सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. केरळ ते जम्मू काश्मीरपर्यंत देश पादाक्रांत करत राहुल गांधी यांनी काँग्रेसचा हात बळकट केला. आता गाव-तालुका स्तरावर काँग्रेसची वज्रमूठ साकारण्यासाठी महाराष्ट्रासह मारेगाव काँग्रेस कमिटी च्या वतीने आज बुधवारपासून मारेगाव तालुक्यात जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. "यात्रा संवादाची, बांधिलकी लोक भावनेची" असा गजर करत काँग्रेसचे कार्यकर्ते गावोगावी जाणार आहेत.
यात्रेपूर्वी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीने तालुक्यातील वनोजा देवी येथील जनामाय कासामाय मंदिरात नारळ फोडून श्रीगणेशा केला. यावेळी बोलताना माजी आमदार वामनराव कासावार म्हणाले, राज्य व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, तरुण, महिला, व्यापारी त्रस्त आहेत. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून खरीप पिकांची नासाडी होत आहे. याकडे सरकारची जबाबदारी म्हणून ते प्रश्न सोडवण अत्यंत गरजेचे आहे. मात्र,असे होताना दिसत नाही. त्यासाठी ही पदयात्रा सरकारचे पितडं उघडं करणार आहे.
काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनाखाली ही जन संवाद यात्रा तालुक्यात संपन्न होणार आहे. 6 ते 9 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या यात्रेत सर्व तळागाळातील काँग्रेसचे कार्यकर्ते भेदभाव विसरून सहभागी झाले आहेत. आज 6 सप्टेंबर रोजी तालुक्यातील वनोजा देवी येथून सकाळी 12 वाजता या यात्रेला सुरुवात झाली आहे. तर 9 सप्टेंबरपर्यंत ही यात्रा तालुक्यात फिरणार आहे.
माजी आमदार व माजी सभापती यांनी यात्रेचं नेतृत्व केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील विविध भागांना भेटी देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. आजपासून सुरू झालेली ही जनसंवाद यात्रा सलग चार दिवस मार्डी, कुंभा, बोटोणी व वेगांव ह्या चारही सर्कलची भ्रमंती कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते करणार आहे.
यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, जेष्ठ नेते नरेंद्र पा. ठाकरे, राकेश खुराणा, मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष मारोती गौरकार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा, डॉ.लोढा, खालीद पटेल, उदय रायपुरे, अंकुश माफुर, सरपंच रविराज चंदनखेडे, तुळशीराम कुमरे, उपसरपंच प्रफुल्ल विखनकर, नगरसेवक आकाश बदकी,सय्यद समीर, समीर कुळमेथे, शाहरुख शेख, आकाश भेले, गौरव आसेकर, विजय बोथले, महिला तालुका अध्यक्ष माला गाडगे, प्रफुल क्षीरसागर, नयन आसुटकर, गंगाधर ठावरी, विनोद आत्राम, यांचेसह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व हजारों नागरिक उपस्थित होते.