आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना करण्यात येणाऱ्या दूध पुरवठ्याबाबत झालेल्या आरोपासंदर्भात आदिवासी विकास विभागाने केला खुलासा….


शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुगंधी दुध २०० मि.ली. (टेट्रापॅक) पुरवठ्याबातच्या खरेदीबाबतची टिपणी.

आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासन निर्णय आदिवासी विकास विभाग, दिनांक 30.12.2020 मधील तरतुदीनुसार सुगंधी दुध पुरवठयाबाबत तरतुद आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळा हया अतिदुर्गम भागात असल्याने तेथे दररोज दुध पुरवठा करणे शक्य नसल्याने टेट्रापॅक मध्ये सुगंधी दुध पुरवठा करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

सदर निविदेचे मुल्य ठरवतांना टेट्रापॅक उत्पादन करणारे उत्पादक (डेअरी) तसेच महानंद डेअरी तसेच इतर नामांकित उत्पादकांकडून दर प्राप्त करुन घेण्यात आले होते. त्यानुसार सदर दरांची सरासरी रु. 27.70 प्रती 200 मी. ली. टेट्रापॅक इतका दर निश्चित केला होता.

खरेदी धोरणानुसार पार पडलेल्या निविदाप्रक्रियेत एकूण सहभाग घेतलेल्या पात्र निविदाकारांचा तपशिल व त्यांनी नमूद केलेले दर खालीलप्रमाणे आहे :
 उक्त तपशिलानुसार 5 निविदाकारांपैकी 4 निविदाकारांचे दर अपर आयुक्त निहाय न्युनतम आहेत व महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मर्या. मुंबई यांचे दर जास्त होते. न्युनत दरधारक यांचेशी वाटाघाटी करुन सर्व अपर आयुक्त निहाय एकच दर रुपये 26.25 प्रति 200 मि. ली. टेट्रापॅक असा निश्चित करण्यात आला होता. दिनांक 12.01.2024 रोजी चारही पुरवठाधारक यांना अपर आयुक्त निहाय पुरवठा आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. यानुसार टेट्रापॅक दुधाची रु. 131.25 प्रती लीटर अशी होते. यामध्ये सर्व कर व अति दुर्गम भागातील 497 आश्रमशाळा स्तरावर पोहोच आहेत.

सदर निविदेत महानंद डेअरी यांनी देखील सहभाग घेतला होता. तथापि महानंद डेअरी यांचे दर जास्त होते. त्यामुळे न्युनतम दरधारक यांचेशी अजुन वाटाघाटी करुन सदर दर रु.26.25 निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे महानंद डेअरी व न्युनतम दरधारक यांचे दरामधील फरकानुसार रु. 33 कोटी रुपयाची शासनाची बचत झालेली आहे. तसेच उक्त खरेदी प्रक्रिया शासन निर्णय उद्योग उर्जा व कामगार विभाग दिनांक 01.12.2016 मध्ये विहीत केलेल्या मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करुन राबविण्यात आली आहे.

शासकीय आश्रमशाळेतील विदयार्थ्यांना वाटप करण्यात येत असलेले सुगंधी दुध यामध्ये Homogenized & Pasteurized Milk Fat % -3.0 to 3.5 S.N.F. %-8-5 Min Meeting FSSAI Standard of flavoured milk असा दर्जा ठेवण्यात आला आहे. विभागामार्फत विदयार्थ्यांना देण्यात येणारे सुगंधी टेट्रापॅक मधील दुध हे आहेत त्या स्थितीत पॅकेट फोडुन तात्काळ पिण्यास योग्य व पोषणमुल्य असलेला आहे. बाजारात उपलब्ध असलेले टेट्रापॅक हे 1 लिटर मध्ये आहे तसेच ते सुगंधी दुध आणि पिण्यास तात्काळ उपलब्ध होईल अशा स्वरुपात नाही. तरी निविदेत विहीत केलेल्या स्पेशिफीकेशनचे सुगंधी दुध विदयार्थ्यांना तात्काळ उपलब्ध व पिण्यास योग्य असुन विदयार्थी सदर दुध आवडीने पितात.

विहिरीत पडून 23 वर्षीय शेतकरी पुत्राचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या सराटी येथील एका शेतकरी पुत्राचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

निखिल उत्तम ठमके (अंदाजे वय 23) रा.सराटी असे विहिरीत पडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या कुटुंबाकडे तीन एकर शेत आहे. मृतक हा आपल्या शेतात शेती कामे करण्यासाठी गेला होता. तहान लागल्याने तो विहीरी वर पाणी पिण्यास गेला असताना विहिरीतील पाणी काढत असताना त्याचा तोल जाऊन विहिरीत पडला. ही घटना 21 मार्चचे सायंकाळी पाच वाजता दरम्यान घडली आहे.
सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना देण्यात येऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरणीय तपासणी करिता मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले होते, तपासणी नंतर सराटी येथील मोक्षधामात शुक्रवारी 22 मार्च ला अत्यसंस्कार करण्यात आला. त्याच्या पश्चात आई-वडील व चार बहिणी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

जाहीर सूचना.... सर्व जनतेस या सार्वजनिक जाहिरातीद्वारे

जाहीर सूचना....

         सर्व जनतेस या सार्वजनिक जाहिरातीद्वारे सूचित करण्यात येते कि, माझे पक्षकार श्री. राजू भानुदास डावे मो.नं. ९७६७९१८००६ रा. लाखापूर पो.नांदेपेरा ता.मारेगाव जि. यवतमाळ यांना श्री. सुशीला रामप्रसाद खंडेलवाल रा.चिखलगांव ता.वणी जि.यवतमाळ यांच्या मालकीची व ताब्यातील सर्व्हे क्र. ८३/४ प्लॉट क्र. ९ब चा सन २०२३-२४ घर नं.१२७७, क्षेत्रफळ – १४५३.१ चौ.फुट खुली जागा भूमापन क्रमांक व उपविभाग:- ८३/४/९/ब ग्राम पंचायत चिखलगाव पंचायत समिती वणी, जि.यवतमाळ येथील हि संपूर्ण जागा विकत घेण्याचा करार माझे पक्षकार श्री. राजू भानुदास डावे व श्री. सुशीला रामप्रसाद खंडेलवाल यांच्यात झाला असून सदर मिळकतीची विक्री दुय्यम निबंधक कार्यालय वणी येथे करण्याचे ठरवले असून उपरोक्त मिळकती संबंधी व त्यांचे मालकी हक्कासंबंधी कोणास काही हरकत व उजर असल्यास सदर जाहिरात प्रकाशित झाल्या पासून सात दिवसा पर्यंत उपरोक्त मिळकती संबंधी असलेल्या हरकतीस सबळ पुरावा असलेल्या दस्तऐवजाचा सह मला अथवा माझे पक्षकार श्री. राजू भानुदास डावे यांच्याशी संपर्क करण्यात यावा. उपरोक्त तारखे नंतर आलेली कोणतीही हरकत अथवा उजर लक्षात घेतल्या जाणार नाही अथवा मान्य केल्या जाणार नाही. तसेच त्यांची माझे पक्षकार यांचेवर कोणतेही कायदेशीर बंधन असणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. 

दिनांक : २२/०३/२०२४
वणी

अधिवक्ता                         
(अ‍ॅड.चंदू एस. भगत ) 
रा. कवडशी ता.वणी जि.यवतमाळ 
मो.नं. ९९२२५९२७९३

बोरी (खुर्द) शाळेने केला जागतिक चिमणी दिन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बोरी खुर्द मदनापूर जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यानी जागतिक चिमणी दिवस साजरा केला. गजानन सुरपाम यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार दीपिका मडावी यांनी मानले. प्रास्ताविक संजय चचाने यांनी केले.

सध्या चिमण्यांच्या चिवचिवाटाने सुरू होणारा दिवस अलीकडे फारसा अनुभवता येत नाही. चिमणी आपल्या सगळ्यांच्या परिचयाची असताना मात्र आज चिमण्यांची संख्या कमी होताना दिसत आहे.चिमणी जगायला हवी’याची जाणीव व्हावी यासाठी 2010 पासून 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो.
‘जागतिक चिमणी दिन’ या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचविण्यासाठीची जागृती करणे, तिचे अन्नसाखळीतील- पर्यायाने पर्यावरणातील महत्त्व समजावणे, चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे अशा प्रकारचे कार्यक्रम वैयक्तिक अगर संस्था पातळीवर आयोजित केले जातात परंतु चिमणीसाठीच्या जनजागृतीची आज काळाची गरज आहे. कमी होणारी झाडे, माणसाच्या बदललेल्या खाण्याच्या सवयी, वाढते आधुनिकीकरण, गगनचुंबी इमारतींत होणारी वाढ, मोबाइल फोन टॉवर्स या सर्व गोष्टींमुळे चिमणी अडचणीत आली आहे.

चिमणीला बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबरच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे, घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडेझुडुपे लावणे, आपल्या घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे आवश्यक असल्याचे मत गजानन सुरपाम यांनी केले.

नंदीग्राम एक्स्प्रेस वणी वरून कधी धावणार; सर्वसामान्याना लागली प्रतीक्षा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी तालुकावासीयांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असलेली 'नंदीग्राम एक्स्प्रेस' बल्लारशहा ते मुंबई या रेल्वे मार्गावर 16 मार्च 2024 रोजी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आली. मात्र दुसऱ्याच दिवसापासून ही रेल्वेसेवा बंद पडली आहे. विशेष म्हणजे उद्घाटनाच्या दिवशी सुरू झालेली रेल्वे नंदीग्राम नव्हती. केवळ लोकसभेची आचारसंहिता लागेल, या भीतीने अपूर्ण कामाचे लोकार्पण करण्याचा खटाटोप शासनाच्या वतीने करण्यात आला, असा आरोप प्रवासी करीत आहे.

वणी ते मुंबई ते रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात होती. सर्वात प्रथम ही मागणी 26 मार्च 1962 ला रेल्वे बजेटच्या चर्चेत खासदार लोकनायक बापूजी अणे यांनी केली होती. यादरम्यान तब्बल 45 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही नंदीग्राम रेल्वे अखेर 21 मार्च 2007 पासून सुरू झाली होती. नागपूर, वर्धा, वणी, अदिलाबाद, नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाड, नाशिक यामार्गे ती मुंबईला जायची. मात्र 22 मार्च 2020 पासून कोरोनाच्या उद्रेकावरील उपाययोजनेचा भाग म्हणून काही अभूतपूर्व निर्णय घेण्यात आले. त्यात राज्यात रेल्वे बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला. दि. 1 जुलै 2021 ला नंदीग्राम पूर्ववत सुरू झाली. परंतु ती अदिलाबाद-मुंबई-अदिलाबाद अशी सुरू झाली. दोन ते अडीच वर्षांनंतर बल्लारशहा, चंद्रपूर वणी व येथून मुंबई अशी रेल्वे सुरू होणार असल्याच्या बातम्या झळकल्या आणि इथेच गडबड झाली.

प्रकल्प पूर्ण झाला तर त्याच्या उद्घाटनाचा सोहळा कौतुकाचा असू शकतो. पण, अपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन करून काय साधले असा प्रश्न सर्वसामान्यातून उपस्थित केला जात आहे.