गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत खोटी माहिती दिली - कलावती बांदुरकर


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : खोटं बोल; पण रेटून बोल, ही तर भाजपाची सवय आहे असा आरोप करित कलावती बांदुरकर यांनी भाजपा वर जोरदार टिका केली आहे. आज प्रधानमंत्री यांना निवेदन देऊन देशाचे गृहमंत्री यांचे वर कार्यवाही करण्याची मागणी केली. 

काल लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलतांना देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी वर टिका करतांना जळका येथील कलावतीच्या घरी भेट देऊन तिला वाऱ्यावर सोडले तर तिला घर, वीज, पाणी, शौचालय,अन्न धान्य आदी मदत मोदी सरकारने पोहचविली अशी टीका केली होती. ही गोष्ट जेव्हा कलावती यांना इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून पहावंयास मिळाली तेव्हा कलावती बांदुरकर ह्या फार दुखावल्या माझ्या नावाचा वापर करून ज्या पद्धतीने ते सांगत आहे, हे चुकीचं आहे. मला जे काही मिळालं ते राहुल गांधी मुळे, काँग्रेस च्या काळात मिळाले असे सांगत माध्यमांशी संवाद साधला. आज त्यांनी महिला काँग्रेस च्या नेतृत्वात तहसीलदार मार्फत प्रधानमंत्री यांना निवेदन पाठवून केंद्रीय मंत्री अमित शहा हे खोटे बोलले असून संसदेत खोटी माहिती देणाऱ्या शहावर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

आज मारेगाव तालुका महिला काँग्रेस पक्षाचे वतीने कलावती बांदुरकर यांनी तहसीलदार यांचे मार्फत प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले. निवेदन देतांना महिला कांग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा अरुणा खंडाळकर, माजी. पं स सभापती शकुंतला वैद्य, सुषमा काळे, प्रतिभा कळसकर, पूजा ठेंगळे, मालती बोढे, सुरेखा कोयचाडे, सुनीता कुळमेथे कमल नाखले, कविता मडावी, माया पेंदोर, मंजुषा पोल्हे, माजी गटनेते उदय रायपुरे, खालिद पटेल, अनिल देरकर, रविंद्र धानोरकर, शाहरुख शेख, आकाश भेले, हंसराज तेलंग, पलास बोढे, जगदीश खडसे, आदी काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.

अखेर शुभारंभ, सर्वसामान्यांना मिळणार कोसारा घाटावरील रेती

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

मारेगाव : बऱ्याच प्रतीक्षे नंतर तालुक्यातील लाभार्थ्यांना रेती (वाळू) मिळणार आहे. आज गुरुवार ला कोसारा रेतीचा घाटाचा शुभारंभ पार पडला. याबाबत चे पत्र देण्यात आले, अशी माहिती आहे. तत्पूर्वी रेती मिळण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी लोकशाही चा मार्ग अवलंबून वाळू साठी मोर्चा, निवेदन सह आंदोलन केले, परंतु त्याचा फारसा काही उपयोग दिसून आलेला नाही. सर्व आपापल्या स्तरावर सेट होऊन मोकळे, अशी मध्यंतरी जोरदार चर्चा रंगली होती.
मागील कोरोना काळापासून रेती संबंधित व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे चुरी चा वापर करून अनेकांना आपलं काम भागवावं लागलं असले तरी, छुप्या मार्गाने रेती अव्याच्या सव्या दराने पुरवली जात होती, हे सर्वश्रुत आहे. मात्र शासनाचे सर्व सामान्यांना जाहीर केलेले धोरण कुचकामी ठरले, असे म्हणणं काही वावगं नाही.

स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देवू यासाठी मोठा गाजावाजा केला, परंतु कणभर रेती लाभार्थ्यांना मिळाली नाही. खास करून मारेगाव तालुक्यातील एकही लाभार्थ्यांना रेती मिळाली. अशी ओरड असतांना जवळपास 1036 लाभार्थ्यांनी नोंद प्रशासन दरबारी केली. मात्र, रेती मिळत नव्हती. या साठ्यातून ठेकेदार गब्बर झाले अशी ओरड जनतेतून ऐकायला मिळत होती.
पावसाळा सुरु झाला बांधकाम गुंडाळून घरी बसण्याची वेळ आली, घराचे स्वप्न रंगवणाऱ्याच्या आशेवर पाणी फेरलं गेलं आणि बऱ्याच कालावधी नंतर आज दि.10 ऑगस्ट रोजी  शासन प्रशासनाला जाग आली व कोसारा रेती घाटाचा शुभारंभ आ. संजीव रेड्डी बोदकूरवार, तहसीलदार उत्तम निलावाड, सरपंच सौ. छायाताई खाडे व कोसारा ग्रामपंचायत पदाधिकारी तथा सदस्य गण तसेच ग्रामस्थांच्या, उपस्थित हा शुभारंभ पार पडला आहे. यावेळी मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व सरपंचा यांचे हस्ते रेतीचा शुभारंभ प्रसंगी हिरवी झेंडी दाखवण्यात आली. त्यामुळे लाभार्थ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या, आता मारेगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना शासनाची स्वस्त दरात रेती मिळणार आहे.
या शुभारंभ प्रसंगी प्रशासनातील अधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तथा लाभार्थी यांची लाक्षनीय उपस्थिती होती. 


आज नवरगाव येथे डोळ्यांचे साथ रोग शिबीर

सह्याद्री चौफेर : वृत्तसंस्था 

मारेगाव : आज 10 ऑगस्ट रोजी नवरगाव येथील ग्रामपंचायत मध्ये हे शिबीर आयोजन 1 वाजता करण्यात आले आहे, या शिबिराचा परिसरातील गरजू जनतेनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटी मारेगावच्या वतीने करण्यात आले आहे.

कुंभा, मारेगाव व मार्डी येथे पार पडलेल्या हजारो गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला, विशेष म्हणजे नागरिकांच्या मागणीला मान देऊन हे भव्य डोळ्यांचे साथ रोग शिबिराचे आयोजन केले गेले. आज शेवटचा टप्प्यात हे शिबीर पार पडत आहे, आज गुरुवार ला नवरगाव येथे डोळ्यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नवरगाव येथे होणाऱ्या शिबिराचा लाभ गरजू जनतेनी घ्यावा असे, आवाहन सभापती गौरीशंकर खुराणा यांनी केले असून मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी चे तालुका अध्यक्ष यांच्या पुढाकारातून हे शिबीर आकाश बदकी, सय्यद समीर, अंकुश माफूर, आकाश भेले, शाहरुख शेख, प्रफुल विखणकर, समीर कुळमेथे, यांच्या नेतृत्वात संपन्न होत आहे.
कुंभा, मारेगाव, मार्डी व नवरगाव येथील शिबिराला स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांचे सुद्धा बहुमोलाचे सहकार्य लाभत आहे. असे मत तालुका काँग्रेस कमिटी च्या व्यक्त केले. असेच सहकार्य तालुक्यातील प्रत्येक स्थानिकांनी दिले तर, यापुढे ही जनहितार्थ सामाजिक उपक्रम राबवू असे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खुराणा यांनी मार्डी येथील पार पडलेल्या शिबिराला मार्गदर्शन करतांना म्हणाले.

मार्डीत भर चौकात घडला थरार: 22 वर्षीय युवकांवर कुऱ्हाडीने सपासप केले वार..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : मारेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मार्डी येथील भर चौकात एका 22 वर्षीय युवकांवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करून ठार केल्याची ही थरकाप उडवणारी घटना एका पानटपरी च्या समोर मुख्य मार्गांवर सायंकाळी 8.45 वाजताच्या दरम्यान,घडली. 

आज बुधवार (09 ऑगस्ट) आठवडी बाजार, आणि परिसरातील नागरिकांची बाजार घेऊन परतीची वाटचाल. अशा गजबजलेल्या भर चौकात कुऱ्हाडीचे 15 ते 20 सपासप घाव घालून त्यास घायाळ केल्याची घटना घडल्याने मार्डीसह परिसरात एकच खळबळ उडाली.
कैलास उर्फ गोलू बंडू सयाम (22) रा.मजरा असे या प्राण घातक हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तो एक महिन्याअगोदर कारागृहातून बाहेर आला असल्याचे समजते.तर आरोपी प्रदीप गोविंद भारशंकर (अंदाजे 36) रा. मार्डी (मुळ चा राजुरा कॉलरी ता. वणी) असे नाव आहे. दोघेही गुन्हेगारी प्रवृत्ती चे असल्याची चर्चा घटनास्थळावर नागरिकांतून दबक्या आवाजात ऐकावंयास मिळाली. भर चौकात घडलेल्या घटनास्थळी बघ्याची एकच गर्दी जमली होती. आरोपीने प्राणघातक हल्ला करून गळ्यावर,मानेवर कुऱ्हाडीने 'गत प्राण' होई पर्यंत वार करून त्याला घायाळ केले.
ऐन बाजाराच्या दिवशी रक्तरंजित घटना घडल्याने चौकातील व्यवसायिकांसह नागरिकात भीतीचे वातावरण काही काळनिर्माण झाले होते. या प्राणघातक हल्यातील मृतक हा जवळपास अर्धा तास घटनास्थळी धराशायी झाल्याची चर्चा ऐकीवात होती. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटना स्थळाचा पंचनामा करून जखमीला तात्काळ ठाणेदार जनार्दन खंडेराव यांच्या टीमने उपचारासाठी वणी येथे हलवण्यात आले. मात्र, त्याचा उपचाराअंती मृत्यू झाला. घटनेतील आरोपी प्रदीप भारशंकर याला ताबडतोब अटक करून ताब्यात घेतले. 

या प्राणघातक हल्ल्याला किरकोळ वादाचे कारण ठरले जीवघेणे : 

सूत्राच्या माहितीनुसार मार्डी बुधवार बाजार होता, येथील चोपण मार्गांवरील दारू भट्टी च्या रस्त्यावरून जाऊ दे, हे किरकोळ कारण जीवघेणे ठरले. प्रदिपने रस्त्याच्या बाजूला होय म्हणत दोघात "तू तू मैं मैं" झाली. मृतकाने तू कोण बे म्हणत हुज्जत घातली आणि संतापलेल्या आरोपीने घरी जाऊन हातातली सायकल ठेवली व कुऱ्हाड घेऊन आला आणि मग रागाच्या भरात टपरी समोर भर चौकात उभा असलेल्या गोलू वर सपासप कुऱ्हाडीने गळ्यावर मानेवर वार केले. असे आरोपीने हसत मुखत पोलिसांना सांगितले. हा संपूर्ण थरार अंगाचा काटा उभा करणारा असल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सदर घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली मारेगाव ठाणेदार जनार्दन खंडेराव, यांचे चमू रमाकांत पाटील, अजय वाभीटकर अधिक तपास करित आहे.

उघडा पडलेला डिपी बॉक्स नवीन लावून द्या - ग्रामस्थांची मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वनोजा देवी गावालगत असलेल्या डीपी बॉक्स ला वरील झाकण नसल्याने नकळत विजेचा धक्का लागण्याची शक्यता येथील उपसरपंच प्रशांतकुमार भंडारी यांनी व्यक्त करित संबंधित विभागाला डामदौल अवस्थेत असलेल्या डिपी ला सुरक्षेच्या दृष्टीने वरील झाकण किंवा नवीन डिपी बॉक्सची मागणी सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच बंडुभाऊ पुनवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता महा. राज्य विद्युत वितरण कंपनी मारेगाव यांना करण्यात आली.
1भंडारी यांनी याबाबत मागील महिन्यात 2 जुलै, 23 जुलै 2023 रोजी फोटो सह माहिती विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र,त्यावर अजून पर्यंत काहीच उपाययोजना करण्यात आली नाही. तसेच 11 के व्ही चा नाल्याच्या काठावरील स्मशानभूमीतील उभा असलेला जिवंत विद्युत प्रवाह पोल पडणाच्या मार्गांवर असून सुद्धा काम झालेले नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने डिपी बॉक्स व विद्युतखांब आहे तात्काळ उभारून गावाकऱ्यांना दिलासा देण्यात यावे अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली. जर विद्युत प्रवाह असलेला पोल पडल्यास वाहत्या पाण्यात विदयुत प्रवाह येवून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने या मागणीची दखल घेऊन तात्काळ डिपी बॉक्स व पोलची जागा बदलून घेण्यात यावी.अशी सुद्धा मागणी केली.

यावेळी स्थानिक रहिवासी,सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच बंडुभाऊ पुनवटकर व वनोजा ग्रामपंचायत चे उपसरपंच प्रशांतकुमार भंडारी हे उपस्थित होते.