CBSE कडून 2024-25 साठीचा अभ्यासक्रम जाहीर; नव्या Syllabus सह 'हे' आहेत महत्त्वाचे बदल..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईने शैक्षणिक सत्र 2024-25 साठीचा दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर नवीन सत्र 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे.

▪️सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा संपल्या असून बारावीच्या परीक्षा 2 एप्रिल रोजी संपणार आहेत. मात्र या परीक्षांचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच सीबीएसईने आभ्यासक्रम जाहिर केला आहे. 

नवीन अभ्यासक्रमानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना 5 विषय सक्तीचे असणार आहेत. त्याचबरोबर दोन ऐच्छिक विषयही देण्यात येणार आहेत. तसंच, बारावीसाठी 7 विषय अनिर्वाय करण्यात आले आहेत. यंदा सीबीएसईने अभ्यासक्रमाचे वर्गीकरण केले आहे. माध्यमिक आणि वरिष्ठ या दोन श्रेणींमध्ये विभागला गेला आहे. माध्यमिक अभ्यासक्रम म्हणजे 9 ते 10 आणि वरिष्ठ माध्यमिक म्हणजे इयत्ता 11 आणि 10 या पद्धतीने श्रेणींमध्ये विभागण्यात आला आहे. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थी याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. 

इयत्ता 10 वी साठी पाच विषय अनिवार्य असतील तर दोन ऐच्छिक असतील. तर, इयत्ता 10 वीच्या अभ्यासक्रमात भाषा, मानविकी (Humanity), गणित, विज्ञान, कौशल्य विषय, सामान्य अध्ययन आणि आरोग्य आणि शारीरिक शिक्षण यासह सात मुख्य विषयांचा समावेश आहे. 

2024-25 साठी CBSE इयत्ता दहावी आणि बारावी अभ्यासक्रमासाठी सूचना

• सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर www.cbseacademic.nic.in वर जाऊन शैक्षणिक टॅबवर क्लिक करा
• 'सत्र 2024-25 साठी माध्यमिक आणि वरिष्ठ शालेय अभ्यासक्रम' या टायटलवर क्लिक करा
• PDF फाइल उघडण्यासाठी लिंकवर क्लिक करा 
• ही PDF फाइल डाऊनलोड करुन ठेवा. पुढील प्रक्रियेसाठी या फाइलची प्रिंट करुन ठेवा. 

सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आगामी शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता तिसरी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके सादर करण्यात येणार आहे. तर, उर्वरित इयत्तांचा अभ्यासक्रम आधीच्याच पाठ्यपुस्तकांसह सुरू राहणार आहेत.


लिंबू ही जगाला भारताने दिलेली देणगी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

उन्हाळा आला, आरोग्य सांभाळा हा सल्ला आता सर्वांनाच देण्याची वेळ आली आहे. उन्हाळा म्हटले कि सर्वप्रथम आठवण येते ती शरीर आणि मनाला ताजगी देणाऱ्या लिंबू सरबताची. उन्हाळा आला कि लिंबाचे दर वाढू लागतात पण तरीही तापत्या उन्ह्यातून आल्यावर थंडगार लिंबू सरबत हे अनेकांचे आवडते पेय असते. सायट्रस कुळातील हे फळ अतिशय उपयुक्त असून आरोग्यदायी आहे. ताजेपणा देणारे, तोंडाची रुची वाढविणारे, आजारपण दूर करणारे हे करामती लिंबू मूळचे भारतीयच आहे. 

हडप्पा येथे केलेल्या उत्खननात सापडलेल्या अवशेषात लिंबू पाने याचा उपयोग दिलेला आढळला आहे. प्राचीन काळात भारतात लिंबाचा वापर केला जात होता याचे अनेक पुरावे आहेत. लिंबू ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे. प्राचीन काळात पाण्यात मिसळून लिंबू सेवन केले जात असे त्यामुळे वेगळीच उर्जा, वेगळी चव मिळत असे असे उल्लेख येतात. म्यानमार आणि चीन मध्येही लिंबू प्राचीन काळापासून वापरले जात आहे. मोंगल काळात जे प्रवासी आले त्यांनी त्यांच्या प्रवासवर्णनात लिंबाचा उल्लेख केलेला आढळतो. बादशहा बाबर यांच्या सरदाराने म्हणजे अमीर खुस्रो यांनी लिहिलेल्या ग्रंथात लिंबाचे उल्लेख आहेत. चरक संहितेत लिंबाचे उपयोग नोंदले गेले आहेत तर विजयनगर राज्यात १६ व्या शतकात आलेल्या परदेशी प्रवाशांची नजर लिंबाच्या झाडांवर पडल्याचे उल्लेख येतात. लिंबाचे एक विशेष म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी अश्या कुठल्याही पदार्थात याचा वापर होतो. सरबतापासून सोडा, मद्य यात लिंबाचा झणझणीत स्वाद हवाच. शिकंजी मध्ये लिंबू हवेच.

लिंबाचे औषधी उपयोग अनेक आहेत. पचन व्यवस्थित होण्यासाठी लिंबू उपयुक्त आहेच पण तोंडाची रुची वाढविण्यासाठी लिंबू लोणचे फार उपयुक्त ठरते. लिंबामध्ये ए, बी, सी जीवनसत्व आहेत त्याचबरोबर पोटेशियम, मंगनीज, आयर्न, तांबे, फॉस्फरस अशी अनेक क्षार आहेत. प्रोटीन आणि कर्बोदके सुद्धा आहेत. सर्दी, रक्तक्षय, पचन विकार, उष्णता शमन अश्या अनेक आजारात लिंबाचे सेवन फायद्याचे ठरते. लिंबू शुक्राणू मारते, इतकेच काय पण एचआयव्ही विषाणू सुद्धा मारते त्यामुळे याचा वापर गर्भनिरोधक म्हणून सुद्धा केला जातो. ऑस्ट्रेलियन संशोधकाने लिंबातील हे गुण शोधून काढल्याचे सांगतात.


मराठा समाजाकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण सुरू; प्रश्नावली आली समोर...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

काल अंतरवलीत झालेल्या बैठकीनंतर मराठा समाजाकडून गावागावात सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले असून या सर्वेक्षण दरम्यान आठ प्रश्न करण्यात आलेत. त्यानंतर मराठा सामाज कोण कोणत्या मतदार संघातून आपले उमेदवार उभे करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नेमक कसा आहे हा सर्वेक्षण फॉम :

1. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात यावे का?....
• होय/नाही
अभिप्राय................

2. मराठा समाजानी येणारी लोकसभा निवडणूक लढवावी का.?....
• होय/ नाही
अभिप्राय...........

3. लोकसभा निवडणूक प्रत्येक जिल्हातून एक अपक्ष उमेदवार ‌द्यावा का.?....
• होय/ नाही
अभिप्राय........

4. प्रत्येक गावातून दोन उमेदवार योग्य का?....होय/नाही
अभिप्राय.........

5. कोणत्याही राजकीय एका पक्षाला आपण पाठिबा देणे योग्य का.?...
• होय/नाही
अभिप्राय.......

6. आपल्या कटुंब मतदान संख्या किती ?.... 
• संख्या..

7. आरक्षण प्रश्न मार्गी लावणारा कोणत्याही जाती धर्माचा उमेदवार चालणार का.?
• होय/नाही किंवा फक्त मराठा 
अभिप्राय,.....

8. जिल्हातून लोकसभा मराठा समाजच्या निश्चित उमेदवार यांना तुम्ही मतदान करणार का.?...होय/नाही
अभिप्राय..........

हे आठ प्रश्न प्रमुख्याने विचारण्यात आले आहेत.


अखेर लोकसभेची उमेदवारी प्रतिभाताई धानोरकर यांना घोषित

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराबाबत राज्यासह जिल्ह्यात जोरदार रस्सीखेच असल्याची चर्चा होत होती, प्रत्येक उमेदवार आपला दावा मांडण्यात गर्क होता.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चंद्रपूर लोकसभेतील विरोधी पक्षनेते आमदार विजय भाऊ वडेट्टीवार आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात जोरदार चर्चा रंगली होती. ज्यावर आज काँग्रेस हायकमांडने पूर्णविराम लावला आणि अखेर चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत प्रतिभाताई धानोरकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
मात्र, एकीकडे भाजपाचे लोकसभा उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केलेले वक्तव्य कितपत सफल ठरते हे पाहणे औस्तूक्याचे ठरणार आहे. कारण ते वणी येथील बुथ कार्यकर्ता मेळाव्याला संबोधिताना म्हणाले होते की, काँग्रेस चा उमेदवार कोणीही असो, निवडून येणार एनडीएचाच उमेदवार. त्यामुळे आता चंद्रपूर लोकसभा निवडणूक धानोरकर यांना उमेदवारी मिळाल्याने चांगलीच रंगणार असल्याचे जनसामान्यातून बोलल्या जात आहे. 


सत्ताधाऱ्यांना मतदानातून धक्का द्यायची हिच वेळ आहे, मतदान करण्यासाठी सज्ज रहा - संतोष कुळमेथे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राजुरा : देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झालीत अजूनही आदिवासी समाजाचा विकास आज पावतो सत्ता भोगणाऱ्या पक्षानी आदिवासी समाजाचा अशिक्षितेचा फायदा घेत राहिले. व 25 किलो राशन व 1 लाखाचे घरकुल ह्या शिवाय काहीच आदिवासींना दिले नाही ह्यांची जाणिव सद्याच्या घडीला असलेल्या युवकांना समजून आलेले आहे.

गेल्या काही काळात आदिवासीनी जे प्रश्न घेऊन आंदोलने केली त त्याचा एकही प्रश्न मार्गी लागला नाही. सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय पण विद्यमान सरकार मानायला तयार नाही. मणिपूर असो, हसदेव असो, सुर्जागड असो वा गडचिरोली, छत्तीसगड, म.पी. (MP) मधील विविध समस्यावर कधीही सरकार तर्फे पाऊल उचलले गेले नाही. बळजबरी व बंदुकीच्या जोरावर आंदोलने मोडून काढली गेली. 3 वर्षांच्या मुलीला गोळी घालून ठार केले गेले, नक्सलवादी नावाखाली हे कितपत योग्य वाटते. जे लोक ह्यांचे ऐकणार नाही त्यांना जेल किंवा कुठ अडकवून ठेवतील हे आताच असे आहे तर अजून येथील तर कुठ नेऊन ठेवतील आदिवासींना, असें सामाजिक कार्यकर्ते संतोष कुळमेथे यांनी माध्यमातून बोलताना सांगितले.

आपल्याला आता मतदानाचा अधिकार बजावून कश्या प्रकारे ह्यांना रोकता येईल.याचे नियोजन आदिवासी समाजातील जाणकार व्यक्ती नी करावे, बूथ बूथ वर आपली टीम आपली माणसे आपल्या लोकांना समजवून सांगण्यासाठी तय्यार केले आहेत. घ्या सूड गेल्या 75 वर्षाचा, घ्या सूड आपल्या क्रांतीकारांचा, ज्याचा इतिहास दडपवून आमच्यात डोक्यात डरपोकांचे माफिवीरांचे विचार घालणाऱ्यांचा, घ्या सूड तुम्हाला पेसा कायदा पासून वंचित राहणाऱ्यांचा, ही संधी 5 वर्षात एकदाच येईल. आपण विजयी नाही झालो तरी ह्यांना पाडून आपल्या मताचा पावर दाखवून द्यायचा. मत मागायला आले तर सरळ विचारा किती प्रश्न आमचे गेल्या 5 वर्षात आपण भवनात मांडले,तेव्हा कुठ आम्हाला हे महत्वाचे समजतील.

आमच्या समाजाच्या व्यक्ती नी सुद्धा उमेदवारी अर्ज भरला असेल,ह्यांची सुद्धा योग्यता चेक करा. अनेक जण मतदान विभाजन करण्यासाठी सत्ताधारी पक्ष तर्फे पैसे घेऊन उभे राहतात. त्यामुळे माझ्या समाजाने सावध राहावे, हीच अपेक्षा करतो असे मत संतोष कुळमेथे आदिवासी टायगर सेना विदर्भ अध्यक्ष ह्यांनी माध्यमातून आदिवासी समाजाला आव्हाहन केले आहे.