हरवला...उमेश मुर्लीधर बोथले कुणाला आढळल्यास संपर्क साधा!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथील 25 वर्षीय तरुण, सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी  सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घरून कोणालाही न सांगता निघुन गेला आहे.

उमेश मुर्लीधर बोथले रा.म्हैसदोडका (ता. मारेगाव) असे त्यांचे नाव आहे. उमेश याचा वर्ण गोरा, असुन उंची 4 फुट 5 इंच, सडपातळ बांधा आहे. 

त्याच्या अंगावर निळा रंगाचा पँट व लाल रंगाचा टी शर्ट असे वस्त्र परिधान केलेले आहे. अशा वर्णन असलेला तरुण मुलगा कोणाला आढळल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मारेगाव पोलीस स्टेशन व बोथले परीवाराकडून करण्यात आलेले आहे.

संपर्क : 9021050331/9767448828

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पोषण आहार सप्ताह चे ऊत्साहात उद्घाटन व जनजागृती


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे           

वरोरा : दिंनाक. १ सप्टेंबर २०२३ रोजी 'पोषण आहार सप्ताह' चे उद्घाटन ऊपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे ऊत्साहात करण्यात आले. मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून सरस्वती मातेच्या फोटोचे पुजन व माल्यार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात पोषण आहार गीताने करण्यात आली.

विचारमंचावर डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक, वंदना बरडे सह.अधीसेविका, वैशाली ईनरव्हील क्लब अध्यक्ष पाचोरे, गीतांजली ढोक आहारतज्ज्ञ, वंदना बूर्रेवार समुपदेशक हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गीतांजली ढोक यांनी केले.

यामध्ये पोषण आहार सप्ताह च्या थीमची माहिती दिली. डॉ खूजे वैद्यकीय अधीक्षक यांनी जीवन शैली, आपले खानपान तसेच मुलांना फाष्टफुड न देता वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आईने तयार करून मुलांना खावू घालाव्यात आजारानूसार आहार घ्यावा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले.     
वंदना बरडे यांनी समतोल आहार, आणि तो सर्वांसाठी व सर्वच वयोगटातील लोकांसाठी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, कसा आवश्यक आहे हे समजून सांगितले तसेच शेती कशी करावी, शेंद्रीय शेती वर भर देण्यात यावा असे आवाहन केले. फास्ट फुडला बायबाय करून पारंपारीक पध्दतीच्या रेसीपी कराव्यात आणि त्रुणधान्य,भरड धान्य यांचा वापर आपल्या जेवणात करावा. मौसमी फळ भाजीपाला यांचा वापर करावा. मिक्स धाण्याचा वापर करावा आणि आपली जीवनशैली बदलावी, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. भरड धाण्याची जास्तीत जास्त लागवड करावी भारत देश हा सुजलाम सुफलाम सोने की चिडिया वाला देश है वैसाही रहना चाहीय. केमिकल वाली खेळती नहीं करना. आपल्या शरीर प्रकृती नुसार आहार घ्यायला पाहिजे, हे समजावून सांगितले. पौष्टिक व समतोल आहार घ्यायला पाहिजे.
    
सूत्रसंचालन सोनल घाग यांनी केले तर,आभारप्रदर्शन गीतांजली ढोक माडम यांनी केले. हा कार्यक्रम डॉ. प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना बरडे सह.अधीसेविका यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये विषेश म्हणजे वंदना बूर्रेवार व ढोक मॅडम यांनी सेल्फी पाईन्ट तय्यार केला व आहाराच्या पदार्थांची प्रदर्शन लावले होते. त्यातून जनजागृती प्रचार व प्रसार करण्यांत आला.

 कार्यक्रमाला सरस्वती कापटे परिसेविका सूजाता जुनघरे अप.कूंदा मडावी,विक्की आत्राम, श्री सतिस येडे, श्री कैलाश समूद्रे यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाला सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी सर्वांनी जनजागृतीचे आश्वासन दिले.

हरहुन्नरी कलावंत विनोदकुमार आदे समाज भुषण पुरस्काराने सन्मानित

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : बाजोरीया हॉल येथे बिरसा ब्रिगेड वणी तालुक्याच्या वतीने "आदीवासी एकता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात एकशे एक कला अवघत करणारे कलावंत  विनोदकुमार आदे यांचा बिरसा ब्रिगेड वणी तालुक्याच्या वतीने समाज भुषण पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. 

पंधरा वर्षापासून ते वणी उपविभागात अगदी बालवयापासून समाजासाठी राबत आहे. मारेगांव येथे बिरसा मुंडाचे तैल चित्राच्या स्थापने करीता व तसेच रंगवण्यापर्यंत त्यांचे अमूल्य योगदान आहे. क्रांतिवीर बिरसा मुंडा ह्या नाट्य प्रयोग मारेगांव येथे जुन्या आयटीआय मैदानावर घेण्याकरीताही विनोदकुमार यांचा मोलाचा सहभाग होता. श्री गुरुदेव सत्संग सेवा समिती द्वारेही चौकाचौकात पाणपोई लाऊन, विर बिरसा मुंडा जयंतीच्या शुभेच्छाचे स्वता बनवलेले बॅनरही चौकाचौकात मारेगांवकरानी प्रत्यक्ष अनुभवले. वणी येथे बिरसा ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यक्रमात विनोदकुमार निशुल्क रांगोळीच्या माध्यमातून विर बिरसामुंडाचे हुबेहुब चित्र साकारून कार्यक्रमात रंगत आणण्यासाठीह आदे ने हमीच तत्पर राहीला अश्या निस्वार्थी व्यक्तीमत्वाचा बिरसा ब्रिगेडच्या वतीने समाज भुषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी. डाॅ संचिता नगराळे, रमेशभाऊ कुळमेथे कवी,
राष्ट्रवादीचे विजय नगराळे, अॅड एल. के मडावी, बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डाॅक्टर अरविंद कुळमेथे, डाॅ. अभिलाषा बेहेरे- गावतुरे, प्रा. वसंत कनाके, आदिवासी साहित्यीक यवतमाळ, ब्राह्मणनंद मडावी कवी साहित्यिक मुल,
निळकंठजी जुमनाके, देविदास चांदेकर, डाॅ. गजानन मेश्राम, आनंदराव आत्राम, सुभाष आत्राम, वंचीतचे दिलीप भोयर, संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे, वंचितचे मंगलजी तेलंग, लढाचे प्रविण खानझोडे, कैलास आत्राम, हरिभाऊ रामपुरे
बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुधाकर चांदेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री संजय देवाळकर यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!


        ◆ वा|ढ|दि|व|स || अ|भि|ष्ट|चिं|त|न ◆

युवा शेतकरी 
   संजय देवाळकर 
          
व्हावास तूम्ही शतायुषी,
व्हावास तूम्ही दीर्घायुषी,
ही एकच आमची इच्छा,
              तुमच्या भावी जीवनासाठी.
              ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी 
आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी 
              एक अनमोल आठवण ठरावी,
             आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, हीच शुभेच्छा.. !

संजय भाऊ आपणास प्रगटदिनाच्या अगणित हार्दिक शुभेच्छा..त्यांच्या जन्मदिनी यांना दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो..


शुभेच्छुक :- संजय देवाळकर मित्र परिवार, वनोजा (देवी) मारेगाव तालुका

पहापळ येथील शेतकऱ्यांच्या गोधनाला लंपीची लागण



सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पहापळ येथील अनेक जनावरांना लम्पी रोग प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत असून यात तीन बैल मरण पावली तर,दहा जनावरे लंपीने ग्रस्त आहेत. अशी धक्कादायक माहिती समोर आली. यामुळे गांव बाधित क्षेत्र म्हणून घोषित होण्याच्या मार्गांवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे अशातच लंपी ची लागण येथील अनेक जनावरांना होऊन यात तीन बैल दगावल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. जोडी पैकी प्रत्येकी एकऐक बैल मरण पावलेल्या शेतकऱ्यांची नामे दुष्यन्त लांबट, प्रल्हाद चौधरी, फकरू निखाडे यांचे ते आहेत. तर दहा जनावरे लंपी आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शेती च्या पुढील मशागतीची चिंता लागली असून या लम्पीचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी तालुक्यातील पशुपालक तसेच क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांनी मार्गदर्शन करणे व शंकाचे निरसन करणे यासाठी विभागनिहाय पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समितीतील सर्व गांवे यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करणे अतिशय आवश्यक झाले आहे.

तूर्तास येथील पशुधनाची वेळीच उपचार मिळाल्याशिवाय जनावराला लंपी आजाराची लागण होण्यापासून वाचविता येणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या गंभीर आजाराच्या प्रादुर्भावावर तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे गोधन दगावलेल्या शेतकऱ्यांनी "सह्याद्री चौफेर" ला बोलताना सांगितले.

"लम्पी रोग प्रादुर्भाव वाढलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष वार रुम तयार करण्यात यावे, तसेच लम्पी प्रादुर्भावामुळे मृत पशुधनाचे अर्थसहाय्याचे प्रस्ताव त्वरित मागवून पशुपालकांना तत्काळ अनुदान देण्यात यावे."

-भैय्याजी कनाके
ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी तथा पेसा समिती अध्यक्ष, पहापळ (पंस मारेगाव)