ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची निवडणूक आयोगाची परवानगी

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दि. १ डिसेंबर रोजी पत्र निर्गमित केले आहे. वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविणयात आले आहेत. ३० नोव्हेंबरपासून आयोगाची वेबसाइट अतिशय मंदगतीने सुरु असल्याने उमेदवारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, ते अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक आयोगाकड़े केली. या मागणीस आयोगातर्फे सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन देखील दिले. निवडणूक आयोगातर्फे तातडीने दखल घेतली गेली व सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

वाघाच्या हल्ल्यात नाहक जीव गमवावा लागलेल्या मृतकांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्याकरिता खासदार बाळू धानोरकर यांनी त्या कुटुंबियांची घेतली भेट


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी वणी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्ती अभय मोहन देऊळकर रा. भुरकी (रांगणा) व रामदास जगन्नाथ पिदुरकर कोलेरा (पिंपरी) या दोन मृतकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्याकरिता खासदार बाळू धानोरकर यांनी दोनही मृतकांच्या कुटुंबियांना भेट दिली.

त्यापूर्वी वणी रेस्ट हाऊस येथे उपविभागीय अधिकारी तहसीलदार तसेच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचेसोबत चर्चा करून कायमस्वरूपी नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करून मृतकांच्या कुटुंबीयांना उर्वरित आर्थिक मदत तात्काळ देण्याच्या सूचना केल्या वणी तालुक्यात भविष्यात मानवावर हमला होवू नये. याची दक्षता घ्यावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रंगनाथस्वामी फार्मर्स प्रोडयुसर कंपनी लि. वणी चे अध्यक्ष संजय खाडे यांचेकडून मृत व्यक्तींना वारस मोहन आनंदराव देऊळकर यांना 10,000 रू. व प्रतिभा रामदास पिदूरकर यांना 10,000 रू. असे 20,000 रू. मा. खासदार बाळू भाऊ धानोरकर यांच्या हस्ते आर्थिक मदत करण्यात आली. त्यात शासकीय मदत प्रत्येकी 10 लाख रु. त्यांना मिळाले आहे.
उर्वरित 10 लाख रु. सुद्धा तात्काळ आजचा आजच द्या अशी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या तसेच परिसरात फिरत असलेले नरभक्षक वाघ आहे त्या वाघाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा असे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 
 परिसरातील शेतकरी व शेतमजूर यांनीसुद्धा घाबरून जाऊ नये असा धीर दिला. यावेळी परिसरातील कोलेरा, पिंपरी, पिंपळगाव, उकणी, व मुंगोली या गावच्या पुनर्वसनाबाबत लवकरात लवकर पुनर्वसन करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी त्यांच्यासोबत चर्चा करून शक्य तितक्या लवकर मिटिंग लावून पुनर्वसनाचा मार्ग व इतरही समस्या मार्गी लावण्यासाठी मिटिंग घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार त्यांचेसोबत माझ्या उपस्थितीत मिटिंग लावा अशा सूचना मा. खासदारांनी दिल्या.
               
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार निखिल धूळधर वणी, किरण जगताप उप वनसंरक्षक पांढरकवडा, आशिष वासनिक वनपरिक्षेत्र अधिकारी वणी, टिकाराम कोंगरे अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सह बँक, संजय खाडे अध्यक्ष रंगनाथस्वामी फार्मर्स प्रोडयुसर कंपनी लिमिटेड वणी, प्रमोद वासेकर, संजय सपाट, जितेंद्र बोंडे, प्रफुल उपरे, बंडु सोनटके, विलास चिकटे सरपंच नांदेपेरा अधिकारी व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

राज्य सरकार करणार जि. प. च्या 30 हजार शिक्षकांची मेगा भरती, 'या' महिन्यात होणार 'टेट' परीक्षा..

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

मुंबई : जिल्हा परिषद शाळांमध्ये 29,600 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या शिक्षक भरतीसाठी फेब्रुवारी-2023 मध्ये शिक्षक पात्रता चाचणी (टेट) होणार असून, निकाल मार्चमध्ये जाहीर केला जाईल. मेरिटनुसार पात्र उमेदवारांना पवित्र पोर्टलद्वारे जूनपूर्वी थेट नियुक्ती दिली जाईल.

राज्यात गेल्या चार वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने लवकरच शिक्षक भरती करण्याचे नियोजन केले आहे.
फेब्रुवारीत होणार 'टेट'

पहिली ते आठवीच्या शाळांवरील शिक्षकांसाठी 'टीईटी', तर नववी ते अकरावीपर्यंत शाळांवरील शिक्षकांसाठी ‘टेट’ परीक्षा घेतली जाणार आहे. फेब्रुवारीत ही परीक्षा होईल. त्यासाठी सहा हजारांहून अधिक केंद्रांवर ही परीक्षा होईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.

परीक्षेच्या नियोजनासंदर्भात शालेय शिक्षण विभाग उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. परीक्षेचा निकाल जाहीर होताच, भरती प्रक्रिया सुरु होईल,परंतु त्यासाठी वित्त व नियोजन विभागाचा ‘हिरवा कंदिल’ मिळणे आवश्यक आहे.


गायरान जमिनीवरील घरे अतिक्रमण म्हणून काढणार नाही

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : गायरान जमिनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत, असा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने चर्चेअंती घेतला. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आग्रहानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडून मंजूर करून घेतला. त्याबद्दल श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले. राज्यातील सुमारे सव्वादोन लाख कुटुंबांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत कार्यवाही करण्यात येणार होती. परंतु, या गरीबांची घरे निष्कासित करणे योग्य नाही, असे श्री. मुनगंटीवार यांनी आग्रहपूर्वक मांडले. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत एकाही व्यक्तीचे अतिक्रमण काढले जाणार नाही, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. यासंदर्भात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल करेल, असेही श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

राज्यात 2 लाख 22 हजार 382 व्यक्तींची घरे शासनाच्या गायरान जमिनीवर आहेत. परंतु, या गरीबांची घरे निष्कासित करणे शक्य नसल्याने त्याठिकाणी गावठाणचे पट्टे तयार करता येतील का याची चाचपणी करण्याचे सरकारने ठरवले आहे. गाव किंवा शहराजवळील गायरान जमिनीवर अनेक वर्षांपूर्वी हातावरील पोट असलेल्या निराधार व्यक्तींनी घरे बांधली आहेत. त्यातील अनेकांना राहायला स्वतःची जागादेखील नाही. त्यामुळे त्यांचे गायरान जमिनीवरील अतिक्रमण न काढण्याबाबत राज्य सरकार अनुकूल आहे. या लोकांसाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

अतिक्रमणासंदर्भात ज्यांना ज्यांना नोटीस दिली आहे, त्या नोटीसा मागे घेण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. परंतु, यापुढील काळात शासकीय जमिनीवर अतिक्रमण होणार नाही, यादृष्टीने देखील स्वतंत्र धोरण आखले जाणार आहे.

मारेगाव: अतिवृष्टी निधीची यादी बँकेत पाठवल्याची मनसेने खात्री करून लेखी घेतली

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

मारेगांव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन दिवसापूर्वी प्रशासनाला निवेदन दिले होते, त्यात निधी तात्काळ खात्यात जमा करण्याची मागणी सह ईशारा दिला होता, निवेदनाची दखल घेत तहसिलदार पुंडे यांनी संबंधित बँकेकडे लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादया पाठवून मनसे पदाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले.

मागील जुलै-ऑगष्ट महिन्यात अतिवृष्टीने व महापूरात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, प्रशासन व राजकिय नेत्यानी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली मात्र शेतकऱ्याना नुकसान भरपाई मिळण्यास होणारा विलंब पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांच्या नेतृत्वात तहसिल प्रशासनाला निवेदन देण्यात आले, यात त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा निधी तातडीने खात्यात जमा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देताच तहसिलदार दिपक पुंडे यांनी कर्मचार्‍याना आदेश देत उर्वरीत शेतकऱ्यांच्या यादया दुरस्त करून बँकेत पाठवल्या, आज बुधवार दि ३० नोव्हेबरला मनसे कार्यकत्यानी तहसिलदार पुंडे यांची भेट घेत यादया बँकेत पाठवल्याची खात्री करत तहसिलदार पुंडे यांचेकडून बँकेत निधी पाठवल्याचे लेखी पत्र घेतले.

यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, शहर अध्यक्ष नबी शेख, चांद बहादे, विलास रायपुरे, गजु चंदनखेडे, किशोर मानकर, संतोष राठोडसह असंख्य मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.