अतिवृष्टी पिकविमा पूरपिढीत व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या - राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


महागाव | नंदकुमार मस्के 

महागाव : महागाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार) गटाच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत काल दि. ५ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले.

महागाव तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना अतिवृष्टी ची भरपाई, पीकविमा व पुरपिडित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई व आर्थिक मदत मिळणे बाबत मा. गोविंदराव देशमुख तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महागाव यांच्या वतीने निवेदन देण्यात आले, सन २०२२ ते २०२३ यावर्षा पासून सतत अतिवृष्टी व पुर नापिकी या नैसर्गिक संकटात शेतकरी सापडला असून शासनाने याची दखल घेतली नाही तसेच वारंवार या बाबी कडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली नाही याबाबत शासनाने त्वरित निर्णय घेऊन ताबडतोब नुकसान भरपाई घोषित करुन संपूर्ण बाधीत शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत घोषित करावी तसेच कापसाला किमान १० ते १२ हजार रुपये सोयाबीनला ७ ते ८ हजार रुपये भाव देण्यात यावा आणि सरसकट विमा मंजुर करण्यात यावा अशी मागणी महागाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली.

मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून,निवेदन देताना रा.काँ. शरद पवार गटाचे महागाव तालुका अध्यक्ष गोविंदराव देशमुख सवना,रा.यु. काँ.तालुका अध्यक्ष स्वप्निल अडकिने महागाव,तसेच रा.काँ.पक्षाचे महागाव तालुकाध्यक्ष तथा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विशाल पवार,वरोडी सोसायटीचे आध्यक्ष नंदकुमार मस्के, अविनाश भांगे, सतीश ठाकरे करंजखेड, उल्हास अडकिने यांच्या सह महागाव तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

कोंढीच्या सरपंच वासुदेव गेडाम यांनी पदभार स्वीकारला तर उपसरपंच पदी रेखाताई आत्राम यांची निवड

सह्याद्री चौफेर | रवी वल्लमवार 

पांढरकवडा : केळापूर केळापुर तालुक्यातील कोंढी गट ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपा प्रणित आघाडीने ग्रामपंचायतीवर थेट सरपंचपदी निवडून गेलेल्या वासुदेव पैकाजी गेडाम यांनी आज पदभार स्वीकारला तर उपसरपंचपदी रेखाताई रामु आत्राम यांची निवड करण्यात आली.

तालुक्यातील कोंढी गट ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपा प्रणीत लोकनेते माजी आमदार अन्नासाहेब पारवेकर, माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर, आमदार संदीप धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा शहर अध्यक्ष किशोर देशट्टीवार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविली असता सत्ता कायम ठेवत ४ सदस्य निवडून आले.

गट ग्रामपंचायत कोंढीच्या निवडणूकीत थेट जनतेतून सरपंच निवडुन आले, तर सोबतच ४ सदस्य निवडून आले असून आज दि. ४ डिसेंबर सोमवार रोजी उपसरपंच पदी सौ.रेखाताई आत्राम यांची एकमुखी निवड झाली. भाजपा प्रणीत कोंढी गट ग्रामपंचायत सरपंच म्हणून वासुदेव गेडाम यांनी आज पदभार स्वीकारला.

यावेळी भाजपा शहर अध्यक्ष किशोर देशट्टीवार, निलेश ठाकरे, मोबिन पटेल, माजी उपसरपंच अरुण डोळे, अतीश होले, सुधीर धोतुलवार, संजय किनाके, शालिक सुरपाम, अनिल नैताम, सुदर्शन टेकाम, अमोल आत्राम, सुरेश कोप्पुलवार, अनिल देशट्टीवार, रमेश आत्राम, श्रीराम टेकाम, नितेश पेंदोर आदी उपस्थित होते, या प्रसंगी भाजपा कार्यकर्त्यांनी नवनियुक्त संरपच, उपसरपंच, तथा सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अत्यंत गरजु लोकांची प्राधान्यक्रमानुसार निवड करा - ग्रामस्थांची मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कानडा (पार्डीं) ग्रामपंचायत येथील अपंग, विधवा, अल्पभुधारक, भुमीहीन, प्रकल्पग्रस्त, पुरग्रस्त, शेतकरी आत्महत्या अशा लाभार्थीना प्राधान्य न देता गावातील होतकरु लोकांना प्राधान्य देवुन घरकुल लाभ प्रदान करीत असल्याचे निवेदन आज गटविकास अधिकारी मडावी यांना देण्यात आले. 

तालुक्यातील कानडा (पाडीं) येथील ओबीसी करिता बऱ्याच कालावधी नंतर मोदी घरकुल आवास योजना आली. मात्र, लाभार्थी निवड प्रक्रियेमध्ये सरपंच, सचिव व इतर पदाधिकारी यांनी अत्यंत गरजु लाभार्थीची निवड न करता आपल्या मर्जीतील व नातेवाईकांना प्राधान्य देवुन लाभार्थी निवड केलेली आहे. तसेच गावातील घरकुल लाभार्थी निवडीची ग्रामसभेबाबत माहीती न देता परस्पर हेतु साध्य करण्याकरीता ग्रामसभा घेवुन लोकांचा सहभाग न होवु देता आपसी संगनमताने घरकुल लाभार्थी निवड केली अशी तक्रार करण्यात आली आहे. 

त्यामुळे अत्यंत गरजु लोकांना, प्राधान्यक्रमानुसार निवड प्रक्रिया राबवून उचित लाभाथ्यांना घरकुलाचा लाभ प्रदान करण्यात यावा व ग्रामसभेमध्ये घेण्यात आलेल्या बेकायदेशिर लाभार्थीची निवड रद्द करण्यात यावी तसेच पुनश्च ग्रामसभा घेवुन गरजु लाभार्थीची निवड करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी मागणीकडे दुर्लक्ष केल्यास पंचायत समिती मारेगांव येथील प्रांगणात सर्व वंचित लाभार्थी उपोषणास बसु असा गर्भीत ईशाराही देण्यात आला आहे. 

यावेळी प्रशांत चवले ग्रामपंचायत सदस्य, पवण ढवस, प्रसाद ढवस, निलेश मोहितकर, आनंद देठे, देवराव धोबे, अंकुश आत्राम आदींची उपस्थिती होती.


घरकुल योजनेचा लाभ शासन निकषाप्रमाणे दिला जात असून लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेतून झाली आहे. विकलांग व विधवा यांना प्रथम प्राधान्य देवून गरजू लोकांनाच लाभ मिळणार आहे.

-सुषमा रुपेश ढोके 
सरपंच ग्रामपंचायत कानडा (पार्डी)

ग्राम सभेमधूनच प्राधान्य क्रमानुसार लाभार्थ्यांची निवड करा - ग्रामपंचायत सदस्य

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पहापळ ग्रामपंचायतचा 'मोदी आवास योजने'चा तिढा सुटता सुटेना. येथील लाभार्थ्यामध्ये गोंधळ निर्माण झाल्याने घरकुलाचा लाभ प्रतीक्षा यादी मध्ये समाविष्ट असलेल्या गरजू लाभार्थ्यांना ग्रामसभेमधूनच प्राधान्य क्रमानुसार लाभार्थ्यांची निवड करा,अशा आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी पि एम मडावी यांना काल सोमवार ला देण्यात आले.

तालुक्यातील पहापळ ग्रामपंचायतला बऱ्याच प्रतीक्षेनंतर ओबीसी लाभार्थ्यांसाठी मोदी आवास योजने अंतर्गत 52 घरकुल मंजूर झाली आहे. त्याकरिता पहिली ग्राम सभा दि.17/11/2023 ला घेण्यात आली. परंतु कोरम पूर्ण नसल्याकारणांने होऊ घातलेली सभा तहकुब करण्यात आली. अशातच गट तटाच्या विरोधात तसेच गावातील परस्पर समर्थक यांच्यात एकमेकांवर आगपाखड करित घरकुल लाभ चहाट्यावर आल्याचे पाहायला मिळत असताना तीच सभा दि.29/11/2023 रोजी परत घेण्यात आली, त्यामध्ये गावातील जनता सभेला उपस्थित होते. मात्र, सभेचा विषय चालू असताना गोंधळ निर्माण झाल्यामुळे फक्त उपस्थित असलेले ग्रामपंचायत सदस्य व सचिव यांच्या उपस्थितीत कोणत्याही लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली नाही. असा आरोप काही सदस्यांनी केला आहे. 

त्यामुळे परत ग्रामसभा बोलावून योग्य व गरजावू लाभार्थ्यांची शासनाचे परिपत्रकानुसार प्रपत्र 'ड' चे यादी नुसार त्यांचा प्राधान्य क्रम ठरविण्यात यावा, असे दि.4 डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.

यावेळी पंचायत समितीला निवेदन देताना पहापळ येथील ग्रामपंचायत सदस्य भैय्याजी कनाके, हरी ठाकरे, साधना मोहितकर, चंदा गेडाम यांच्या सह अनेक लाभार्थी व महिला पुरुष प्रामुख्याने उपस्थित होते.


घरकुल लाभार्थ्यांची निवड करणे बाबत घेतलेल्या ग्रामसभेत झालेला गोंधळ पाहता शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्या करिता पोलीस बंदोबस्तात ग्रामसभा आयोजित करण्यात यावी. त्या शिवाय निकषाप्रमाणे लाभार्थ्यांची निवड होणार नाही.
- भैय्याजी कनाके
ग्रामपंचायत सदस्य पहापळ

शासनाच्या परीपत्रकानुसारच घरकुल लाभ मिळणार आहे. अपंग, भूमिहीन, अल्पभूदारक, अशा गरजू लोकांना प्राधान्याने लाभ मिळणार. 
- राहुल आत्राम
सरपंच ग्रामपंचायत पहापळ


भाजपच्या विजयाची हॅटट्रिक, मारेगावात जल्लोष

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : पाच पैकी तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले असून त्यापैकी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने काँग्रेसविरोधात मोठा विजय मिळवला आहे.

राज्यस्थान,मध्यप्रदेश व छत्तीसगढ मध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे, तर तेलंगणामध्ये काँग्रेस केसीआर यांच्या 10 वर्षाच्या सत्ताकाळावर पूर्णविराम लावत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली बहुमत प्राप्त केलं. या विजयाबद्दल जिल्ह्यासह मारेगावात उत्सहाचे वातावरण असून सर्वत्र अतिशबाजी,फटाके फोडून जल्लोष व्यक्त करण्यात आला.

भाजपाला घवघवीत यश मिळाल्याने मारेगाव शहरातील मार्डी चौक येथे भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, बाजार समिती संचालक अविनाश लांबट, दत्तू लाडसे, शालिनी दारुंडे, नंदा थेरे, प्रवीण बोथले,

रवी टोंगे, हनुमान जुमनाके, प्रमोद आत्राम, मारोती तुराणकर सह तालुक्यातील सर्व आजी माजी भाजपा चे पदाधिकारी हजर होते.