करणार असुन त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यासह सरकार कडे लेखी स्वरूपात बोलणे केलेले आहे म्हणून आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी कोलाम समाजाला सावत्र पणाची वागणूक देवू नये नाहीतर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असा इशारा देवून मुंजाळा येथील कृष्णा मडावी व ईतर लोकांच्या कब्जात असलेल्या जमिनी राखीव वन गठित करताना सुरक्षित राहतील याची महसूल व वन विभागाने घ्यावी या मागणीकडे अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष केल्यामुळे तहसील कार्यालयात स्वतःला बंद करुन आंदोलन केले म्हणून तात्काळ दाखल घेवून मंडळ अधिकारी यांना पत्र देवून महसूल व वन विभागाकडून संयुक्त अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्यामुळे सदर आंदोलन मागे घेतले असल्याचे सांगून या पुढें कोलाम समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला तर बिगर सातबारा शेतकरी संघटना शामादादा कोलाम ब्रिगेड च्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशाराही प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी दिला.

यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी पुढाकार घेवून उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात जावून कोलाम समाजाच्या समस्या बाबत चर्चा केली उपविभागीय अधिकारी यांनी करंजी मंडळ अधिकारी यांनी कक्षात बोलावून अन्नू पोड येथे कॅम्प आयोजित करणे बाबत सूचना दिल्या लगेच कृष्णा मडावी, अंबादास टेकाम, चेंडकु कडकी, मारोती रामपुरे, वामन रामपुरे वसंता रामपुरे, अविनाश जांभूळकर अर्चना अत्राम,चंद्रकला रामपुरे किसन रामपुरे, रामकृष्ण मडावी, विलास कडकी, यांनी प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांचे आभार व्यक्त केले आंदोलन स्थगित केले.



तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पेंढरी शाळेला सुयश

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव स्व. चिंधूजी पुरके आश्रम शाळा मारेगाव येथे दि.२७/१२/२०२४ ते ३०/१२/२०२४ पर्यंत पार पडला. त्यामध्ये यावर्षीही १०० टक्के आदीवासी बहुल असलेली नवरगाव केंद्रातील जि.प.उ.प्राथमिक शाळा पेंढरी, पं. समिती मारेगाव या शाळेने तालुकास्तरीय विजेते पद पटकाविले. 

मारेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री स्नेहदीप काटकर, विस्तार अधिकारी (शिक्षण) श्री रामटेके साहेब, सर्व केंद्रप्रमुख, सर्व शिक्षक (पं.स.मारेगाव) यांनी कौतुक केले. पेंढरी शाळेला सतत तिसऱ्यांदा विजेतेपद मिळविण्यासाठी श्री वडस्कर सर (मुख्याध्यापक), श्री गोंडाणे सर, श्री बडोले सर, श्री टेकाम सर, श्री मनोहर सर व श्री करमणकर सर यांनी अथक परीश्रम घेतले.

यासाठी नवरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री कयापक सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री भास्कर जुमनाके व ईतर सदस्याचे मोलाचे सहकार्य लाभले.


महिला मुक्त्ती दिन निमित्त जि.प.शाळा चिंचमंडळ येथे विविध उपक्रमांचे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : दिनांक 3 जानेवारी 2025 रोज शुक्रवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिंचमंडळ येथे सावित्रीमाई फुले यांची जयंती तथा महिला मुक्ती दिन तसेच बालिका दिन संपन्न झाला.
      
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक श्री. जीवतोडे सर सत्कारमूर्ती श्रीमती शोभाबाई कनाके प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमान चाफले सर, श्रीमान आत्राम सर, कुमारी पुसाटे मॅडम अंगणवाडी सेविका, कुमारी निता निमसटकर प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमात विद्यार्थी भाषणे, वेशभूषा, गितगायान, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. विजयी स्पर्धकांना पारितोषिक म्हणून ग्रंथ भेट देण्यात आले.
     
महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून शा. पो. आ. स्वयंपाकी ताई श्रीमती शोभाबाई कनाके यांची साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कुमारी निता मॅडम यांनी केले  प्रमुख मार्गदर्शक श्री. चाफले सर, पुसाटे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ,तसेच श्री. जिवतोडे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून अमूल्य मार्गदर्शन केले तर आभार प्रदर्शन श्री.सुंदरलाल आत्राम सर यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.
  या कार्यक्रमाच्या यशस्विते करिता शाळेतील सर्वांनी सहकार्य केले.

वाहतुकीची नियम मोडणाऱ्या चालकांना लाखो रुपयांचा दंड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वणी वाहतूक उपशाखेच्या वतीने अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच वाहन चालकांना शिस्त लावण्याकरिता वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहन चालकांवर वणी वाहतूक विभागाने विविध कलमांखाली दंडात्मक कारवाई करीत डिसेंबरमध्ये लाखो रुपयांचा दंड आकरण्यात आला आहे.

मागील दहा दिवसात विशेष मोहीम आखून आत्तापर्यंत मोटर वाहन कायद्याखाली एकूण 624 वाहन चालकांविरुद्ध विविध कलमाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली असून संबंधित वाहन चालकांना एकूण 5 लाख 52 हजार 550 इतक्या रकमेचा दंड आकारण्यात आला आहे.

वणी वाहतूक विभाग अंतर्गत 22 डिसें. 2024 मध्ये एकूण केसेस 624 करण्यात आल्या आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलं, ट्रिपल सीट, विना लायसन्स, विना वाहन लायसन, धोकादायक वाहन चालवीने, रेसर बाईक, पोलिसांच्या थांब्या ईशाऱ्याचे उलंघन, बुलेट सायलेंसर अशा कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण दंड 5 लाख 52 हजार 550 रुपयाचा आकरण्यात आला आहे. वणी परिसरातील वाहन चालकांनी महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर वाहने चालवताना स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मोटर वाहन कायद्याचे पालन करावे असे आवाहन वाहतूक शाखा प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक सीता वाघमारे यांनी केले आहे.

पोलीसांनी अवैध वाहतूकीवर सातत्याने कारवाई सुरू ठेवली तर बेकायदा वाहनचालकांना चाप बसू शकतो.