वनविभागाला अखेर यश; वाघाला केले जेरबंद ...


सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवर 

सावली : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील तिन व्यक्तीचा वाघाने बळी घेतला होता. सगळी कडे वाघाची दहशत पसरली होती. शेतकरी शेतात जाण्यासाठी भयभीत झाले होते, अशा संकटकाळी वनमंत्री एक्शन मोड मध्ये येवून वनविभागाच्या कर्मचारी यांना आदेश पारित केले होते. वनमंत्र्याच्या आदेशप्रमाणे सावली येथील वनविभागाची टीम व चंद्रपूर येथील जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक सुध्दा खेडीला हजर होते.

वनविभागाचे 100 कर्मचारी, डॉक्टर,शार्पशूटर तसेच प्रत्येक गावातील 20 लोकांची टीम असे सर्व जण वाघांच्या "झुंड" जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करीत असतांनाच. आज सकाळी 5.30 वाजता कंपार्टमेंट न 502 मध्ये नरभक्ष वाघाला जेरबंद करण्यात यश आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी पि जी विरुटकर, डॉक्टर पी एन बसेट्टी आणि शार्पशूटर तसेच सर्व वनकर्मचारी यांनी अथक मेहनत घेतली.