सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
पांढरकवडा : राखीव वन गठीत करतांना बिगर सातबारा शेतकऱ्याच्या कब्ज्यातील जमिनी सुरक्षित राहतील याची खबरदारी महसूल व वन विभागाने घ्यावी अश्या मागणी साठी उपोषण करुन सुध्धा दखल न घेतल्यामुळे बिगर सातबारा शेतकरी संघटना व शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी कोलाम समाजाच्या लोकांना घेवून तहसील कार्यालयामध्ये तहसीलचा दरवाजा बंद करुन आंदोलनात्मक भूमिका घेवून आपला रोष व्यक्त केला.
कोलाम समाज सुद्धा माणूसच आहे जनावर नाही याची दखल घेवून लोकप्रतिनिधी सहित प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा कोलाम समाज एकदा पेटला तर त्याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील. कारण शामादादा कोलाम ब्रिगेड च्या वतीने कोलाम समाज परिवर्तनाचे कार्य सुरू असुन कोलाम समाजावर तीळा एव्हाडा सुध्धा अन्याय सहन केल्या जाणार नाही, असा इशाराही प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी दिला. आपला रोष व्यक्त करतांना म्हणाल्या की सुदैवाने आपल्या जिल्याला प्रा अशोक उईकें यांच्या रूपाने आदिवासी मंत्री लाभलेले आहेत परंतू त्यांनी आदिवासीं मधील सर्व घटकांना समानतेची वागणूक देणे गरजेचे असताना कोलाम समाज बद्दल भेदभावाची वागणूक मिळत असल्याचा आम्हाला अनुभव मिळत असल्याचा आरोप करून त्याचा खुलासा मी स्वतः त्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढून करणार असुन त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यासह सरकार कडे लेखी स्वरूपात बोलणे केलेले आहे म्हणून आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी कोलाम समाजाला सावत्र पणाची वागणूक देवू नये नाहीतर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असा इशारा देवून मुंजाळा येथील कृष्णा मडावी व ईतर लोकांच्या कब्जात असलेल्या जमिनी राखीव वन गठित करताना सुरक्षित राहतील याची महसूल व वन विभागाने घ्यावी या मागणीकडे अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष केल्यामुळे तहसील कार्यालयात स्वतःला बंद करुन आंदोलन केले म्हणून तात्काळ दाखल घेवून मंडळ अधिकारी यांना पत्र देवून महसूल व वन विभागाकडून संयुक्त अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्यामुळे सदर आंदोलन मागे घेतले असल्याचे सांगून या पुढें कोलाम समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला तर बिगर सातबारा शेतकरी संघटना शामादादा कोलाम ब्रिगेड च्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशाराही प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी दिला.
यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी पुढाकार घेवून उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात जावून कोलाम समाजाच्या समस्या बाबत चर्चा केली उपविभागीय अधिकारी यांनी करंजी मंडळ अधिकारी यांनी कक्षात बोलावून अन्नू पोड येथे कॅम्प आयोजित करणे बाबत सूचना दिल्या लगेच कृष्णा मडावी, अंबादास टेकाम, चेंडकु कडकी, मारोती रामपुरे, वामन रामपुरे वसंता रामपुरे, अविनाश जांभूळकर अर्चना अत्राम,चंद्रकला रामपुरे किसन रामपुरे, रामकृष्ण मडावी, विलास कडकी, यांनी प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांचे आभार व्यक्त केले आंदोलन स्थगित केले.