सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; राज्यातील ४८ मतदारसंघात ४ जूनला मतमोजणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात घेण्यात आली असून या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील ४८ मतदार संघात मंगळवारी दि. ४ जून २०२४ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. 
ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत देण्यात आली आहे.
राज्यातील ४८ मतदार संघातील मतमोजणी केंद्रावर एकूण
१४५०७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण २८९ हॉल मध्ये ४३०९ मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हिंगोली लोकसभेत कोण मारणार बाजी!

सह्याद्री चौफेर | लखन लोंढे 

महागांव : महिना भराखाली पार पडलेल्या नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाला आता आजचा दिवस शिल्लक राहीला असून या निवडणुकीत हिंगोली लोकसभेतून दुहेरी लढतीत कोण बाजी मारणार याकडे आता वाडी, तांडयातील नागरिकाचे लक्ष लागले आहे तर निकालाची उत्सुकता गाव, खेड्यात चांगलीच लागली असून मोबाईलवर सोशल मीडियावर, टीव्हीकडे नागरिकाचे अधिक लक्ष लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी २६ एप्रिल रोजी मतदान शांततेत पार पडले असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी चांगल्या प्रकारे झाली आहे.गेल्या महिन्या भरापूर्वी मतदान झाले असून देशातील लोकसभेचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. मतदानानंतर आता निकालाची तारीख व वेळ जवळच आली.असल्याने आता निकालाबाबत मतदारात तर्क, वितर्क लावत कोण निवडून येणार या बाबत कडक उन्हाळ्यात गरम खमंग चर्चा रंगली आहे.

हिंगोली लोकसभेसाठी मतदारसंघातील वाडी, तांड्यासह विविध गावात दुहेरी लढत झाली आहे. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम पाटील कोहळीकर, महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर या दोघांमध्ये चांगली चुरस झाली आहे. व दोघांनीही चांगल्या प्रकारे मतदारांनी पसंती देत मतदान केले आहे. परंतु या दुहेरी लढतीमध्ये आता कोणाचा विजय होईल. व कोण किती मताने निवडून येईल या बाबत वाडी, तांड्यातील मतदारांमध्ये तर्क, वितर्क लावत सोशल मीडियावर पाहावयास मिळत आहे. तर टीव्हीवर देखील एक्झिट पोल च्या बातम्या सुरू असल्याने त्या बघण्यासाठी मतदारांनी अधिक पसंती देत. या बाबत मतदारांना त्यांची चांगलीच उत्सुकता लागली आहे.

शामा दादा कोलाम ब्रिगेड च्या वतीने कोलाम समाज जनसंवाद अभियानाची रायपूर येथून सुरुवात


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पाटणबोरी : अनुसूचित जमाती पैकी कोलाम समाज हा अतिशय महत्त्वाचा घटक असून शासनाच्या विविध योजनेतून व कामापासून वंचित राहत असल्यामुळे श्यामा दादा कोलाम ब्रिगेडच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सुरेश कुमरे यांच्या पुढाकाराने यवतमाळ जिल्ह्यात कोलाम समाज जनसंवाद अभियान सुरू करण्यात आला असून याची सुरुवात झरी (जामणी) तालुक्यातील रायपूर या गावातून करण्यात आली असल्याची माहिती बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा तथा श्यामा दादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी संघटनेच्या विशेष प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.
                     
पुढे प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे की यवतमाळ जिल्ह्यात प्रामुख्याने झरि (जामणी) तालुक्यात बहुतांश आदिवासी कोलाम पोड ची मोठ्या प्रमाणात आहे पंचायत अनुसूचित क्षेत्रात विस्तार अधिनियम १९८६ केंद्र शासनाने दिनांक २४ डिसेंबर १९९६ रोजी अनुसूचित केला आहे. राज्यामध्ये साधारणता आदिवासी उपाय योजना क्षेत्र अतिरिक्त आदिवासी उपाय योजना क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्यात १३ जिल्ह्यातील ५९ तालुक्यातील २८३५ ग्रामपंचायत व ५९०५ गावे पेसा क्षेत्रात येतात अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत सक्षम व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याकरिता राज्य शासनाने अनेक योजना राबविल्या आहेत.
            
 परंतु झरी जामणी तालुक्यात पेसा कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप शामा दादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी केला असून रायपूर कोलाम पोड वरील लोकांना विविध योजनेपासून वंचित राहावे लागत आहे त्यापैकी रायपूर फाट्यापासून पोहोच रस्ता सुरळीत नाही दफनभूमी करिता स्वतंत्र जमीन नाही घरकुल योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी नाही.
        
 त्यामुळे घरकुल योजनेपासून कोलाम समाज वंचित आहे असे अनेक गावे आहेत. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत आदिवासी उपाय योजनेअंतर्गत ५% थेट निधी देण्याबाबत पेसा कायदा असताना अंमलबजावणी होत नाही म्हणून शामा दादा कोलाम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुंमरे यांनी विशेष पुढाकार घेऊन मा. अप्पर आयुक्त आदिवासी विभाग अमरावती यांच्याकडे निवेदन सादर करून लेखी स्वरुपात मागणी केली असून संघटनेच्या वतीने कोलाम समाज जनसंवाद अभियानाची रायपुरातून सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती संघटनेच्या विशेष प्रसिद्धी पत्रकातून कळविली आहे



                      

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्याकडून स्ट्राँग रुमसह मतमोजणी व्यवस्थेची पाहणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : निवडणूक प्रक्रियेमधील अतिशय महत्वाचा समजला जाणारा मतमोजणीचा टप्पा, येत्या मंगळवारी (4 जून) होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची युध्द पातळीवर तयारी सुरू आहे. मतमोजणीकरीता प्रशासन पूर्णपणे सज्ज असून या व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी वखार महामंडळाच्या गोडावून येथील स्ट्राँग रुमसह मतमोजणी केंद्राची पाहणी केली व सुचना दिल्या.

13- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल 2024 रोजी पार पडली. जवळपास दीड महिन्याच्या कालावधीनंतर येत्या 4 जून रोजी पडोली एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडावून येथे मतमोजणी होणार आहे. या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी मतमोजणी केंद्राला भेट दिली. प्रत्यक्ष मतमोजणीकरीता येथे असलेल्या एकूण टेबलची व्यवस्था, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्था, लावण्यात आलेले बॅरीकेटींग, सीसीटीव्ही, विद्युत व्यवस्था, ईव्हीएम असलेल्या स्ट्राँगरूमचा मार्ग, सुरक्षा व्यवस्था, मिडीया सेंटर आदींचा त्यांनी आढावा घेतला. तसेच संबंधितांना सूचनाही केल्या.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, अजय चरडे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सतीश खडसे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मतमोजणीकरीता एकूण टेबल व फेऱ्यांची संख्या : 
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघासाठी (ईव्हीएम मतमोजणी) प्रत्येकी 14 टेबल याप्रमाणे एकूण 84 टेबल, टपाली मतपत्रिका मोजण्याकरीता 9 टेबल आणि ईटीपीबीएमएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) मोजण्याकरीता 8 टेबल असे एकूण 101 टेबल राहणार आहेत. तसेच राजूरा विधानसभा मतदारसंघाच्या 24 फे-या, चंद्रपूर - 28, बल्लारपूर – 26, वरोरा – 25, वणी – 25, आणि आर्णी मतदारसंघाच्या मतमोजणीच्या 27 फेऱ्या होणार आहेत.

नियुक्त कर्मचारी संख्या : 
प्रत्यक्ष मतमोजणी करीता आणि अतिरिक्त स्टाफ धरून 120 टक्के याप्रमाणे एकूण 379 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात मतमोजणी पर्यवेक्षकांची संख्या 122, मतमोजणी सहायक 140 आणि सुक्ष्म निरीक्षकांची संख्या 117 आहे.

मतमोजणी केंद्रावर नियुक्त सुरक्षा व्यवस्था : 
मतमोजणी आवाराच्या / परिसराच्या सभोवताली 100 मीटर परिघापासून राज्य पोलिस, मतमोजणी आवाराच्या प्रवेशद्वारावर राज्य सशस्त्र पोलिस आणि मतमोजणी कक्षाच्या द्वाराजवळ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात आहे.

मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तुंना प्रतिबंध :
मतमोजणी केंद्रात मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप, आयपॅड, तसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल, कॅमेरा मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल.

उमेदवार / प्रतिनिधींना अत्यावश्यक सूचना : 
मतमोजणी परिसरात तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था असल्याने प्रत्यक्ष मतमोजणी स्थळी एकदाच प्रवेश दिला जाईल, परिसर सोडल्यास पुन्हा प्रवेश नाकारण्यात येईल. उमेदवार / उमेदवारांचे प्रतिनिधींनी आपले मोबाईल / इलेक्ट्रॉनिक संयत्रे जमा करणे बंधनकारक राहील.