आज यात्रेचा दुसरा दिवस : काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला बोटोणीतून झाली सुरुवात...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जिल्ह्यात काँग्रेस पक्षांनी एकत्र येत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जन संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काल दि.6 सप्टेंबर पासून मारेगाव तालुक्यातील वनोजा देवी येथे श्रीगणेशा करित वनोजा, हिवरा व्हाया चोपण या गावानंतर मार्डीत यात्रेची बैठक करण्यात आली आहे.

त्यानंतर आज मारेगाव काँग्रेस कमिटीकडून मारेगाव तालुक्यात जनसंवाद यात्रेची सुरुवात बोटोणीतून आता सराटी कडे कूच करण्यात आली आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेंद्र पा. ठाकरे यांच्या नेतृत्वात आज बोटोणी व वेगांव आणि तालुक्यातील कानाकोपऱ्यात यात्रा होणार अशी माहिती तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी दिली आहे.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशानुसार, माजी सभापती नरेंद्र पा ठाकरे, सभापती गौरीशंकर खुराणा, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, नगरसेवक शंकरराव मडावी, यादव पांडे, नगरसेवक आकाश बदकी, अरविंद वखनोर, रवि पोटे, अंकुश माफूर, यु.कॉ.शहराध्यक्ष सय्यद समीर, महिला अध्यक्ष माया गाडगे, आकाश भेले, शाहरुख शेख, मंगेश उईके, विनोद आत्राम, यांनी ही यात्रा ठाकरे पाटील यांच्या नेतृत्वात बोटोणी येथून सुरुवात झाली आहे. जनतेशी भेट घेत काँग्रेसचा विचार जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून घराघरात पोहचवला जाणार अशी माहिती मारेगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.
आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी काँग्रेसने जनसंवाद यात्रेची घोषणा केली आहे. येत्या 3 सप्टेंबरपासून राज्यात जनसंवाद यात्रा सुरू झाली असून त्यात भाजप सरकारचा भ्रष्ट कारभार, महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि अन्य मुद्द्यांवर रान उठवलं जाणार आहे. दरम्यान,विभागवार यात्रेचं नियोजन करून यात्रा सुरुवात झाली असून तालुक्यातील यात्रेत पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला आहे.