शेतकरी पुत्राने संपवली जीवन यात्रा, कोलगाव येथील घटना

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील कोलगाव येथील तरुणाने शेतातील एका झाडाला गळफास घेत आपली  घटना आज सकाळी 10 वाजता उघडीस आली.

प्रदीप उर्फ शालिक नानाजी अवताडे (39) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे. वडिलांकडे असलेल्या शेतीसह इतरत्र मजुरी करून आपल्या परिवाराचे गुजरान करायचा. शालिक हा नेहमीप्रमाणे कोलगाव शिवारात असलेल्या शेतात गेला आणि झाडाला फाशी चा फंदा लावलेल्या अवस्थेत काहींना दिसून आला. ही बातमी नातेवाईक यांना कळताच दुःखाचे डोंगर कोसळले.

शालिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदीपच्या आत्महत्येचे नेमके कारण गुलदस्त्यात असून त्याच्या पाठीमागे वडील, आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

समाजकंटकाकडून बिरसा मुंडाच्या प्रतितिमेचे विटंबना, ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्द गुन्हा दाखल

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आदिवासी समाजाचे आराध्य दैवत क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची विटंबना केल्या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करणवाडी गावातील उपसरपंच संगीता बळवंत कोवे (35) यांनी याबाबत मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

प्राप्त माहितीनुसार करणवाडी ग्रामपंचायत समोर चौकात लोखंडी खांबाच्या बोर्डावर क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची प्रतिमा लावलेली आहे. दिनाकं 17 डिसेंबरच्या रात्रीच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात समाजकंटकाने प्रतिमेच्या चेहऱ्यावर मातीचे काळे डाग लावल्याचे 18 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आले.

बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे दैवत असून प्रतिमेची विटंबना केल्यामुळे समाजाची धार्मिक भावना दुखावली गेली. त्यामुळे करणवाडी येथील आदिवासी समाजातील नागरिकांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठून प्रतिमेची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपीचा तत्काळ शोध घेऊन कार्यवाहीची मागणी केली आहे. मारेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्द कलम 295 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

नागरिकांनो घाबरू नका, काळजी घ्या; कोरोना जेएन-वन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

ठाणे : देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश दिले. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले. राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याचीही ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून ही बैठक घेतली. त्यामध्ये आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाईपलाईन्स, आरटीपीसीआर लॅब, डयुरा/लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी व योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही याची खात्री करतानाच लसीकरणाचा आढावा घ्यावा, ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांची माहिती घ्यावी व लसीकरण करण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

लस व औषध साठा पुरेसा उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी. आरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सची स्थापना करुन त्यातील तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटर, विलगीकरण बेड्स, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर बेड्सच्या सद्य:स्थितीबाबतचीही माहिती यावेळी घेतली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाने याआधी देखील कोविडच्या संकटाचा धीरोदात्तपणे यशस्वी मुकाबला केला आहे. संपूर्ण जगाने त्याबाबतीत आपल्या देशाचे अनुकरण केले. मागील अनुभवाच्या आधारे आताही राज्यातील यंत्रणा संपूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करुन घ्यावी. आगामी सण व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार यासाठी काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नागरिकांना केले.

सोशल मीडियावरून तसेच प्रसारमाध्यमांनी देखील या नव्या व्हेरिएंट संदर्भात चुकीच्या बातम्या प्रसारित होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम वा घबराट निर्माण होणार नाही, अफवा पसरणार नाही. माहिती प्रसारीत करताना अधिकृत माहितीचाच उपयोग करावा, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शासन यंत्रणा एकजुटीने कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पूर्णत: सज्ज आहे. यंत्रसामुग्री, औषध साठा, इतर साधनसामुग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेने घाबरु नये. काळजी घ्यावी काळजी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ, आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी आरोग्ययंत्रणेच्या सज्जतेबाबत माहिती दिली. आरोग्य यंत्रणेच्या सर्व यंत्रसामुग्री, इतर सर्व यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित असल्याची खात्री करण्यासाठी दि. 15 ते 17 डिसेंबर 2023 या कालावधीत ठिकठिकाणी मॉक ड्रिल घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या राज्यात 63 हजार विलगीकरण बेड्स, 33 हजार ऑक्सिजन बेड्स, 9 हजार 500 आयसीयू बेड्स व सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे 45 रुग्ण (मुंबई-27, पुणे-8, ठाणे-8,कोल्हापूर-1, रायगड-1) आढळून आले आहेत, असे श्री. म्हैसकर यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी जेएन वन या नव्या व्हेरिएंटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येईल, असे सांगितले.

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : मुद्रांक शुल्क न भरलेल्या किंवा नियमापेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या अथवा नोंदणी न केलेल्या दस्तांसाठी सरकारने महाराष्ट्र शुल्क अभय योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. दि. 1 डिसेंबर 2023 पासून दि.31 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 अशा दोन टप्प्यांत ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल विभागामार्फत करण्यात आले आहे.

मुद्रांक शुल्क अभय योजनेमध्ये कमी स्टॅम्पड्युटी भरलेल्या जुन्या दस्तांवरील मुद्रांक शुल्कामध्ये आणि दंडामध्ये मोठयाप्रमाणात सूट दिली आहे. दि.1 जानेवारी, 1980 ते दि.31 डिसेंबर, 2000 या कालावधीत निष्पादित केलेल्या ज्या दस्तांमध्ये कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम १ लाखापेक्षा कमी असणार आहे. अशा दस्तांवरील कमी भरलेले संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ करण्यात येऊन व त्यावरील दंडाची रक्कम देखिल संपूर्णपणे माफ करण्यात आली आहे. तर, कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम ही 1 लाखापेक्षा जास्त असेल तर, कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये 50% सूट देऊन त्यावरील दंडाची संपूर्ण रक्कम माफ करण्यात आली आहे. दि.1 जानेवारी, 2001 ते दि.31 डिसेंबर, 2020 या कालावधीमध्ये निष्पादित केला असेल तर, अशा दस्तांवर देखिल कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये 25% पर्यंत सूट देण्यात येऊन त्यावरील दंड हा 25 लाख ते 1 कोटी मर्यादेपर्यंतच वसुल करण्यात येणार आहे. त्यापेक्षा जास्त दंडाची रक्कम असेल तर, ती संपूर्णपणे माफ केली जाणार आहे.

काही कारणास्तव पहिल्या टप्यामध्ये सवलत घेण्यासाठी अर्ज करण्यास विलंब झाला तर दुसऱ्या टप्यामध्ये देखिल सवलतीसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. परंतु, हा लाभ हा कमी प्रमाणात मिळेल.

या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्यासह नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अभय योजनेसाठी अर्जदार यांना संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात समक्ष किंवा ऑनलाईन अर्ज करता येतील. अर्जाचा नमुना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर (www.igmaharashtra.gov.in) तसेच, सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच योजनेची सविस्तर माहिती या विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशने परिपत्रक-मुद्रांक अभय योजना या सदराखाली नागरिकांसाठी उपलब्ध आहे.

दहेगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दहेगाव (घोंसा) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.

या प्रसंगी धोबी समाजाचे नेते माजी नगरसेवक राजू तुराणकर, दहेगाव चे सरपंच दिलीप महाकुलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बंडू वांढरे, धोबी समाज तालुका अध्यक्ष प्रवीण वाघमारे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी शेखर चिंचोलकर, प्रदीप मुके समाजसेवक, नितीन बिहारी वणी शहर सचिव भाजप व्यापारी आघाडी, मनोज दाढे, कैलास दाढे शिक्षक, अनिल ठावरी, दहेगाव पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, गावकरी उपस्थित होते.

संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रबोधनकार ह. भ. प. उदयपाल महाराज यांच्या प्रबोधनाने कार्यक्रम संपन्न झाला आहे.