आनंद निकेतन महाविद्यालय,आनंदवन,वरोरा येथेमहाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा प्रशिक्षण शिबिर संपन्न


कालू रामपुरे | सह्याद्री चौफेर 

वरोरा : आनंद निकेतन महाविद्यालय,आनंदवन,वरोरा येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य,रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन,यांचे महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018 अंतर्गत आयोजित "महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेच्या" सदर धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे.
राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या संबंधाने प्रशिक्षण शिबिर घेऊन यासंबंधीचे आनंद निकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. ही स्टार्टअप यात्रा 2 सप्टेंबर 2022 रोज शुक्रवारला आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन,वरोरा येथे सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत येत आहे. या अनुषंगाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.मृणाल काळे, कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा.राजू महाजन, प्रमुख उपस्थिती, महाविद्यालयीन समन्वयक नीरज आत्राम,प्रा. राधा सवाने,प्रा. रमेश पळसुटकर, प्रा. गालकर प्रा. नितीन बारेकर, प्रा.सीमा नगरारे, प्रा.मानसी काळे, व्ही.आर.आत्राम, प्रा मंडल, प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. "विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कौशल्य, कला आणि ज्ञान विकसित करून बेरोजगारांना रोजगाराच्या संबंधाने सतत प्रोत्साहित केले पाहिजे" असे आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांनी सांगितले. तसेच मार्गदर्शक प्रा. राजू महाजन यांनी "महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018" आणि महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांनी तथा बेरोजगारांनी सामोरे यावे असे आवाहन केले." महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेसाठी स्पर्धक नोंदणी सुरू आहे. तरी इच्छुकांनी महाविद्यालयात येऊन समन्वयकांशी संपर्क साधावा. अशाप्रकारे सर्व योजना सविस्तरपणे समजावून सांगितले.
प्रा मंडल, प्रा.सचिन लोहकरे, प्रा.व्ही पि.गजरे, नव उद्योजक, जितेश कायरकर, प्रशांत ढेंगळे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक निरज आत्राम यांनी केले. तर या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन प्रा. रमेश पळसुटकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.नितीन बारेकर यांनी केले. या शिबिराला विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

आणखी एका शेतकऱ्यांची आत्महत्या; 28 ऑगस्ट रोजी घेतले होते विष


चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यात आत्महत्यांची मालिका थांबता थांबेना, आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. मात्र, मारेगाव प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने घेत नसल्याचे बोलल्या जात आहे.

मारेगाव तालुक्यातील दांडगाव येथील शेतकरी तरुण तोताराम मंगत चिंचोलकर (47) याने राहत्या घरात दि.28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता विषप्राशन केले. त्यांना वणी येथे दाखल करण्यात आले होते, परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते. त्यांचे वर तेथे उपचार सुरु असतांना काल मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. या दुःखद घटनेने चिंचोलकर परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

मागील महिन्याभऱ्यातील अतिवृष्टी आणि सततची नापिकी, डोक्यावर असलेले ओझे त्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकलने फार तारेवरची कसरत सध्या शेतकऱ्यांना करावी लागत असल्याने तालुक्यात आत्महत्याचे प्रमाण वाढत असून शासन प्रशासन या गंभीर बाबीकडे पाहिजे तसे लक्ष घालत नसल्याचे बोलल्या जात आहे. 

तोताराम यांचे पाठीमागे पत्नी, आई-वडील, दोन मुली असा बराच आप्त परिवार आहे.

अनिल सचदेव साहेबांचा सूरमाज फाउंडेशनच्या वतीने सत्कार

सह्याद्री चौफेर | न्यूज 

चोपडा : आपल्याला माहीत आहे की, रुग्णालयात गेल्यास रुग्णाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे काही वेळा रुग्णाची प्रकृती गंभीर होते, त्यामुळेच जिल्हास्तरावर वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे आणि तेथे जिल्हा समन्वय.रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम करणारे एक पद आहे, या पदावर चोपडा शहरातील माननीय सुनील सचदेव साहेब यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळेच सूरमज फाऊंडेशनने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी अध्यक्ष डॉ. सूरमज फाउंडेशनचे हाजी उस्मान शेख साहिब अब्दुल्ला शेख नजीर काझी साहिब शाहिद शेख जुबेर बाग उपस्थित होते.

पिकअप वाहनाने दिली दुचाकीला धडक, दुचाकीस्वार ठार

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी :भरधाव पिकअप वाहनाने  एका दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना मुकुटबन मार्गावरील मानकी गावाजवळ घडली. मृतक मानकी येथील रहिवासी आहे. मात्र, घटना घडताच वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. 

घटना अशी की, मानकी येथील शेतकरी चरणदास पांडुरंग ठेंगणे (54) हे  दुचाकी क्र एम एच 29 डब्ल्यू 5040 ने आज रविवार रोजी दुपारी 2:15 वाजताच्या सुमारास घरून काही कामानिमित्त वणी कडे निघाले सोबत मुलाला वाटेत असलेल्या शेतात त्याला सोडून वणीकडे जात असताना अशातच त्यांच्या पाठीमागून येत असलेल्या भरधाव चार चाकी पिकअप वाहनाने चरणदास यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने चरणदास हे रस्त्यावर पडले असता त्याच  पिकअप वाहनाने त्यांना चिरडले व त्याच्या मृत्यू झाला. 

आवाजाच्या दिशेने आसपासच्या शेतातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीला धडक देवून चरणदास ठेंगणे यांच्या मृत्युस कारणीभूत ठरणाऱ्या पसार पिकअप वाहनचालकाच्या विरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघातातील पिकअप वाहन विस्फोटक वाहतूक करणारी असल्याची माहिती आहे. या घटनेचा पोलीसांनी पंचनामा केला असून, पुढील तपास वणी पोलीस करित आहे.
  

49 वर्षीय इसमाची विष प्राशन करून आत्यहत्या


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नवरगाव (कायर) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे चार वाजताचे दरम्यान, घरी एकटा असतांना विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.
रमेश विठ्ठल तिखट (49) असे विषारी औषध प्राशन आत्महत्या केलेल्या मृतकाचे नाव आहे. घरी कोणीच नसतांना त्याने विषारी औषध प्राशन केले असता, त्याला  वणी येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला चंद्रपूर येथे हलविण्यास सांगितले, चंद्रपूर येथे उपचारादरम्यान 23ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या निधनाने तिखट कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
रमेश यांच्या पाठीमागे पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा असा बराच आप्त परिवार आहे.