11 फेब्रुवारी ला वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर OBC, VJ, NT, SBC, चा एल्गार मोर्च्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सरकारने OBC (VJ,NT, SBC) वी जातनिहाय
जनगणना करावी तसेच मराठा समाजाल सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये व त्यांचा 'ओबीसी' मध्ये समावेश करण्यात येऊ नये या प्रमुख मागण्या व इतर 18 मागण्या घेऊन OBC (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व महिला समन्वय समिती, वणी-मारेगोव-झरी यांनी वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर 'एल्गार मोर्चा'चे दि. 11 फेब्रु 2024 ला दुपारी आयोजन करण्यात आलेले आहेत.

मागिल अनेक वर्षापासून मागणी होत असलेली ओबीसीची जात‌निहाय जनगणना केंद्र व राज्य सरकारने करावी, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना कररावी ही मागणी जातनिहाय जनगणना कृती समिली क्रीत आहेत. परंतू आत्तापर्यंत केंद्र व राज्य सरकारने ठोस पावले उचलली नाहीत. तसेच मराठा समाजाच्या दबावामुळे सरकारकडून त्यांना ओबीसीत समावेश करण्याचा घाट घातल्या जात आहे. ही बाब ओ बी सी साठी अन्याय‌कारक असून आहे. त्याचबरोबर विद्याथ्र्यांचे प्रश्न, शेतकयांचे प्रश्न, सरकारी कर्मचारी यांचे विविध प्रश्स घेऊन ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीकडून सरकारविरोधात एल्गार पुकारलेल आहेत. तरी OBC (VJ, NT, SBC) बलवेव ओबीसी तील विविध जातसमूहाने आपल्या मुलाच्या उज्वल भवितव्यासाठी, समाजाच्या भवितव्यासाठी लाखोंच्या संख्खेने मोर्च्यात मुलाबाळासहित सहकुटुंब सहपरिवार, आप्तस्वकीय, नातेवाईक, मित्रमंडळीसह सहभागी व्हावे' असे आवाहन OBC (VJ, NT SBC) ज्ञातनिहाय जनगणना कृती समितीचे अध्यक्ष, निमंत्रक यांचेसह सर्व सभासदानी केलेले आहेत, शासकीय मैदान, वणी येथुन मोर्चा प्रारंभ करून समारोप सुद्धा शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळ वणी येथे होणार आहेत. समारोप सुद्धा शासकीय मैदानात होणार आहे त्यानंतर सदर मोर्च्याच रुपांतर सभेत होऊन त्याठिकाणी सभेला डॉ. लक्ष्मण यादव (प्रसिद्ध वक्ते तथा ओबीसी विचावंत, दिल्ली) हे संबोधित करणार आहेत. सभेनंतर शिष्टमंडळ मा उप‌विभागीय अधिकारी, वणी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

शासकीय मैदानावरुन प्रारंभ करून पुरुष व महिला यांनी रांगेत संपूर्ण शहरात विविध घोषणाबाजी करित शांततेत मोच्या करावा मोर्च्या दरम्यान कोणीही हूल्लडबाजी, कोणत्याही सामाजिक संघटना वे पक्षा विरुद्ध शेरोबाजी करुन मोर्च्याला गालबोट लावू नये. हा मोर्चा कोणत्याही पक्ष व समाजाविरुद्ध नसून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आहे याची सर्व OBC CVT, NT, SBC) च्या समाज‌बांधवांनी नोंद घ्यावी असे आवाहन एल्गार मोर्चा'च्या आयोजकांनी केलेले आहेत.


मार्डी : इन्स्पायर इंग्लिश मिडीयम स्कुल येथे तिन दिवशीय स्नेहसंमेलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मार्डीत दि. 28 ते 30 जाने. असे तिन दिवशीय स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन इन्स्पायर इंग्लिश मिडीयम स्कुल येथे करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनाला उदघाटक म्हणून संस्था अध्यक्षा श्रीमती विद्याताई काळे तर अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक श्री. भास्करजी धानफुले सर होते. प्रमुख अतिथी म्हणुन सरपंच रविराज चंदनखेडे, उपसरपंचा सौ. शोभाताई कालर, रमेश खेकारे सर (मुख्याध्यापक, चिंचमंडळ), पो. पा. श्री. डॉ. प्रशांत पाटील, ग्रा.पं.सदस्य श्री. सुरेश चांगले व इतर सर्व सदस्य गण, मंगेश देशपांडे, संचालक सुभाष आवारी, मुख्याध्यापक श्री. सुमित आवारी सर व इतर पालक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

स्नेहसंमेलनाचे उदघाटन श्रीमती विद्याताई काळे व प्रमुख उपस्थित अतिथीच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. शाळेतील विद्यार्थींनी स्वागत गीत सादर करून शाळा संस्थेतर्फे मंचावरील अतिथींचे स्वागत व शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उदघाटन भाषणानंतर उपस्थित प्रमुख अतिथींनी व कार्यक्रमाचे अध्यक्षांनी विद्यार्थी व पालकांना उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. 
त्यानंतर स्नेहसंमेलनातील पुढील सुरुवात झाली. यात प्रामुख्याने फॅन्सी ड्रेस स्पर्धा, एकल नृत्य व समुह नृत्य स्पर्धा, ऍक्ट-थिम्स तसेच पालकाकरिता "आई स्पेशल" स्पर्धा असे तीन दिवस अनेक भरगच्च कार्यक्रमाचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी पालकांची व प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम 30 जाने. ला सायं. 6 वा. घेण्यात आला. यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून सौ. किरणताई देरकर, सौ. वरारकर मॅडम, उपसरपंच सौ. शोभाताई कालर, सौ. निलिमाताई थेरे सरपंच सिंधी, मंगलाताई टिपले, बेबीताई मोहूर्ले, मनिषाताई चौधरी, छायाताई पुसाटे, सुरज पंडिले, गणेश कनाके सर्व सदस्य ग्रा. पं. मार्डी, पालक प्रतिनिधी म्हणून राजकुमार बोबडे, उज्वलाताई बुरडकर, मेघाताई गानफाडे, सुशांत बोबडे उपस्थित होते.

संमेलनाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुमीत आवारी, संचालन कु. स्वाती झोटींग तर आभार प्रदर्शन कु. तृप्ती ताठे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मुख्याध्यापक सुमित आवारी, रुपेश अलोणे, गंभीर कवाडे, ऋतुजा पाटणे, शितल बरडे, स्वाती निमसटकर, शारदा वाढई तसेच शिक्षेकत्तर कर्मचारी सौ. लता रोगे, उमेश पिंपळशेंडे, अविनाश गजबे यांनी परिश्रम घेतले.

अनिल बेहराणी वणी पोलीस स्टेशन चे नवे ठाणेदार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : ठाणेदार अनिल बेहराणी यांना वणी पोलिस स्टेशनचा प्रभार देण्यात आला आहे. येथिल कर्तव्यदक्ष ठाणेदार अजित जाधव यांची जिल्हा बदली करण्यात आल्याने वणी पोलिस निरीक्षक म्हणून अनिल बेहराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस खात्यात बदल्यांचं सत्र सुरु झालं आहे. जिल्ह्यात 3 वर्ष कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्याचे आदेश धडकल्याने यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, उप पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात जिल्ह्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या वणी पोलिस स्टेशनचाही समावेश आहे.

वणी पोलिस स्टेशनसाठी मोठी चढाओढ पहायला मिळते. या ठिकाणी बदली करून घेण्याकरिता आटोकाट प्रयत्न केले जातात. वणी पोलिस स्टेशन ला ठाणेदार म्हणून नियुक्ती मिळावी याकरिता सर्वतोपरी फिल्डिंग लावली जाते. परंतु या ठिकाणी कर्तव्यदक्ष व रुबाबदार ठाणेदाराची वर्णी लागावी अशी अपेक्षा बाळगण्यात येत होती. ठाणेदार अजित जाधव यांनी आपला कार्यकाळ यशस्वीरीत्या पार पाडला. वणी पोलिस स्टेशनचा कार्यभार स्विकारल्यानंतर त्यांनी गुन्हेगारी क्षेत्रावर नियंत्रण मिळवलं. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर त्यांची वचक होती. परंतु निवडणुकीचा काळ असल्याने त्यांची जिल्हा बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर आता अनिल बेहराणी यांची ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बेहराणी यांच्याकडे वणी पोलिस स्टेशनचा प्रभार सोपविण्यात आला असून यापुढे नवनियुक्त ठाणेदार अनिल बेहराणी त्यांच्यावर शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबादारी राहणार आहे. तालुक्यातील गुन्हेगारी क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. हे विशेष...

सेवाग्राम येथून ओबीसी जनगणना संकल्प यात्रेला सुरुवात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वर्धा : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणा तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत दि. 23 जानेवारी 2024 ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत हे सर्वेक्षण पूर्ण झाले. या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेतली. 

ओबीसी राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालय खटला, रोहिणी आयोग,भारत सरकार, व निती आयोग नेहमी ओबीसी डेटा ची मागणी करते परंतु 1931 पासून आतापर्यंत ओबीसींची जातिनिहाय जनगणना न झाल्यामुळे भारत सरकारकडे डेटा उपलब्ध नाही. म्हणून अनेक वेळा न्यायालयात अथवा धोरण ठरविताना शासनाला अनेक अडचणी येतात. यामुळे मंडल आयोगाने ठरविलेल्या 52 टक्के ओबीसी समुदायावर अन्याय होत आहे.

बिहार राज्याची जनगणना यशस्वी झाली की, आपण सुद्धा समिती तयार करून जातिनिहाय जनगणना करू असे, 29 सप्टेंबर, 2023 रोजी महाराष्ट्रातील विविध ओबीसी संघटना आणि महाराष्ट्र शासन यांच्यामधे झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आश्र्वासित केले होते.

ओबीसी समाजाकडून अनेक वर्षांपासून जातिनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली जात आहे. परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. बिहार राज्याने यशस्वीरित्या जातिनिहाय जनगणना केली आहे. सोबतच आंध्र प्रदेशात सुद्धा 19 जानेवारी, 2024 पासून जातिनिहाय जनगणनेला सुरुवात झाली आहे.तेव्हा महाराष्ट्र राज्यातही जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे यासाठी ओबीसी जनमानसात जनजागरण व महाराष्ट्र शासनाला अवगत करण्याच्या उद्देशाने व ओबीसींचे 72 वसतिगृह,आधार योजना, 26 जानेवारीला काढलेली अधिसूचना रद्द करण्यात यावी व मराठ्यांचं ओबीसीकरण करू नये यासाठी ओबीसी जनगणना संकल्प यात्रेला सेवाग्राम येथून सुरवात आहे.

वरील मागणीसाठी विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ आणि चंद्रपूर या 7 जिल्ह्यातून ओबीसी जनगणना संकल्प यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रा मुख्य शहरांसोबतच ग्रामीण भागातून सुद्धा मार्गक्रमण करणार आहे.

ओबीसी जनगणना संकल्प यात्रा संयोजक उमेश कोर्राम,संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे,ओबीसी सेवा संघाचे,जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल डहाके,पियूष आकरे,कृतलं आखरे, स्नेहल बावनकर,आकाश वैद्य,नयन कालबांधे, सुभाष मोथलकर,रोहन आदेवार, प्रणय गुल्हाने,त्रिशूल कळंबे, रितिक वैद्य या यात्रेत पूर्ण वेळ सहभागी झाले आहे.या यात्रेचे सेवाग्राम, वर्धा येथे प्रा रुपेश कुचेवार,ऍड.पुरुषोत्तम सातपुते, डॉ सचिन पावडे, मनोज चांदूरकर,विलास माथनकर, सुधिर पांगुळ, प्रविण पेठे, भूषण फुसे, सुधीर ताटेवार, विजय कोपुलवार, प्रकाश बमनोटे, सौ सोनाली कोपुलवार, वसंत वडस्कर यांनी उत्साहात स्वागत केले. ही यात्रा नागपूर -भंडारा कडे रवाना झाली.

मच्छिन्द्रा येथील त्रस्त शेतकऱ्याची कैफियत ऐकून सामाजिक कार्यकर्ता नारायण गोडेंनी जिल्हाधिकाऱ्यांना केली मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : मारेगाव तालुक्यातील 42 वर्षीय त्रस्त झालेल्या युवा शेतकऱ्यांने वणी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना वहीवाटी चा रस्ता मोकळा करून देण्यात यावा अशी निवेदनातून आग्रही मागणी केली.

मारेगाव तालुक्यातील मच्छिन्द्रा येथे पांडुरंग उर्फ पंकज दत्तात्रय शेडामे हे येथील कायमचे निवासी आहे. पूर्वी त्यांना त्यांच्या घरापर्यंत बैलगाडी जाण्याजोगा एवढा रस्ता अस्तित्वात होता. त्याच रस्त्याने ते पूर्वीपासून वहीवाट करित होते, परंतु गावातील काही गैरअर्जदारांनी अतिक्रमण करून शेडामे यांचा रस्ता बंद केल्याचा त्यांचा आरोप आहे. ते गेल्या एक ते दिड वर्षांपासून रस्ता मोकळा करून द्यावा यासाठी पंचायत समिती मारेगाव, तहसील कार्यालय, जि प मुख्याधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे, तरी सुद्धा त्यांना रस्ता मिळाला नाही, असे निवेदनात नमूद आहे. मच्छिन्द्रा ग्रामपंचायत कडे लेखी तक्रार अर्ज देऊन मागणी करित होते. ग्रामपंचायतने सुद्धा लक्ष घालून वहीवाट रस्त्याची प्रोसेस केली परंतु पांडुरंग दत्तात्रय शेडामे यांना त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता अजूनही मोकळा होऊ शकला नाही, त्यामुळे त्रस्त शेतकऱ्याने वणी येथील सामाजिक कार्यकर्ता नारायण गोडे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. त्यांनी सर्व बाबी समजून घेतल्यानंतर आज वणी महसूल विभागात मा. जिल्हाधिकारी यवतमाळ हे आले असता त्यांची भेट घेऊन गोडे यांनी शेतकऱ्याचा विषय मांडला.

वणीचे तहसीलदार विवेक पांडे यांनी उपविभागीय अधिकारी, मच्छिन्द्रा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा करून कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या. असे समाजसेवक नारायण गोडे यांनी सांगितले. गैर अर्जदारांनी कायद्याचा गैरवापर करू नये म्हणत पुढे ते म्हणाले की, सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब आपण या त्रस्त शेतकऱ्याला न्याय द्यावा, शेतकऱ्याचा शेतातील माल त्याच्या घरापर्यंत गेला पाहिजे यासाठी त्यांना रस्ता आवश्यक आहे, अशी पांडुरंग शेडामे यांच्या वतीने आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ता नारायण गोडेंनी केली.

परिणामी गट ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालय मारेगाव, तहसील कार्यालय, मारेगाव, जि प मुख्याधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या कडून अपेक्षाभंग झाल्याने आता जिल्हाधिकारी यांच्या कडून आता अखेर न्यायाची अपेक्षा संबंधित शेतकऱ्याला लागली आहे.