कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
भारतातील सर्वात मोठे औद्योगिक विकास महामंडळ
एमआयडीसीची स्थापना 1 ऑगस्ट 1962 मध्ये राज्य सरकारमार्फत महाराष्ट्र औद्योगिक अधिनियमानुसार करण्यात आली आणि एमआयडीसीला महाराष्ट्रातील समतोल औद्योगिक विकासाची जबाबदारी देण्यात आली. एम आय डी सीच्या बांधिलकी आणि समर्पणामुळे महाराष्ट्र हे आज भारतातील सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले, अद्ययावत पायाभूत सुविधा असलेले प्रगत राज्य बनले आहे.
एमआयडीसी ने ठाण्यातील केवळ एका औद्योगिक वसाहतीपासून सुरुवात केली आणि आज राज्यातील सर्व 36 जिल्ह्यात असलेल्या 16 प्रादेशिक कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात 289 हून अधिक औद्योगिक वसाहती उभ्या आहेत. एमआयडीसी ने 2.25 लाख एकरपेक्षा जास्त जमीन विकसित केली असून तेथे अद्ययावत पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि यामुळे एमआयडीसीला भारतातील सर्वात मोठे औद्योगिक विकास महामंडळ म्हणून गणले जाते.
एमआयडीसी आज, नवीन युगातील तंत्रज्ञानासह विविध धोरणे सक्षमपणे राबविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत
जरी असली तरी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील एमआयडीसी चा जीर्ण मळकट, सडलेला उभा बोर्ड मात्र, तालुक्यातील सुशिक्षित होतकरू युवकांची थट्टा उडवीत आहे. असे म्हणायला हरकत नाही. आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या मारेगाव तालुक्यात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, येथील लोकप्रतिनिधीची निष्क्रियतामुळे बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे स्वप्न भंग झाले आहे.
अनेक तालुक्यातील या एमआयडीसीच्या या जागेवर छोटे-छोटे उद्योगगही सुरु झाले. मात्र, मारेगावात याकडे पाठफिरविली जात आहे. परंतु शहरात एखादा मोठा उद्योग उभा राहिल्यास निश्चीतच तालुक्यातील बेरोजगारी कमी होईल असे मत व्यक्त केल्या जात आहे. एमआयडीसी 60 वर्षांची वयस्क नाही, तर 60 वर्षांची तरुण आहे. एमआयडीसी नेहमीच एक पाऊल पुढे राहण्याचा सतत प्रयत्न करित आहे. मात्र मारेगाव या उद्योगाच्या स्पर्धेत मागे राहिला आहे. त्यामुळे नावालाच "मारेगाव तालुका" असं आता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष म्हटलं जात आहे.