लोकमान्य टिळक महाविद्यालय येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ द्वारा येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात पहिल्यांदाच भव्य रोजगार मेळावा (ता. 7 जुलै) रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी प्रथम ऑनलाईन गुगल वर लिंक (link) करून आपला फार्म (application) भरणे अनिवार्य आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळ व लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिन दयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून, शहरात प्रथमच रोजगारांची सुवर्ण संधी प्राप्त होत असून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी सह देशभरातील 12 नामांकित कंपन्याचा सहभाग असणार आहेत. त्यासाठी 2365 पदाची जंबो भरती होणार आहे.
या आयोजित रोजगार मेळाव्याचे उदघाटक मा खा बाळू धानोरकर उपस्थित राहणार आहेत तर विशेष अतिथी तथा मार्गदर्शक मा श्री अमोल येडगे  जिल्हाधिकारी यवतमाळ, प्रमुख पाहुणे मा श्री नरेंद्र नगरवाला अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ वणी, मा श्री संजय देरकर उपाध्यक्ष जिमस बँक मर्या.यवतमाळ, संयोजक अध्यक्ष म्हणून मा श्री टिकाराम कोंगरे अध्यक्ष जिमस बँक मर्या, यवतमाळ, श्रीमती विद्या शितोडे,प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे इत्यादी मान्यवर उपस्थिती राहणार आहे.
तेव्हा वणी उपविभागातील 10 वी, 12 वी आय टी आय (ITI), डिप्लोमा व पदवीधारक विद्यार्थी युवक युवतीनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा व सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे. 
            जाहिरात साठी संपर्क : 9011152179

उदगीर: शंभर फुटाच्या रस्त्यासाठी पत्रकारांचे तीव्र आंदोलन

बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : उदगीर शहर हे तीन राज्याच्या सीमेवरती असलेले असून उदगीर हे उपजिल्हाचे ठिकाण असून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाराष्ट्रातील नामांकित असलेल्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयापर्यंत पक्के सिमेंट रोड च्या रस्त्याचे काम सध्या सुरू असून शंभर फूट रस्त्याचे काम असताना व रोडच्या दोन्ही बाजूने पक्के बांधकाम असलेले हॉटेल दुकाने असून सध्या 80 फुटाचा रस्त्याचे काम सुरू आहे.

 शासनाकडे याचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकारांच्या वतीने गेल्या बारा दिवसापासून तीव्र आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुरू असून आत्तापर्यंत हलकी आंदोलन तिरडी आंदोलन शासनाच्या विरोधात सुरू असून अद्याप या आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
आजच्या या आंदोलनाच्या बारावी दिवशी महाराष्ट्र राज्य टीचर ग्रुप चे संस्थापक तथा ॲडमीन व मुक्त पत्रकार सुवर्णकार यांनी पाठिंबा दिला असून खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक पोरांचे पदाधिकारी तथा वेग वर्धीनी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दादाराव दाडगे, सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक गोविंद भुरे, उदगीर येथील जेष्ठ नागरिक शंकरावजी पानगावे, ज्येष्ठ पत्रकार अंबादास अलमखाने व पत्रकार अरविंद पतकी, प्रा.गुट्टे यांच्यासह दत्ता गायकवाड नागोरी जगदीश यांच्या सह समर्थ न्यूज चैनल चे संपादक माधव रोडगे इत्यादी उपस्थित होते.

महाराष्ट्र पोलिस भरती 2022 : राज्यातील अशी होणार पोलिस भरती

सह्याद्री चौफेर

महाराष्ट्र पोलिस भरती 2022 – तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्र सरकार पोलिसांसाठी एकूण 7231 पदे भरणार आहे, आज महाराष्ट्र पोलिस भरती 2022 ची माहिती आली आहे. महा पोलीस भरती 2022 ची सर्व माहिती जाणून घेऊया


पोलिस भरती कशी होणार 2022
पोलिस पदासाठी प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी होईल त्यानंतर शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होईल. पोलीस भरती माहिती मराठीत
शारीरिक चाचणी कशी घेतली जाणार आहे – 2022

पुरुषांची शारीरिक चाचणी कशी घेतली जाईल :
महापोलिस भारतीमध्ये, पुरुषांना 1600 मीटर धावण्यासाठी 20 गुण, 100 मीटर धावण्यासाठी 15 गुण आणि मैदानी चाचणीत शॉटपुटसाठी 15 गुण मिळतील – एकूण 50 गुण.
महिलांची शारीरिक चाचणी कशी होणार?
महापोलिस भारतीमध्ये महिलांना 800 मीटरसाठी 20 गुण, 100 मीटरसाठी 15 गुण आणि शॉटपुटसाठी 15 गुण मिळून एकूण 50 गुण मिळतील.
SRPF 2022 ची शारीरिक चाचणी

SRPF 2022 ची शारीरिक चाचणी – SRPF पदासाठी, पुरुषांना शारीरिक चाचणीत एकूण 100 गुण मिळतील; ज्यामध्ये पुरुषांना मैदानी चाचणीत 50 गुण, 100 मीटरसाठी 25 गुण आणि शॉट पुटसाठी 25 गुण मिळतील.
महा पोलीस भरती 2022 मध्ये लेखी परीक्षा

लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणीत 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे
महापोलीस भरती लेखी परीक्षा 2022 – लेखी परीक्षेत एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न असतील; अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण इत्यादी.

साहेब दहा टक्केही उगवलं नाही; प्रशासनाने न्याय न मिळवून दिल्यास नुकसान भरपाईसाठी ग्राहक मंचाकडे धाव घेणार - शेतकरी प्रशांत भंडारी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : भारत हा कृषी प्रधान देश आहे असं म्हटलं जातेय मात्र या कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम प्रशासन दरबारी होत असल्याचे दिसून येत आहे. मौजा वनोजा (देवी) या परिसरात शेतकरी प्रशांत भंडारी व श्रीमती सुवर्णा ताई आवारी यांचे सुद्धा शेत आहे. हंगामानुसार त्यांनी पेरणी केली मात्र, सोयाबीनची उगवण न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याबाबत शेतकऱ्याने रीतसर तालुका कृषी अधिकारी यांचे कडे निवेदनातून सोयाबीनचे बोगस बियाणं (विक्रांत कंपनी) विरुद्ध तक्रार करून नुकसान भरपाई ची मागणी केली.
तालुक्यातील देवी शेत शिवारातील शेतकरी प्रशांत भंडारी व श्रीमती सुवर्णा ताई आवारी यांचे सुद्धा शेत आहे. यांनी 22 ते 23 जून रोजी दरम्यान, सोयाबीनची पेरणी केली. परंतु आजपर्यंत 10 टक्के सुद्धा उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी मारेगाव यांचे कडे तक्रार केल्यानंतर कृषी पर्यवेक्षक यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व सोयाबीन उगवण न झाल्याचे शेताचे फोटो सुद्धा काढले, मात्र जवळपास 5/6 दिवस लोटूनही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्यात आली नाही. हीच परिस्थिती तालुक्यातील वडगाव, आकापूर येथील शेतकऱ्याची आहेत.
या झालेल्या नुकसानीची भरपाई आम्हांला मिळावी किंबहुना मिळवून द्यावी यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे तक्रारी केल्या आहे. परंतु अजूनपर्यंत त्यांना मोबदला मिळाला नाही.
या नुकसान भरपाई बाबत आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना शेतकरी प्रशांत भंडारी यांनी सांगितले की, पेरणी केली, सोयाबीन उगवले नाही. जवळपास 60 हजार ते 70 हजार रुपयाचे नुकसान झाली आहे. त्याकरिता मी संबंधित विभागाला तक्रार केली, मात्र 5 दिवस लोटूनही प्रशासन न्याय मिळवून देण्यास असमर्थ ठरत असल्यामुळे मी ग्राहक मंचाकडे धाव घेणार असल्याचे ते म्हणाले आहे.

‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’च्या माध्यमातून आता मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या अंतिम मतदार यादीत नाव शोधण्यासाठी ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’ची सुविधा आता उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिली.

श्री. कुरुंदकर यांनी सांगितले की, मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष आणि निवडणूक यंत्रणेच्या सोयीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘ट्रू व्होटर’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. राज्यभरातील विविध 14 महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांत नाव शोधण्याची सुविधादेखील अलीकडे उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचबरोबर आपल्या नावासंदर्भात काही हरकती किंवा सूचना असल्यास त्याही या ॲपद्वारे नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमुळे मतदारांनी स्वत: प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत आपली नावे शोधली व त्यावरील हरकती आवश्यक कागदपत्र व पुराव्यांसह स्वत:च नोंदविल्या. केवळ तीन ते चार दिवसांत असे आक्षेप नोंदविणाऱ्यांची संख्या 2 हजार 770 इतकी होती. त्याचबरोबर या कालावधीत सुमारे पंधरा लाखांपेक्षा जास्त मतदारांनी आपले नाव शोधण्यासाठी या ॲपचा वापर केला. त्यासाठी जवळपास 50 हजारांपेक्षा जास्त मतदारांनी हे ॲप आपल्या मोबाईलवर फोनमध्ये इन्स्टॉल केले.

आता आगामी निवडणुकांच्या प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्यांमध्येही या ॲपच्या माध्यमातून आपले नाव शोधता येईल, असेही श्री. कुरुंदकर यांनी सांगितले.