मारेगाव येथे शिवसेना पक्ष बांधणीचा श्रीगणेशा..


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मारेगाव तालुका तसा तर खूप ग्रामीण आहे व त्या ग्रामीण भागाकडे सर्व पक्षाची भूमिका ही दुय्यम स्वरूपाची असली तरी शिवसेना मात्र, आपल्या संघटन बांधणीकडे दुर्लक्ष न करता ग्रामीण भाग हा शिवसेनेकडे आकर्षित होताना आज पुन्हा पाहावयास मिळाले. 
कांग्रेस पक्षासोबत मागील 20 वर्षापासून तालुका उपाध्यक्ष पदावर असलेले विनोद केशवराव आत्राम सरपंच घोडधरा 
सुनील हिवरकर उपसरपंच घोडधरा, परमेश्वर टेकाम उपसरंपच बुरांडा, प्रभाकर आत्राम उपसरपंच
शिवनाळा यांनी आपल्या असंख्य समर्थकासोबत आज शिवसेना नेते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके चे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या नेतृत्वात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. ह्यावेळी मारेगाव तालुक्यातील पांडविहार, खेकडवाई, बुरांडा,जानकाई पोड, शिवनाळा, बोटोनी, बिहाडी पोड, सराटी, खडकी, येथील शेकडो लोकांनी आपला प्रवेश घेतला.
ह्यावेळी मारेगाव येथील नगरसेवक जितेंद्र नगराळे, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, भगवान मोहिते, विलास कालेकर, प्रवीण खानझोडे हे प्रामुख्याने पक्ष प्रवेश सोहळा पार पडताना उपस्थीत होते.

पुसद विधानसभा मतदारसंघातील शाळा बनल्या कोंडवाडे

नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर 

महागांव : शासनाच्या शैक्षणिक ध्येय धोरणानुसार, 30 विद्यार्थी पटसंख्येच्या मागे 1 शिक्षक असावं या पद्धतीच शैक्षणिक धोरण निश्चित असताना पुसद विधानसभा मतदार संघातील, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ शेवटचे टोक असलेले महागाव पंचायत समिती अंतर्गत डोंगराळ भागातील आदिवासी बहुल बंजारा तांडा, (कोनदरी) या गावामध्ये सध्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये वर्ग १ ते ५ असून, एकूण पटसंख्या 212 विद्यार्थ्यांची असताना देखील केवळ दोनच शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहे. त्यामध्ये एक शिक्षक व दुसरे सहाय्यक कंत्राटी, शिक्षक असुन वेळोवेळी शिक्षकांकरिता गाव पातळीवरून मागणी झाल्यानंतर 2021 -- 22, हे शिक्षक उपलब्ध झाले. अन्यथा संपूर्ण शाळेचा शैक्षणिक ज्ञानदानाचे कारभार हे केवळ एकच शिक्षकावर अवलंबून आहे व दैनंदिन इतर तालुका स्तरावरील प्रशासकीय शैक्षणिक मीटिंग, इतर निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय कामकाजाच्या बैठकी व शैक्षणिक कामकाज शालेय मध्यम पोषण आहार त्यासोबत सर्व विद्यार्थ्यांना धडे देण्याचे काम चालू असून या गावांमध्ये मागील 10 वर्षापासून उच्च श्रेणी पद रिक्त आहे.
शासनाच्या शिक्षण विभागाच्या विद्यार्थी पटसंखेच्या ध्येय धोरणानुसार या गावाला (6 + 1) असे एकूण शिक्षक पदसंख्या असणे अपेक्षित व क्रमप्राप्त आहे ही वरील पदे या शाळेला मंजूर असून हे गाव डोंगराळ भागात असल्यामुळे शहरी आसरा शोधणाऱ्या नव्या पिढीच्या शिक्षकांना येथे रुजू होण्यास फारसं स्वारस्य नसतो अशा गावात रूजू होण्यास नकार देतात. या गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून इयत्ता (5) पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांचं पोखरी या गावामध्ये शाळेत प्रवेश निश्चित केला या बालवयात प्राथमिक शिक्षण हे गावातच मिळायला हवं पण दुर्दैवाने या बाल वयात त्यांना दररोज 10, किलोमीटर स्वखर्चाने ये -- जा करून शिक्षण घ्यावं लागत आहे, या शाळेला उत्पन्नाचे साधन म्हणून 11, हेक्टर शेतजमीन पण हराशी होत नसल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे शाळा च्या सादिल खर्चासाठी आर्थिक स्रोत मिळणे बंद आहे.

पंचायत समिती महागाव शिक्षण अधिकारी यांनी दिलेल्या अधिकृत माहिती नुसार या महागाव पंचायत समितीत, 250 शिक्षकांची आज रोजी गरज असून आदिवासी बंजारा तांडा वाडी वस्तीवर शिक्षण व्यवस्था शिक्षकां अभावी ही पूर्णतः कोलमडलेली असून या अभावात जगणाऱ्या या बंजारा, आदिवासीबहुल भागातील तांडा वाडी वस्तीवरील शैक्षणिक गुणवत्तेवर न बोललेलंच बरं. शासनाचा गले लठ्ठ पगार घेऊन आपल्या कर्तव्यात काम चूकारपणा करून निवासी न राहता निवासी भत्ता घेणे अधून मधून शाळेला दांडी मारणे, ग्रामीण विभागातील शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा अत्यंत घसरलेला असून यामध्ये गत दोन दशकात अनेक पिढ्या गारद झाल्या शाळा व्यवस्थापन समिती केवळ कागदावर नामात्र असून शिक्षण व्यवस्थेची माती करणाऱ्या या बोथट व संवेदनाहीन यंत्रणा व व्यवस्थेला प्रश्न उपस्थित करून राज्यकर्ते जबाबदारी निश्चित करणार का? या ज्वलंत प्रश्नावर आढावा घेऊन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायला यांना वेळ मिळणार की, नाही, केवळ प्रासंगिक प्रसंगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेंवर जाऊन सेल्फी घेऊन व्हाट्सअप वर वळवळ करत असतानाचे फोटो सध्या पुसद विधानसभा मतदारसंघात दृष्टिक्षेपात येतात पण अशा डोंगराच्या कुशीमध्ये होत असलेली विद्यार्थ्यांची शिक्षका अभावी होणारी कोंडी गैरसोय बघण्याकरिता ना स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य, स्थानिक प्रस्थापित आमदारांकडे वेळ नाही, राज्यातील सध्याचे अस्तित्वात असलेले प्रचलित शैक्षणिक ध्येयधोरण ग्रामीण व शहरी अशा विषमतावादी बिज रोहण्याचं काम करत आहे शैक्षणिक धोरणामुळे ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांची स्पर्धेतील पीछेहाट, क्षमता बांधणी निर्माण होणे मोठे कठीण झाले आहे.
स्थानिक जिल्हा प्रशासनाने व पंचायत समिती कक्ष अधिकारी यांनी आम्हाला सकारात्मक आश्वासन देऊन तातडीने या गावाला व पंचायत समितीला लवकरच शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही दिली प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास या विधायक विषयाच्या मागणीला घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाची भूमिका घेणार पंचायत समिती शिक्षणाधिकारी कडे निवेदन करताना शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव, विशाल पवार जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना सचिव, सचिन राठोड, निलेश राठोड, आकाश राठोड, आदी गावकरी उपस्थित होते.

सावली येथील विश्रामगृहात खा.अशोकजी नेते यांच्या दौऱ्या दरम्यान विविध विषय घेऊन भाजपा सावली कार्यकर्त्यांची बैठक..


उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

सावली : शासकीय विश्रामगृह सावली येथे खा.अशोकजी नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतला आढावा या बैठकीदरम्यान खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना क्षेत्रात विविध ठिकाणी होत असलेले वाघांचे हल्ले यावर उपाय योजना करावी. पंतप्रधान आवास योजनेचा अहवाल,यशवंतराव चव्हाण योजनेत सर्व गावांना प्राधान्य द्यावे,ड यादीचा सर्वेक्षण करून गरजूं लाभार्थ्यांना आवास योजनेत समाविष्ट करावे.पुरपरिस्थितीमुळे पिकांचे झालेले नुकसान व त्वरीत पंचनामे,सततच्या पाण्याने,पुराने अनेकांची घरे पडली.या संदर्भातसुध्दा चौकशी करून पंचनामे करणे आवश्यक आहे.
अशा विविध विषयाचा आराखडा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देऊन निर्देश दिले.

 याप्रसंगी खा.अशोकजी नेते, तालुकाध्यक्ष अविनाश पाल,महामंत्री तथा नगरसेवक सतिशजी बोमावार,शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर,तहसीलदार पाटील,थानेदार बोरकर साहेब,BDO सुनिता मरसकोल्हे,RFO राजुरकर साहेब, वनपाल कोडापे सर, कोषाध्यक्ष अर्जुन भोयर,निखिल सुरमवार,प्रफुल तुम्हे,राकेश गोलेपलिवार तसेच भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते..

मारेगाव येथे राष्ट्रीय क्रीडादिन निमित्य 'मेजर ध्यानचंद भव्य दौड स्पर्धा' संपन्न

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगांव : कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगांव जि यवतमाळ ,शारीरिक शिक्षण विभागातर्फे राष्ट्रीय क्रीडादिन निमित्य 'मेजर ध्यानचंद भव्य दौड स्पर्धा' दिनांक 29 ऑगस्ट 20022 रोजी आयोजित करण्यात आली होती.P या स्पर्धेत 18 वर्षा आतील 3 किमी तथा वारिस्ट गट 5 किमी असे दोन वयोगट ठेवण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्धघाटन प्रसंगी शेतकरी शिक्षण संस्था मारेगाव यांचे अध्यक्ष मा. जीवन पाटील कापसे, मारेगाव चे नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की, पोलीस ठाणेदार श्री सावंत साहेब तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाशजी घरडे यांनी हिरवे झेंडे दाखवून केले. 
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्रवीण लांडे यास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घरडे सर यांचे कडून रोख 3001 द्वितीय पारितोषिक डॉ. येवले यांचेकडून कुणाल चौधरी यास रोख 2001 तर तिसरे पारितोषिक डॉ. सोडणार यांचे कडून रोख 1001 प्रवीण नारनवरे यास तर कनिस्ट गटात प्रथाम पारितोषिक मा. जीवन पाटील कापसे यांचे कडून 3001 क्रिश मिस्त्री यास तर द्वितीय पारितोषिक भाऊरावजी राऊत यांचे कडून 2001 ओम ढवळे यास तर तिसरे पारितोषिक रवीभाऊ धानोरकर यांचे कडून रोख 1001 निकुंज किरमिरे यास प्रधान करण्यात आले.
या स्पर्धे करीता कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगांव शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. नितेश राऊत, डॉ चिरडे, डॉ.आडसरे, डॉ सोडणार, डॉ चावरे, डॉ देशमुख,डॉ चौहान, प्रा. चिंचोलकर, डॉ गायकवाड यांनी परीश्रम घेतले .

वर्धा नदीच्या पुलाला असलेल्या कठड्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : वर्धा नदीवरील पाटाळा पुलाला असलेल्या लोखंडी कठड्याला एका युवकाने गळफास घेतल्याचे लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या युवकाचे नाव तेजस मोगरे असल्याचे कळते. आज 31 ऑगष्टला पहाटे काही वाहन चालकांना हा युवक ट्यूबने (टायर) वर्धा नदीच्या पुलाभोवती असलेल्या कठड्याच्या लोखंडी पाईपला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला असून, त्याच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप कळू शकले नाही.

पुलावर एक दुचाकी उभी असून ती या युवकाचीच असावी असा अंदाज लावल्या जात असून मृतदेहाजवळ उभी असलेल्या दुचाकीचा क्रमांक एम एच 34 बि एल 5163 हा आहे.

सदरहू घटनेचा पोलिस तपासात लवकरच ते समोर येईल.