एसीबीची कारवाई, साडेचार हजाराची लाच घेतांना तलाठी रंगेहात अडकला


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : खैरगाव भेदी साजातील तलाठ्यावर सापळा लावला असता या सापळ्यात शेतीचा फेरफार साठी 4500/- रुपयांची लाच घेताना तलाठी शालिक मारोती कनाके (56) यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईने तालुका प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, खैरगांव भेदी साजा तथा अतिरिक्त प्रभार असलेल्या चिंचमंडळ तलाठी यांनी तक्रारदाराकडे फेरफार करण्यासाठी 5000/- रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ही रक्कम 4500/- रुपये निश्चित करण्यात आली. रक्कम देण्यापूर्वी तक्रारदाराने यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली होती. 

त्यानुसार आज मंगळवारी दि.16 एप्रिल 2024 ला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने डॉ जवादे यांचे राहते घर सजा क्रमांक 30 सुभाष नगर येधील तलाठी कनाके यांचे वर सापळा रचून तलाठी कनाके यांना साडेचार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधिक्षक मारोती जगताप, अप्पर पोलीस अधिक्षक अनिल पवार (अमरावती), पोलीस उप अधिक्षक उत्तम नामवाडे, पो.नि.विनायक कारेगावकर यांच्या मार्गदर्शनात सापळा पथक पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, संजय कांबळे, वसीम शेख, अतुल मते, सचिन भोयर,भागवत पाटील, सुरज मेश्राम, राकेश सावसाकडे, सतीश सोनोने (यवतमाळ) यांच्या पथकाने केली.

दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

'RTE' प्रवेशाला प्रारंभ; 16 ते 30 एप्रिलपर्यंत 'या' संकेतस्थळावर करा अर्ज..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांसाठी २५ टक्के 'आरटीई' प्रवेश प्रक्रियेला आता प्रारंभ झाला आहे.

'या' संकेतस्थळावर करा अर्ज, जूनमध्ये प्रवेश प्रक्रिया
'आरटीई'अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्यास आजपासून (मंगळवारी) सुरवात होणार आहे. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर त्याची छाननी होऊन लॉटरी निघेल आणि लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील. दरम्यान, ज्या शाळांमध्ये लॉटरीची गरज भासणार नाही, त्याठिकाणी 'आरटीई'तून प्रवेशासाठी पात्र मागेल त्या विद्यार्थ्याला थेट प्रवेश मिळतील. विद्यार्थ्यांना १६ ते ३० एप्रिलपर्यंत 'आरटीई' पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

राज्यातील ७५ हजार २६४ शाळांनी 'आरटीई'अंतर्गत नोंदणी केली असून त्यात जिल्ह्यातील तीन हजार ३७८ शाळा आहेत. नवीन बदलानुसार 'आरटीई'अंतर्गत राज्यातील नऊ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या (घरापासून एक किमी अंतराची अट लागू) खासगी अनुदानित किंवा शासकीय शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे.

RTE प्रवेशाचे निकष
• विद्यार्थ्यांना RTE अंतर्गत प्रवेशासाठी त्यांच्या घराजवळील एक किमी अंतरावरील खासगी अनुदानित शाळा, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळेत प्राधान्याने प्रवेश घ्यावा लागणार आहे. 
• एखाद्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किमी अंतरावर शासकीय किंवा अनुदानित शाळा नाही, पण इंग्रजी माध्यमाची खासगी शाळा आहे, त्या विद्यार्थ्याला तेथे प्रवेश घेता येणार आहे. परंतु, त्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून खरोखरच त्या अंतरावर शासकीय किंवा अनुदानित शाळा आहे की नाही, याची खात्री गुगल मॅपिंगद्वारे केली जाणार आहे.


वणीत सिनेअभिनेत्री रवीना टंडनचा रोड शो "सुपरहिट"


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्री रवीना टंडन आज सोमवारी वणी येथे आली होती. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ 'ती' रोड शो मध्ये सहभागी होऊन मतदारांना विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. 

यावेळी वणी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, संजय पिंपळशेडे, यासह महायुतीचे व मित्र पक्षातील सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी सामील झाले होते. विशेष म्हणजे महिलां पदाधिकारी यांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. 
प्रत्यक्ष मतदानासाठी केवळ चार दिवस आहे. यासाठी उमेदवार मतदारांना जागृत करण्यासाठी स्टार प्रचार असो की पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी असो, उमेदवारांच्या प्रचारासाठी रात्रंदिवस एक करित आहे. यात भारतीय जनता पक्ष सर्वात पुढे असताना दिसत आहे. यासाठी विदर्भात सिनेकलाकार स्वयं्फुर्तीने प्रचारात उतरले असून आज वणी येथील सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सुप्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन ह्यांचा रोड शो आयोजित करण्यात आले होते. येथील शिवतीर्थावरून प्रचाराला सुरुवात झाली त्यानंतर वणी शहरातील प्रमुख मार्गाने जयघोष करित परत टिळक चौक येथे रोड शो ची सांगता करण्यात आली. 
या रोड शो प्रचारादरम्यान विशाल विजयी संकल्प करण्यात आले असून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी आपण येत्या 19 एप्रिल ला आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन सुधीर भाऊंना मतदान करावे आणि निवडून लोकसभेत पाठवावे,असे आवाहन आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी केले. 
दरम्यान अभिनेत्री रवीना टंडनला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने जन समुदाय रस्त्यावर उतरला. तूर्तास जनतेमध्ये उत्सहाचे वातावरण यावेळी दिसून आले. 


अभिनेत्री रविना टंडन आज वणीत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणीत आज सिने अभिनेत्री रवीना टंडन हिचा ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ रोड शो आहे. दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि चित्रा वाघ यांची जाहीर सभा झाली होती. या सभेला नागरिकांची तुफान गर्दी उसळली होती.

सोमवार 15 एप्रिलला सायंकाळी 5.30 वाजता अभिनेत्री रविना टंडन या वणी मध्ये येणार आहे. त्यामुळे 90 च्या दशकातील तीचे फॅन्स व मुनगंटीवार समर्थकामध्ये तीला बघण्यासाठी ऐकण्यासाठी तोबा गर्दी असण्याची शक्यता आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथून रोड शो ला सुरुवात होणार असून खाती चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक, काठेड चौक, सुभाषचंद्र बोस चौक, सर्वोदय चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक, टिळक चौक असा रोड शो असणार आहे. पडद्या वर भुरळ पाडणारी आज प्रत्यक्ष वणीत रोड शो ने सिनेअभिनेत्री रविना टंडन यांची भुरळ पडणार आहे. अशी चर्चा वणी विधानसभा क्षेत्रातील तीच्या फॅन्स मध्ये जोर धरत आहे.

सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ दोन दिवसांअगोदर फडणवीस यांची सभा झाली, त्यानंतर भाजपने स्टार रोड शो आयोजित केला आहेत. आज सोमवारी सायंकाळच्या वेळेस हा रोड शिवतीर्थावरून सुरुवात होणार असल्याचे आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकातून माहिती दिली. 

मतदार राजा म्हणते आता ढिसाळ नियोजन नको; राजकीय जाणकार काय सांगतात!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी आता केवळ पाच दिवसांचा कालावधी राहिला असून या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारात तेजी आल्याचे दिसून येत आहे. 

वणी मारेगाव झरी तालुक्यात सभा, बैठका, कॉर्नर सभा, भेटीगाठी अगदी पद्धतशिर सुरू आहे. मात्र, जास्तच अविर्भावात गेलेल्या आघाडी चे प्रचारात नियोजन ढिसाळ असल्याचे चर्चा आहे. ताजे आणि उत्तम उदाहरण म्हटलं तर वणीतील केतकर यांची सभा. आघाडी आणि मित्र पक्षातील मातब्बर लोकं संधी साधू असल्याचे बोलल्या जाते. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत काही करत नाही. आणि मिळालेच की ते केव्हा कुणाचा गेम करतील याचा नेम नाही, दिवसभर वातावरण ताईंचे आहे असे सांगून रात्रीतून भाऊंची हवा बनवून टाकतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

विशेष म्हणजे ताईंनी शेवट च्या घडीला खर्चिक हात आखूड केल्याने अनेकांची गाडी आदळआपट होत आहे. एवढेच नाहीतर कोणीतरी कान भरल्याने माध्यमापासून फारकत एकदमच घेतल्याची चर्चा आहे. लोकांमध्ये भावनिक वातावरण असल्यामुळे आपण सहजच जिंकू अशी बेसावध संकल्पना मेहनती वर पाणी फेरू नये यासाठी प्रचार माध्यमातून कंटिन्यू असणं आवश्यक आहे, पण तसं काही दिसत नाही. प्रचार प्रसार अपडेट्स असायला हवा नाहीतर चित्र वेगळंच दिसते, असे राजकीय जाणकार सांगतात.

एरवी निवडणूकीत "जिधर दम उधर हम" अशी पद्धत झाली आहे. तुम्ही कितीही पटवून सांगा, पायापोटी लागा, खाऊ पेवू घाला, गुण  त्याचेच गाईल जो शेवटी कामी पडला. कित्येकांनी शेवटच्या क्षणी दृढ विश्वास असणाऱ्यांचे गणित बिघडवले आहे, त्यांचा फार्मुला एकच 'slow but sure' धिमा पण निश्चित. याप्रमाणे प्रतिस्पर्धीचे काम चालू असल्याचे चर्चेत आहे. मतदानाला केवळ आणि केवळ पाच दिवस आहे. तूर्तास ज्याने दाबून जोर लावला, त्याने गड जिंकला अशी चर्चा जोर धरत आहे.