मनावर अधिराज्य करणारा नेता आज आपल्यातून गेला!

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (३१ जुलै) : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन माननीय आमदार गणपतराव देशमुख हे अफलातून निर्माण झालेलं व्यक्तिमत्व होते. सलग सलग अकरा वेळा आमदार होणे तेही जनतेच्या विश्वासाने जनतेच्या मनाने आणि कुठलेही प्रलोभनं न देता,अकरा वेळा आमदार होणे ही एक अद्वितीय आणि न पटणारी अशी गोष्ट असली तरी, हे खरे आहे.

माननीय आमदार गणपतराव देशमुख उर्फ आभार हे सांगोला सांगोला तालुक्याचे करत होते. ते धनगर समाजाचे एक अत्यंत विश्वासू साधे मनमिळावू आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारं असं नेतृत्व होतं असे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले देशाची तसेच राज्याची मोठी हानी झालीआबा ना भावपूर्ण श्रद्धांजली बाबाच्या जाण्याने एकच शतकातील कायम लोकप्रतिनिधी व करून शासनाला आपल्या भाषणाच्या माध्यमातून प्रभावित करणारे व्यक्तिमत्व अभ्यासू व्यक्तिमत्व तसेच साधी राहणी आणि उच्च विचारसरणी नागपूर असो या मुंबई असो अधिवेशनासाठी एसटीने प्रवास करणारे व्यक्तिमत्व असे नेते दुर्मिळच कुठले भ्रष्टाचाराचे ठपका न ठेवता जीवन जगणारे तसेच शुद्ध चारित्र्याचे व्यक्तिमत्व निरोगी आणि जनतेच्या मनावर अधिराज्य करणारा नेता आज आपल्यातून गेला आहे.(आबा साहेब उर्फ गणपतराव देशमुख बसने प्रवास करताना)

असे नेते होणे नाही जीवनामध्ये अकरा वेळा आमदार होताना कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता शेतकरी कामगार पक्षाची ध्येयधोरणे राबवणे कुठल्याही पक्षाने प्रलोभने दिले तरी पक्ष बदलला नाही प्रलोभनाला बळी पडले नाही. तहहयात एकाच पक्षांमध्ये राहून जनतेची सेवा केली असे व्यक्तिमत्व आज आपण हरवून बसलो याचे मोठे दुःख होत आहे. आबा आपण देशामध्ये एक आदर्श निर्माण केला की, पैसा पद हे काहीच नसते तर जनता ही सर्वस्व असते जनतेसाठी कामे करणे हेच महत्त्वाचे याच्याच जोरावर अकरा वेळा जवळ जवळ अस पंचावन्न वर्षे आमदार म्हणून काम केले.

देशाचे नेते आदरणीय शरदराव पवार यांचे विश्वासू आणि एक मित्र असे त्यांचे व्यक्तिमत्व होते माननीय शरदरावजी पवार साहेब यांनी त्यांना मंत्रिपदी ही आमंत्रित केले होते, सन्मान माननीय पवार साहेबांनी केला. अनेक वेळा अनेक मोठी पदे देण्याचे प्रलोभन दाखवून सुद्धा बाबांनी पक्ष सोडला नाही.

आजच्या काळात असे दैवी जनतेची सेवा करणारे जनतेवर विश्वास ठेवणारे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करणारे नेते दुर्मिळच अशी एक स्वच्छ कारभाराचे जनतेच्या मनातील राजा आबा साहेब उर्फ गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

देगलूर,बिलोली विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात मतदार संघात इच्छुक उमेदवारांची भेटी गाटींना सुरुवात


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (३१ जुलै) : केसराळी तालुका बिलोली येथे देगलूर/बिलोली विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात माजी अपरजिल्हा अधिकारी मा. बी.एम.कांबळे यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन अनेक विषयांवर चर्चा तसेच हितगुज झाले. ग्रामस्थांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या. यावेळी एक मोकळा संवाद झाला, या भेटी दरम्यान देगलूर-बिलोली  पोटनिवडणूक संदर्भात सविस्तर चर्चा आणि ग्रामस्थांनी स्वतःची मत व्यक्त केली. या संवाद दरम्यान ग्रामस्थांचे मिळालेले आशीर्वाद नेहमी बळ देतील.

यावेळी माडे दत्तात्रय पाटील (माजी सरपंच), सुभाष पाटील काळे, सटवाजी सोनकांबळे (माजी सरपंच), 
प्रकाश फकीरे (त्रिरत्न बौद्ध विहार ट्रस्ट अध्यक्ष), रानबाजी इरबा सोनकांबळे, हनमंत टमटम, मोगलाजी फकीरे, नितीन कारले, राजेश्वर मंदरणे (सरपंच प्रतिनिधी), मादळे मारुती (उपसरपंच), विनोद मोगलाजी फकीरे‌ तसेच केसराळी गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

ट्रक झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालकासह क्लिनर ठार

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
केळापूर, (३१ जुलै) : यवतमाळ-चंद्रपूर या राज्य महामार्ग क्रमांक चार वर ट्रक झाडावर आढळल्याने झालेल्या अपघातात चालक व क्लिनर दोघेही ठार झाले आहेत. हा अपघात आज ३१ जुलै ला सकाळी ८:३० वाजताच्या दरम्यान घडला.

चंद्रपूरहून यवतमाळच्या दिशेने लोखंडी पोल घेऊन निघालेल्या ट्रकचा टायर फुटून अनियंत्रित ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळला. यात ट्रकचालक व क्लिनर दोघेही ट्रकच्या केबिनमध्ये फसले. यात दोघांचाही मृत्यू झाला.
अपघातात ट्रक मध्ये दोघे फसले असतानाही त्यांना वाचविण्यासाठी ५ तासात कुठलेही प्रयत्न न झाल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. या अपघातात ठार झालेले ड्राइवर व क्लिनर दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याचे चर्चा आहे. 

मारेगाव: समाज भवन मंदिराचे काम ४ महिन्यापासून रखडले

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मारेगाव, (३१ जुलै) : समाज कार्यासाठी निर्माण होत असलेल्या समाज भवनाचे केवळ पिल्लर उभे करून  भवनाचे बांधकाम चार महिन्यापासून रखडले आहे. लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून बांधकाम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 
स्थानिक नगरपंचायत जवळ हनुमान मंदिराला लागून असलेल्या खुल्या जागेवर एक समाज भवन बनावे या मागणीसाठी काही प्रतिष्ठित नागरिकांनी समाज भवनासाठी वणी विधानसभेचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याकडे आग्रही मागणी घालून त्यांच्या पुढाकाराने २० लाखांचा निधी भावनासाठी मिळाला. मात्र, गेल्या तीन चार महिन्यापूर्वी सुरू झालेले समाज भवनाचे बांधकाम पिल्लर उभे करून थांबल्या गेले असून, पुढील बांधकामाचा वेग मंदावल्याने बांधकाम बस'स्टॉप आहे.

तातडीने समाज भवनाचे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मित्रानेच केली मित्राची हत्या : सहा तासात आरोपीला पकडण्यात पोलिसांना आले यश


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
यवतमाळ, (३१ जुलै) : नागपूर तुळजापूर महामार्ग वरील उमरखेड येथुन तीन किलोमीटर अंतरावरील नदीच्या पुलाजवळ युवकाचा मृत्यू खळबळ जनक घटना आज घडली मृतक अक्षय वसंतराव करे वय २० वर्ष या युवकाचा खून करून मारून टाकले असता, पोलीसांनी अवघ्या पाच ते सहा तासात मुख्य आरोपी आकाश लोंढे यांना जेरबंद करून यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास करीत आहेत. सदरील घटना ज्ञानेश्वर कदम यांच्या शेतात घडली ज्ञानेश्वर कदम या शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन उमरखेड यांना संपर्क साधून घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले, पंचनामा केला असता पोलिसांना दोन तीन मोठे दगड, दोन डिस्पोजल ग्लास, एक नंबर वन मॅकडॉल : दारूची बॉटल मिळाली. तसेच मृतकाचे चार मित्र संशयित ताब्यात घेऊन तपास करण्यात आला. तपासातून आरोपी आकाश लोंढे यांनी मृतक अक्षय करे याचा खून करण्यात आला असे सांगण्यात आले.

पुढील कायवाही उपविभागीय पोलिस अधिकारी पुसद अनुराग जैन त्यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड ठाणेदार आनंद वाघतकर साहेब, API संदीप गाडे, पी. एस. आय. विनित घाटोळ, NPC विजय पतंगे, संदीप ठाकूर हे करीत आहे.