मारेगाव : पाच पैकी तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले असून त्यापैकी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने काँग्रेसविरोधात मोठा विजय मिळवला आहे.
राज्यस्थान,मध्यप्रदेश व छत्तीसगढ मध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे, तर तेलंगणामध्ये काँग्रेस केसीआर यांच्या 10 वर्षाच्या सत्ताकाळावर पूर्णविराम लावत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली बहुमत प्राप्त केलं. या विजयाबद्दल जिल्ह्यासह मारेगावात उत्सहाचे वातावरण असून सर्वत्र अतिशबाजी,फटाके फोडून जल्लोष व्यक्त करण्यात आला.
भाजपाला घवघवीत यश मिळाल्याने मारेगाव शहरातील मार्डी चौक येथे भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, बाजार समिती संचालक अविनाश लांबट, दत्तू लाडसे, शालिनी दारुंडे, नंदा थेरे, प्रवीण बोथले,
रवी टोंगे, हनुमान जुमनाके, प्रमोद आत्राम, मारोती तुराणकर सह तालुक्यातील सर्व आजी माजी भाजपा चे पदाधिकारी हजर होते.
रवी टोंगे, हनुमान जुमनाके, प्रमोद आत्राम, मारोती तुराणकर सह तालुक्यातील सर्व आजी माजी भाजपा चे पदाधिकारी हजर होते.