22 वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार, आरोपी विरोधात गुन्हा दाखल

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे

मारेगाव : तालुक्यातील 26 वर्षीय युवकाकडून तालुक्यातीलच एका खेड्यात राहणाऱ्या 22 वर्षीय मजुरी करणाऱ्या युवतीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून याबाबत पिडीत मुलीने अत्याचारी विरोधात मारेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पिडितेच्या तक्रारीनुसार गणेश अभिमान आत्राम (26) रा.इंदिरा ग्राम, (नगारा पोड) असे त्याचे नाव आहे. गणेश ने तिला एक वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तीच्या ईच्छे विरुद्ध लैंगिक संबंध ठेवले, तसेच 28 मार्च 2023 ते 3 एप्रिल या दरम्यान त्याने बाहेर ठिकाणी तिच्याशी शारीरिक संबंध साधला,आणि मग "मी तुझ्याशी लग्न करणार नाही तुला जे करायचं ते कर" अशी धमकी देऊन तीला सायंकाळी तीच्या घरी आणून सोडून दिले, परिणामी अत्याचारीने घुमजावं ची भाषा केल्याने अखेर पिडीत मुलीने आज दि.6 एप्रिल 2023 ला अत्याचारी विरोधात तक्रार दाखल केला. मारेगाव पोलिस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

कसा असेल तुमचा आजचा दिवस,जाणून घ्या आजचे रशिभाविष्य

        
                  राशीभविष्य: 6 एप्रिल गुरुवार...

मेषः
आज दिनमान प्रतिकूल राहण्याची शक्यता आहे. कामकाज किंवा रोजगार क्षेत्रात आज असंतोषाची भावना निर्माण होईल. वादविवाद आणि गैरसमज वाढतील असे संवाद टाळावेत. मिळालेल्या लाभात मन समाधानी राहणार नाही. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. खरेदी विक्रीचा व्यवहार आज करू नका. कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. राग आणि चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवा. वादविवादातून मनस्ताप होईल. खर्चात वाढ होईल. कायदेशीर प्रकरणात कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे लक्ष द्या. मानसिक स्वास्थ संभाळा. दुर्व्यसनांपासून सावध रहा.

वृषभ:
आज व्यक्तीगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्यावे. परस्परात मतभेद होऊ शकतात. जोडीदाराशी विवाद टाळा. क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधीचा योग आहे. नोकरीत स्थान बदल होईल. वेळेचा अपव्यय टाळा. प्रवासातून लाभ होणार नाही. प्रवास निरर्थक ठरतील. नोकरीत स्थान बदल होईल. प्रेमप्रकरणात वितुष्ट निर्माण होऊ शकते. संततीविषयी चिंता निर्माण होईल. त्यांच्या विद्याभासाकडे लक्ष द्यावे. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. घाई गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. चोरी अथवा नुकसान घडण्याची शक्यता आहे.

मिथुन:
आज सौख्यदायक दिवस आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींची मान प्रतिष्ठा प्रतिभा वाढीस लागेल. नोकरीत वेगळ्या कल्पना नक्की मांडा. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. बढ़ती व वेतनवाढीचा योग आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. कार्यक्षेत्रात वाढ होईल. नवीन समुहाशी जोडले जाण्याची शक्यता आहे. राजकीय सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. राजाश्रय मिळेल. शासकीय दप्तरी रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. आजच दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल. कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध कराल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क:
आज कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. कार्यक्षेत्रात सबुरीने वाटचाल करा. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपक्षे प्रमाणे यश येईल. दिवसभर मन प्रसन्न राहिल. कार्यक्षमतेमुळे फायदा होईल. व्यापार उद्योगात फायदा होईल. खर्च मात्र विचार करून करा. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात नवीन भागीदारा सोबत नवीन प्रकल्पाची सुरुवात कराल. कुटुंबाची साथ लाभेल.प्रवास लाभदायक होतील. व्यापारात मोठे आर्थिक लाभ होतील.

सिंह:
आजच्या चंद्रभ्रमणात जोरदार शुभफळे मिळतील. नोकरीत अनुकूल वातावरण लाभेल. शासकीय सेवेत नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. कर्मावर विश्वास ठेवा. आपल्या कार्यक्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. भांवडाकडून मदत मिळेल. व्यापारात तुम्हाला भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. लेखक कला क्षेत्रातील व्यक्तींना शासकीय मानसन्मान मिळेल. आजचा दिवस ठरविल्याप्रमाणे कामे पार पाडण्यात उपयुक्त असा आहे. आर्थिक लाभ होतील. उन्नतीकारक दिवस आहे. एकंदरित शुभ फलदायी दिवस राहील

कन्या:
आज दैवी पाठबळ लाभणार आहे. नोकरीत मनाजोगे घडेल. नवीन प्रयोग यशस्वी होतील. बढ़ती व बदलीसाठी उत्तम दिवस आहे. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. दुरचे प्रवास घडतील. परदेशगमनाचे योग आहेत. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल.स्वतःच्या मनाने विचाराअंतीच निर्णय घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. साहित्यिक संपादन या बौद्धिक अधिष्ठान असणाऱ्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्याचा विस्तार वाढेल. मानधनात वाढ होईल. नवनवीन कल्पना सुचतील. आर्थिक बाबतीत वाढ होईल.

तूळ:
आज रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस काहीसा परिक्षा घेणारा आहे. प्रतिकूलता जाणवेल. कामाच्या ठिकाणी ताणतणात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापारात भागीदारासोबत वादविवाद टाळा. कलह होण्याची शक्यता राहिल. मोठी आर्थिक मोठी आर्थिक हानी फसवणुक होण्याचे योग आहे. लक्ष्मीची अवकृपा रहिल. छोट्याशा कारणाने मन दुखावेल. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. शारीरिक दृष्टीकोनातून मधुमेह पोटाचे विकार असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्या. जोडीदाराशी स्नेहपुर्वक वागा. आर्थिक हानीची शक्यता वाटते. चिंता वाढविणारा दिवस असुन मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी.

वृश्चिक:
आज कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक भागीदारासोबत नवीन व्यापार प्रारंभास दिनमान अनुकुल राहिल. व्यवहारचातुर्य संयमी भूमिका घेतली तर मोठा आर्थिक लाभ होईल. कामाप्रती सजग रहा. मित्रांकडून आयकारक प्रस्ताव येतील. कुटुंबात मंगलकार्याची रुपरेखा नियोजन कराल. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. सर्वच स्तरातील नातेसंबंधात स्नेह निर्माण होईल. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहिल.

धनु:
आज मध्यम स्वरूपाचे दिनमान राहील. वादविवाद होण्याची शक्यता आहे. शत्रु वरचढ पणा करण्याची शक्यता आहे. मनावर संयम ठेवून रहा. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गानी काळजी पूर्वक व्यवहार करावेत. सुखचैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढणार आहे. नोकरीत वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. शारिरिक त्रास जुना आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. मानसिक दृष्टीकोनातून क्लेश उत्पन्न करणार दिनमान आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या आरोग्याची काळजी घ्या. वैद्यकिय उपचारा वर खर्च होण्याची शक्यता आहे.

मकर:
आज सकारात्मक उर्जा निर्माण करणारा दिवस आहे. अपूर्ण राहिलेली कामे वेळेत पूर्ण कराल. नोकरीत वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. रोजगारात कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. मुलांच्या प्रगतीने मन समाधानी राहिल. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल. कला क्षेत्रातील मनोरंजन विश्वातील मंडळीना उत्तम दिवस आहे. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. कुटुंबांवर वाहन घर खरेदीस अनुकूल दिवस आहे.

कुंभ:
आजच चंद्रभ्रमण पहाता वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहिल. सर्वच क्षेत्रातील जातकांना धनलाभाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजनेचा प्रारंभ करा वक्तृत्वाचा प्रभाव राहील. समाजात आपली मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. आकस्मिक लाभाचा योग आहे. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. स्थावर मालमत्तेची विक्रि करताना घाईगडबड करू नका. दुसऱ्याच्या कामात मात्र हस्तक्षेप करू नका.

मीनः
आज आपले मनोधैर्य उंचाविणारा दिवस आहे. शुभवार्ता ऐकायला मिळतील. मंगल कार्याचे नियोजन कराल. आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. चंद्रबल उत्तम आहे. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित करणारा दिवस ठरेल. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा. यश निश्चित लाभेल. बौद्धिक क्षेत्रात काम करण्याऱ्या व्यक्तींचा मानसन्मान होईल. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल. आजचा दिवसआपल्यास अत्यंत शुभ फलदायी ठरेल. व्यापारात आकस्मिक धनलाभ होईल.


महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान; प्रा. दीपक धर यांना ‘पद्मभूषण’, तर अन्य चौघे ‘पद्मश्री’ ने सन्मानित

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील 55 मान्यवरांना आज ‘पद्म पुरस्कारा’ने सन्मानित केले. यामध्ये महाराष्ट्रातील 5 मान्यवरांचा समावेश आहे. प्रा. दीपक धर यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने, तर अन्य चार मान्यवरांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये पद्मपुरस्कार प्रदान सोहळा झाला. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आदी उपस्थित होते.

प्रा. दीपक धर यांना ‘पद्मभूषण’ तर गजानन माने, परशुराम खुणे, रवीना टंडन आणि कुमी वाडिया यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी प्रा. धर यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रा. धर हे सांख्यिकीय भौतिकशास्त्रावरील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. त्यांना विज्ञानातील प्रतिष्ठेचा जागतिकस्तरावरील बोल्ट्झमन पुरस्कार (Boltzmann Medal) घोषित झाला आहे.

राज्यातील 4 मान्यवरांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान

गजानन माने यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री. माने यांनी कुष्ठ रोग्यांसाठी आपले जीवन समर्पित केले.

श्री. खुणे यांनी नक्षल प्रभावित भागात लोककलेच्या माध्यमातून पुनर्वास आणि सामाजिक कुप्रथांविषयी लोक जागृती केली.

अभिनेत्री रविना टंडन या 25 वर्षांपासून चित्रपट सृष्टीत काम करीत असून अनेक चित्रपटांमंधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे.

कला क्षेत्रातील कुमी वाडीया कोरल संगीत ‘कंडक्ट’( संचलन) करणाऱ्या प्रथम भारतीय महिला आहेत. त्यांनी आजवर देश विदेशात विविध कार्यक्रम सादर केलेले आहेत.

एकूण 55 पद्म पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले. 3 मान्यवरांचा पद्मविभूषण, 5 मान्यवरांचा पद्मभूषण आणि 47 मान्यवरांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव झाला.

नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळणार; अनधिकृत उत्खननाला आळा घालणारे नवे रेती धोरण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले असून, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या धोरणानुसार प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये (रुपये १३३ प्रति मेट्रीक टन) वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. यात स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात येईल. याशिवाय जिल्हा खनीज प्रतिष्ठान निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क इ. खर्च देखील आकारण्यात येतील. वाळुचे उत्खनन, उत्खननानंतर वाळुची डेपो पर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रीया राबवण्यात येईल. यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल. ही रेती शासनाच्या डेपोमध्ये नेली जाईल व तिथून या रेतीची विक्री करण्यात येईल.

नदी पात्रातील वाळू गटाचे निरिक्षण करण्याची कार्यवाही तहसिलदारांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती करेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरिय वाळू संनियत्रण समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती वाळू गट निश्चित करून, त्या गटासाठी ऑनलाईन ई-निविदा पद्धती जाहीर करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीला शिफारस करेल. जिल्हास्तरीय संनियत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील आणि या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त, अपर जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग तसेच प्रादेशिक परिवहन अधिकीर, भू-विज्ञान व खनीकर्म विभाग, भूजल सर्वेक्षण तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील. ही समिती वाळू डेपोमध्ये वाळू साठा उपलब्ध करून घेण्यासाठी वाळू गट निश्चित करतील. तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशांचे पालन होईल, याची दक्षता घेईल.

दोन हजार रुपयांच्या नोटा गेल्या कुठे?


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोट बंदीची घोषणा करीत जुन्या १००० व ५०० च्या नोटा चलनातून बात ठरवत दोन हजाराची नवीन नोट चलनात आणली या घटनेला सहा ते साडेसहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. सुरुवातीच्या काळात दोन हजाराची नोट चांगल्या प्रकारे चलनात होती सर्वसाधारणपणे इतर नोटा चलनात दिसत असल्या तरी ग्रामीण भागात दोन हजाराची नोट चलनातून दिसेनाशी झाली आहे त्यामुळे दोन हजाराच्या नोटा गेल्या तरी कुठे असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

दोन हजाराची नोट चलनात आल्यानंतर या नोटा सुद्धा चालण्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत होत्या मात्र मागील अनेक महिन्यापासून ग्रामीण भागात दैनदिन व्यवहारात दोन हजाराच्या नोटांचे प्रमाण कमी प्रमाणात दिसत आहे त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना अनेक अडचणी येत आहेत बँकेच्या दैनंदिन व्यवहारात सुद्धा ग्राहकांना ५००, २००, १००, ५०, २० या रुपयाच्या नोटा दिल्या जात आहे दोन हजाराची नोट बाजारात दिसत नसल्यामुळे या नोटा बाजारातून गेल्या तरी कुठे? असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.

चलनातून गायब झालेले या नोटा एटीएम मधूनही दिशेनाशा झाल्या आहेत ग्रामीण भागातील अनेकांनी दोन हजाराची नोट काही महिन्यापासून बघितली नसल्याचे सांगितले जाते आहे. तर व्यापारी वर्गालाही दोन हजाराची नोट व्यवहारात येत नसल्याचे व्यवहार करताना अडचणी येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाबाजार थांबविण्याच्या उद्देशाने नोटबंदी घोषित केली होती या निर्णयाविरोधात तीव्र संतापही व्यक्त करण्यात आला यामुळे अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम झाला होता मात्र आता चलनातून दोन हजाराची नोट गायब झाल्यामुळे सदर नोट गेली कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बँक एटीएम मधूनही दर्शन नाही

केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बाद केल्या होत्या त्यावेळी दोन हजार रुपयाची नोट चलनात होती मात्र अवघ्या सहा साडेसहा वर्षाच्या कालावधीत दोन हजाराची नोट चलनातून गायब झाली आहे विशेष म्हणजे बँक व एटीएम मधून ही नोट हद्दपार झाल्याचे चित्र आहे.