राष्ट्रपिता बापूंना समजून घेताना.....


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

आंतरराष्ट्रीय किर्तीचे लेखक 'विल ड्युरंट' महात्मा गांधी बद्दल लिहितात, "भारताने शस्त्र हातात न घेता इतिहासातील आश्चर्यकारक व्यक्तीला आपला नेता मानले आणि एका संताने शास्त्रविना घडवून आणलेली अपूर्वक क्रांती जगाला पाहायला मिळाली".जगाला हिंसा माहित असताना महात्मा गांधीजी अहिंसेची मशाल हातात घेऊन जगाला एक नवीन मार्ग दाखविला. लोक पाहू लागली. भारतात असा एक संत आहे. ज्याच्या अंगावर ना कपडे होते,ना कोणता पद होतं, ना कसल ऐश्वर्यात, ना त्याच्याकडे पैसा, तरी हातात काठी घेत बंदूक घेतल्या इंग्रजांना हाकलुन लावलं, अहिंसेच्या शास्त्रा पुढे इंग्रजाच्या बंदुका चाल्याच नाही. गांधीजी नी जगावर प्रभाव टाकला जगाने गांधीजींच्या विचाराचे महत्त्व अधोरेखित केले.
गांधीजी चा इतिहास आणि स्वतंत्र लढा काही वेगळं लिहण्याची गरज नाही. ते आपल्या सर्वांना माहितीच आहे. तरी महात्मा गांधीजी बदनाम कसे व का होत आहेत ? त्याचा त्याग व विचार आपल्याला समजले का ? चरख्या वरून फरणार परिवर्तनाच चाक आपणच बंद पाडल ? सहज बोलत बोलता म्हणून जातो गांधीजी मुळे अस झालं, तस झालं !  
गांधीजी समजुन घेताना आपल्याला थोडं आद्यात्मिक अंगाने पाहवं लागेल, अगदी प्राचीन काळापासून भारतामध्ये अहिंसा,नैतिकता,विश्वास चे तत्वज्ञान महत्त्वचे मानले जाते. अहिंसा व,नैतिकता बद्दल विचार आपल्याला गौतम बुद्धांच्या शिकवणी दिसते, भगवान महावीर यांच्या शिकवणीत दिसते. तिचीच शिकवण महात्मा गांधीजींनी पुढे नेली. नोबल पारितोषिक विजेते 'दलाई लामा ' सांगतात, "बदल घडवून आणण्यासाठी गांधीजीने जो अहिंसेचा आधुनिक मार्ग प्रस्थापित केला त्यांच्या जीवनापासून मी शिकलो आहे". गांधीजीचा एक अध्यात्मिक अँगल (अहिंसा, विश्वास,सत्य, नैतिकता) अध्यात्मिकतेचा अर्थ मनावरील नियंत्रण, मनाचे ज्ञान असा आहे. अहिंसेचा मार्ग स्वीकारने हा आद्यत्मिक व मानसिक विकासाचा भाग आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे, हिंसेला प्रतिसाद न देणे. विश्वास दाखविणे, नैतिकता असणे उदाहरणार्थ एखादाने तुम्हाला शिव्या दिल्या किंवा मारले, त्याचा तुमच्यावर प्रभाव पडला नैसर्गिक प्रवृत्ती आहे .की तुम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देता, पण प्रतिक्रिया न देता, तुम्ही काही न करता त्याच्याही चांगल्याची सदिच्छा करणे . साध्या माणसाचं काम नाही. यासाठी मनाची असीम स्थिरता लागले. जी सामान्य मनुष्यात ती दिसत नाही. गांधीजी असे संत होते जे एका हातात अध्यात्म आणि दुसऱ्या हातात समाज धरून पुढे जात . म्हणून गांधीजी समजणे आपल्याला अवघड गेले . आपल्याला तुलना करण्याची व त्यातून परीक्षण करण्याची सवय झाली आहे.जातीपातीत, धर्मात महापुरुषांना विभागण्याची सवय आहे .एखाद्याला चौकटीत बांधण्याची सवय आहे. तोच चष्मा डोळ्यावर चढऊन आपण नेहमी पाहत असतो. 
ज्या राष्ट्रांना आपण विकसित वैचारिक समजतो त्या राष्ट्रावर गांधीजीचा प्रभाव कायम आहे. म्हणून आपल्या देशातले नेते जेव्हा बाहेर जातात. तेव्हा महात्मा गांधीजीचच नाव घेतात. "मी इंडोनेशियाला असताना मला कित्येक देशातल्या युवकांनी विचारले तुम्ही बुद्ध गांधीच्या देशातून आलात."
अमेरिकेमध्ये मार्टिन ल्युथर किंग नावाच्या व्यक्तीने गांधीजी पासून प्रेरणा घेऊन मोठा आंदोलन उभं केल. दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला यांनी स्वातंत्र्याची मोठी लढाई लढली . संयुक्त राष्ट्र संघाची ग्रीन मुमेंट, त्याची प्रेरणा गांधीजींची आहे. नॉर्वे, डेन्मार्क, पोलंड या देशामध्ये गांधीजीच्या विचाराच्या आधारे आंदोलने उभी झाली. युरोपात कायदा व सामाजिक सुरक्षा या विषयावर कित्येक देशात मोठ मोठ्या परिषदा झाल्या याचा उगम महात्मा गांधीजीच्या संकल्पनेतून आहे. जगावर प्रभाव आहे हे संत भारतातील त्या संताची आणि विचारांची हत्या ही भारतात करण्यात आली. त्याच्या कार्यची, विचारांची परतफेड त्यांना गोळी घालून केली. भयंकर दुर्दैवी बाब आहे. त्या ही पलीकडे महात्मा गांधीजींना बदनाम करण्यात आले. आज युवकांमध्ये महात्मा गांधीजींनी भगतसिंग यांच्या फाशीचा विरोध केला नाही. म्हणून महात्मा गांधीजींना बदनाम करण्यात आले. पण ही चुकीची गोष्ट आहे भगतसिंग याना फाशी देऊ नका, हा युवक देशाला एक नवी दिशा देऊ शकतो आशा आशयाच पत्र त्या वेळच्या राज्यकर्त्यांना लॉर्ड आयर्विन ला लिहिलं होत. तरीसुद्धा इंग्रजांनी फाशी थांबविली नाही. दुसरा महत्त्वाचा म्हणजे सुभाष चंद्र बोस आणि गांधीजी विरुद्ध होते त्याला त्यांचा विरोध होता, असा अपप्रचार करण्यात आला. त्यांचा मार्ग तरी वेगळा असला तरी साध्य एकच होत. ते एकमेकांचा आदर करीत, चाले जावं आंदोलनात गांधीजी च्या नेतृत्व सम्पूर्ण भारत एक पाहून नेताजी खुश झाले होते. तसा त्यांनी उल्लेख ही केला आहे. नेताजींनी आपल्या तीन ब्रिगेड चा नाव गांधी,नेहरु,आझाद, ठेवले होते. गांधीजीनी ही बोस याच्या बद्दल चांगलेच मत होते. ते लिहितात, 'सुभाष चंद्र बोस यांनी जपानला जाऊन सर्व जाती धर्मातील लोकांची एक मोठी फौज तयार केली आणि मोठ्या ब्रिटिश हुकूमतला ते टक्कर देत आहेत" असे संबंध महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस याचे होते. बाबासाहेब आणि गांधी बद्दलही तसंच . प्रचार झाला तिथे गांधीजी बदनाम झाले. पण आम्ही हे समजू शकलो नाही. की ते आपापल्या,वेगवेगळ्या उद्दिष्टपूर्ती करिता आपल्या मार्गाने लढत होते . त्यांची तुलना होऊ शकत नाही. कोणी महान किंवा लहान अस होत नाही. त्यांचं महत्त्व आपापल्या ठिकाणी कायम आहे. आता प्रश्न उजव्या संघटना बद्दल, महात्मा गांधी जेव्हा राजकारणात आले आणि प्रस्थापिताच्या हातातलं नेत्रुत्व गेलं. काँग्रेसची दारं सर्वांसाठी उघडी झाली.काँग्रेस भारतभर पोचली. प्रस्थापितांच्या हातातून काँग्रेसचा घसरता नेतृत्व पाहता त्यांच्या नाराजी होती,सर्व जाती धर्मातील लोकांना गांधीजी जवळ करीत होते. देशाची फाळणी झाली, त्यांचा रोष गांधीजीवर उसळला. म्हणून त्यांनी सुद्धा गांधीजींचा भयंकर अश्लील असा अपप्रचार केल्याच दिसते. फाळणी कोणी समर्थन करत नाही मग देशात यादवी हवी होती का ? युद्ध पाहिजे होतं का हा प्रश्न येतो. या बाबी लक्षात घेण्या सारख्या आहे. गांधीजींनी एका वर्गाकरिता काम केले नाही, धर्मा करिता केले नाही, कार्य सर्व भारतीयांकरिता कार्य केले.सर्व देशांचा विचार करीत असताना सर्वांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावे लागतात. सोबतच गांधीजी च्या विचारणे चालणारे पक्ष, संघटना हे गांधीजींचे खरे विचार पोहोचवण्यात असमर्थ राहिले. (गांधीजीच्या विचारांना रोखणं शक्य होत नाही, गांधी नावाच्या आंधी रोखण शक्य होत नाही हे लक्षात आल्यावर सरळ त्यांचा खूनच करून टाकला) पण खून केल्यावर सुद्धा गांधीजींचे विचार काही मेले नाहीत. वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून आणि व्यक्तींच्या माध्यमातून जगभर जिवंत राहिलेत. फरक फक्त एवढाच आपण त्यांना समजू शकलो नाही.आता संकुचित दृष्टिकोन सोडून सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जाणं महत्त्वाचं.एखाद्या मूर्तीवर वादळ वाऱ्याचा, पाऊस व्हावा की मूर्ती धुऊन निघावी आणि पुन्हा प्रखर चमकायला लागावी त्याप्रमाणे गांधीजीचे विचार आजही चमकत आहे.

संदीप गोहोकार, वणी 
संपर्क : 7350006276

राज्यात लवकरच ९८ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची मोठी भरती होणार; जाणून घ्या सविस्तर..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

महाराष्ट्रात लवकरच मेगा पोलीस भरती सुरू होणार आहे. महा पोलीस भरती 2023 अंतर्गत राज्यात *९८ हजार पोलिसांची भरती* होणार आहे. जे महाराष्ट्र राज्यात पोलीस बनण्याची योजना आखत आहेत त्यांनी पोलीस भरती परीक्षा 2023 ची तयारी आतापासूनच करायला हवी. 

पोलीस कर्मचारी व लोकसंख्या यांचे प्रमाण सुध रण्यासाठी राज्यात लवकरच ९८ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. राज्यात सध्या एक लाख लोकसंख्येमागे १३६.४५ इतके पोलीस कर्मचारी असून पोलिसांची हीच संख्या २२५ इतकी करण्यात येणार आहे. राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण संख्या सध्या २.४५ लाख इतकी आहे. भरतीसंदर्भातील निर्णय उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच घेतला जाणार आहे.

अर्थ खात्याची उपसमिती व मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती यांनी घेतलेल्या खातेनिहाय आढाव्यानुसार राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची सध्याची संख्या कायम ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र प्रत्येक पोलीस ठाण्यातील तसेच संबंधित युनिटमधील कर्मचाऱ्यांबाबत धोरण निश्चित करण्यात यावे, असे आम्ही सांगितले. हे काम झाल्यानंतर आता आम्ही अतिरिक्त ९८ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यापैकी किमान ५० टक्के पदांना तरी मंजुरी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे, असे गृहखात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

 केंद्र सरकारने मार्चमध्ये संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात देशाचे सध्याचे लोकसंख्या पोलीस यांचे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे १५२.८० इतके आहे. नागालँडमध्ये हेच प्रमाण सर्वाधिक ११८९.३३ कर्मचारी तर बिहारमध्ये सर्वात कमी ७५.१६ कर्मचारी इतके आहे.


जि. प. उ. प्राथ. शाळा पहापळ येथे गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती संपन्न

सह्याद्री चौफेर | अनंता पाचपोहर 

मार्डी : आज जि. प. उच्च प्राथ. शाळा पहापळ येथे राष्ट्पिता महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पहापळ येथील युवा उद्योजक, उमेद चे तालुका संघटक श्री. महेश पाचपोहर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ड्रॉईंग वही, पेन्सिल कलर सेट भेट देण्यात आले.
या कार्यक्रमाला पहापळ येथील सरपंच श्री. राहुलजी आत्राम, पेसा अध्यक्ष श्री. भैय्याजी कनाके, आरोग्य पर्यवेक्षिका सौ. पुसदेकर मॅडम, अंगणवाडी सेविका सौ. कल्पना आत्राम, सौ. छाया कनाके, शारदाताई ठाकरे, आशा वर्कर शाळेचे मुख्याध्यापक श्री. एन.टी. चौधरी सर, श्री. संजय फुलबांधे, श्री. अमर पुनवटकर सर उपस्थित होते.

स्वच्छता हीच खरी सेवा अभियाना अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे स्वच्छता अभियान उत्साहात साजरा

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 
       
वरोरा : आयुष्य भव: या सरकारच्या उपक्रमा अंतर्गत आज दिनांक १ आक्टोबर २०२३ ला महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले.सकाळी १० वाजता पासून तर १२ वाजेपर्यंत हे स्वच्छाता अभियान राबविण्यात आले.हे अभियान डॉ .प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित राहुन पार पाडण्यात आले.यासाठी डॉ खूजे वैद्यकीय अधीक्षक, डॉ शेख, डॉ.झाकिया, डॉ बोरकर,सौ वंदना विनोद बरडे सह.अधीसेविका श्रीमती तुलसी कुमरे परिसेविका, श्रीमती सरस्वति कापटे परिसेविका, श्रीमती रुबिना खान अधिपरिचारीका, श्री प्रतापसींग राजपूत, श्री सतिस येडे, सौ अनिता ठाकरे,सौ वर्षा भुसे,श्री अमोल भोग, घोटकर,विजय ऊके, निरंजना कोरडे, कुंदा मडावी, लक्ष्मीकांत ताले,सोनू देवगडे, रंगनाथ सोरडे, श्री जवादे सागर कापटे,समीर ऊके श्री मेश्राम सेक्युरिटी गार्ड इत्यादींनी साफसफाई व स्वच्छता अभियानात मेहनत घेतली.सर्वांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला व स्वच्छता अभियानाची प्रतिज्ञा घेण्यात आली.आणी स्वच्छतेचा संदेशासोबत प्रचार व प्रसार करण्यात आला.

वेदनांचे अश्रू दुसऱ्यांच्या डोळ्यातून विकत घेणं शक्यच नाही - सागर जाधव

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

सध्याचा काळ अत्यंत धावपळीचा आहे. श्वास घ्यायला देखील कुणाकडं उसंत नाही. पूर्वीसारखं कुणाला भेटणं होत नाही. संवाद पूर्ण होत नाहीत. निवांत गप्पा मारता येत नाहीत. सुखदुःखांची देवाण-घेवाण होत नाही. मात्र याला अपवाद काही व्यक्ती नक्कीच आहेत. जे हे सगळं आवर्जून करतात. आपल्या डोळ्यांपर्यंत आलेली आसवं दाबण्यासाठी हे इतरांचे अश्रू पुसतात. खरं पाहता वरून ते खूप आनंदी असल्याचं भासवतात. असं असलं तरी आतून ते खूप दुःखी असतात. खचलेले असतात. कोलमडून पडलेले असतात. आतून पूर्णपणे तुटलेले असतात. त्यांचा आंतरिक संघर्ष सुरूच असतो. हुंदका कंठात दाबून आपल्याला अनेकदा खोटं खोटं स्मित द्यावं लागतं. या खोट्यातलं खरं ओळखेल तोच अस्सल माणूस. अशा माणसांना आपण जपलं पाहिजे. अशांना तोडू नका. जेवढं जुळता येईल, जोडता येईल, जुळवता येईल एवढं मात्र नक्की केलं पाहिजे.

आज आपण स्वतःमध्येच खूप गुरफटलेले आहोत. गुंतलेले आहोत. अशावेळी आपण इतरांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत नाही. एकमेकांच्या वेदनांची कारणे शोधत नाही. बरेचदा त्यासाठी आपण असमर्थ ठरतो. इतरांकडून भावनिक मदत मिळावी, अशी आपण अपेक्षा करतो, परंतु दुसऱ्या व्यक्तीनं आपल्या दुःखाची कारणं का शोधावी? त्यावर तोडगा का काढावा? भलेही तुम्ही त्या व्यक्तीसोबत भावनिकदृष्ट्या घट्ट जोडलेले असतात. तरीसुद्धा ती व्यक्ती तुमच्यासोबत त्या अंगानं जुळलेली असेलच असं नाही. तुम्ही काही व्यक्तींना प्रामाणिकपणे समजून घेऊ शकता‌. मात्र ती व्यक्ती तुम्हाला समजून घेऊ शकेलच असंही नाही. तुमच्या वेदनांनी तो हळहळावा, असंही काही बंधनकारक नाही. ज्या व्यक्ती ही कार्यं अगदी बेमालूनपणे करतात, त्यांना मात्र कधीही सोडू नका. ते अनेकदा स्वतःच्या मोठ्या दुःखात असतात. तरीदेखील त्यांना तुमच्या छोट्याछोट्या दुःखांबद्दल कळतं, तेव्हा ते मनातून दुःखी होतात. आपलं दुःख मनाच्या एका कोपऱ्यात लपवून तुमचं दुःख निवारण्यासाठी ते प्रयत्न करतात. तुम्ही अनेकदा दुखी होता. तुम्हाला त्रास होतो. वेदना होतात. अशावेळी तुमची वेदना पलीकडल्या व्यक्तीच्या डोळ्यातून पाझरते. अशी माणसं भेटणं आजच्या काळात तरी खूप कठीण आहे. तुमच्याकडे भलेही गडगंज संपत्ती असेल. तरीदेखील आपल्या वेदनांचे अश्रू दुसऱ्यांच्या डोळ्यातून विकत घेणं शक्यच नाही.

काहीजण खूप कठोर हृदयाचे असतात. क्वचित एखादेवेळी ते रडतात देखील. मात्र ही माणसं फणसासारखी असतात. वरून काटेरी, तरीही आतून गोड. मधाळ आणि रसाळ. आपल्या जिवलगांची छोटीशी सलदेखील त्यांच्या काळजाला पीळ आणते. ही माणसं फार संवेदनशील असतात. त्याची आपण फक्त कल्पना करू शकतो. मात्र आपण तो अनुभव घेऊ शकत नाही. जर आपण हा अनुभव घेण्याची पात्रता स्वतः निर्माण करू शकलो, तर आपण कधीही त्या व्यक्ती च्या पापण्यांच्या कडा ओल्या होऊ देणार नाही.

फुलांसारखी असो की, काट्यांसारखी अशी वेगळी माणसं आपण सांभाळली पाहिजेत. कारण अशा व्यक्ती स्वतःपेक्षाही तुम्हाला जास्त सांभाळण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला वारंवार जपतात. आपल्या दुःखांना वेदनांना ती सहज नजरेआड करतात. प्रामाणिकपणे तुम्हाला सांभाळण्याचा प्रयत्न करतात. अशी माणसं जपली पाहिजेत. सांभाळली पाहिजेत.

बँक बॅलन्स, गाडी, बंगला म्हणजेच केवळ संपत्ती नव्हे. आपल्या सुखदुःखांना समजून घेणारी एक दोन व्यक्ती तरी आपल्या आयुष्यात हवीच. जर त्या तुमच्यासोबत असतीलच तर आपल्यासारखं भाग्यवान कोणीच नाही. आपल्याला काही जण खूप महत्त्व देतात. आपल्या भावना संवेदना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र कधी कधी आपल्याला असं वाटतं की, ते आपल्या आयुष्यात लुडबुड करीत आहेत. आपण त्यांच्यासोबत हेखेखोरपणे वागतो. अनेकदा त्यांना दुखावतो देखील. हे मात्र योग्य नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. हे आपले आधारवड आहेत. वेदनांच्या रखरखत्या उन्हात सावली देणारे आहेत. नशिबानं मिळालेली ही माणसं आपण जपली पाहिजेत.

जग दिवसेंदिवस औपचारिक होत चाललंय. नात्यांची गुंफणदेखील सैल होत आहे. ती अधिक घट्ट केली पाहिजे. काही व्यक्तींना तुम्हाला गमवण्याची भीती वाटते. त्यांना समजून घ्या. जाणून घ्या. अशा व्यक्तींना नेहमी सांभाळा, अगदी स्वतःपासूनच. काहीजण आपल्यासाठी त्याग आणि समर्पण करतात. मौलिक वेळ देतात. त्यांना खूप काळजीनं जपा. अनेक भौतिक बाबींपासून आपल्याला सुख मिळतं. बरेचदा हे फार लवकरदेखील मिळतं. मिळालेल्या सुखाचा त्याग करण्यासाठी समर्पण लागतं. ही क्षमता फार कमी लोकांत असते. असे काही लोक मात्र आजही आहेत. जे केवळ तुमच्या सुखासाठी स्वतःच्या भौतिक सुखाचा त्याग करतात.

आयुष्यात प्रत्येकदा रक्ताची नाती साथ देतीलच असं नाही. काही अशीसुद्धा नाती  असतात की, जी रक्ताची नसतात. मात्र रक्ताच्या नात्यापेक्षादेखील नक्कीच कमी नसतात. कधी कधी ही नाती तर रक्ताच्या नात्यापेक्षाही महत्त्वाची ठरतात.

ही नाती टिकविणं खूप गरजेचं आहे. काही गोष्टी अत्यंत महत्चपूर्ण असतात. त्यामध्ये प्रामाणिकपणा, विश्वास आणि समजून घेण्याची पद्धत. या तीन गोष्टी जर असतील, तर कोणतंही नातं टिकून राहतं. काही व्यक्ती आत्माभिमानी असतात. स्वाभिमानी जिद्दी असतात. तरीही हे सगळं ते तुमच्यासाठी बाजूला ठेवतात. जर ती पुढील व्यक्ती आपल्याला जपत असेल, तर तिला सांभाळा. अशा माणसांना कधीच गमवू नका. आपल्या माणसांना जपा.