सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके
7066027404
नागभिड : कैलास सत्यार्थी फाऊंडेशन नवी दिल्ली पुरस्कृत "बालविवाह प्रतिबंधक जनजागृती दिप जलाओ अभियान" नोबल पारितोषिक विजेते आदरणीय कैलास सत्यार्थी यांच्या प्रेरणेतून चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील २५ पेक्षा अधिक गावांमध्ये स्नेहल ज्ञानसागर शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद चे प्रतिनिधी अरुण बारसागडे यांचे मार्गदर्शनाखाली बालविवाह प्रतिबंधक दिप जलाओ रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गावातील सरपंच, पोलीस पाटील,आशा कार्यकर्ती, अंगणवाडी शिक्षिका, अंगणवाडी सेविका, बचतगटांचे पदाधिकारी, महीला सदश्य, तरूण मुले-मुली, अनेक शाळकरी मुले,व गावांतील प्रतिष्ठीत व्यक्तींना सामावून घेण्यात आले होते.
बालविवाह प्रतिबंधक दिपजलाओ रॅली चे प्रत्येक गावातील मुख्य रस्त्यां वरून आयोजन करण्यात आले होते,बालविवाह हा देशावरील कलंक असून तो नष्ट झालाच पाहीजे या आत्मविश्वासांने ग्रामस्थ या रॅलीत हातामध्ये जळती मेणबत्ती, बालविवाहाचे संदेश देणारे रंगीत पोस्टर्स, तसेच नोबल पारीतोषिक विजेते आदरणीय कैलासजी सत्यार्थी यांचा संदेश पत्रके आणि बॅनर्स घेवून सहभागी झाले होते, रॅलीत "आगे बढ़ेंगे और जितेंगे!" "बालविवाह है कुप्रथा है, बेटी के लिए एक विपदा है! " कच्ची उम्र में मत करो ब्याह, दोनो का जिवन होगा तबाह!", "गाव गाव पहूचना है, बालविवाह रुकाना है!" या सारख्या अनेक घोषणांनी आसमंत दणाणून गेले होते, तर गावातील चौका चौकात गावक-यांना बालविवाह करू नका, मुलींना शिकू द्या अशी प्रतिज्ञा देण्यात आली.
इतकेच नव्हे तर आम्ही बालविवाह समारंभात सहभागी होणार नाहीत व बालविवाह थांबविण्यासाठी पुर्ण प्रयत्नशील होवू, बालविवाहाची माहीती मिळाल्यास गावातील पोलीस पाटील, पोलीस विभाग व बालसंक्षक्षण कक्षाला कळवू अशीही शपथ देण्यात आली. नागभिड तालुक्यातील बोंड,राजोली, येनोली, सोनूली, इत्यादी २५ गावात या रॅली चे आयोजन करण्यात आले होते.