अटल फाउंडेशनच्या वतीने जनसेवक विजयबाबू चोरडिया यांचा सत्कार व सन्मान

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील अटल फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष रवि रेभे,अनुराग राठेड, संदीप मदान,शाम लहरीया, गुलशन खुराणा, व समस्त कार्यकर्त्यांच्या वतीने प्रतिष्ठित उद्योजक तथा जनसेवक व भाजपा नेते विजय चोरडिया यांचा सत्कार व सन्मान त्यांच्या वाढदिवस निमित्त करण्यात आला.तसेच त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
विविध सामाजिक उपक्रम राबवून गेली बारा वर्षांपासून समाजहित जोपासत लंगड्या पांगड्याना आधार वणी उपविभागीय क्षेत्रात दृष्टीहीन वृद्धाच्या च्या हाकेला धावून जात ते विविध जनहितार्थ कार्य ते करित असतात. तसेच जनतेच्या समस्याचे निराकरण करण्यात विजयबाबू यांचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे.
अशा कर्तृत्वान व्यक्तीमत्वाचा सत्कार व सन्मान करण्यासाठी वणी येथील अटल फाउंडेशन च्या विद्यमाने व जिल्हाध्यक्ष रेभे यांच्या पुढाकाराने त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला आहे. 


आज यात्रेचा दुसरा दिवस : काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला बोटोणीतून झाली सुरुवात...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जिल्ह्यात काँग्रेस पक्षांनी एकत्र येत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जन संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काल दि.6 सप्टेंबर पासून मारेगाव तालुक्यातील वनोजा देवी येथे श्रीगणेशा करित वनोजा, हिवरा व्हाया चोपण या गावानंतर मार्डीत यात्रेची बैठक करण्यात आली आहे.

त्यानंतर आज मारेगाव काँग्रेस कमिटीकडून मारेगाव तालुक्यात जनसंवाद यात्रेची सुरुवात बोटोणीतून आता सराटी कडे कूच करण्यात आली आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेंद्र पा. ठाकरे यांच्या नेतृत्वात आज बोटोणी व वेगांव आणि तालुक्यातील कानाकोपऱ्यात यात्रा होणार अशी माहिती तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी दिली आहे.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशानुसार, माजी सभापती नरेंद्र पा ठाकरे, सभापती गौरीशंकर खुराणा, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, नगरसेवक शंकरराव मडावी, यादव पांडे, नगरसेवक आकाश बदकी, अरविंद वखनोर, रवि पोटे, अंकुश माफूर, यु.कॉ.शहराध्यक्ष सय्यद समीर, महिला अध्यक्ष माया गाडगे, आकाश भेले, शाहरुख शेख, मंगेश उईके, विनोद आत्राम, यांनी ही यात्रा ठाकरे पाटील यांच्या नेतृत्वात बोटोणी येथून सुरुवात झाली आहे. जनतेशी भेट घेत काँग्रेसचा विचार जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून घराघरात पोहचवला जाणार अशी माहिती मारेगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.
आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी काँग्रेसने जनसंवाद यात्रेची घोषणा केली आहे. येत्या 3 सप्टेंबरपासून राज्यात जनसंवाद यात्रा सुरू झाली असून त्यात भाजप सरकारचा भ्रष्ट कारभार, महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि अन्य मुद्द्यांवर रान उठवलं जाणार आहे. दरम्यान,विभागवार यात्रेचं नियोजन करून यात्रा सुरुवात झाली असून तालुक्यातील यात्रेत पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला आहे. 

मारेगाव: शिवसेना तालुका संघटक पदी प्रवीणभाऊ बलकी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते प्रवीणभाऊ बलकी (लाखापुर) यांची शिवसेना मारेगाव तालुका संघटक पदी निवड करण्यात आलेली आहे.

मा मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनुमतीने पालकमंत्री संजय राठोड यांचे शुभहस्ते जिल्ह्याच्या ठिकाणी नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. या वेळी मारेगाव तालुका उपप्रमुख पदी सुरेश लांडे, पवन जांभुळकर यांची सुद्धा तालुका उप प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
शिवसैनिक प्रवीण बलकी हे "शिवसेना" मध्ये सुरुवातीपासून पक्षात सक्रीय आहे. राज्याचे मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वणी विधानसभा क्षेत्रात मारेगाव वणी झरी मध्ये पार्टीचे संघटन व विस्तार फार मोठ्या प्रमाणात करण्यात आले असल्याचे मत बलकी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

बलकी हे पक्षाच्या सामाजिक कार्याचा झेंडा हाती घेवून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी सतत कार्यरत असतात. या निवडीमुळे मारेगाव शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. ते या निवडीचे श्रेय तालुका प्रमुख विशालभाऊ किन्हेकर, संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार व विनोदभाऊ मोहितकर यांचे त्यांनी विशेष आभार मानले आहे. 

अन्यायाच्या विरोधात त्या बाळ दगावलेल्या कुटुंबियांचे आमरण उपोषण

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : सोनोग्राफीचा रिपोर्ट व्यवस्थित न पाहता डॉक्टरांच्या  हलगर्जीपणामुळे अपंग बाळ जन्मास येवून त्याचा मृत्यू झाला. यास डॉ लोढा हे सर्वस्वी जबाबदार आहे म्हणून डॉ लोढा यांच्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्यासाठी शहरातील भगतसिंग नगर परिसरात वास्तव्यास असणारं एक साधारण बुजाडे कुटुंबं अन्यायाच्या विरोधात सलग सहा दिवसापासून तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला बसून न्याय मागत आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी तपासणी व योग्य उपचार घेतानाच नियमित कालावधीत सोनोग्राफी देखील करण्यात आली. तरीही अघटितच घडले. तज्ज्ञ डॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यानंतर गर्भातिल बाळ सुस्थितीत असल्याचे निदान दिले होते. पण बाळ जन्माला आल्यानंतर त्याची शारीरिक अवस्था फारच दयनीय होती. अविकसित व विचित्र शारीरिक अवयव असलेलं बाळ जन्माला आलं. त्या बाळाची शारीरिक अवस्था पाहून जन्मदात्यांनाही अश्रू अनावर झाले. सोनोग्राफीत बाळ निरोगी असल्याचे प्रमाण देणाऱ्या डॉक्टरांना पालकांनी नवजात बाळाची अवस्था सांगितल्यानंतर डॉक्टारांनी घुमजाव केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

नरेंद्र शंकर बुजाडे यांची पत्नी भाग्यश्री ही गरोधर राहिल्याने त्यांनी नियमित तपासणी व उपचार घेणे सुरु केले. त्यांनी शहरातील तज्ज्ञ डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या मान्यताप्राप्त सोनोग्राफी केंद्रावर सोनोग्राफी करून घेतली. गर्भवाढी नुसार सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टारांनी पोटातील बाळ सुखरूप असल्याचे निदान दिले. मात्र वेळोवेळी तपासणी, योग्य उपचार व सोनोग्राफी केल्यानंतरही अविकसित बाळ जन्माला आलं. विचित्र शारीरिक अवयव असलेलं मुल जन्माला आल्याने जन्मदाते चांगलेच दुखावले. सोनोग्राफीत निदान देतांना गर्भातील बाळ निरोगी व स्वस्थ होते, मग जन्माला आलेलं बाळ अविकसित व विकलांग कसं, या विवंचनेत त्यांनी डॉक्टरांशी संपर्क केला असता डॉक्टरांनी घुमजाव केले. उलट त्यांनी कुटुंबीयांनाच तंबी दिली असे उपोषण कर्ते म्हणणं आहे.

बाळाची अवस्था अतिशय नाजूक असल्याने आई वडिलांनी नागपूर येथे त्याच्यावर उपचार केले. पण काही उपयोग झाला नाही. एका महिन्याच्या कालावधीतच बाळ दगावलं. बाळ दगावल्याने नातेवाईक चांगलेच संतप्त झाले. उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी रेटून धरली. डॉक्टरांवर कार्यवाही होत नसल्याचे पाहून त्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. सहा दिवसांपासून त्यांचं न्यायासाठी उपोषण सुरु आहे. पण लोकप्रतिनिधी व प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची साधी दखलही घेतली नाही. उपोषण मंडपातील महिला आज चक्कर येऊन बेशुद्ध झाली. पण पाषाण व्ह्रदयी प्रशासनाला मात्र पाझर फुटला नाही.

डॉ. महेंद्र लोढा यांनी बुजाडे कुटुंबियांवर खंडणी मागितल्याचा ऑडिओ क्लिप केल्या समाजमाध्यमावर सार्वजनिक 

डॉ लोढा यांनी मोबाईल वरील संभाषणाची ऑडियो क्लिप समाजमाध्यमावर सार्वजनिक केल्या आहे. बुजाडे कुटुंबीयांनी 25 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप करीत तशी त्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. परंतु बुजाडे कुटुंबीयांनी कुठल्याही प्रकारची खंडणी मागितल्याच्या आरोपाचे खंडन केले आहे. आमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने खंडणी मागितली नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ऑडियो क्लिप मधील आवाजाची शहानिशा करून गुन्हे दाखल करायला हवे होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

ऑडियो क्लिप मधील आवाज कुणाचा, याची आधी पडताळणी करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया बुजाडे कुटुंबातील व्यक्तीनी व्यक्त केली आहे. डॉ. लोढा यांनी याआधीही तत्कालीन पोलिस निरीक्षकांवर खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. पण ते सिद्ध करू शकले नाही. त्यांच्यावर गर्भपाताचा आरोप झाल्याचे देखील ऐकायला मिळाले. मग नेमके त्यांच्या सोबतच असे प्रसंग का घडतात, हा प्रश्न उपोषणकर्त्या कुटुंबाने उपस्थित केला आहे. ते पोलिस निरीक्षकांवरच खंडणी मागितल्याचा आरोप करू शकतात, मग आम्ही तर सामान्य लोक आहोत. ते त्यांच्या विरुद्ध उठणारा आवाज दाबण्याकरिता कुठलीही शक्कल लढऊ शकतात, ही उपरोधक प्रतिक्रिया देखील उपोषण कर्त्यांनी यावेळी व्यक्त केली. शेवटच्या श्वासापर्यंत न्यायासाठी लढणार असल्याची प्रतिक्रिया उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

आमदार बोदकूरवार आणि चौकशी समितीचे आश्वासन

उपोषण मंडपातील महिला काल चक्कर येऊन बेशुद्ध झाली. ही बाब लोकप्रतिनिधीला समजताच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, यवतमाळ सिव्हील सर्जन राठोड व टी एच ओ शेंडे यांनी भेट देत उपोषणकर्त्याची भेट घेत चर्चा करून आश्वासन दिले, यात असं म्हटले की, डॉ. लोढा यांच्याबद्दल चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येइल. दरम्यान, उपोषणकर्त्याना पेयजल पाजून त्यांचे आमरण उपोषण सोडले. मात्र, न्याय न मिळाल्यास यापुढेही हा लढा सुरूच राहील असेही  उपोषणकर्त्यानी प्रतिक्रिया व्यक्त करित उपोषण मागे घेतलं.

काँग्रेसची मार्डी, कुंभा, बोटोणी, वेगांव सर्कल मध्ये जन सवांद यात्रा

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. केरळ ते जम्मू काश्मीरपर्यंत देश पादाक्रांत करत राहुल गांधी यांनी काँग्रेसचा हात बळकट केला. आता गाव-तालुका स्तरावर काँग्रेसची वज्रमूठ साकारण्यासाठी महाराष्ट्रासह मारेगाव काँग्रेस कमिटी च्या वतीने आज बुधवारपासून मारेगाव तालुक्यात जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. "यात्रा संवादाची, बांधिलकी लोक भावनेची" असा गजर करत काँग्रेसचे कार्यकर्ते गावोगावी जाणार आहेत.

यात्रेपूर्वी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीने तालुक्यातील वनोजा देवी येथील जनामाय कासामाय मंदिरात नारळ फोडून श्रीगणेशा केला. यावेळी बोलताना माजी आमदार वामनराव कासावार म्हणाले, राज्य व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, तरुण, महिला, व्यापारी त्रस्त आहेत. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून खरीप पिकांची नासाडी होत आहे. याकडे सरकारची जबाबदारी म्हणून ते प्रश्न सोडवण अत्यंत गरजेचे आहे. मात्र,असे होताना दिसत नाही. त्यासाठी ही पदयात्रा सरकारचे पितडं उघडं करणार आहे.

काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनाखाली ही जन संवाद यात्रा तालुक्यात संपन्न होणार आहे. 6 ते 9 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या यात्रेत सर्व तळागाळातील काँग्रेसचे कार्यकर्ते भेदभाव विसरून सहभागी झाले आहेत. आज 6 सप्टेंबर रोजी तालुक्यातील वनोजा देवी येथून सकाळी 12 वाजता या यात्रेला सुरुवात झाली आहे. तर 9 सप्टेंबरपर्यंत ही यात्रा तालुक्यात फिरणार आहे.

माजी आमदार व माजी सभापती यांनी यात्रेचं नेतृत्व केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील विविध भागांना भेटी देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. आजपासून सुरू झालेली ही जनसंवाद यात्रा सलग चार दिवस मार्डी, कुंभा, बोटोणी व वेगांव ह्या चारही सर्कलची भ्रमंती कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते करणार आहे.

यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, जेष्ठ नेते नरेंद्र पा. ठाकरे, राकेश खुराणा, मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष मारोती गौरकार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा, डॉ.लोढा, खालीद पटेल, उदय रायपुरे, अंकुश माफुर, सरपंच रविराज चंदनखेडे, तुळशीराम कुमरे, उपसरपंच प्रफुल्ल विखनकर, नगरसेवक आकाश बदकी,सय्यद समीर, समीर कुळमेथे, शाहरुख शेख, आकाश भेले, गौरव आसेकर, विजय बोथले, महिला तालुका अध्यक्ष माला गाडगे, प्रफुल क्षीरसागर, नयन आसुटकर, गंगाधर ठावरी, विनोद आत्राम, यांचेसह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व हजारों नागरिक उपस्थित होते.