लोकनेते विजयबाबू चोरडिया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, समाज कार्यात सदैव तत्पर असलेले सामाजिक कार्यकर्ता तथा प्रतिष्ठित व्यापारी विजयबाबू चोरडिया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

लोकनेते विजयबाबू चोरडिया यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...!

शुभेच्छुक :- सचिन बोढे 
 अंकुश मोबाईल शॉपी, वणी

आदरणीय 'पप्पा'जी या शुभंदिनी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा...!


                         अ|भि|ष्ट|चिं|त|न

प्रिय पप्पा,
रखरखत्या उन्हातील आरामदायक सावली आहात तुम्ही,
खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहेत तुम्ही,
माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहात तुम्ही !

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात

पप्पा तुम्ही सोबत आहात ना मग मला कशाचीही काळजी नाही !
आदरणीय 'पप्पा'जी तुम्हास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुम्हाला उत्तम आरोग्य,
आनंदी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!
Happy Birthday Pappa 

शुभेच्छुक :- अ‍ॅड. कुणाल विजय चोरडिया
अध्यक्ष : श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती, वणी 

भारत विरुद्ध पाकिस्तान थरार पुन्हा रंगणार...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

काल दिंनाक 2 सप्टेंबर रोजी झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपमधील तिसरा सामना अनिर्णित राहिला आहे. कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 266 धावा केल्या, परंतु पाकिस्तानची फलंदाजी सुरू होऊ शकली नाही, सुमारे दोन तास प्रतीक्षा केल्यानंतरही परिस्थिती योग्य नसताना सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशावेळी दोन्ही संघाना 1-1 गुण देण्यात आला आहे. 
मात्र, भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार शक्यता आहे. कारण भारताविरुद्धचा सामना रद्द होऊनही पाकिस्तानचा संघ सुपर-4 मध्ये पोहोचला आहे. पाक टीमने पहिल्या सामन्यात नेपाळवर 238 धावांनी मोठा विजय मिळवला होता. टीम इंडियालाही सुपर-4 मध्ये पोहोचण्याची सुवर्णसंधी आहे, कारण ब्लू टीमचा पुढचा सामना 4 सप्टेंबरला नेपाळसोबत आहे. जर भारताने नेपाळचा पराभव केला तर 10 तारखेला सुपर - 4 मध्ये पुन्हा एकदा आमनेसामने येतील. मात्र अशा परिस्थितीत भारतापुढे करो या मरोची स्थिती झाली आहे. 

परंतु कालच्या सामन्यात इशान किशन आणि हार्दिक पांड्याने भारतीय चाहत्यांची मने जिंकली. टीम इंडियासाठी हार्दिकने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 87 धावांची खेळी खेळली. इशानने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 82 धावा केल्या. या दोघांशिवाय एकाही भारतीय फलंदाजाला 20 धावांचा आकडाही गाठता आला नाही.

विषबाधा होऊन युवा शेतकऱ्याचा मृत्यू


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

वणी : वणी तालुक्यातील चिंचोली येथील युवा शेतकऱ्याचा विषबाधा होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला.

साहिल किशोर भोयर (20) रा चिंचोली असे विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. प्राथमिक अहवाला नुसार साहिल भोयर हा दि.28 ऑगस्ट 2023 रोजी स्वतः च्या शेतात फवारणी करित असताना त्याला विषबाधा झाली. पुढील उपचारासाठी त्याला नागपूर येथे हलविण्यात आले होते, काल शनिवार 2 सप्टेंबर रोजी त्याची प्रकृती गंभीर झाली व तो मृत पावला. या दुःखद घटनेने भोयर कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले.

साहिल याच्या पश्चात वडील, आई, भाऊ व आजी असा बराच मोठा आप्त परिवार आहे. 

पाण्यात बुडून तीन युवकांचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी पोलीस स्टेशन हद्दीतील वांजरी (मजरा) येथे खदाणीच्या खुल्यातळ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज सकाळ पासून पाण्यात बुडालेल्या त्या तीनही युवकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु होते.

तालुक्यातील वांजरी येथे लाईमस्टोन खाणीच्या तळ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची शंका काल दुपारनंतर त्याठिकाणी आढळून आलेल्या मोफेड गाडी व कपडे यावरून आल्याने गावाकऱ्यांनी तलावाच्या ठिकाणी एकच गर्दी केली. मात्र संध्याकाळ झाल्याने त्या तलावात बुडालेल्या युवकांचा शोध घेणं अवघड असल्यामुळे आज सकाळपासून पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली, तेव्हा पोहायला गेलेल्या तीनही युवकांचा मृतदेह तलावतील पाण्यात तरंगत असताना आढळून आला, पोलीस व गावाकऱ्यांच्या मदतीने सदर बुडालेल्या त्या तीनही युवकाचे मृतदेह बाहेर काढले. मृतक आसीम अब्दुल सलाट शेख (16), नुमान शेख सादिर शेख (16) राहणार एकता नगर,  प्रतिक संजय मडावी (16) रा. प्रगती नगर असे नावे असलेल्या या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी मोपेड दुचाकी क्रमांक MH-29-Y-5342 वरुन तीन तरुण वांजरी परिसरात गेले होते.

वांजरी (मजरा) गावाच्या हाकेच्या अंतरावर लाईमस्टोनची बंद पडलेल्या अवस्थेतील मोठी खोली असलेली खदान आहे. त्यात दरवर्षी निसर्गाचे पाणी साचून तलावाचे मोठे स्वरूप आलेले आहे. तिनही नवयुवक काल शनिवारी मोपेड दुचाकी दुपारी त्या परिसरात सहजच फिरायला गेले असता, त्या ठिकाणी बसून गप्पाटप्पा मारल्यानंतर त्यांना पोहण्याचा मोह आवरला नसल्याने तिघांनी आपले कपडे, चप्पल व मोबाईल दुचाकीवर ठेवून पाण्यात पोहायला उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्या तीनही युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या हृदय हेलावणाऱ्या घटनेने पुरती ग्रामीण परिसरासह वणी शहरात शोककळा पसरली आहे.