'हे' कॅमेरे कसे काम करतात, तिथे कोणी बसून क्लिक करते का?

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

रस्त्यावरून गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही दिल्ली, मुंबई किंवा इतर कोणत्याही मोठ्या महानगरात राहत असाल तर तुम्ही रस्त्यांवर कॅमेरे लावलेले पाहिले असतील. जेव्हा एखादी व्यक्ती ट्रॅफिक सिग्नलचे उल्लंघन करते किंवा जास्त वेगाने वाहन चालवते तेव्हा कॅमेरे आपोआप चलन तयार करतात आणि त्याच्या घराच्या पत्त्यावर पाठवतात. त्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला चलन भरावे लागते. हे कॅमेरे कसे काम करतात आणि ते टाळणे का शक्य नाही ते जाणून घेऊ या.

ट्रॅफिक कॅमेरा अशा प्रकारे काम करतो
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी रस्त्यावर ट्रॅफिक कॅमेरे बसवले आहेत. हे कॅमेरे सुपर हाय रिझोल्युशन (2 मेगापिक्सेल) कॅमेऱ्यांसह वापरले जातात, जे 60 डिग्री कव्हरेजचे आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या कॅमेऱ्यांना टाळणे अत्यंत अवघड आहे. या कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहनांचा वेग शोधणे सोपे जाते.

डेटा सुरक्षा
हे कॅमेरे वाहतूक नियंत्रण कक्षातून चालवले जातात. या कॅमेऱ्यांसाठी खास डेटा एन्क्रिप्शन सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. तसेच कॅमेऱ्याने काढलेले फोटो आणि व्हिडीओ सुरक्षित ठेवण्यात आले आहेत, जेणेकरुन काही वाद झाल्यास ते न्यायालयासमोर मांडता येतील.

ई-चालन कसे पाठवले जाते?
एखाद्या व्यक्तीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर, वाहतूक नियंत्रण कक्षाकडून तुमच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे ई-चलन पाठवले जाते. विहित मुदतीत चलनाची रक्कम जमा न केल्यास वाहन जप्त केले जाऊ शकते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की वाहतूक नियंत्रण कक्ष 24x7 कार्यरत आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळीही तुम्ही या कॅमेऱ्यांपासून बचावण्याची शक्यता नाही.

चूक होण्याची शक्यता नाही
ई-चलान तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी, त्याला दोन टप्प्यांतून जावे लागते. प्रथम, रहदारीच्या नियमांच्या उल्लंघनाची स्वयंचलित पुष्टी केली जाते, आणि नंतर ते मॅन्युअली तपासले जाते, जेणेकरून कोणतीही त्रुटी राहत नाही.


शिवसेनेतर्फे तलाठी व वनरक्षक पदाकरीता निःशुल्क टेस्ट सिरीज

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेने चंद्रपूर जिल्ह्यातील युवक व युवतींकरीता तलाठी व वनरक्षक या पदाकरीता निःशुल्क टेस्ट सिरीज चे आयोजन वरोरा व भद्रावती या तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आले आहे. वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवा-युवती सेना व अस्पायर प्रोफेशनल अकॅडमी, चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने या निःशुल्क टेस्ट सिरीज उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ९ जुलैपासून नियमित सकाळी १० वाजेपासून वरोरा येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शिवालय व भद्रावती येथे डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालय येथे टेस्ट सिरीजचे वर्ग चालणार आहेत. 

वरोरा-चिमुर-ब्रम्हपुरीच्या युवती जिल्हा अधिकारी कु. प्रतिभा माडंवकर यांनी या उपक्रमाचे प्रसारण केले आहे.
युवासेना प्रमुख आमदार आदित्य साहेब ठाकरे यांचे प्रेरणेने व युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई, युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा मुबंई विद्यापीठाचे सिनेट सदस्य शितलताई देवरुखकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य, हर्षलजी काकडे, युवासेना विभागीय सचिव तथा गोडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य निलेशजी बेलखेडे, पूर्व विदर्भ सघंटीका व प्रवक्ता सौ. शिल्पाताई बोडखे यांचे नेतृत्वात तसेच माजी संपर्क प्रमुख अजय स्वामी, जिल्हा सघंटीका (वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी) सौ. नर्मदाताई दत्ताभाऊ बोरेकर, वरोरा-भद्रावती विधानसभाप्रमुख रविंद्र शिंदे व जिल्ह्यातील सर्व जेष्ठ (पुरुष,महीला) युवा-युवती पदाधिकारी यांचे मार्गदर्शनात युवा-युवती सेने तर्फे “तलाठी व वनरक्षक" पदाकरीता निःशुल्क टेस्ट सिरीज घेतल्या जात आहे. 

यामध्ये चंद्रपुर जिल्हा व ईतर जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थीनी भाग घेवु शकतात. या करीता युवा-युवती सेनेकडुन आव्हान करण्यात आले आहे. विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी प्रा. प्रीती पोहाणे, प्रा. आश्लेषा जीवतोडे, शिव गुडमल, तेजस्विनी चंदनखेडे, प्रणाली मडकाम, नेहा बनसोड, गौरव नागपुरे, सीमा लेडांगे, पुनम सरपाते, ज्योती पोयाम, स्नेहा किन्नाके, भावना खोब्रागडे, महेश निखाडे, मनोज पापडे, प्रज्वल जाणवे, सौरभ खापने, निखिल मांडवकर, राहूल मालेकर, गौरव नागपुरे यांचेसह संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 सदर उपक्रम यशस्वी करण्याकरीता सर्व युवा-युवती सेनेच्या पदाधिकारी, सर्व शिवसैनिक, सघंटीका यांनी या उपक्रमाकडे लक्ष देवुन वेळोवेळी मदत करावी. तसेच युवा-युवती सेनेव्दारा नविन पिढीतील सर्व युवा-युवती यांच्या उज्वल भविष्यासाठी युवा-युवती सेनेकडुन भविष्यात सामाजिक व सघंटनात्मक अनेक उपक्रम राबवून जनतेमध्ये वंदनीय हिन्दुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, मराठी माणसाचे हक्क, मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण, माजी मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे मुख्यमंत्री कार्यकाळातील लोकहितार्थ कामे, कोरोना काळात राज्यात केलेली कामे याविषयीची माहिती व गद्दारांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसुन शिवसेना पक्षाचे दोन गट निर्माण  केले व त्यावर मा.सुप्रीम कोर्ट यांनी दिलेला न्याय निवाळा या विषयाची संपूर्ण माहिती कुटुंब, घर, गाव ते शाखा, शहर, तालुका, जिल्हा, राज्यात व समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याकरीता शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) च्या सर्व विंगचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी कटीबध्द राहुन कार्य करावे, असे शिवसेना वरोरा-भद्रावती विधानसभाप्रमुख रविंद्र शिंदे म्हणाले.

चिंचाळा येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज चिंचाळा येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला. या उत्सवाला गावातील युवक युवती, जेष्ठ नागरिक, पुरुषमंडळी यासह महिलांमंडळीची उपस्थिती लक्षणीय पहायला मिळाली. श्री किशोरभाऊ उलमाले यांच्या शेतात,(मारेगाव रोड) येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.

सतत ९ वर्षांपासून संपन्न होत असलेल्या या गुरुपौर्णिमा महोत्सवात गावातील भाविक भक्त एकत्रित येवून सर्वधर्म समभावाने हा उत्सव साजरा केला जातो, दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गुरुपौर्णिमेचे आयोजन केले होते. आज सोमवारला गुरुपौर्णिमेनिमित्त १ वाजता पालखी काढुन साई मंदीर ते गावातील मुख्यमार्गाने पालखीची शोभा यात्रा परत साई मंदीर येथे दाखल झाले. या पालखी सोहळ्यात नागरिकांसह महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

कोरोनामुळे मागील काही काळ या उत्सवावर विरजण आले असले तरी गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर गावातील भाविकांनी खचून न जाता नेहमीप्रमाणे या पवित्र स्थानी येवून श्रद्धा जोपासली. या अनुषंगाने गावाकऱ्यात एक उत्साहाचे, प्रेम भक्ती चे वातावरण निर्माण होऊन भावभक्तीने पूजन करून हा महोत्सव साजरा करण्यात आला.

या निमित्ताने गावात ग्रामस्वछता राबवून गल्लोगल्ली, घरा-दारासमोर सुशोभीत रांगोळ्या काढुन सर्वत्र भक्तिमय वातावरण पहायला मिळतं. साईंच्या चरणी आत्मसमर्पण करित देहभान हरपून भजन-पूजनाचे आयोजन असते. या वर्षी वरूण राजाने मागील काही दिवसापासून एकदमच दांडी मारल्याने या निमित्ताने त्यालाही भावपुर्ण साकडे घातले. त्यानंतर दही हांडी, काला व शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रमाने गुरुपौर्णिमेची सांगता करण्यात आली, हे विशेष...!!



समृद्धी महामार्गावरील खासगी बस अपघातातील २५ जणांवर एकत्रितरित्या अंत्यसंस्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर देऊळगाव राजानजीक शनिवारी, दि. १ रोजी खासगी प्रवासी बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २५ जणांवर आज दि. २ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता हिंदू स्मशानभूमीत एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले. मंत्री गिरीष महाजन यांनी अग्नि दिला.

यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रामदास तडस, आमदार आकाश फुंडकर, श्वेता महाले, संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी सहमती दिल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले. यात तेजस पोकळे वर्धा, करण बुधबावरे वर्धा, वृषाली वनकर पुणे, शोभा वनकर पुणे, ओवी वनकर पुणे, ईशान गुप्ता नागपूर, सुजल सोनवणे यवतमाळ, तनिषा प्रशांत तायडे वर्धा, तेजस्विनी राऊत वर्धा, कैलास गंगावणे पुणे, कांचन गंगावणे पुणे, सई गंगावणे पुणे, संजीवनी शंकरराव गोटे वर्धा, सुशील खेलकर वर्धा, झोया शेख नागपूर, रिया सोमकुवर नागपूर, कौस्तुभ काळे नागपूर, राजश्री गांडोळे वर्धा, मनीषा बहाळे वाशिम, संजय बहाळे वाशिम, राधिका महेश खडसे वर्धा, श्रेया विवेक वंजारी वर्धा, प्रथमेश प्रशांत खोडे वर्धा, अवंती परिमल पोहणेकर वर्धा, निखिल पाते यवतमाळ यांच्यावर एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी मंत्री गिरीष महाजन यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. श्री. महाजन म्हणाले, घडलेली घटना अत्यंत दुर्देवी असून शब्दांमध्ये सांत्वन करता येणे शक्य नाही. आज दुःखाचा डोंगर कोसळला असताना नातेवाईकांनी संयम दाखवून दुःखाला सामोरे जात आहे. अपघातातील केवळ चार मृतदेहांची ओळख पटली आहे. मात्र २१ मृतदेहांची ओळख पटली नसल्याने सर्व नातेवाईकांनी सहमती दिली असल्याने एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती शासनातर्फे शोकसंवेदना व्यक्त करण्यात आली. अंत्यसंस्कार करण्यात आलेल्यांच्या सर्व कुटुंबियांना अस्थी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या प्रथा परंपरेप्रमाणे या अस्थींचे विधिवत विसर्जन करावे. कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. यापुढे असे अपघात होणार नाहीत, यासाठी कडक कारवाई करण्यासोबतच कठोर पावले उचलण्यात येतील.

यावेळी खासदार रामदास तडस यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या. उपस्थित नागरिकांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.

कृषी दिन व वसंतराव नाईक जयंतीनिमित्त टी डी आर एफ द्वारा "एक जवान, एक वृक्ष" या उपक्रमाद्वारे तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणीदरवर्षीप्रमाणे दि. १ जुलै रोजी कृषी दिन व हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त टी डी आर एफ द्वारा "एक जवान,एक वृक्ष" हा उपक्रम राबवून विदर्भातील वेगवेगळ्या कंपनीतील (तालुक्यांमधील) सर्व टी डी आर एफ अधिकारी व जवान यांनी आपल्या घराच्या अंगणात तसेच आजूबाजूच्या परिसरात सोबतच मोकळ्या जागेत व ज्या ठिकाणी झाड नाही अशा विविध उपयोगी वृक्ष लावून त्याच्या संगोपणाची जबाबदारी घेऊन त्यांची निगा राखण्याचे संकल्प घेतले. 

या उपक्रमाच्या माध्यमातून वणी तालुक्यातील टी डी आर एफ जवानांनी टी डी आर एफ संस्थापक तथा संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात गव्हरमेंट हायस्कूल परिसरात व निरगुडा नदी विविध ठिकाणी वड, पिंपळ, कडूनिंब, निंबु, सीताफळ, इ. उपयोगी वृक्षांची लागवड केली. या उपक्रमाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून टी डी आर एफ (TDRF) जनसंपर्क अभिषेक राजहंस कार्यरत होते.

सोबतच टी डी आर एफ (TDRF) मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद, कंपनी कमांडर गणेश बुरांडे,वितेश वंजारी,अस्मिता वाळके,काजल वाळके,
सुमित जुमनाके,वैभव मडावी,साहिल लोखंडे,क्रिशना येमुरले, आदित्य दूर्गमवार,अनुष्का नक्षने,सिया झिलटे,प्रगती परचाके, प्रेरणा कामत्वार, खुशी ताजने, नम्रता सोनेकार इ. जवानांनी विशेष कार्य केले. या उपक्रमाला गव्हरमेंट हायस्कूल चे मुख्याध्यापक खान सर उपस्थित होते.