वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीरः ११ मतदारसंघात दिली 'ही' उमेदवार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीशी चर्चेची दारे बंद केलेली नाहीत, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले असले तरी आज पुन्हा या निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या दुसऱ्या यादीत हिंगोली, जालना, लातूर, सातारा, सोलापूर, माढा आदी मतदारसंघांचा समावेश आहे.

या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीशी युती करून निवडणुकीला सामोरे जाईल, असे वाटत असतानाच 'वंचित'ची मविआशी बोलणी फिस्कटली आणि पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याच्या एक दिवसआधी पहिली उमेदवार यादी जाहीर केली होती.

वंचितने पहिली यादी जाहीर केल्यानंतरही वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाची शक्यता धुसर झाल्याचे मानले जात होते. परंतु खुद्द वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीच महाविकास आघाडीशी चर्चेची दारे बंद केलेली नाहीत, असे सांगितले होते. त्याला दोन दिवसही उलटले नाही तोच आज वंचितची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

दुसऱ्या यादीतील उमेदवार :


लोकसभा निवडणुक अन चमचेगीरांची लुडबुड...!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
  
वणी : देशात लोकशाही महोत्सवाला अगदी थाटात सुरुवात झाली आहे. दि.27 मार्च पर्यंत उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन दाखल करून लोकसभेच्या मैदानात दंड थोपटले आहे.जसा खोगीर कसलेला घोडा मैदानात उभा झाला आहे, तसा या घोडया पेक्षा खोगीर मोठया प्रमाणात उड्या मारताना दिसून येत आहे. 

निवडणूक मैदानात उडी घेण्याची 27 मार्च पर्यंत मुदत होती. या मैदानात उड्या मारण्यासाठी खोगिरानाहीं संधी होती.मात्र त्यांनी ही संधी बिनशर्त सोडली आहे.या कालावधीत केवळ 36 जणांनी उडी घेतली होती, मात्र निवडणूक रिंगणातील 15 लोकांची शक्ती पाहून इतरांनी आपली माघारी घेतली आहे कोणत्याही मैदानातील खेळात हार जीत हे ठरलेला भाग असताना रिंगणात उडी मारून आपली ताकद आजमावणे हे खेळाडूचे कर्त्यव्य आहे. 

विशेष म्हणजे जीखेळाडू मैदानात दंड थोपटून उभे आहेत त्यांना लोकशाही मोहोत्सवात रंग उधळण्याचा अधिकार आहे. आता मात्र, माघार घेण्याची संधी हुकली असून यापलीकडे कोणालाही हा मैदान सोडून पळ काढता येणारच नाही. या सामन्यात उडी घेण्यासाठी कसरत व अभ्यास करावा लागतो यानंतरच तो कसोटीवर खरा उतरतो आहे.या सामन्यामध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रतिभाताई धानोरकर, महायुतीचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार तथा वंचीत बहुजन आघाडी चे अधिकृत उमेदवार राजेश बेले यांचे सह 12 खेळाडू कायम आहे. 

दरम्यानच्या काळात चमचेगीरांची फौज इकडून तिकडे लुडबुड करताना दिसून येत आहे. पक्षाच्या निष्ठावंताना या चमचेगिरानी मागे टाकले असून सोशल मिडिया वर तर यांनी चांगलीच धूम्माकूळ घातला आहे.या रिकाम टेकड्यापायी  त्रस्त असून हा उसने तत्वज्ञान सोशल मिडियावर फिरवताना आढळून येत आहे. डाव साधण्यासाठी सुरु असलेली मेहनत निष्ठावंत ओळखून आहेत.दिवसा एका पक्षात तर रात्री दुसऱ्या पक्षात हा अनेकांना आढळून येत आहे.

"तोंड लपवून तत्वज्ञानाची खैरात" या पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिसू नये म्हणून त्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना तोंड लपवून आपल्या बेचव ज्ञानाची खैरात वाटत फिरताना दिसत आहे.गाडी एकाची आणि भोजन दुसऱ्याचे खाण्यासाठी हा चमचेगीर तालुक्यात शहरापासून ग्रामीण भागात भटकंताना दिसत आहे. मात्र निवडणूक कालावधी कोणालाही दुखावता येत नाही या करणाखाली त्याची चलती दिसून येत आहे.

लालपुलिया कोल डेपोतील कोळसा आगीने भस्मसात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरालगतच्या लालपुलीया परिसरातील फ्युल कॉरपेरेशन ऑफ इंडिया (FCI) च्या डेपो मधील कोळशाच्या साठ्याला भीषण आग लागून जवळपास दहा हजार टनाच्या वर कोळसा जळून खाक झाला असून आणखीन येथील ढिगाऱ्यामध्ये प्रचंड आग धगधगत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

यवतमाळ रोडवरील लालपुलिया परिसरात मोठ्या प्रमाणात  कोल डेपो आहेत. मात्र, येथील कोळशाच्या ढिगाऱ्याला आग लागनेही नित्याची बाब आहे, उन्हाळ्यात कडक तापमान तपत असते, किंबहुना कोळसा हा ज्वलनशिल पदार्थ असल्याने दगडी कोळशाला लगेच आग लागते. त्यामुळे येथील कोलडेपो धारक सातत्याने अशी आग वीजवून कोळसा पसरवून त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने आगीवर नियंत्रण करीत असतात. परंतु मागील चार दिवसापूर्वी मंगळवार 26 मार्च रोजी वातावरणात बदल होवून हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सारी आल्या होत्या, त्यामुळे येथील साठा असलेल्या कोळशाला आतून असलेली आग व दरम्यान पडलेल्या पावसाच्या हलक्या सरीने कोळशाला आतमध्ये गॅस तयार होऊन चक्क येथील साठ्याला भीषण आगीने कोळशाला कवेत घेत किमान उपलब्ध साठे जळून खाक होत असल्याचा असा अंदाज वर्तविला जात आहे.

कोल डेपोत चार दिवसापासून अग्निशमन दलाच्या व शेकडो पाणी टँकरच्या सहाय्याने भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी फ्युल कॉरपेरेशन ऑफ इंडिया (FCI) कंपनीकडून पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु सर्व प्रयत्न व्यर्थ ठरत आहे व अजूनही कोळशाचे साठे आगीतच आहे. प्रशासनाकडून सहकार्य मिळत असून कोल डेपो ला आग लागणे ही नैसर्गिक बाब असून कंपनीचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे फ्युल कॉरपेरेशन ऑफ इंडिया कंपनीचे मॅनेजर शाम शर्मा यांनी सांगितले.

तरुणाने स्ट्रीट लाईट पोलला दोरीच्या साहाय्याने घेतला गळफास

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बेलोरा येथे एका तरुणाने गावातील स्ट्रीट लाईट पोलवर चढुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज रविवार ला सकाळी उघडकीस आली.

स्वप्निल सुधाकर भोंगळे (29) रा.भालर, असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो आई सोबत राहुन मजुरीचे काम करीत असल्याचे समजते.

काल शनिवारी 30 मार्च 2024 रोजी रात्रीचे दरम्यान चक्क स्ट्रीट लाईटच्या पोल वर चढून दोरीच्या सहाय्याने त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

गावातील पोलिस पाटीलांनी शिरपूर पोलिस स्टेशन येथे घटनेची माहीती दिली. पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे.

राज्यात आघाडीच्या बिघाडीला दोष कुणाचा?

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : लोकसभेच्या निवडणूक मैदानात महाराष्ट्राच्या 48 जगावर महाविकास आघाडी एकजुटीने निवडणूक लढणार असे वातावरण निर्माण करण्यात आले होते. काँग्रेस शिवसेना,राष्ट्रवादी,या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी निर्माण केली होती. मात्र जागा वाटपा वरून आघाडीत बिघाडी झाल्याची सत्यता उघड झाली आहे.5 जागा वरून काँग्रेस शिवसेना आघाडी कोंडीत सापडली आहे.निवडणुकीच्या पहिल्यां टप्प्यापर्यंत तरी हीं कोंडी निश्चिपने फुटेल अशी शक्यता होती.मात्र तसे घडले नाही.दोनही पक्षाची 5 जागावर जोरदार रस्सीखेच असून तोडगा निघत नसल्याने काँग्रेस,शिवसेना दोनही मित्र पक्षाचे उमेदवार आमणे सामाने लढणार आहे.त्यामुळे आता या आघाडीच्या बिघाडीला दोष कुणाचा?या प्रश्नाच्या उत्तरासाठी कार्यकर्त्यां मध्ये घमासान सुरु झाले आहे.जागा वाटपा वरून काँग्रेस व सेनेत बिनसल आहे.हे सत्य नाकारून चालत नाही. 5 जगावर समझोता झाला नसल्याने मैत्रीपूर्ण लढतीचा फार्म्यूला हायकमांडने मंजूर केला आहे.

हायकमांड कडून मंजूर झालेल्या फार्म्यूल्याचा विपरीत परिणाम महाराष्ट्रात महाविकास आघाडीत बिघाडी झाला आहे.या 5 जागाच्या मतदार संघात मतांची विभागणी अटळ आहे.मित्रच मित्राच्या आमने सामने दंड थोपटणार आहे.याचा फायदा निश्चितपणे महायुतीच्या उमेदवारांना होईल हे निर्वाद सत्य कोणीही नाकारू शकत नाही.अडेलटट्टू धोरणामुळे 5 जागाचे नुकसान झाल्यास जबाबदार कोण?नेते की कार्यकर्ते असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.महाविकास आघाडीला खरंच महायुतीला टक्कर द्यायची आहे का? जर उदिष्ट मोदीजीला हरवायचे आहे तर इंडिया आघाडीत एकजूट आवश्यक आहे.आणि तेच उदिष्ट डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात महाविकास आघाडी उदयास आली होती. महायुतीला शह देईल असे वातावरणहीं पहिल्यांदा निर्माण झाले होते.मात्र आपण हरलो तरी चालेल पण जागेचा हट्ट सोडायचा नाही हीं भूमिका महाविकास आघाडीत पाहायला मिळाली आहे.या अट्टाहासापायी नुकसान दोनही मित्र पक्षाचे होईल हे कोण्या भविष्यकाराला विचारण्याची गरज नाही.या 5 जागेच्या दाव्यावरुन कोणीच माघार घेण्यास तयार नाही.हे आता स्पष्ट झाले आहे.

आघाडीचा धर्म सर्वानी पाळायला पाहिजे अस काँग्रेस म्हणत असली तरी समझोत्या शिवाय शिवसेना (उबाठा) कडून उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आल्यामुळे तिढा निर्माण झाला असा मुद्दा काँग्रेस मधून ऐकायला मिळत आहे.आता महाविकास आघाडीत असंतोषाचे वातावरण पेटले आहे.याचा विपरीत परिणाम सम्पूर्ण मतदार संघावर होणार आहे.त्यामुळे आम्ही सम्पूर्ण जागा जिंकू असे म्हणणे बालिशपणाचे ठरेल की काय असे चित्र सद्या तरी दिसून येत आहे.शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत या आघाडीचे नेतृत्व करीत आहे.वाटघाटी मध्ये ते सदा अग्रेसर असल्याचे सर्वांना पाहायला मिळत आहे.त्यामुळे निश्चितच जय,पराजयाचा ठपका त्यांचेवर लागणार आहे.उमेदवारीवारी वरून झालेल्या बैठकाचे नेतृत्व त्यांनीच केल्याचे वास्तव कोणीच नाकारू शकत नाही.प्रसार माध्यमाशीहीं संवाद साधताना ते पुढेच असायचे हे सर्वांनीच बघितलं आहे.सर्व सुरळीत चालले आहे. समाधानकारक,सकारात्मक चर्चा झाल्याचे तेच जाहीर करून टाकत होते.आता मात्र सर्व उलटे काटे फिरताना दिसून येत आहे.त्यामुळे या आघाडीच्या बिघाडीला दोष कुणाचा? हे निवडणूक निकाला नंतर उघड होणार आहे.