मान स्वच्छ करण्यासाठी घरगुती सोपे उपाय, १५ मिनिटांत निघेल मानेवरचा काळपटपणा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चेहऱ्याच्या सुंदरतेकडे लक्ष देत असताना अनेकांचे मानेकडे दुर्लक्ष होते. घाम, धूळ आणि माती मानेवर जमा झाल्यास ते क्लिन करणं कठीण होतं. मानेवर मळ जमा होत गेला की काळे थर दिसून येतात, एकदा हे काळे डाग मानेवर चिकटून राहीले तर बरेच उपाय करून ही निघत नाहीत. मानेचा काळेपणा चुटकीसरशी दूर करण्यासाठी काही सोपे उपाय फायदेशीर ठरू शकतात. या उपायाचा एक फायदा असा की, पार्लरमध्ये तासनतास न घालवता फक्त 15 मिनिटांत मान स्वच्छ करता येते.
हा घरगुती उपाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी एलोवेरा घ्यावं लागेल. एलोवेराला मधोमध कापून त्यावर अर्धा चमचा हळद. अर्धा चमचा कॉफी पावडर, अर्धा चमचा साखर आणि लिंबू लावून मानेवर चोळा. पूर्ण मानेवर आणि पाठीवर रगडून 15 मिनिटांनी कोमट पाण्यानं स्वच्छ करा..
मान स्वच्छ करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी उपाय सुद्धा आजमाऊ शकतात...
▪️ मानचा काळेपणा दूर करण्यासाठी 1 चमचा तुरटी पावडरमध्ये एक चमचा मुल्तानी माती मिक्स करा. त्यानंतर यात 1 चमचा गुलाब पाणी घाला. याच 1 ते 2 चमचे लिंबाराच रस मिसळून जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट लावल्यानंतर 15 ते 20 मिनिटांसाठी तसेच राहू द्या. सुकल्यानंतर पाण्यानं स्वच्छ धुवा.
▪️ एका वाटीत तुरटी, बेकींग सोडा आणि गुलाब पाणी एकत्र करा हे मिश्रण मानेला लावा आणि 10 मिनिटांनी धुवून टाका.

▪️ एक चमचा लिंबाच्या रसात एक चमचा मध मिसळा. ही पेस्ट मानेला लावा 15 ते 20 मिनिटांनी ओल्या टॉवेलनं चेहरा स्वच्छ पुसा.
▪️ एका भांड्यात एक चमचा बेसन घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला. ही पेस्ट गडद मानेवर चांगली लावा आणि 10 ते 15 मिनिटे राहू द्या. यानंतर साध्या पाण्याने धुवा.

▪️ एका भांड्यात दोन चमचे तांदळाचे पीठ घ्या आणि त्यात बटाट्याचा रस आणि एक चमचा गुलाबपाणी घाला. हे सर्व मिसळून पेस्ट तयार करा आणि 15 ते 20 मिनिटे मानेवर लावलेली राहू द्या, कोरडे झाल्यानंतर स्वच्छ करा.


तासंतास मोबाइलवर स्क्रोल करत राहणं आहे एक गंभीर आजार, वेळीच व्हा सावध!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

आजकाल लोकांना सोशल मीडियावर जास्तीत जास्त वेळ घालवण्याची सवय फारच लागली आहे. लोक तासंतास रील्स बघत असतात आणि त्यांना वेळेचं भानही नसतं. डॉक्टरांनी या सवयीला एक नवीन आजार मानून याला मास सायकॉजेनिक इलनेस म्हणजे MPI असं नाव दिलं आहे.

हॉवर्ड मेडिकल स्कूलच्या एका स्टडीनुसार, फार जास्त रील्स बघणाऱ्या लोकांमध्ये ही लक्षण स्पष्ट दिसतात. या आजारात लोक नेहमीच बोलताना आपले पाय हलवतात. हे या आजाराचं एक पहिलं आणि मुख्य लक्षण आहे.

▪️मानदुखी
हेल्थ एक्सपर्टनुसार, रोज बराच वेळपर्यंत मोबाइल फोन स्क्रोल करण्याने कंबर आणि मानदुखीची समस्या वाढते. मोबाइल बघण्यासाठी तुम्ही जेवढा वेळ मान झुकवता, त्याने मानदुखी आणि मणक्याचीही समस्या होते. 

▪️फोकस कमी होतो
बराचवेळी रील्स बघितल्याने लोकांचा फोकस कमी होतो. ते कोणताही व्हिडीओ शेवटपर्यंत न बघता एका व्हिडिओवरून दुसऱ्या व्हिडिओवर पोहोचतात. हळूहळू ही त्यांची सवय बनते आणि ते कोणत्याही गोष्टीवर फोकस करू शकत नाहीत. ते सतत अस्वस्थ राहतात.

▪️अनेक आजारांचा धोका वाढतो
मोबाइलवर जास्तीत जास्त वेळ घालवल्याने लोकांना झोप कमी येणे, मायेग्रेन, डोकेदुखी आणि डिप्रेशनची समस्या होऊ लागते. कारण मोबाइलमधून निळा प्रकाश निघतो, जो डोळ्यांना नुकसान पोहोचवतो. सोबतच डोकेदुखीही वाढवतो. अशा लोकांमध्ये शांत झोप न लागण्याची समस्या अधिक असते. झोप जर पूर्ण झाली नाही तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो.

असा करा बचाव?
सतत रील्स बघून होणाऱ्या आजारापासून बचावासाठी तुम्ही रोज पायी चला आणि योगा करा. मोबाइल गेमऐवजी बाहेरचे खेळ खेळा. जेवण करताना मोबाइल बघणं बंद करा. आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियाऐवजी समोरासमोर भेटा. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक ॲप्स डाउनलोड करू नका. 


लोकशाहीर अण्णाभाई साठे जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा वणी येथे


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : "जिथे कमी तिथे आम्ही" हा विचार बाळगून आर्थिकदृष्ट्या कमकुवत तसेच विपरीत परिस्थितीत मेहनत करून जिद्दीने पुढे जाण्याऱ्या मादगी समाजाचा विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांचा 103 व्यां जयंतीचे औचित्यसाधून "मादगी बहुउद्देशीय संस्था"चा वतीने इयत्ता 10 वी, 12 वी व विविध परीक्षेत तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या वणी ,मारेगाव व झरी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्याकरिता गुणगौरव सोहळा रविवार दि.6 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता वणी येथील वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी हॉल, येथे आयोजित करण्यात आला आहे.
सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष चरणदास कोंडावार (माजी नायब तहसीलदार),कार्यक्रमाचे उद्घाटक सुनिल मिद्दे (महासचिव मोची, मादगी, मादरु, मादिगा, महासंघ (M4)), तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून गणेश किंद्रे (उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी) व प्रा. डॉ. करमसिंग राजपुत (अर्थशास्त्र विभाग प्रमुख, लो.टी. महा. वणी) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. अॅड. गजानन अंबलवार (LLB, LLM), अधिवक्ता नागपुर उच्च न्यायालय व मुरलीधर लाटेलवार (उपकोषाध्यक्ष मोची, मादगी, मादरु,मादिगा, महासंघ (M4) हे असणार आहे.
वणी उपविभागात पहिल्यांदाच हा गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव व विद्यार्थी मार्गदर्शन सोहळा मादगी समाजाचा वतीने संपन्न होत आहे. या गुणगौरव सोहळ्यात पालकांनी उपस्थित राहावे असे, आवाहन समितीचे अध्यक्ष निलेश परगंटीवार, उपाध्यक्ष चरणदासजी कोंडावार, सचिव सुरज चाटे, सहसचिव रवि कोमलवार, कोषाध्यक्ष नथ्थुजी नगराळे, प्रकाश तालावार (शिक्षक), राकेश शंकावार, अरुण एनपल्लीवार, विक्की पगंटीवार, विजय कंडेवार, शिवकुमार नलभोगे, प्रभाकर लिक्केवार, कैलास पौन्नलवार , नागेश मोहरले या आयोजकांनी केले आहे.

आकाश भेले यांची अनु.जा.विभागाच्या तालुका अध्यक्ष पदी निवड


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आकाश भेले यांची अनुसूचित जाती विभागाच्या मारेगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदर नियुक्ती पत्र मा. सिध्दार्थ हत्तीअंबीरे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य (अनुसुचित जाती विभाग) यांचे आदेशाने प्रदान करण्यात येत आहे.
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाची ध्येय व धोरणे जन सामान्यापर्यंत पोहचवुन पक्ष वृध्दीगत,हिच आपेक्षा आहे. अध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी महेंद्र नवसाजी कावळे, अनुसूचित जाती विभाग यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांच्या हाती तालुक्याची धुरा दिली.

तालुक्यातील कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील. जन सामान्यांना अधिकाऱ्यांकडून न्याय न मिळाल्यास तालुकाध्यक्ष या नात्याने त्यांना धडा शिकवू असे, आव्हान देखील अनुसूचित जातीचे मारेगांव तालुका अध्यक्ष आकाश मनोहर भेले यांनी केले आहे.
भेले हे त्यांच्या नियुक्तीचे श्रेय तालुक्यातील सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांना देतात. माझी नियुक्ती करून माझ्यावर सोपावलेल्या जबाबदारीला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न असेल, आकाश भेले यांच्या मारेगाव तालुका अध्यक्षपदी (अनुसूचित जाती, विभाग) नियुक्ती बाबत काँग्रेस सह सर्व स्तरावरून अभिनंदनसह शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

तलाठ्याच्या हयगयमुळे कात्री येथील अनेक पूरग्रस्त कुटुंब सानुग्रह अनुदान लाभापासून वंचित - जिल्हाधिकारी यांनी लक्ष दयावे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

कळंब : कळंब  तालुक्यात कात्री येथे अतिवृष्टी व पुराने थैमान घातले असून शेतकऱ्यासह ग्रामस्थ या नैसर्गिक कोपाला वैतागले असून या पुरा मुळे अनेक कुटुंब व शेतकत्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे
नैर्सगिक आपत्तीच्या वेळी तलाठयानी मुख्यलयी राहुन सर्वेक्षण करण्याचे तलाठी यांचे कर्तव्य आहे. परंतु मुख्यालयी राहत नसल्यामुळे सर्वेक्षण पूर्ण झाले नाही. त्यामुळे गावातील अनेक पात्र कुटुंब शासनाच्या सानुग्रह अनुदान व मदती पासून वंचित असल्याचे गावातील नागरीका मध्ये असंतोष पसरलेला आहे .

तलाठी मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामवासीयांचा  तलाठ्याशी संपर्क होत नाही त्या मुळे लोकांना काही समस्या, अडचन निर्माण झाल्यास कुठे संपर्क करावा असा गावातील नागरीकांच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे.
तरी जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी  गांभीर्याने दखल घेऊन पूरग्रस्त कुटुंब व शेतकरी यांचा पुर्ण सर्वेक्षण करून पुरग्रस्त कुटुंबाला शासणा कडुन सानुग्रह अनुदान व मदत दयावी  अशी मागणी राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रूस्तम शेख यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात केली आहे.