मारेगाव पंचायत समितीची वार्षिक आमसभा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज मारेगाव पंचायत समितीची "वार्षिक आमसभा" येथील बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. या सभेचे अध्यक्ष वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन नायब तहसीलदार महेश रामगुंडे, गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, कार्यकारी अभियंता निलेश काळबांडे, ह्यांची प्रामुख्याने मंचावर उपस्थिती होती. 
या सभेत आरोग्य, रस्ते विद्युत, पाणी, जल जिवन मिशन, यासह विविध विभागाच्या समस्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच विद्युतचा लंपडाव, रस्त्यावर पडलेले खड्डे, शाळेत ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना रस्त्यामुळे निर्माण झालेली समस्या, अशा अनेक विभागाशी संबंधित मुद्द्यावर स्थानिक सरपंचानी प्रश्न लावुन धरले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाना उत्तरे दिली. मात्र,प्रलंबित प्रश्नाना उत्तरे देताना अनेक अधिकाऱ्याची तारांबळ उडाल्याची पाहायला मिळाली. 
दरम्यान,वन विभाग आणि पोलीस विभाग मात्र, सभेला अनुपस्थीत राहील्याने संबंधित विषयाचे प्रश्न अनुत्तरीत राहीले. यावेळी उपस्थित सरपंचांनी गावातील विकासकामाचे काही प्रश्न, समस्याचं निवारण करून घेतलं. शेवटी आमदार बोदकुरवार यांनी शासनाच्या अनेक योजनेची माहिती वर बोलताना नुकतेच शासनाने जाहीर केलेल्या "माझी लाडकी बहीण" योजनेचा लाभ घेण्याचं यावे आवाहन करून जनतेसाठी आपण ऑनलाईन सेवा केंद्र सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
वेळेअभावी महिनाभरात पुन्हा जलजिवन मिशनची विशेष सभा लावुन उर्वरीत समस्या मार्गी लावु अशा आशयाच्या सुचना देऊन वार्षिक सभेचा समारोप करण्यात आला. 
कार्यक्रमाचे संचालन मारेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुधाकर जाधव यांनी, प्रास्ताविक गटविकास अधिकारी भिमराव व्हनखेडे तर, आभारप्रदर्शन पंचायत समिती कृषी विभागाचे विस्तार अधिकारी संदिप वाघमारे यांनी केले. 

सरचिटणीस पदी गणेश झाडे यांची नियुक्ती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आगामी विधानसभेच्या निवडणुका व कार्यकारणी घोषित करण्याकरिता व इतर विषयावर चर्चे करिता येथील जेष्ठ नागरिक भवन येथे रविवार दि.१ जुलै२०२४ रोजी दुपारी २ वाजता मारेगाव भाजपा तालुक्याची बैठक आयोजित करण्यात आली होती.
वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ जिल्हा अध्यक्ष श्री.तारेंद्र भाऊ बोर्डे माजी जिला अध्यक्ष श्री.राजेंद्र डांगे, तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. 
मागील लोकसभा निवडणूकीत मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाने खऱ्या अर्थाने मोठा विजय मिळवला. देशात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने कडे आज पाहालं जातं आहे. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूकीत सुद्धा आपल्याला विजय मिळवायचा आहे. त्यासाठी आतापासूनच सर्वांनी कामाला लागण्याच्या सूचना आमदार बोदकुरवार यांनी बैठकीत बोलताना उपस्थित मान्यवरांना दिल्या. तर जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी सुद्धा आपले विचार मांडले. 
तसेच माजी जिला अध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी आपला परिचय देत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व प्रदेश व जिल्हा उपाध्यक्ष पदाधिकारी, महिला आघाडी तालुक्याची कार्यकारणी, मंडळाचे सर्व आघाड्याची कार्यकारणी, पंचायत समिती प्रमुख, जिल्हा परिषद प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, सुपर वोअरियर, आजी-माजी पदाधिकारी व सर्व प्रमुख विद्यमान पदाधिकारी 
यांना येणारी निवडणूक कशी जिंकता येइल याचे सखोल व परिपूर्ण मार्गदर्शन व निवडणूक रूपरेषा समजावून सांगितली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ता.अध्यक्ष अविनाश लांबट यांनी केले.
बैठकीच्या शेवटी तालुक्यातील नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली,एकूण ६८ आजी माजींना तालुक्याचा विविध पदभार देण्यात आले. यात युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष गणेश झाडे यांची सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश झाडे यांची भारतीय जनता पक्षाच्या मारेगाव तालुका सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल सर्व प्रदेश व जिल्हा उपाध्यक्ष पदाधिकारी,महिला आघाडी तालुक्याची कार्यकारणी, मंडळाचे सेर्व आघाड्याची कार्यकारणी, पंचायत समिती प्रमुख, जिल्हा परिषद प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, सुपर वोअरियर, नगरसेवक, आजी-माजी लोकप्रतिनिधी, सरपंच-उपसरपंच, सर्व सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी कौतुकासह अभिनंदन केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत नांदे यांनी तर,आभार पवन ढवस यांनी मानले. 

युवा शक्ती विचार मंच व प्रतिभा लायब्ररी यांच्या वतीने वरोरा शहरांतील 58 गुणवंत विद्यार्थ्यांनचा सत्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वरोरावरोरा शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील दहावी व बारावीच्या 58 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार युवाशक्ती विचार मंच व प्रतिभा लायब्ररी वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात करण्यात आला. हा कार्यक्रम स्थानिक आलिशान लॉन वरोरा येथे थाटात संपन्न झाला. यावेळी स्वामी विवेकानंद व भारत माता यांचे प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. 

वरोरा शहराचे माजी नगराध्यक्ष अहेतेशामजी अली, गजानन मुंडकर गट विकास अधिकारी पंचायत समिती वरोरा, युवाशक्ती विचार मंच वरोराचे अध्यक्ष गणेश नक्षीने, व लोकेश घाटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश नक्षीने यांनी ले. यावेळी गजाननजी मुंडकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्व आणि स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कोणत्या प्रकारचे आव्हान येतात व दहावी बारावीनंतर काय करावे या सारख्या अनेक विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या आयुष्यातले वेगवेगळे अनुभव कथन केले. त्यानंतर माजी नगराध्यक्ष श्री अहेतेशामजी आली यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या युगातील विद्यार्थी हा काय करू शकतो व त्याला त्याच्या जीवनातील सामोरे जाण्यासाठी चा मार्ग त्यांनी दिला.  
     
युवाशक्ती विचार मंच चे सदस्य सौरभ साखरकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले तर कोमल साखरकर हिने मान्यवरांचा परिचय करून दिला. व शकिल शेख यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने युवाशक्ती विचार मंच चे शकील शेख, लोकेश रुयारकर, सौरभ साखरकर, लोकेश घाटे, रोहित घाटे, छकुली पोटे, कोमल साखरकर, दिशा आगलावे, स्वाती हनुमनते, यांनी अथक परिश्रम घेतले. 

राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल भगिनींनी मानले मुख्यमंत्री भाऊरायाचे आभार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात महिला- भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला- भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी १ जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याना अनोखी ओवाळणी दिली.
विधानभवनाच्या प्रांगणात आज विविध क्षेत्रातील महिला भगिनी एकत्र जमल्या होत्या. विधिमंडळात काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांना ओवाळून राखी बांधून त्यांचे आभार मानले. 

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अर्थसंकल्पात राज्यातील महिला- भगिनींना दिलासा देणारे अनेक निर्णय आम्ही घेतले आहेत. मुख्यमंत्री माझी बहिण योजनेचा शासन निर्णय देखील तातडीने काढण्यात आला असून त्याचा लाभ येत्या 1 जुलैपासून भगिनींना देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटींहुन जास्त महिलांना होणार आहे. 
महिलांना वर्षातून ३ सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही सुरू करण्यात येणार आहे. तसेच २५ लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. बचतगटांतील महिलांचे खेळते भांडवल 15 हजारावरून वाढवून 30 हजार केले आहे. मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा, 10 हजार महिलाना पिंक रिक्षांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिलांना मोफत प्रवास, 50 टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास यापूर्वीच दिलेला आहे, राज्यातील सर्व माता-भगिनींच्या पाठीशी त्यांचा मुख्यमंत्री भाऊराया म्हणून नेहमी पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राखी बांधल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व भगिनींचे आभार मानले. 

यावेळी मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र भोंडेकर आणि विविध क्षेत्रातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पेसा क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांची पदभरती करा- ट्रायबल फोरमची मागणी


सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

राळेगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास व चुकीचा अर्थ काढून राज्यशासनाने अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांची संपूर्ण भरती प्रक्रिया थांबवली आहे. त्यामुळे राज्यातील १३ जिल्ह्यामधील आदिवासी उमेदवारांवर अन्याय होत आहे. भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवून, १७ संवर्गातील आदिवासी उमेदवारांची पदभरती करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकना थजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी मध्ये फडणवीस यांचेकडे ट्रायबल फोरम राळेगांव तालुकाध्यक्ष शंकर पंधरे यांनी केली आहे. यासंदर्भात नुकतेच निवेदन सर्व पाठविण्यात आले आहे. 

महामहिम राज्यपाल यांनी २९ ऑगस्ट २०१९ रोजी ५ वी अनुसूचीच्या पॅरा ५ (१) नुसार अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचीत जमातीच्या भरती संबंधात जनजाती सल्लागार परिषदेच्या शिफरशीनुसार अध्यादेश काढून त्यात लोकसंख्येच्या प्रमाणात १०० टक्के, ५० टक्के आणि २५ टक्के (कोतवाल आणि पोलीस पाटील वगळता) आरक्षण दिले आहे. 

याअधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यशासनाने १ फेब्रुवारी २०२३ आणि २८ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासननिर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. मात्र सदर अधिसूचना आणि शासन निर्णय यांना बिगर आदिवासींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

उच्च न्यायालयाने २७ सप्टेंबर २०२३ रोजी, याचिका या नोकरी विषयाशी संबंधित असल्याने याचिकाकर्त्यांनी पहिले अपील मँट केले नाही. बिगर आदिवासींच्या याचिका अंतरिम याचिकासह फेटाळल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुध्द बिगर आदिवासी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २२१०९/ २०२३ ही ३० सप्टें- बर २०२३ रोजी दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सुनावणी झाली. या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटले की, राज्यपालांच्या कथित अधिसूचने नुसार चालू असलेली पदभरती प्रक्रिया जी अंतिम झालेली नाही. असे उच्च न्यायालयात जे विधान केले आहे. ते पुढील सुनावणीपर्यंत चालू राहील. सर्वोच्च न्यायालयात १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सुनावणी होऊन आदेश निघणार होते. परंतू त्या दिवसाची व आदेशाची वाट न पाहता, त्याच दिवशी १३ आक्टोबरला सामान्य प्रशासन विभागाने निर्देश दिले की, सर्वोच्च न्यायालयाचे अंतिम आदेश येईपर्यंत पेसा क्षेत्रातील निवड प्रक्रियाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये किंवा गरज वाटल्यास सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय घेतल्याशिवाय पुढील कार्यवाही करु नये. दरम्यान महसूल व वन विभाग मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ च्या पत्राच्या आधारे १७ आँक्टोबर रोजी पत्र काढून अनुसूचित क्षेत्रातील संपूर्ण भरती प्रक्रिया थांबवली आहे. या १३ जिल्ह्यातील भरती थांबली राज्यातील १३ जिल्हे अनुसूचित क्षेत्रात येतात. यात ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव, अहमदनगर, पुणे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या १३ जिल्ह्यातील पेसा क्षेत्रामधील १७ संवर्गातील केवळ आदिवासी उमेदवारांची भरती प्रक्रिया प्रभावित झाली आहे.

जवळपास १४ वर्षापासून पेसा क्षेत्रातील भरती झाली नाही. राज्यातील तत्कालीन आदिवासी मंत्री, आमदार यांचे दुर्लक्ष झाले. आता सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख चालू आहे. न्यायालयाचा निर्णय येण्यास बराच कालावधी लागू शकतो. बहुतांश आदिवासी उमेदवारांची वयोमर्यादा संपत आहे. सरकारने योग्य मार्ग काढून कोणत्याही परिस्थितीत पेसा क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांची भरती करावी.
- शंकर पंधरे 
तालुकाध्यक्ष, ट्रायबल फोरम राळेगांव