मुख्य मार्गांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याची शिवशक्ती वाहतूक सेनेची मागणी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

 वणी : मुख्य मार्गांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात वाढले असून अपघातात अनेकांचे जीव गेले आहेत. तर अनेकांना अपंगत्व आले आहे. रस्त्यांवर उभी राहणारी वाहने अपघातास कारणीभूत ठरत असून, या वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी शिव शक्ती वाहतूक सेनेच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच रस्त्यावर विनाकारण वाहने उभी राहणार नाही, अशी वाहनधारकांना सक्त ताकीद देण्याचेही शिव शक्ती वाहतूक सेनेने निवेदनात म्हटले आहे. रस्त्यावर निष्काळजीपणे उभे करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे यापुढे अपघात झाल्यास शिवशक्ती वाहतूक सेने कडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.       
वणी तालुक्यात अनेक कोळसाखानी, कोलडेपो व लाइमस्टोन डोलोमाईटच्या खाणी आहेत. त्यामुळे रस्त्यांवरून कोळसा व खनिजांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. कोलडेपो मधूनही कोळशाची सतत वाहतूक सुरु असते. तसेच कोल वाशऱ्यांमुळे कोळसा वाहतुकीच्या वाहनांमध्ये आणखीच भर पडली आहे. कोळसा व खनिजांची वाहतूक करणारे शेकडो ट्रक रस्त्याने सुसाट धावत असतात. वणी शहर व तालुक्यात ट्रान्सपोर्ट कंपन्यांचं जाळं पसरलं आहे. अनेक ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे कॅम्प अगदीच रस्त्यावर असल्याने वाहने रस्त्यावर उभी करून वाहनांच्या दुरुस्तीचे काम केले जाते. तासंतास वाहने रस्त्यावर उभी असतात. कोल वॉशरी व कोलडेपो मध्येही वाहतूक करणारे ट्रक रस्त्यावरच ठिय्या मांडून उभे असतात. रात्रीही ट्रक रस्त्यावर तासंतास उभे ठेवले जातात. ट्रकच्या मागील भागाला रेडियम, ब्रेक लाईट, इंडिकेटर लावणे गरजेचे असतांनाही अनेक ट्रक मालक या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे रात्रीला रस्त्यावर उभे असलेले ट्रक छोट्या वाहनधारकांच्या दृष्टीस पडत नाही. या रात्रीच्या वेळेला रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या ट्रकांवर दुचाक्या आदळून अनेक निष्पाप जीवांचे बळी गेले आहेत. तर अनेकांना अपंगत्व आलं आहे. वणी यवतमाळ, वणी वरोरा, वणी घुग्गुस व वणी मुकुटबन या मार्गांनी मोठ्या प्रमाणात कोळसा व खनिजांची वाहतूक सुरु असते. या मार्गांवर रात्रीला नियमबाह्य पद्धतीने ट्रक उभे केले जातात. मागील दोन ते तीन महिन्यात या मार्गांवर अनेक भीषण अपघात झाले आहेत. हे मुख्य मार्गांवर उभे राहणारे ट्रक रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या छोट्या वाहनधारकांसाठी कर्दनकाळ ठरू लागले आहेत. तेंव्हा या रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या ट्रकांवर कार्यवाही करून ट्रक मालकांना ताकीद देण्यात यावी. अन्यथा या ट्रकांमुळे निष्पाप जीवांचा बळी गेल्यास शिव शक्ती वाहतूक सेने कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.
रस्त्यांवर बेजाबदारपणे उभे करण्यात येणाऱ्या ट्रकांमुळे अपघात होऊन निष्पाप जीवांचे बळी गेल्यास ट्रक मालकांना दोषी ठरवून त्यांच्यावर उचित कार्यवाही करण्याची मागणी शिव शक्ती वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चंदनखेडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनावर शिवशक्ती वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष गजेंद्र घरत, जिल्हा उपाध्यक्ष पप्पू सिरसाट, तालुकाध्यक्ष सचिन मडावी, सदस्य विजय कलारे, नितीन कर्णेवार, अरुण कुळसंगे, सतिश जोगी, बलराज खैरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोठी बातमी : महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची चर्चा यशस्वी..!

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

यवतमाळ : आज सकाळपासून राज्यभरातील बत्ती गुल झाली होती. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला होता. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला होता.

आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा संप मागे घेण्यासाठी त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली. त्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, महावितरणचे खासगीकरण करायचे नाही. त्याबद्दल कोणताही विचार नाही असंही फडणवीस म्हणाले आहेत. आज वीज कर्मचारी आणि उपमुख्यमंत्री-उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली, या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला आहे.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
राज्य सरकारला कोणत्याही कंपन्यांच खासगीकरण करायचं नाही. राज्य सरकारला तिन्ही कंपन्यांच खासगीकरण करायचं नाही. ३२ संघटनांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. तीन ते चार मुद्यांवर सकारत्मक चर्चा झाली. वीज कंपन्यांमध्ये सरकार गुंतवणूक करणार आहे. वीज कंपन्यांमध्ये ५० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. ही चर्चा सकारात्मक झाल्याचेही फडणवीस यावेळी म्हणालेत.

तसेच, राज्य वीज नियामक आयोगाकडे आपल्या हिताचे निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सरकार घेईल, असे फडणवीस यांनी म्हटले. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. कामगार संघटनांनी घेतलेली भूमिका ही राज्य सरकारची भूमिका असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

वनविभागाला अखेर यश; वाघाला केले जेरबंद ...


सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवर 

सावली : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील तिन व्यक्तीचा वाघाने बळी घेतला होता. सगळी कडे वाघाची दहशत पसरली होती. शेतकरी शेतात जाण्यासाठी भयभीत झाले होते, अशा संकटकाळी वनमंत्री एक्शन मोड मध्ये येवून वनविभागाच्या कर्मचारी यांना आदेश पारित केले होते. वनमंत्र्याच्या आदेशप्रमाणे सावली येथील वनविभागाची टीम व चंद्रपूर येथील जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक सुध्दा खेडीला हजर होते.

वनविभागाचे 100 कर्मचारी, डॉक्टर,शार्पशूटर तसेच प्रत्येक गावातील 20 लोकांची टीम असे सर्व जण वाघांच्या "झुंड" जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करीत असतांनाच. आज सकाळी 5.30 वाजता कंपार्टमेंट न 502 मध्ये नरभक्ष वाघाला जेरबंद करण्यात यश आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी पि जी विरुटकर, डॉक्टर पी एन बसेट्टी आणि शार्पशूटर तसेच सर्व वनकर्मचारी यांनी अथक मेहनत घेतली.

एस. पी. एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती संपन्न

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांती ज्योती सावित्री बाई फुले जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर, उपमुख्याध्यापक श्री तामगाडगे सर, जेष्ठ शिक्षिका सिंग मॅडम, देशमुख मॅडम, बडे मॅडम, मेश्राम मॅडम, नवघरे मॅडम, कचवे मॅडम, कनाके मॅडम, चिडे मॅडम, गादेवार मॅडम, जेऊरकर मॅडम, कु त्रिरत्न मजगवळी या विद्यार्थिनीने सावित्रीबाई ची भूमिका साकारली.

यावेळी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई च्या जीवनावर प्रकाश टाकला. या वेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजगडकर मॅडम यांनी केले तर, आभार देशमुख मॅडम यांनी मानले.

कारेगाव पारंबा येथे सावित्रीबाई फुले जयंती थाटात करण्यात आली

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामनी : कारेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच गोपाल नामदेव मडावी व कृष्णा अशोक कावडे व सूरज गोपाळ गुरनुले व संपूर्ण गावच्या सहकार्याने भाषणे व रांगोळी व सत संग महिला भजन मंडळ यांचे आयोजन करण्यात आले व सावित्री बाई फुले यांच्या फोटोंचे प्रथम पुरस्कार व शत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोंचे द्वितीय पुरस्कार व राष्ट्रसंत तुकोडोजी महाराज यांचे तृतीय पुरस्कार देण्यात आले
व गावातील सर्व शालीय विद्यार्थ्यांना गावकऱ्यांच्या सहकार्याने रजिस्टर वहया बुक पेनी पुस्तके वाटप करण्यात आले.