नरसाळा हद्दीतील मुरमाचे अनधिकृत उत्खननाबाबत तंटामुक्त अध्यक्षाची जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यात अवैध मटका, अवैध दारू हा विषय नसून आता अवैध गौण खनिजाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. गौण खनिजासाठी प्रसिद्ध असलेल्या नरसाळा येथील नेहमीच गौण खनिजाची राजरोसपणे लूट होते. याचा प्रत्यक्ष अनुभव नरसाळा येथील जनतेला आला. 

धामणी येथील तलावाच्या हद्दीतील शेकडो ब्रास मुरुम चव्हाण स्टोन केशर संचालकांने वाहन क्रमांक एम एच २९ बी ई ४१५५, व वाहन क्रमांक एम एच बी ई ०१५३ सहाय्याने गायब केला आहे. या मुरमाची लूट नरसाळा येथील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सुरू असल्याची तक्रार तंटामुक्ती अध्यक्ष रवी बाभळे यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केली आहे.

शेकडो ब्रास मुरमाचे उत्खनन राजरोसपणे होत असून यावर प्रशासनाचे एवढी डोळेझाक का, असा सवाल रवि बाभळे कडुन होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धामणी येथील असलेल्या तलावाच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून अवैध उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन महसूल विभागाच्या मेहेरबानीने सुरू असल्याची चर्चा आहे. याच मेहरबानीच्या वरदहस्ताने मुरूम पळवला जात असून विना रॉयल्टी तलावाच्या जमिनीवर अवैध मुरम उपसा होत आहे.  
एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुरमाच्या उत्खननावर ना पाटबंधारे विभागाचे लक्ष आहे, ना महसूलचे. यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडवला जात तर आहेत परंतु, दमडी खिशात घालण्याचे काम जोमात सुरू आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत अवैध मुरम उपसा केलेल्या जागेचे मूल्यमापन करून चव्हाण स्टोन केशर संचालकावर कारवाई करावी तसेच अशा अवैध प्रकाराला खतपाणी घालणाऱ्या व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी तंटामुक्ती अध्यक्ष रवी बाभळे यांनी केले आहे. तरी या अवैध मुरूम उपसा करणाऱ्यावर शासन काय कारवाई करतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पोलीस भरती एनसीसी आरक्षणावरून पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी दिले निवेदन

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : पोलीस भरतीत एनसीसी आरक्षणावरून पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी 23 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी (sdo) यांना निवेदन दिले. पोलीस भरतीत एनसीसी (ncc) च्या विद्यार्थ्यांना पाच टक्के जास्त गुण मिळण्याबाबत या विरुद्ध विद्यार्थ्यांनी निवेदनातून मागणी केली.


अनेक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एनसीसी युनिट नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना एनसीसी (ncc) घेता येत नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. परिणामी इतर मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा सरासर अन्याय होतो यासंदर्भात विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीतील एनसीसीच्या विद्यार्थ्यांना पाच टक्के मार्क न वाढवून देता त्यांना स्वतंत्र आरक्षण कोटा द्यावे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय याची गृह खात्याने दखल घ्यावी या संदर्भात विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय वणी येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी पोलीस भरती करणारे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.

विलासराव जाधव याची ४९ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी सलग पाचव्यांदा निवड

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : आतापर्यंत असंख्य वणीकरांनी शहराचे नाव अटकेबार नोंदवले आहे. असे म्हणायला हरकत नाही. नुकतेच शैक्षणिक सञ २०२१-२२ चे ४९ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक १८ सप्टेंबर व १९ सप्टेंबर २०२२ रोजी शिक्षणाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे घेण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात अनु.जाती मुलांची शासकीय निवाशी शाळा परसोडा वणी येथिल प्रयोगशाळा सहाय्यक श्री.विलास किसनराव जाधव यांनी दिव्यांग भोजन यंत्र तयार केले होते. हे यंञ ज्या दिव्यांग विद्यार्थ्याला दोन्ही हात नाहीत त्या विद्यार्थ्यांना भोजन करण्यासाठी हे यंत्र अतिशय महत्त्वाचे ऊपयोगी आहे. दिव्यांग भोजन यंत्र या प्रतिकृतीला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेली आहे. विलास यांच्या निवडीचा सर्वच वणीकरांना अभिमान आहे.

विलास जाधव प्रयोगशाळा सहाय्यक यांची जिल्ह्यातून सलग पाचव्यांदा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेली आहे. विलास जाधव प्रयोगशाळा सहाय्यक यांनी अनु.जाती मुलांची शासकीय निवाशी शाळा परसोडा वणी येथे मानाचा तुरा खोवला आहे. या नैञदिपक यशाबद्दल सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यवतमाळ मा.श्री.भाऊराव रामसिंग चव्हाण साहेब यांनी भरभरून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या व महाराष्ट्रातून आदर्श प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून समाज कल्याण विभागातर्फे गौरवण्यात येईल अशी ग्वाही दिली.तसेच प्रादेशिक ऊपायुक्त समाज कल्याण विभाग अमरावती मा.श्री.वारे साहेब यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. मा.आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे मा.श्री.प्रशांत नारनवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात ९० निवाशी शाळा कार्यरत आहे. परंतु अनु.जाती मुलांची शासकीय निवाशी शाळा परसोडा वणी जि.यवतमाळ यांनी आतापर्यंत सलग सहाव्यांदा नेतृत्व करणारी अव्वल निवाशी शाळा ठरली आहे.

सामाजिक न्याय विभागात अप्रतिम कार्य करणारे ऊत्कृष्ट प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून एक वेगळी ओळख आहे. प्रयोगशाळा सहाय्यक विलास जाधव हे सलग विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोगातुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. अतिशय प्रेरणादाई प्रवास या प्रयोगशाळा सहाय्यक यानी केलेला आहे. सतत विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा यासाठी प्रयत्नशिल असलेला ऊत्कृष्ट प्रयोगशाळा सहाय्यक यांनी यावर्षी युनिक असा प्रयोग तयार केला आहे.जो आपण कल्पनाही करु शकत नाही. दोन्ही हात नसलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना हा भोजन यंञ खूप कामी येणार आहे. या अप्रतिम कलाकृतीला महाराष्ट्रातुनच नाही तर गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र ईत्यादी कानाकोपऱ्यातुन प्रयोगशाळा सहाय्यक यांना अभिनंदनाचा वर्षाव आणि शुभेच्छा दिल्या जात आहे.

श्री.विलास किसनराव जाधव हे समाजसेवक आहे. आज पर्यंत निवासी शाळा परसोडा वणी च्या निवाशी शाळेत मानाचा तुरा रोवल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.प्रविण ठमके सर, श्री.संदीप सातपुते सर, श्री.रविंन्द्र चव्हाण सर, श्री.दत्ताञय पूलेनवार सर, श्री.प्रविण खडसे सर, श्री.वैभव दहीकर सर, श्री.दत्ताञय प्रधान भाऊ, श्री.निखाडे सर,श्री.थाटे सर, श्रीमती.माथनकर मॅडम व सर्व शिक्षकेतर सर्व कर्मचारी आणि सर्व स्तरावरून शुभेच्छा व अभिनंदन केले जात आहेत.

नांदेपेरा परीसरातील नागरीकांच्या आंदोलनाला यश..जड वाहतुक खैरी वडकी करंजी मार्गे वळविण्याचा आदेश निघाला


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : नांदेपेरा वणी मागाॆवर मागील 10 महीण्यापासुन कोळशाची जड वाहतुक सुरु होती.ज्यामुळे नागरिकांना ये जा करतांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.वारंवार निवेदन दिल्यानंतरही प्रशासन त्याची दखल घेतांना दिसत नव्हते. 21 सप्टें. ला सायं.7 वाजता हि जड वाहतुक चिखलात फसल्याने वाहतुक खाेळंबली नागरिकांचे येणे जाणे ‌बंद झाले राज्य परिवहन बसेस अडकुन बसल्या. 22 सप्टें. आले‌ तरीही मागॆ खुला झाला नाही. मग नागरिकांनी आक्रमक होत sdo कार्यालयावर धडक दिली.नागरीकांचा तिव्र रोष बघता बंद वाहतुक खूली करण्यात आली.आणि युध्द पातळीवर कार्यवाही करीत उपरोक्त वाहतुक खैरी वडकी करंजीं मागेॆ वळविण्याचा आदेश काढण्यात आला. आजच्या धडकेत काॅ.अनिल घाटे,राकेश खामनकर,सारंग घाटे,अथवॆ निवडींग,अनिल देऊळकर,चंद्रकांत धोपटे,शंकर केमेकर,भारत केमेकर,विलास चिखटे,सुरेश शेंडे यांचे नेत्रुत्वात शेकडो नागरिक उपस्थित होते.

सत्रारंभ सभेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : स्थानिक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉ. गजानन सोडणर, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप केलोड सर व वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रवीण कुलकर्णी सर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचा उद्देश हाच की नवीन सत्रामध्ये प्रवेश घेतलेला राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेची संकल्पना आणि कार्याची माहिती मिळाली पाहिजे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संदीप केलोडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय आणि उद्दिष्टे यावर आपला प्रकाश टाकला तर डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून संत गाडगेबाबांनी केलेल्या कार्याची दाखले देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच डॉ. गजानन सोडणर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थीदशेत राष्ट्रउभारणीमध्ये युवकांचे योगदान या विषयावर आपले मत व्यक्त केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घरडे सर यांनी शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जाव्यात असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख यांनी केले तर रासेयो सह कार्यक्रमाधिकारी प्रा विजय भगत व रासेयो विद्यार्थिनी कु. खुशी खैरे यांनी 'खरा तो एकची धर्म' ही प्रार्थना म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पौर्णिमा काळे हिने केले तर आभार प्रदर्शन वसुधा देवाळकर यांनी मांडले. महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद डॉ. अनिल अडसरे सर, प्रा. शैलेश आत्राम सर, प्रा. अक्षय जेनेकर सर, रासेयो महिला सहकार्यक्रम अधिकारी प्रा. माधुरी शेंडे मॅडम व रासेयो विद्यार्थी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.