भारतीयांमध्ये वाढत चाललाय 'साडी कॅन्सर'चा धोका; नेमका काय आहे हा प्रकार? जाणून घ्या...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

तुम्हाला माहिती आहे का साडी नेसल्याने तुम्हाला कॅन्सर आजार होऊ शकतो? फक्त साडीच नाहीतर इतर कपडेही चुकीच्या पद्धतीने घातल्यास कॅन्सर होऊ शकतो. याला वैद्यकिय भाषेत स्कॅमस सेल कार्सिनोमा म्हणतात. या आजाराचे रूग्ण भारतात सर्वाधिक आहेत. कारण भारतात महिला सर्वात जास्त साडी नेसतात.

भारतात साडी कॅन्सर का वाढतो आहे?
भारतातील अनेक भागांमध्ये महिला रोजच साडी नेसतात. साडी घालण्यासाठी महिला सुती पेटीकोट कंबरेवर सुती धाग्याने बांधतात. जर एखाद्या महिलेने एकच कापड खुप वेळ घातला तर तो कंबरेला घर्षण करतो, ज्यामुळे तिथली त्वचा सोलून काळी पडू लागते.

यामुळे साडी कॅन्सरचा धोका वाढू शकतो. तसेच कपड्यांची स्वच्छता ठेवणे देखील गरजेचे असते. शरीराच्या ज्या भागामध्ये जासेत उष्णता आणि घाम येतो तेथे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. बिहार आणि झारखंडमधून या आजाराचे प्रकरण समोर येत आहेत.

अभ्यासानुसार भारतीय महिलांमध्ये आढळलेल्या एकूण कॅन्सरच्या प्रकरणांपैकी 1 टक्के प्रकरणे साडी कॅन्सरची आहेत. मुंबईतील आर एन कूपर हॉस्पिटलमध्येही याबाबत संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनात साडीसोबतच धोतराचाही समावेश करण्यात आला. या साडीच्या कॅन्सरचे नाव बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिले होते. जेव्हा तिथे या प्रकरणाबाबत 68 वर्षीय महिला या आजाराने ग्रस्त होती. ही महिला वयाच्या 13 व्या वर्षापासून साडी नेसत होती.

टेस्टिक्युलर कॅन्सर
पुरुषांमध्ये टाइट कपडे घातल्याने हा कॅन्सर होऊ शकतो. तासंतास टाइट कपडे घालणे शरीरासाठी घातक ठरू शकते. यामुळे पुरुषांमध्ये पाठीच्या खालच्या भागात तापमान वाढते, ज्यामुळे शुक्राणूंची संख्या देखील कमी होते आणि टेस्टिक्युलर कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाचा कॅन्सर देखील होऊ शकतो. पण या संशोधनाचे ठोस निष्कर्ष येणे बाकी आहे.

असे कपडे घालणे टाळावे
• कोणतेही कपडे घातल्यावर त्वचेवर डाग पडत असतील तर ते घालू नका.
• टाइट कपडे घातल्याने त्वचा लाल होत असेल तर ते घालू नका.
• श्वास घेण्यास त्रास होत असेल तर असे कपडे घालणे टाळावे.

कोणती काळजी घ्यालं?
जर तुम्ही टाइट कपडे घालत असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही ब्रा, अंडरवेअर सारखे आतील कपडे खूप टाइट घालत असाल तर याकडे लक्ष द्यावे. याशिवाय जिमसाठी घालण्यात येणारे टाइट कपडे देखील समस्या निर्माण करू शकतात. नेहमी स्वच्छ धुतलेले कपडे घालावे.

भीमराव मून यांची मारेगाव पोलिसात तक्रार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगांव पोलीस स्टेशन हद्दीत नवरगाव (धरण) येथे 26 मार्च 2024 रोजी घोंसा येथील प्रजोत मून (वय 21) याचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली होती. प्रजोतचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर त्याने विष प्राशन केले असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले.

मात्र, प्रजोत चे वडील भिमराव मुन रा. रासा (ता.वणी) यांनी मारेगाव पोलीसात तक्रार दाखल करून आपल्या मुलाची आत्महत्या नसून त्याची हत्या झाल्याचे दिलेल्या तक्रारीतुन आरोप केला आहे. तक्रारीत असेही म्हटले आहे की, प्रजोत हा मंगळवारी 26 मार्च रोजी सकाळी साडे आठ वाजता घरून कामावर निघुन गेला. परंतु संध्याकाळपर्यंत तो घरी परत न आल्यामुळे त्यांनी त्याच्या मोबाईल वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चिंतेत आलेल्या मून कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी (ता.27 मार्च) ला वडील भिमराव मुन आणि त्यांचे दोन भाऊ वणी येथे प्रजोतच्या मित्रांना भेटून त्याच्याबाबत चौकशी करत होते. त्याची तक्रार देण्यासाठी गेले असता त्याच वेळी वणी पोलीसांनी त्यांना नवरगाव धरण (ता. मारेगाव) परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती दिली. भिमराव मुन आणि त्यांच्या बंधूंनी जाऊन मृतदेहाची बघितला असता तो प्रजोतच असल्याचे दिसून आले. 

भिमराव मुन यांनी तक्रारीत पुढे असे म्हटले की, प्रजोतच्या जवळ विषारी द्रव्य मोनोशीलचा डब्बा आढळून आला आहे. त्यामुळे त्याच्या मुलाला विष पाजून हत्या केल्याचा संशय आहे. त्यामुळे प्रजोत याच्या मृत्यूची सत्यता शोधण्यासाठी त्याच्या मोबाइलवर आलेल्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत झालेल्या संभाषणाचा तपास करावा. तसेच, हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. 

मारेगाव पोलीस स्टेशनचे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सदर घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर सावंत यांच्याकडे दिला असून या प्रकरणीतील प्रत्येक बाबींची बारकीने सखोल चौकशी करून, प्रत्येक गोष्टीवर तपास, स्पॉट पंचनामा योग्यरित्या केला जाईल आणि जे सत्य असेल ते समोर आणण्याचा प्रयत्न असेल, प्रजोत च्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. त्याच्या मोबाईलचा तपासही केला जात आहे,असेंही त्यांनी सांगितले. 

गजानन तामगाडगे यांचे निधन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील रहिवासी गजानन श्रावण तामगाडगे (73) यांचे सोमवारी सायं. 6 वाजता अल्पशा आजाराने 
राहते घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी दुपारी12 वाजता मारेगाव प्रभाग क्र.17 मधील राहत्या घरून निघेल. ते अनिल तामगाडगे यांचे वडील होत.

'ती'चे अश्लील क्षणचित्रे सोशल मिडियावर वायरल करणाऱ्या संशयित आरोपीला अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे अश्लील क्षणचित्रे सोशल मिडियावर शेअर करून तीची बदनामी केल्याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून अनिल लेतू आत्राम (28) रा. सुसरी असे संशयित आरोपीचे नाव आहे.

वणी तालुक्यातील विद्यार्थीनी ही त्याच तालुक्यातील एका महाविद्यालयमध्ये उच्च शिक्षण घेत असल्याचे समजते. पिडीत युवतीचे संशयित आरोपी हा तिच्या नात्यातीलच असल्याचेही समजते. अशातच या दोघांचे मनोमिलन होत गेले आणि एकमेकांची जवळीकता वाढली. सिर्फ तुम म्हणत "शुभमंगलम सावधान" च्या आणाभाका घेतल्या. दरम्यान,च्या वारंवार भेटीगाठीने दोघांपैकी एकाच्या घरचा या राजाराणी च्या जोडीचा प्रतिबंध असल्यामुळे आरोपीने लग्न कार्यातून माघार घेतल्याने पिडीतेने त्याचा "ध्यास"च अंतरंगातून काढून टाकत ओन्ली 'स्टडी' वर फोकस केले.

दरम्यान च्या काळात पीडित युवती वसतिगृहाकडे जात असतांना संशयित आरोपीने तिला शस्त्राचा धाक दाखवून इम्पॉर्टन्ट आहे, चल म्हणून तिला दुचाकी वर बसून दोघे गेले. शहराच्या निर्जनस्थळी जाऊन जबरदस्तीने रासलीला करित विवस्त्र अवस्थेत तीचे क्षणचित्रे काढले. धाक दाखवून नको ते मोबाईल समोर बोलायला लावले आणि या सर्व अश्लील प्रकाराचे 'शूट' सुद्धा केले. त्यानंतर दोघे परत आले आणि वणी शहरातील मुख्य चौकात तीला सोडून संशयित आरोपी निघून गेला. मात्र,आरोपी इथेच थांबला नसून त्याने घरून व्हिडीओ कॉल वर अंगप्रदर्शणास तिला पुन्हा भाग पाडले. या घटनाचे शुट करून त्याचे स्क्रीन शॉट काढले व त्याने "फेसबुक"या सोशल माध्यमातून  व्हायरल केल्याने माझी बदनामी झाली असा, थेट आरोप करत पिडीतने मारेगाव पोलीसात धाव घेत तक्रार दाखल केली.

मारेगाव पोलिसांनी तपासाची चक्रे अतिशीघ्र करून पोलीस उपनिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर सावंत, राजू टेकाम यांनी आरोपीला हैद्राबाद येथून अटक केली असून त्यांचेवर विविध कलमान्वये तसेच सह कलम व माहिती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

उमेदवारासाठी प्रचारदूत बनला सोशल मिडिया

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सोशल मिडिया हा आजकाल परवलीचा शब्द बनला आहे. त्यामुळे कोणत्याही निवडणुकात या आधुनिक तंत्राचा वापर होणे अपरिहार्य आहे. काळ बदलला आणि त्यानुसार आचारसंहितेचे नियम अधिक कडक झाले. साहजिकच प्रचाराचा कालावधी कमी झाला. पारंपरिक प्रचाराची जागा आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली. त्यामुळे केवळ एका 'क्लिक'ने लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची सोय उमेदवारांना आयतेच उपलब्ध झाली. 

पदयात्रा, मतदारांशी वैयक्तिक संपर्क, कानाकोपऱ्यातील सभा यांचे महत्त्व आजसुद्धा कमी झालेले नाही. तथापी, त्याचबरोबर फेसबुक, व्हॉटसप, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) यासारख्या माध्यमांतून लोकसभेच्या उमेदवारांचे समर्थक पोस्ट टाकल्या जात आहेत. सोशल मिडिया म्हणजे प्रत्येक पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचारदूत बनला आहे. लोकसभा निवडणुकीत सोशल मिडीयाचा प्रभाव पडणार आहे. म्हणूनच निवडणूक आयोगानेही यावर नजर ठेवण्याची तयारी केली आहे. परंतु राजकीय पक्षाकडून आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या पोस्ट टाकण्याचा सपाटा लावला आहे. मतदारावर सोशल मिडियाच्या माध्यमातून एकतर्फी भडिमार होऊ शकतो. सोशल मिडियाचा योग्य उमदेवाराची निवड करताना उपयोग होऊ शकतो. यासाठी सोशल मिडियाला एक व्यासपीठ बनविता येईल. 

लोकशाहीच्या मंदिरात स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार या माध्यमातून आपली दावेदारी सादर करू शकतात. आज सोशल मिडिया राजकीय पक्षासाठी एक नवे साधन म्हणून पुढे आले आहे. चंद्रपूर-वणी- आर्णी लोकसभा निवडणुकीचा विचार करता सोशल मिडियावर राजकीय पक्षाची सक्रियता बघायला मिळत आहे. मतदान जवळ आल्यानंतर सोशल मिडियावरील प्रचाराचा भडीमार अधिक वाढणार आहे. विविध प्रकारचे फोटो, व्यंगचित्र, व्हिडोओ च्या माध्यमातून प्रचार करीत आहेत. सोशल मिडियावरील राजकीय पोस्टवर नजर ठेवणे अवघड आहे. त्यामुळे मतदारात संभ्रम वाढण्याची शक्यता आहे. अनेकांनी राजकीय पोस्ट टाकणाऱ्यांना आपल्या यादीतून डिलीट करणे सुरू केले आहे. निडणुकीच्या कालावधीत सोशल मिडियावर प्रत्येक तिसरा मेसेस हा राजकीय पक्ष, कार्यकर्ते यांच्याशी निगडीत आहे. 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत पारंपरिक प्रचार जवळपास लुप्त झाल्याचे दिसून येत आहे. त्याची जागा पूर्णपणे सोशल मिडियाने घेतली आहे. 

प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपापले सोशल मिडिया सेल वर्षभर आधीपासूनच कार्यान्वित केले. थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीचा पर्याय म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांनी याचा पुरेपूर वापर करायला सुरुवात केली आहे. ही सगळी आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही तसेच चित्र दिसत आहे. त्यामुळे उत्तरोत्तर हायटेक प्रचाराचा फंडा वाढत जाईल, यात काही शंका नाही!