विवेकानंद विद्यालयात किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : स्थानिक विवेकानंद विद्यालयात किशोरवयीन मुलींना शुक्रवार दि.२४/०२/२०२३ ला मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय स्त्री शक्ती नागपूरच्या उपाध्यक्षा सौ. राधिका देशपांडे व कार्यकारिणी महिला उपस्थित होत्या.प्रमुख पाहुण्या सौ. सुनिता विदयवंश, सौ. वर्षा देशपांडे, सौ.श्रद्धा श्रोत्री, सौ. भारतीताई सरपटवार,सौ.देशमुखताई व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आस्कर सर,विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. वंदनाताई वऱ्हाटे व्यासपिठावर उपस्थित होते.
         
या कार्यक्रमात सौ.राधिका देशपांडे यांनी किशोवयीन मुलींना या वयात होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदल तसेच मासिकपाळीच्या वेळी मुलींना होणाऱ्या समस्या व उपाय यावर मुलींना बोलते केले.
        
या कार्यक्रमाचे संचालन सौ.आरती ठावरी मॅडम यांनी केले तर आभारप्रदर्शन कु. राजश्री गोखरे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यालयाच्या सर्व शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

जैताई मंदिरात मार्गदर्शन व शंका निरसन कार्यक्रम संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वनिता समाजतर्फे शुक्रवारी भारतीय स्त्री शक्ती संघटन शाखा नागपूर यांचा मार्गदर्शन व शंका निरसन हा कार्यक्रम स्थानिक जैताई मंदिराच्या सभागृहामध्ये पार पडला.
त्यासाठी भारतीय स्त्री शक्ती संघटना शाखा नागपूरचा उपाध्यक्ष राधिका देशपांडे, संघटनेच्या कार्यकारणी सदस्या वर्षा देशपांडे, श्रद्धा श्रोती, सुनिता विद्वान उपस्थित होत्या. राधिका देशपांडे यांनी त्यांच्या संघटनेमार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची सखोल माहिती देत कळी उमलतांना विवाहपूर्व मार्गदर्शन, समुपदेशन केंद्र, बाल संकुल व मदत केंद्र,वाचक चळवळ या स्तुत्य उपक्रमाबद्दल सुसंबंध असे मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित महिलांच्या शंकांचे सुयोग्य निरसन केले. वणी मध्ये संघटनेची शाखा सुरू व्हावी अशी इच्छा व्यक्त केली.
यावेळी महिलांची उपस्थिती वाख्याण्याजोगी होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय सरपटवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदांती उंबरकर तर आभार राधा वैद्य यांनी केले.

स्वातंत्र्यसंग्रामात वैज्ञानिकांचे देखील वैशिष्ट्यपूर्ण योगदान - डॉ.नरेश चाफेकर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : "भारतीयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधन वृत्ती नाही असा खोटा आरोप करणाऱ्या आणि त्या आधारे त्यांना अनेक गोष्टींना करणाऱ्या पाश्चात्त्यांना आपल्या शांत आणि सातत्यपूर्ण कार्यातून भारतीय संशोधकांनी या देशाच्या वैज्ञानिक महत्तेला केवळ दाखवून दिले नाही तर संपूर्ण जगाला उपयोग अनेक संशोधने करीत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला यश आल्यानंतर स्वतंत्र भारताच्या विकासाचा भरभक्कम पाया त्या काळातील वैज्ञानिकांनी साकारला हेच त्यांचे सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण योगदान होय." असे विचार विज्ञान भारतीचे डॉ. नरेश चाफेकर यांनी व्यक्त केले.
        
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्राचार्य राम शेवाळकर स्मृती व्याख्यानामध्ये " स्वातंत्र्यसंग्रामात वैज्ञानिकांचे योगदान" या विषयावर ते व्यक्त होत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष रमेश बोहरा यांच्यासह सचिव लक्ष्मण भेदी, सहसचिव अशोक सोनटक्के तथा प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे उपस्थित होते.
       
प्रास्ताविक करताना डॉ प्रसाद खानझोडे यांनी नानासाहेबांच्या योगदानाला अभिवादन करीत आजपर्यंत त्यांच्या स्मृतीत झालेल्या व्याख्यानमालेत साहित्य किंवा कला विषयातील लोक सहभागी झाले आज प्रथमच या व्यासपीठावर विज्ञान विषयक व्याख्यान होत असल्याचा आनंद व्यक्त केला.संस्थेचे सचिव लक्ष्मण भेदी यांनी नानासाहेबांच्या सोबतच्या व्यक्तिगत अनुभवांना कथन करीत वक्त्यांचा परिचय करून दिला.
        
आपण कधीही मुघल किंवा इंग्रजांच्या समोर शरणागती पत्करली नसल्याने आपण गुलाम होतो हे वाक्यच मुळात चूक आहे असे सांगत स्वातंत्र्ययुद्धाच्या आसेतुहिमाचल सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी इतिहासाचे वर्णन करीत पूर्वी फक्त भंजन करणारे शत्रू होते पण इंग्रजांनी खच्चीकरण करण्याचा अत्यंत दुष्ट खेळ केला हे सांगत प्रमथनाथ बसू, महेंद्रनाथ सत्काळ, जगदीश चंद्र बोस, सी व्ही रमण या सगळ्यांचे योगदान आणि आपली विद्वत्ता संशोधन आपल्या देशाच्या विकासासाठीच असावे ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका अधोरेखित केली. 
        
सोबतच स्वामी विवेकानंद आणि जी आर डी टाटा यांच्या संवादातून या देशातील अध्यात्मिक व्यक्ती पासून व्यापारी वर्गापर्यंत सर्वत्र असणारी वैज्ञानिक वृत्ती त्यांनी विशेषत्वाने सुस्पष्ट केली.

अध्यक्षीय मनोगतामध्ये रमेश बोहरा यांनी भारताची यज्ञ संस्कृती देखील अशीच विज्ञाननिष्ठ आहे हे सांगत त्या दृष्टीने संशोधनाची आवश्यकता प्रतिपादन केली.
कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक गणांसह वणीतील गणमान्य व्यक्ती, संस्थेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तथा सुनील गढ आणि मनीषा घारे हे विज्ञान भारतीचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अभिजित अणे यांनी तर आभारप्रदर्शन सहसचिव अशोक सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनकर उरकुंडे, मनोज केळकर, जयंत त्रिवेदी, पंकज सोनटक्के, संजय बिलोरिया, कार्तिक देशपांडे, नितेश चामाटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

व्यावसायिक शिक्षण कार्यशाळे चे आयोजन...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : शिक्षण ही ज्ञान, कौशल्य, मुल्ये, विश्वास व सवयींच्या प्राप्तीची प्रक्रिया आहे. शिक्षण हे वारंवार शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली होत असते, तथापि विद्यार्थी स्वतःला शिक्षणातून सुद्धा घडवू शकतात. पण त्याला व्यावसायिक शिक्षणाची जोड असणे आवश्यक आहे,असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षणासोबत व्यावसायिक शिक्षणाचे ज्ञान असले पाहिजे फक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही तर, आजच्या काळानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला व तरुण वर्गाला कोणता ना कोणत्यातरी तंत्रज्ञानाचे शिक्षण असले पाहिजे आणि शिक्षणासोबत शिका आणि कमवा असा उद्देश असला पाहिजे. त्याकरिता वणी शहरातील प्रसिद्ध विवेकानंद विद्यालय येथे दिनांक 4 मार्च 2023 ला सकाळी 7.30  वाजता शाळेतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व या विषयावर वणीतील व्यावसायिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असे, सागर मुने मार्गदर्शन करणार आहे.

 यामध्ये दहावी, बारावीनंतर कोणकोणत्या शिक्षणाने काय फायदा होतो, सकारात्मक दृष्टीकोन व्यवसायाचे मूल्य, शिक्षणाचे मूल्य, असे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी वणी परिसरातील तरुणांनी व विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे, आवाहन शाळेचे मुख्याध्यापक दिलीप आसकर यांनी केले आहे.

एटीएम सेवा कोलमडली, मारेगावकरांना सहन करावा लागतो विस्कळीत सेवेचा मनस्ताप!

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : एटीएम (ATM) च्या साहाय्याने पैसे काढणे, पैसे जमा करणे त्याचप्रमाणे आपल्या बँक खात्याची स्टेटमेंट काढणे तसेच बँक खात्यामध्ये किती पैसे आहेत हे तपासणे अश्या प्रकारची कामे या कार्ड द्वारे केल्या जातात. वेळेची बचत व काम पटकन होतं म्हणून या एटीएम कडे लाभ घेण्याचा एटीएम धारकांचा जास्त कल असतो. मात्र हिच सेवा कोलमडली तर किती मनस्ताप होतो हे सध्या मारेगावकर अनुभवतेय.

मारेगाव तालुक्याची ठिकाणी असलेले दोन्ही एटीएम कधी बंद तर कधी कॅश नसल्याने एटीएम ची विस्कळीत झाली आहे यामुळे एटीएम धारक ग्राहकांना या विस्कळीत सेवेचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मारेगाव शहरात स्टेट बँक ऑफ इंडिया व सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे केवळ दोन एटीएम मशीन आहे. परंतू सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे एटीएम (ATM) मागिल काही महिन्यापासून बंद असून स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम सुरु असले तरी त्यामध्ये रोख रक्कम नसणे तसेच त्या एटीएम मशीनवरील बटनाच दबल्या जात नसून त्यामुळे अनेकवेळा चुकीचे आकडे समोर येतात यामुळे ग्राहकांना पैसे काढताना गोंधळ निर्माण होतो त्यामूळे व्यवहार होण्यास अडचणी येत आहे.
   
तरी संबधित यंत्रणेने लक्ष देऊन एटीएम (ATM) सेवा सुरळीत करावी अशी मागणी एटीएम धारक ग्राहक करीत आहे.