महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचा हीरक महोत्सव साठ वर्षांची तरुण ‘एमआयडीसी’

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : एखाद्या व्यक्तीची साठ वर्षे सेवा झाली किंवा व्यवसाय करणारी व्यक्ती वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होते, पण महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी (MIDC) सारख्या संस्थेसाठी ही फक्त एक सुरुवात आहे. महाराष्ट्राच्या भवितव्याची बांधणी करणारी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून आणि गुंतवणूक प्रोत्साहन संस्था म्हणून जबाबदारी सांभाळणारी जागतिक मंचावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी एमआयडीसी (MIDC) चा हीरक महोत्सव नुकताच पार पडला. एमआयडीसी 60 वर्षांची वयस्क नाही, तर 60 वर्षांची तरुण आहे आणि दरवर्षी अधिकाधिक उत्साही आणि तरूण होत आहे. एमआयडीसी नेहमीच एक पाऊल पुढे राहण्याचा सतत प्रयत्न करित आहे. परुंतु मारेगाव तालुका याला अपवाद ठरत आहे. 


भारतातील सर्वात मोठे औद्योगिक विकास महामंडळ

एमआयडीसीची स्थापना 1 ऑगस्ट 1962 मध्ये राज्य सरकारमार्फत महाराष्ट्र औद्योगिक अधिनियमानुसार करण्यात आली आणि एमआयडीसीला महाराष्ट्रातील समतोल औद्योगिक विकासाची जबाबदारी देण्यात आली. एम आय डी सीच्या बांधिलकी आणि समर्पणामुळे महाराष्ट्र हे आज भारतातील सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले, अद्ययावत पायाभूत सुविधा असलेले प्रगत राज्य बनले आहे.


एमआयडीसी ने ठाण्यातील केवळ एका औद्योगिक वसाहतीपासून सुरुवात केली आणि आज राज्यातील सर्व 36 जिल्ह्यात असलेल्या 16 प्रादेशिक कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात 289 हून अधिक औद्योगिक वसाहती उभ्या आहेत. एमआयडीसी ने 2.25 लाख एकरपेक्षा जास्त जमीन विकसित केली असून तेथे अद्ययावत पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि यामुळे एमआयडीसीला भारतातील सर्वात मोठे औद्योगिक विकास महामंडळ म्हणून गणले जाते. 


एमआयडीसी आज, नवीन युगातील तंत्रज्ञानासह विविध धोरणे सक्षमपणे राबविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत 
जरी असली तरी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील  एमआयडीसी चा जीर्ण मळकट, सडलेला उभा बोर्ड मात्र, तालुक्यातील सुशिक्षित होतकरू युवकांची थट्टा उडवीत आहे. असे म्हणायला हरकत नाही. आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या मारेगाव तालुक्यात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, येथील लोकप्रतिनिधीची निष्क्रियतामुळे  बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे स्वप्न भंग झाले आहे.


अनेक तालुक्यातील या एमआयडीसीच्या या जागेवर छोटे-छोटे उद्योगगही सुरु झाले. मात्र, मारेगावात याकडे पाठफिरविली जात आहे. परंतु शहरात एखादा मोठा उद्योग उभा राहिल्यास निश्चीतच तालुक्यातील बेरोजगारी कमी होईल असे मत व्यक्त केल्या जात आहे. एमआयडीसी 60 वर्षांची वयस्क नाही, तर 60 वर्षांची तरुण आहे. एमआयडीसी नेहमीच एक पाऊल पुढे राहण्याचा सतत प्रयत्न करित आहे. मात्र मारेगाव या उद्योगाच्या स्पर्धेत मागे राहिला आहे. त्यामुळे नावालाच "मारेगाव तालुका" असं आता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष म्हटलं जात आहे.


जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५०


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर  

मुंबई : राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सध्या राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कमीत कमी 55 आणि जास्तीत जास्त 85 अशी सदस्य संख्या अशी आहे. ग्रामीण भागातील घटत चाललेल्या लोकसंख्येमुळे सुधारित सदस्य संख्या करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याला किमान 50 जागा देण्यात येतील. या संदर्भातील अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल.
नवीन महाविद्यालयांसाठी इरादापत्रांची मुदत 17 ऑगस्ट

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भातील अध्यादेश निर्गमित करण्यात येईल.

या अधिनियमामुळे महाविद्यालयांना नवीन महाविद्यालये, परिसंस्था सुरु करणे तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्रे सुरु करण्यासाठी 17 ऑगस्ट 2022 पूर्वी इरादापत्र देता येईल.

सेवा नगरातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : येथील सेवा नगर परिसरात न.प.शाळा.क्र.8 जवळील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. नागपंचमी सणासुदीच्या दिवशी रात्री 8 वाजता च्या दरम्यान, उघडकीस आली.
सचिन बाबुलाल हारोडे (36) असे या मृतकाचे नाव आहे. त्याने राहते घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. तो मजुरीचे काम करीत होता. त्याच्या पत्नीने त्याला सोडचिठ्ठी दिल्याने तो एकटाच घरी राहत होता. 
मृतकाचे भाऊजी सचिन रामदास डांगोरे रा. वागधरा यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी मर्ग दाखल करून, मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.
सचिनच्या आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून, नेमकं स्पष्ट कारण पुढील तपासात निष्पन्न होणार आहे.

महागांव शहरात साहित्यसम्राट डाॅ. अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

लखन लोंढे | सह्याद्री चौफेर 

महागांव : महागांव शहरातील सटवाराव नाईक सभागृहात साहित्यसम्राट, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची आज १०२ वी जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.
      
आज दूपारी ठिक १ वाजता जयंतीच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. उमरखेड - महागांव विधानसभेचे विद्यमान आमदार नामदेव ससाने व सर्व मान्यवरांनी सर्व महापुरुष व डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन केले. तद्वनंतर मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले.   

तसेच बालवक्ते कु. शुभांगी लोंढे हिच्या भाषणाने अण्णाभाऊंच्या विचारसत्राला प्रारंभ झाला. यावेळी नांदेडहून आलेले समाजातील युवा वक्ते शैलेश रणखांब यांनी आपल्या जोरदार क्रांतीकारी शैलीत बोलतांना म्हणाले की, मातंग समाजाने पूर्वीपासूनच काळानुरुप आपले महत्वपुर्ण स्थान निर्माण केले असुन भारताचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या कालखंडात मातंग ऋषींचा धार्मिक उल्लेख आढळतो तर आधूनिक काळात साहित्यरत्नाच्या रुपाने अण्णाभाऊ आदर्शवत झाले. त्याचप्रमाणे नियोजित वक्ते प्रा.डाॅ. बाळकृष्ण सरकटे, प्रा.देवेंद्र ठाकरे, माधव वैद्य (सेवानिवृत्त उपायुक्त, समाजक्याण) विजय रणखांब यांनी अण्णाभाऊंच्या जीवनावर अभ्यासपुर्ण प्रकाश टाकला आणि शेवटी विद्यमान आमदार नामदेव ससाने यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, अण्णाभाऊंचा आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीने आदर्श घेतला पाहिजे असा त्यांनी राष्ट्रीय विचार मांडला.    

यावेळी दिपक आडे (भाजपा तालुका अध्यक्ष), सुदाम खंदारे (शिवसेना नेते), सुरेश नरवाडे (न.पं. उपनगराध्यक्ष, महागांव), गजानन वाघमारे (पत्रकार), संतोष कांबळे, अ‍ॅड. लक्ष्मीकांत भांगे, शिवानंद राठोड (उपसरपंच, चिली) तालुका उत्सव समितीचे प्रसाद शिंदे, दिपक लोंढे, प्रभाकर खंदारे, राजू कावडे, शिवाजी लोंढे, सुभाष पतंगे, देवराव घड्याळे, निलेश खंदारे, प्रभाकर अडलुरे, आनंदराव गरडे व लखन लोंढे (पत्रकार) मान्यवरांसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपसथित होते.

खड्डा वाचवण्याच्या नादात घडला भीषण अपघात; एक ठार, एक जखमी

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गौराळा फाट्या जवळ भरधाव वेगाने येत असलेल्या टाटा एस (TATA ACE) या छोटा हत्ती वाहनाने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या मोटरसायकल स्वारांना जोरदार धडक दिल्याने एक जण घटनास्थळी ठार झाला तर, सहकारी जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजता च्या दरम्यान घडली.
बाळकृष्ण महादेवराव पाचभाई (60) मु.कवठाळा ता.कोरपना जिल्हा चंद्रपूर असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव असून, त्याचा सहकारी जखमी आहे. जखमीवर वणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर मृतक महादेव पाचभाई यांचा मृतदेह मारेगाव रुग्णालयात हलविण्यात आला.
    
दरम्यान, टाटा एस (TATA ACE) छोटा हत्ती वाहन वणी वरून मारेगावकडे येत असतांना बाईकस्वार विरुद्ध दिशेने जात होते. राज्यमहामार्गावरील खड्डा वाचविण्याच्या नादात हा अपघात झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.