मारेगांव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन दिवसापूर्वी प्रशासनाला निवेदन दिले होते, त्यात निधी तात्काळ खात्यात जमा करण्याची मागणी सह ईशारा दिला होता, निवेदनाची दखल घेत तहसिलदार पुंडे यांनी संबंधित बँकेकडे लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादया पाठवून मनसे पदाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले.
मागील जुलै-ऑगष्ट महिन्यात अतिवृष्टीने व महापूरात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, प्रशासन व राजकिय नेत्यानी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली मात्र शेतकऱ्याना नुकसान भरपाई मिळण्यास होणारा विलंब पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांच्या नेतृत्वात तहसिल प्रशासनाला निवेदन देण्यात आले, यात त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा निधी तातडीने खात्यात जमा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देताच तहसिलदार दिपक पुंडे यांनी कर्मचार्याना आदेश देत उर्वरीत शेतकऱ्यांच्या यादया दुरस्त करून बँकेत पाठवल्या, आज बुधवार दि ३० नोव्हेबरला मनसे कार्यकत्यानी तहसिलदार पुंडे यांची भेट घेत यादया बँकेत पाठवल्याची खात्री करत तहसिलदार पुंडे यांचेकडून बँकेत निधी पाठवल्याचे लेखी पत्र घेतले.
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, शहर अध्यक्ष नबी शेख, चांद बहादे, विलास रायपुरे, गजु चंदनखेडे, किशोर मानकर, संतोष राठोडसह असंख्य मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.