अपघातातील जखमींसाठी देवदूतासारखे धावले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्सव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार अपघातातील जखमींसाठी देवदूतासारखे धाऊन आले. ना. मुनगंटीवार यांनी जखमींना तातडीने रुग्णालयाकडे रवाना केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर येथील चांदा क्लबच्या मैदानावर आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मूलकडे मार्गस्थ झाले. सावलीतील पेंढरी (मक्ता) येथे आयोजित मत्स्य महोत्सवात उपस्थित राहण्यासाठी ना. मुनगंटीवार मार्गस्थ असताना चंद्रपूर- मुल मार्गावर अपघात झाल्याचे त्यांना दिसले. चंद्रपूर - मूल मार्गावर कार आणि दुचाकीचा हा अपघात नुकताच झाला होता. त्यामुळे ना. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना ताफा थांबविण्याची सूचना केली.
ताफा थांबताच ना. मुनगंटीवार स्वत: वाहनातून खाली उतरले व त्यांनी अपघातातील जखमींची आस्थेने विचारपूस केली. अपघातातील जखमी गंभीर असल्याचे लक्षात येताच ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या जिल्हा शल्य चिकित्सक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना फोनवरून जखमींना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. ना. मुनगंटीवार देवदूतासारखे धाऊन आल्याने जखमींना गहिवरून आले. तातडीने मदत मिळाल्याने जखमींच्या परिवाराने ना. मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.

धमाल विनोदाची रंगबिरंगी बरसात...धुळवडीच्या पर्वावर वणीत रंगणार महामूर्ख संमेलन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

वणी : गेली पन्नास वर्षे सांस्कृतिक परंपरा जपणारे आणि सुप्रसिद्ध साहित्यिक स्व. राम शेवाळकर यांच्या संकल्पनेतून निर्मित झालेले वणी येथे 'महामूर्ख संमेलन' या वर्षीही आयोजित करण्यात आलेले आहे.

दरवर्षी होणाऱ्या धुळवडीच्या उत्सवात हास्यरंगाची पेरणी करणारे हे संमेलन असते. कोरोना काळानंतर वणीकरांना हास्यरंगाची धमाल मेजवानी यावर्षी सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता एजाज खान, नागपूर तसेच सुप्रसिद्ध कवी अनिल दीक्षित, पुणे हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण राहणार आहे. वणीचे सुप्रसिद्ध नाट्य व हास्य कलावंत  प्राचार्य हेमंत चौधरी व वऱ्हाडी कवी पुरुषोत्तम गावंडे हे देखील प्रेक्षकांना मनमुराद हसविणार आहे.

या संमेलनात आजतागायत अनेक नामवंत कलाकारांनी हास्यरंग उधळले आहे. या वर्षी सुद्धा हे संमेलन शेतकरी मंदीर येथे 7 मार्च 2023 रोज मंगळवारला दुपारी 2.00 वाजता संपन्न होणार आहे.

या महामूर्ख संमेलनाला वणी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजक मुन्नालाल तुगनायत, शशिकांत माळीचकर, जयचंद खेरा, संजय खाडे, राजेश महाकुलकर, भुमारेड्डी बोदकूरवार, विलन बोदाडकर, गजानन बोढे, सुनील पानघाटे, यांचे तर्फे करण्यात आलेले आहे. 

कानडा येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : 8 मार्च, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कानडा येथे प्रथमच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा केवळ महिलांकरिता आयोजित केली असून प्रवेश विनामूल्य आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक सरपंचा सौ सुषमाताई रुपेश ढोके यांचे हस्ते होणार आहे.

दिनांक 8 मार्च 2023 रोजी सकाळी 8 वाजता जि प शाळा, कानडा येथून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. आयोजक मंडळाचा निर्णय अंतिम राहील, जीवित्वाची जबाबदारी स्वतःची स्वतःवर राहील, वयाचे बंधन नाही, कोणत्याही वयातील महिलेस भाग घेता येईल, धाव स्पर्धा 5. किमी अंतराची राहील.                                                                    यात प्रथम पारितोषिक 3001 सरपंचा सौ सुषमाताई रुपेश ढोके यांचेतर्फे, द्वितीय पारितोषीक 2001सौ कविताताई झिले ग्राम. सदस्य व सौ रेखाताई आस्कर ग्राम. सदस्य यांचे तर्फे, तर तृतीय पारितोषिक 1001सौ अर्चनाताई विनोद धोबे यांचे तर्फे आहे.                                           

या मॅरेथॉन स्पर्धा करिता रुपेश ढोके 8459729921, पियुष धोबे 9356179389, नागाजी दर्वे 7320368841, सुरज येवले 8605042998, चेतन चामाटे 805979397, विशाल चिडे 8308158529 यांचेशी संपर्क करण्याचे व स्पर्धे मध्ये सर्व महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन कानडा शिवराय एकता ग्रुप तर्फे करण्यात आले आहे.
 

मारेगाव महाविद्दालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे व्याख्यानाचे आयोजन केले होते. या व्याख्यानाकरीता प्रा. डॉ. उमेश मोरे, सहा. प्राध्यापक, भारती महाविद्यालय, आर्णी जि. यवतमाळ यांना पाचारण करण्यात आले होते.

सरांनी "Protein Synthesis" या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला प्रा. डॉ. अशोक यावले अध्यक्ष म्हणून तर प्रमुख अतिथी डॉ. उमेश मोरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. विनोद चव्हाण यांनी तर कु. ऋतुजा ठावरी यांनी सूत्रसंचालन व कु. वैष्णवी राजूरकर यांनी आभारप्रदर्शन केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. कुळकर्णी, डॉ. केलोडे, डॉ. तानुरकर, डॉ. घोडखंदे, प्रा. देशमुख, डॉ. चिरडे, डॉ. राऊत, प्रा. कांबळे, प्रा. जेणेकर, प्रा. आत्राम, प्रा. वांढरे, डॉ. कांबळे व अभिजित पंढरपूरे इत्यादी मंडळी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता प्रा. भांदक्कर, प्रा. माकडे व प्रा. डॉ. अडसरे यांनी परिश्रम घेतले.

शेतकऱ्याची बैलजोडी गेली चोरीला, संशयी विरोधात वणी पोलिसात तक्रार!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : रासा येथील शेतकरी नरेश कवडू घुगुल यांच्या स्वत:च्या मालकीची बैलजोडी अंदाजे किंमत एक लाख रुपयांची बैलजोडी चोरट्यांनी लांबवली आहे. 

नरेश घुगुल यांनी दिलेल्या माहितीनुसार आमची लाख्या रंगाची बैलजोडी गोठ्या समोर बांधलेली होती, संशयित आरोपींनी चोरून नेली, व ती बैलजोडी कत्तलीसाठी जनावर पुरविणाऱ्यांच्या हाती दिली. असा त्यांचा आरोप असून नरेश घुगुल यांना माहिती होते की, आपली बैलजोडी कुणी चोरली व संशयित आरोपी कोण? हे पण त्यांना माहिती होते. ही सर्व माहीती घेऊन ते वणी पोलिसांकडे गेले, पण या प्रकरणाचा धातूरमातुर तपास वणी पोलिसांनी केला आहे. असा त्यांचा थेट आरोप आहे.

शेतकऱ्याचा मित्र बैलअसून त्याची बैलजोडी चोरून नेली असून, शेतकरी चिंतेत आला आहे. पुलिस प्रशासन अधिकारी दुर्लक्ष करत असून १४ फेब्रु. ला घुगुल यांची बैल जोडी चोरून नेली, यासंदर्भात रीतसर तक्रार वणी पोलिसात दिली आहे, मात्र कुठलाही तपास पोलीस यंत्रणेकडून होत नसल्याची खंत शेतकरी घुगुल यांनी व्यक्त केली. 
तूर्तास शेतकरी घुगुल यांचा गावातील दोघांवर संशय आहे. त्यांनी त्यांची नावासहित तक्रार दिली असून सुद्धा कोणतीही कार्यवाही झाली नाही, हे सर्व सांगताना घुगुल म्हणाले की, ज्या दिवसापासून माझी बैलजोडी चोरीला गेली तेव्हा पासून त्यांना माहिती झाले की, आरोपी कोण?, आरोपीने ते बैलजोडी कुणाला दिली! व ती बैलजोडी कुठे गेली ही सर्व माहिती पोलीस प्रशासनाला तक्रारीस्वरूपात दिली असून सुद्धा माझ्या तक्रारीकडे जाणीव पूर्वक अधिकारी दुर्लक्ष करित आहे. असा थेट आरोप नरेश कवडू घुगुल यांनी पोलीस प्रशासनावर लागवला. 


नरेश घुगुल या शेतकऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे साकडे

अजूनही वणी पोलिसांकडून बैलाचा शोध घेण्यात आला नाही. अखेर हतबल शेतकऱ्यांने वणी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्फत तक्रारीचे निवेदन देवून त्याच्या प्रतिलिपी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ, वणी विधानसभा क्षेत्र आमदार, गृहमंत्री महाराष्ट्र शासन व पालकमंत्री यवतमाळ यांना दिले आहे