निसर्गाच्या सानिध्यात पत्रकार तुरणकर यांचा वाढदिवस साजरा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : माजी नगरसेवक (वणी) तथा लोकवाणी जागर ई-न्यूज पेपरचे संपादक राजूभाऊ तुरणकर यांचा वाढदिवस मांगरूळ (रोड) येथील चापली पवनसूत रोपवाटिका मध्ये उत्साहात साजरा करण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार माणिक कांबळे, लढा चे प्रवीण भाऊ खानझोडे, दीपक डोहणे, दिलदार शेख, महिला पत्रकार प्रतिभा तातेड, आनंद नक्षणे, प्रेस सपादक चे तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम, पंकज नेहारे, कैलास मेश्राम, रवि घुमे, कुमार अमोल, प्रामुख्याने उपस्थित होते. या निमित्ताने केक कापून त्यांना निरोगी दीर्घायुष्याच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.

जातपात, धर्मांधता नष्ट करून शोषण विरहित समाजव्यवस्थे साठी भगतसिंगांचे विचार व कृती आजही प्रासंगिक - राजूर येथील मान्यवरांचा सूर


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राजूर कॉलरी : इंग्रजांनी स्वातंत्र्य चळवळीला कमजोर करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर धार्मिक विभागणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये इंग्रज यशस्वी झाले, त्याबरोबर देशात परंपरेने आलेला जाती वाद होता. त्याकाळात भगतसिंगांनी वृत्तपत्रात अनेक लेख लिहिले तसेच अनेकदा रस्त्यावर उतरून एकात्मता निर्माण करण्यासाठी जागृती केली. आज स्वातंत्र्याचा ७५ वर्षानंतर पुन्हा एकदा जातीवादाने व धर्मांधतेने डोके वर काढले आहे, अश्या वेळेस शहीद भगतसिंगांचे विचार व कृती आजही प्रासंगिक असून तरुणांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी असे आवाहन करणारे सूर राजूर येथे झालेल्या शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांचा २३ मार्च शहीद दिना निमित्त झालेल्या अभिवादन कार्यक्रमात वक्त्यांनी काढला.

राजूर येथे असलेल्या शहीद भगतसिंग चौकात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला शिक्षिका छाया काटकर व शंकर हीकरे यांचे हस्ते मेणबत्ती प्रज्वलित करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

या अभिवादन कार्यक्रमात कॉ. कुमार मोहरमपुरी, शिक्षिका छाया काटकर, मुख्याध्यापक महेश लिपटे व कवी गायक राजेंद्र पुडके यांनी आपले विचार मांडले तसेच पुडके यांनी सुमधुर आवाजात गीते सुद्धा सादर केली.

यावेळेस बंडू ठमके, संजय कवाडे, संजय काटकर, साजिद खान, गौतम कवाडे, वर्मा काका, ओम पवार, ऍड.अरविंद सिडाम, दिशा पाटील, अमर फुलझेले, वर्षा सिडाम, अशफाक अली, राजेश मानवटकर, शांताराम फुलझेले, संतोष गेडाम, अमित करमरकर, जाबिर अली, शेख साबीर, संजय पाटील, कवडू करमरकर, सिनु कलवलवार, सागर नगराळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

माध्यम क्षेत्रातील विपुल ज्ञानाचे धनी श्री. राजूभाऊ तुरणकर यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..


अभिष्टचिंतन | वाढदिवस 

आज 24 मार्च 

हा दिवस तुमच्यासारखाच खास असू दे. तुमच्या आयुष्यातील सर्व आनंदी, लहान क्षणांचा आनंद घेणे कधीही थांबवू नका. तुमच्या उत्तम आरोग्यासाठी! आम्ही प्रार्थना करतो. वाढदिवसासारखा संस्मरणीय आणि तुमचा आजच्या वाढदिवसापेक्षा अधिक विलक्षण वर्ष असू दे!

आयुष्यात अनेक व्यक्ती येतात आणि निघुनही जातात पण काही असे असतात जे शेवटच्या श्वासापर्यंत आपली साथ देत असतात. आमच्या प्रत्येक चांगल्या वाईट काळात आमच्या पाठीशी उभा राहणाऱ्या आमचे जिवलग बंधुराज, उत्तम मार्गदर्शक तथा वणी विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, गोरगरीब लोकांच्या मदतीला सदैव धाऊन जाणारे व्यक्तिमत्व,लोकवाणी जागर ई माध्यमचे मुख्य संपादक मा श्री राजूभाऊ तुरणकर यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी निर्मिकाकडे प्रार्थना...

अत्यंत मनमिळावू प्रामाणिक अणि शांती संयमी स्वभावाच्या बंधुराजास या जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा...!!

शुभेच्छुक :- सह्याद्री चौफेर परिवार, (महाराष्ट्र राज्य) व मित्र परिवार.वणी-मारेगाव 

शिरीष अवताडे यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश

 
सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

 वणी : विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील शिंदे गटात गेलेल्या अनेक शिवसैनिकांनी काल संजय देरकर यांचे निवासस्थानी वणी विधानसभा संपर्क प्रमुख संतोष माहुरे, माजी उपजिल्हा प्रमुख दिपक कोकस, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचे प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेतला. लाठी-लालगुडा सर्कल भुरकी येथील उपसरपंच तथा शाखा प्रमुख विनोद दानव, शाखाप्रमुख सुमित कुमरे, रामा गाडगे, मनोहर कनाके, विलास वाढई, विनायक पिंपळकर, रांगणा येथील तुळशीराम सातपुते, कैलास सालुरकर, कोंडू काळे, गोविंदा कुमरे, नांदेपेरा येथील अजय भोसले शाखाप्रमुख, विजय राजूरकर उपशाखा प्रमुख, शिरीष अवताडे यांच्या सह नांदेपेरा 2 मधील संतोष दूमोरे, पवन पेचे व असंख्य शिवसैनिकांनी प्रवेश केला, यावेळी नेताजी पारखी, जगन जुनगरी, कैलास मेश्राम हे उपस्थित होते.

देश विरोधी निर्णय घेणाऱ्या भाजपला निवडणुकीत हरविण्याचे जनतेला आवाहन -माकप


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : आर एस एस ची राजकीय संघटना असलेली भाजपचा मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात देशविघातक जन विरोधी कायदे, धोरणे व निर्णय घेत देशाला रसातळाला नेऊन ठेवले असून देशावर गेल्या ७० वर्षाचा अपेक्षा तीन पट कर्ज वाढवून देशातील नागरिकांवर प्रचंड कर्जाचे डोंगर उभे करून ठेवले आहे. एवढे कमी म्हणून की काय पेट्रोलियम पदार्थांवर प्रचंड कर लावून तीन पट डिझेल पेट्रोल व गॅस चे दर वाढवून देशात प्रचंड महागाई वाढवून जनतेचे कंबरडे मोडले आहे.

दुसरीकडे शेतकरी विरोधी काळे कायदे करणे, संविधान विरोधी निवडणूक रोखे द्वारे भांडवलदारांकडून प्रचंड निधी उकळणे, ४४ कामगार कायदे रद्द करून भांडवलदार धार्जिणे ४ श्रम संहिता आणून श्रमिकांचे शोषण करण्यासाठी मोकळीक देणे, नवीन शैक्षणिक धोरण आणून सार्वजनिक शिक्षण व्यवस्था संपविणे, सी ए ए कायदा लागू करून धार्मिक मतभेद निर्माण करून विशिष्ठ धर्माला टार्गेट करून त्यांच्यावर अन्याय करणे, दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार देऊ म्हणून निवडणूक जिंकून गेल्या ४० वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी वाढली, शासकीय रिक्त जागा न भरणे, सार्वजनिक उद्योग विकणे, शासकीय जागांचे खाजगीकरण करणे, ई डी, सी बी आय, निवडणूक आयोग, ह्यांचा गैर वापर करून विरोधी पक्षातील लोकांना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना टार्गेट करून त्यांना तुरुंगात टाकने, आदी संविधान विरोधी निर्णय घेऊन भाजपने जनविरोधी कार्य केल्याने ह्या सरकारला सत्तेवरून पायउतार करून येत्या निवडणुकीत "संविधान बचाव, लोकशाही बचाव, देश बचाव " ह्या देशव्यापी आंदोलन अंतर्गत देशात समाजवादी समाजव्यवस्था आणण्यासाठी व देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू ह्यांना इंग्रजांनी २३ मार्च दिनी फासावर लटकविण्यात आले, त्याचा दिनाचे निमित्ताने त्यांचा क्रांतिकारी विचारांना जिवंत करीत आज दिनांक २३ मार्चला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेचा वतीने वणीत निदर्शने आंदोलन ठेवण्यात आले होते. परंतु आचारसंहिता लागल्याने पोलीस विभागाकडून आंदोलनाची परवानगी नाकारल्याने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर पक्षाने बैठक घेऊन येणाऱ्या निवणुकित भाजपला हरविण्या साठी कंबर कसून जनतेत जागृती करण्याचे निर्णय घेण्यात आले.

यावेळेस कुमार मोहरमपुरी, ऍड. दिलीप परचाके, मनोज काळे, नंदू बोबडे, सुधाकर सोनटक्के, कवडु चांदेकर, गजानन ताकसांडे, संजय वालकोंडे, संदीप मोहारे, शंकर गाऊत्रे, वाघु सिडाम, संजय कवाडे, प्रीति करमरकर, किरण बोंसूले, वंदना ठाकरे, दिनकर सरोदे, लालू दडांजे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.