शेतकऱ्याचा 10 क्विंटल चना जळून खाक; मारेगाव तालुक्यातील घटना

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगांव : मौजे सगणापुर येथे 26 फेब्रुवारीला सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान, एका शेतकऱ्याचा शेतातील चना अज्ञात इसमाने आग लावली. जमा करून ठेवलेली  गंजी जळून खाक झाली. यात मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

वणी तालुक्यातील विठ्ठल झोलबाजी वैद्य या शेतकऱ्याची सगणापुर येथे 9 एकर शेती आहे. त्यांनी या वर्षी 3 एकरात चना पिकाची लागवड केली होती व ऊर्वरीत शेतात गहु आणि कपाशी या पिकांची लागवड केली. सध्या परीसरात चना पिकाच्या कापणीला सुरूवात झाली असून चना जमा करून शेतातच ठेवला जात असतांना विठ्ठल यांनी सुद्धा आपल्या शेतातील हरबरा पिकांची कापणी करून शेतातच चना जमा करून ठेवला होता. रविवारच्या सायंकाळी सालगडी दिवसभर शेतातील काम करुन घरी गेल्यानंतर शेताकडे काही तरी जळत असल्याचे निदर्शनास येताच सालगडी व गावातील काही नागरीकांनी लगेच शेताकडे धाव घेतली असता, त्यांना शेतातली चण्याचे ढीग जळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चण्याला आग लागली कशी या चर्चेला उधाण आले असून या आगीत शेतकऱ्याची कमाई जळून खाक झाली. या घटनेबाबत शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली. 

अज्ञात इसमाकडून हरबऱ्याच्या गंजीला आग लावल्याचा कयास असून यात शेतकऱ्याचे 8 ते 10 क्विंटलचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आधीच शेत मालाला भाव नाही, कापसाच्या चोरीचे प्रमाण वाढले, शेतातील साहित्य लंपास केले जात असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत असतांना आता एका शेतकऱ्याचा हरभरा जळाल्याची घटना समोर आली. यात मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या गंभीर बाबीबाबत मारेगांव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. अज्ञाताविरोधात कलम 435 भा.द.वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे.

लाचखोर भुमापक एसीबीच्या जाळ्यात अडकला; 12 हजाराची लाच शेतकऱ्याला मागितली

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : येथील भूमिअभिलेख कार्यलयात कार्यरत असलेले भुमापक हे लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला. ही कार्यवाही रविवार दि.26 फेब्रुवारी रोजी 5 वाजताचे दरम्यान रंगेहात पकडून त्याला अटक करण्यात आली.

वणी येथील भूमिअभिलेख येथे के एम कवडे नामक हे भुमापक म्हणून कार्यरत होते, त्यांनी एका शेतकऱ्याला मोजणी साठी बारा हजाराची मागणी केली होती. मात्र, शेतकऱ्याने नियमानुसार सर्व पूर्तता केली. परंतु कवडे वारंवार मोजणीत त्रुटी काढुन मोजणी शीट देण्याचे टाळत होते. दरम्यान,मोजणीसाठी बारा हजार रुपयाची मागणी केली. तडजोडअंती दहा हजार रुपये देण्याचं ठरल्यानंतर शेतकऱ्याने भुमापकाला पैसे न देता यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात तक्रार दिली.

काल रविवारी मोजणीसाठी कवडे शेतात (पुरड) जावून आले व एका हॉटेल मध्ये ठरल्याप्रमाणे कबूली लाच घेण्यासाठी बसले असता, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून भुमापक कवडे यांना दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईने वणी उपविभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. 

आता झेडपीची शाळा ५ मार्चपासून भरणार सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत; उन्हाळ्यामुळे घेण्यात आला निर्णय...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

 जिल्हा परिषदेच्या शाळा ५ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरणार आहेत. उन्हाचा तडाखा आता दिवसेंदिवस वाढू लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा सकाळी साडेसात ते साडेअकरा वाजेपर्यंत भरणार असून दूर अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, या हेतूने हा निर्णय घेतला जातो.

उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका असतो आणि उन्हामुळे अध्यापनाला देखील अडचणी निर्माण होतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरवातीला १ मार्च ते ३० एप्रिल या दोन महिन्यांत शाळांची वेळ सकाळीच असते. यंदा १ मार्चऐवजी ५ मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा सुरु होणार आहेत. पण, प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यासंबंधीची माहिती देतील. त्यानंतर तेच सोमवारी (ता. २७) त्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेणार आहेत.

नवे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून
ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून यंदा प्रथमच सर्व शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने केल्या जात आहेत. परंतु, जून-जुलैमध्ये होणाऱ्या बदल्या फेब्रुवारी संपला तरीदेखील पूर्ण झालेल्या नाहीत. आता पुढील आठवड्यात त्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होईल, पण त्यांना नवीन शाळेवर कधीपासून रुजू व्हावे लागेल, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, आगामी शैक्षणिक वर्ष १५ जूनपासूनच सुरु होईल, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.


जाणून घ्या आजचे रशिभविष्य: 26 फेब्रुवारी रविवार

             राशीभविष्य : २६ फेब्रुवारी रविवार..! 


मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. तुमचे वैवाहिक जीवन आज खूप चांगले असेल. आज तुम्ही मित्रांसोबत एखाद्या लांबच्या सहलीवर जाण्याचा विचार करू शकता. आज एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी मतभेद झाले तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते, त्यामुळे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. नवीन नातेसंबंधांमुळे आज तुमचे नशीब चमकत आहे. सामाजिक सन्मान मिळेल. आज नशीब 90 टक्के तुमच्या बाजूने असेल. गरिबांना कपडे आणि अन्न दान करा.

वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र जाईल. आज तुम्हाला तुमचे लक्ष नवीन योजनांवर केंद्रित करावे लागेल, कारण त्यातून अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आज तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल, दुसरीकडे तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर आज तुम्हाला तुमच्या वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, त्यामुळे लक्ष द्या. संध्याकाळी समाजबांधवांकडून तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 79 टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूच्या मंदिरात पिवळ्या कपड्यात बांधून हरभरा डाळ आणि गूळ अर्पण करा.

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांचे भाग्य आज साथ देत आहे. या दिवशी नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित काही समस्यांचे निराकरण होताना दिसेल. कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो, त्यामुळे तुमच्या मनात अशी भावना असेल तर ते दूर करा आणि मनापासून तुमचे काम करा. आजची संध्याकाळ मित्र आणि कुटुंबियांसोबत हसण्यात आणि मस्करी करण्यात घालवली जाईल. आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच नफा घेऊन येईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज नशीब 82 टक्के तुमच्या बाजूने असेल. श्री शिव चालिसा पठण करा.

कर्क:
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप व्यस्त असेल. आज तुम्ही तुमच्या कामात खूप व्यस्त दिसाल. कोणत्याही प्रतिस्पर्ध्याच्या टीकेकडे लक्ष देऊ नका आणि तुमचे काम आनंदाने करत राहाल, यामुळे भविष्यात यश तुम्हाला मिळेल. या दिवशी तुम्ही तुमच्या सामाजिक क्षेत्रात सुसंवाद वाढवण्यात यशस्वी होताना दिसाल, ज्यामुळे तुमचा आदर वाढेल आणि तुमच्या मनात आनंद निर्माण होईल. आज भाग्य 68 टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूला बेसन लाडू अर्पण करा.

सिंह
सिंह राशीच्या आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी फारसा अनुकूल नाही. आज जर तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत कोणताही व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर असे अजिबात करू नका कारण तुमचे नुकसान होऊ शकते. आज अनावश्यक दु:ख आणि चिंतेमुळे मन उदास राहील आणि आज कठोर परिश्रम केल्यावरच नवीन यश मिळेल. तुमची सामाजिक जबाबदारीही वाढत आहे. आज नशीब 79 टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूची पूजा करा.

कन्या:
कन्या राशीचा आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांचा दिवस सुखकर जाईल. या दिवशी तुमच्या घरातील समस्या दूर होतील. आज तुम्हाला राजकीय मदत मिळेल. सूर्यास्ताच्या वेळी अचानक लाभ होईल. आज तुम्हाला सुख-समृद्धी आणि कौटुंबिक शुभ कार्यात नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. रचनात्मक कार्यात व्यस्त राहाल. प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या तत्परतेचा फायदा होण्याची आशा आहे. आज नशीब 86 टक्के तुमच्या बाजूने असेल. पांढर्या चंदनाचा टिळा लावून तांब्याच्या भांड्यात शिवाला जल अर्पण करा.

तूळ:
आज तूळ राशीचे लोक अति महत्वाकांक्षी असल्याने काही समस्या निर्माण होऊ शकतात. समस्यांवर योग्य तोडगा न मिळाल्याने तुमचे मन अशांत राहील, ज्यामुळे तुम्ही उदास दिसाल. जवळच्या किंवा दूरच्या प्रवासाचा योग असू शकतो आणि पुढे ढकलला जाऊ शकतो. जर तुमच्या घरात कोणतेही काम चालू असेल तर तुम्ही खूप अडकून पडाल. तुमचा दिवस संमिश्र दिसत आहे. आज नशीब 83 टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला दुर्वा अर्पण करा.

वृश्चिक:
वृश्चिक राशीच्या लोकांचे नशीब आज साथ देत नाही. आज तुमचा संपूर्ण दिवस काहीतरी खास करण्याच्या घाईत जाईल, ज्यामुळे तुम्ही खूप व्यस्त असाल. आज तुमचा अधिकाऱ्यांशी चांगला संबंध राहील. आज तुम्हाला तुमचे निराशाजनक विचार टाळावे लागतील. संध्याकाळचा काळ तुम्हाला खूप आनंद देईल कारण आज अचानक तुम्हाला मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. आज नशीब 88 टक्के तुमच्या बाजूने असेल. रोज रात्री शेवटची भाकरी काळ्या कुत्र्याला खायला द्या.

धनु:
धनु राशीच्या लोकांचे नशीब आज साथ देईल. आज तुमची ग्रहस्थिती चांगली असेल. काही खास कार्यक्रमांतर्गत, आज तुम्हाला आश्चर्यकारक मार्गाने अडकलेले पैसे मिळतील. तुम्ही धर्म आणि अध्यात्माकडे वाटचाल करत असताना तुमचा विश्वास अधिक दृढ होईल. दैनंदिन कामात निष्काळजीपणा करू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. नोकरदार लोक खूप धावपळ करत राहतील. आज नशीब 80 टक्के तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन घेऊन तेल अर्पण करावे.

मकर:
मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस खूप व्यस्त असेल. अचानक पाहुण्यांच्या आगमनामुळे तुमच्या खर्चात वाढ होताना दिसत आहे आणि तुमच्या क्षेत्रातील वरिष्ठांशीही मतभेद होऊ शकतात, परंतु तुमचे वैवाहिक जीवन प्रेममय राहील. आज तुमच्या शत्रूंचे मनोबल खचलेले दिसते. आज नशीब 90 टक्के तुमच्या बाजूने असेल. चंदनाचा टिळा लावा.

कुंभ:
कुंभ राशीच्या लोकांचे नशीब आज साथ देत आहे. आज तुमच्यासाठी जमीन खरेदी करण्याचा आणि स्थान बदलण्याचा आनंददायी योगायोग दिसत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात आनंद निर्माण होईल. सुखसोयी आणि घरगुती वापराच्या प्रिय वस्तू खरेदी करता येतील. आज भाग्य तुम्हाला पूर्ण साथ देईल. या प्रभावाने आज तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 76 टक्के तुमच्या बाजूने राहील. ब्राह्मणाला दान द्या.

मीन:
मीन राशीचे लोक आज उत्साही आणि आनंदी असतील. मुलांकडून आनंद मिळेल, यासोबतच आज तुम्ही त्यांची कोणतीही समस्या सोडवू शकाल. आज तुम्ही एखादी स्पर्धा जिंकू शकता. आज तुमचे मन तुम्हाला मिळालेल्या विशेष यशाने आनंदी असेल, परंतु हवामानातील बदलाचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदी क्षणांचा आनंद घ्याल. आर्थिक बाबतीत भाग्य लाभ देईल. आज नशीब 97 टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी पार्वती यांची पूजा करा.


"गरजेनुसार संशोधन झाल्यास सामाजिक परिवर्तन घडेल" - नितीन गडकरी

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २५ वा दीक्षान्त समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत विद्यापीठ परिसर येथे पार पडला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांना डी.लिट. ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती तसेच राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

नवसृजन, उद्यमशीलता यांच्या माध्यमातून ज्ञानाचे रूपांतरण आर्थिक संपदेमध्ये झाले पाहिजे,असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले. ज्ञानासोबत विनम्रता व शालीनता आली पाहिजे हे सांगताना त्यांनी अभिनेता अमिताभ बच्चन व उद्योगपती रतन टाटा यांच्या विनम्र स्वभावाचे उदाहरण दिले.

उत्तम समाज निर्मितीसाठी नीतिमूल्ये आवश्यक आहे असे सांगताना स्नातकांनी प्रतिकूल विचारांचा सन्मान करण्यास शिकले पाहिजे असे त्यांनी सांगितले. जलसुरक्षेसाठी जलसंवर्धन तसेच समुद्रात जाणारे पाणी अडवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 'अन्नदाता शेतकरी' हा ऊर्जादाता झाला पाहिजे असे सांगून गरजेनुसार संशोधन झाल्यास सामाजिक परिवर्तन घडेल असे त्यांनी सांगितले. युवकांनी रोजगारामागे न लागता संपदा निर्माण करणारे उद्योजक व्हावे, असे त्यांनी सांगितले.