मोदी सरकार चे जन विरोधी धोरण हाणून पडण्यासाठी कष्टकरी वर्गाची एकजूट व संघर्ष हाच एकमेव पर्याय - कॉ. शंकर दानव


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (०2सप्टें.) : झेंडावंदन कॉम्रेड पांडुरंग टेकाम यांच्या हस्ते करण्यात आले,लाल झेंड्याला सलामी देण्यात आली व कार्यक्रमाच्या सुरुवातीला या कोरोना काळामध्ये मृत पावलेल्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

गेल्या सात वर्षापासून सत्तेत असलेले मोदी आणि भाजप चे सरकार सतत शेतकरी,कामगार आणि कष्टकरी वर्गाचे विरोधात धोरण घेऊन भांडवलदारांच्या हिताचे धोरण घेत आहे. शेतकरी विरोधी कृषी कायदा आणला, कामगारांनी लढून मिळविले कायदे संपविले,सार्वजनिक ऊधोगा चे खाजगीकरण केले,आणि सार्वजनिक क्षेत्र व देश विक्रीस काढला मोदी सरकार देश विरोधी आहे. या सरकारचे जन विरोधी धोरण हाणून पाडण्यासाठी कष्टकरी वर्गाची एकजूट आणि संघर्ष हाच एकमेव पर्याय आले. असे प्रतिपादन मा. क. प. च्या केळापूर तालुका अधिवेशनाच्या प्रसंगी समारोपीय भाषणात मा. क. प चे राज्य कार्यकरणी सदस्य कॉ. शंकरराव दानव यांनी केले.

पुढे कॉ. दानव असेही म्हणाले की, कष्टकरी वर्गाच्या हिताची लढाई केवळ लाल बवटा लढतो आहे. हा लाल बावटा सतत रस्त्यांवर जन माणसाच्या प्रश्नांना घेऊन रस्त्यांवर दिसतोय. या लढाई चा मी आणि तुम्ही सर्वच सैनिक आहोत. या परिसरात मा. क. प ची जनचळवळ अधिक मजबूत करा,आणि आपले हक्क प्राप्त करण्यसाठी रस्त्यांवर या! मोदी सरकार ला निर्वाणीचा ईशारा देण्याकरिता २५ सप्टेंबर च्या भारत बंद आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा! केळापूर् तालुका अधिवेशनात जिल्हा सचिव कॉ. ऍड. दिलीप परचाके भाषणात म्हणाले की, विळा हातोडा कष्टकरी वर्गाच्या लढाई चे प्रतीक आहे. हा लाल बावटाच शोषण मुक्ती च्या मार्गाचा मार्गदर्शक आहे. सतत खांद्यावर लाल बावटा असूद्या! व कॉ.चंदरशेखर सिडाम यांनी प्रास्ताविक मांडले. कॉ. भाऊराव टेकाम, कॉ. पांडुरंग टेकाम, कॉ. सुरेखाताई बिरकुलवार यांनी आपले मत मांडले.
दर तीन वर्षांनी होणाऱ्या अधिवेशनात तीन वर्षांच्या लेखाजोखा होऊन पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. तेरा सदस्यीय तालुका कार्यकारिणीत कॉ चंद्रशेखर सिडाम यांची तालुका सचिव म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. कॉ अय्या आत्राम, कॉ. संदीप सुरपाम, कॉ सोनू आत्राम, कॉ. सुरेखा बिरकुलवार, कॉ. भाऊराव टेकाम, कॉ. पांडुरंग टेकाम, कॉ. प्रशांत लसंते, कॉ. संतोष टेकाम, कॉ. गणेश आत्राम, कॉ. भारत टेकाम, कॉ. बडीराम मेश्राम, कॉ. रामराव टेकाम अशी कमेटी निवळ करण्यात आली. या वेळी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते महिला व पुरुष उपस्थित होते.

मंत्रिमंडळ निर्णय : सार्वजनिक खासगी गुंतवणुकीद्वारे राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये, अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करणार

सह्याद्री न्यूज नेटवर्क 
मुंबई, (०२ सप्टें.) : सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करून वैद्यकीय सुविधात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

या धोरणाची अंमलबजावणी पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या (IFC) मदतीने करण्यात येईल.

दुर्गम भागातील प्रकल्पांना आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून उद्योग विभागाची पॅकेज स्कीम ऑफ इन्सेन्टीव्हज देखील या योजनेसाठी लागू केली जाऊ शकते. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील शक्तीप्रदत्त समिती या तरतूदींची तपासणी करेल आणि मंजुरी देईल. याद्वारे पदव्युत्तर शिक्षणामध्ये 3 वर्षांत 1000 पदव्युत्तर (एमडी / एमएस / डीएनबी) जागा वाढ (नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 350 आणि विद्यमान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 650 जागा) होणार आहे. तसेच 10 वर्षांत पदवी शिक्षणामध्ये दर वर्षी 2600 एमबीबीएस विद्यार्थी जागा वाढ (नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून 1800 एमबीबीएस विद्यार्थी आणि विद्यमान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून 800) होणार आहे.

तसेच प्रतिवर्षी बाह्यरूग्ण विभागामध्ये 1 कोटी आणि आंतरूग्ण विभागामध्ये 10 लक्ष वाढ होईल. दर वर्षी अतिरिक्त २५०० मुख्य शस्त्रक्रिया, प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय दरवर्षी ५,००,००० बाह्यरूग्ण सेवा आणि ५०,००० रूग्णांना आंतरूग्ण सेवा पुरविता येईल. सन २०२६ पासून दर वर्षी २०० अतिरिक्त अतिविशेषोपचार जागा निर्माण होतील आणि दर वर्षी सुमारे ३,००,००० बाह्यरूग्ण आणि सुमारे ७५००० आंतरूग्ण सेवा पुरविता येईल. सार्वजनिक खाजगी गुंतवणुकीद्वारे नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन केल्याने लहान शहरांमध्ये कुशल आणि अकुशल रोजगार निर्माण होतील.

राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महानगरपालिका तसेच नगरपालिकामार्फत आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात. तथापि, राज्यातील बराचसा भाग ग्रामीण असल्यामुळे तेथील आणि लहान शहरातील जनतेस दर्जेदार व परवडण्याजोग्या वैद्यकीय सुविधांचा अभाव जाणवत आहे. सद्य:स्थितीत बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवेचे जिल्हा रुग्णालय किंवा वैद्यकीय शिक्षण विभागाचे रूग्णालय आरोग्य सेवा देण्याचे कार्य करत आहेत.

तथापि, राज्यात सध्या डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागातील व सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टरांची बहुतांश पदे रिक्त आहेत. त्यामुळे राज्याच्या निमशहरी, ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील जनतेस आरोग्य विषयक प्राथमिक सुविधा अत्यंत अल्प प्रमाणात उपलब्ध होतात. तसेच बऱ्याचशा दुर्धर, अनुवंशिक, जीर्ण आजारांवर अतिविशेषोपचार तृतीयक आरोग्य सेवा (Tertiary care) देखील उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सतत होणारी लोकसंख्या वाढ विचारात घेता राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून डॉक्टरांच्या संख्येत वाढ करणे नितांत गरजेचे असून त्यासाठी राज्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती करणे आवश्यक आहे.

त्यानुषंगाने सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी निधीचा स्त्रोत उपलब्ध करण्यात येईल. त्याद्वारे अतिविशेषोपचार आरोग्य सेवा, पदवी व पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधेत वाढ करण्यात येईल. विद्यमान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण अध्यापन अधिक बळकट करणे आणि कुशल तज्ञ मनुष्यबळ निर्मिती करण्यात येईल. परावैद्यक व परिचर्या महाविद्यालयांची स्थापना करुन प्रशिक्षित परावैद्यक व परिचर्या संवर्गातील मनुष्यबळ निर्मिती करण्यात येईल.

व्यवसायिकदृष्ट्या व्यवहार्य पीपीपीच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून व्यवहार्यता तफावत निधी (VGF) द्वारे अर्थसहाय्य उपलब्ध करून घेण्यात येईल. रूग्णांचे / कर्मचाऱ्यांचे हित संरक्षित करणे, खाजगी भागीदाराच्या गुंतवणूकीचा योग्य परतावा मिळण्यासाठी संतुलित कराराचा आराखडा तयार करण्यात येईल. सन २०३० पर्यंत निश्चित करण्यात आलेली उद्दिष्टे सक्षमपणे गाठण्यासाठी व प्रस्तावित धोरण राबविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा (प्राधिकरण / महामंडळ / तत्सम यंत्रणा) उभारण्यात येईल.

निती आयोगाने विकसित केलेल्या मॉडेल कन्सेशन ॲग्रीमेंट व मॉडेल आरएफपी यामध्ये आवश्यक ते फेरबदल करुन त्याआधारे प्रस्तावित सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरण (PPP) मॉडेलच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे व अतिविशेषोपचार रुग्णालय सुविधा निर्माण करणे व सदर सुविधांमध्ये वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

त्यानुषंगाने, नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे व अस्तित्वात असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ करणे तसेच अतिविशेषोपचार रुग्णालय सुविधा निर्माण करणे व सदर सुविधांमध्ये वाढ करणे यासाठी प्रस्तावित पीएफआय व पीपीपी मॉडेलचा आराखडा तयार करुन राबविण्यात येईल.

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे बेबी किट आणि रुग्णांना फळ वाटप


सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (०१ संप्टें.) : कोविड ची भयानकता लक्षात घेता वरोरा येथील व्यावसायिक, चिरतरुण, आणि सामाजिक दायित्व जोपासून अगदी साधेपणाने मा. समीर पोपट यांनी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे लहान मुलांना बेबी किट आणि रुग्णांना फळ वाटप करून आपला जन्मदिवस साजरा केला.

कोविड च्या या भयावह परिस्थितीत स्वतः वर फिजुल खर्च न करता, रुग्णाच्या सहवासात, मित्र-परिवारासह जन्मदिवस साजरा केला. या त्यांच्या सामाजिक बांधीलकीची चर्चा सर्वत्र दिसून येत आहे.

सिनेस्टाईल पाठलाग, बल्लारपूर खुनातील फरार आरोपिंना घेतले ताब्यात

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मारेगाव, (०१ संप्टें.) : मारेगाव नजीक एक वाहन रस्त्याच्या कडेला मंगळवारी सकाळी पलटली. त्या वाहणातील जखमींना लोकांनी वाहनाच्या बाहेर काढीत मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. मात्र, काही वेळातच मागावून स्कार्पिओ वाहनातून जखमी आरोपी पसार झाल्यानंतर चर्चेला उधाण आले की, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एका युवकाचा खून करून इंडिगोने ते भरधाव निघाले असता, पळून जातांना त्यांच्या वाहनाला अपघात झाला... खरा..!

प्राप्त माहितीनुसार, बल्लारपूर येथे सोमवारला रात्री स्क्वेअर पॉइंट बीअर बार समोर मिलिंद बोन्दाडे (३२), सलमान शेख (२४) व गणेश जंगमवार (२४) यांचा धूंदीत असतांना वाद झाला. शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत होत थेट बीअर बॉटलने मिलिंद यांच्या डोक्यावर प्रहार केला. रक्ताच्या थारोळयात निपचित पडल्याने त्यास चंद्रपुर येथे दाखल केले व येथे मिलिंदचा मृत्यु झाला.

दरम्यान, संशायित आरोपींनी पोबारा करीत यवतमाळच्या दिशेने चारचाकी वाहनाने धूम ठोकली. भरधाव वेगाने येत असतांना मांगरुळ नजीक चालकाचे नियंत्रण सुटून राज्य महामार्गाच्या कडेला इंडिगो आदळली. वाहनातील तिघे जखमींना धाव घेतलेल्या नागरिकांनी बाहेर काढले. जखमीनी थेट मारेगाव रुग्णालयात उपचार घेतले आणि मागावून आलेल्या स्कार्पिओ कार ने पसार झाले.

घटनेची गंभीरता लक्षात घेवून बल्लारपुर पोलिस स्टेशन चे ठाणेदार उमेश पाटील यांनी तपासचक्रे जलदगतीने हलवित मारेगाव पो.स्टे. चे पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार यांना सूचना केल्यानंतर नितिन खांदवे यांनी तपासगती मिळविली. काही वेळातच बल्लारपुर पोलिस पथक मारेगाव येथे दाखल झाले. आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग सुरु झाला. अवघ्या २० कि. मी. अंतर असलेल्या करंजी येथून एकास तर दोघांना कारंजा जी. अकोला येथून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत संशायित आरोपी सलमान मजीद खॉन, गणेश जंगमवार, विष्णु पूण सर्व राहणार बल्लारपुर यांना गजाआड करण्यात आले आणि पोलिसांनी सुटकेचा निश्व:स सोडला. परिणामी अपघातग्रस्त कार मारेगाव पोलिसात जप्त करण्यात आली आहे.


बंगाली कॅम्प फुकटनगर चौकातील धम्म ध्वजाचा अवमान करुन सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (०१ संप्टें.) : शांतीदुत परिवर्तन बौद्ध मंडळच्या माध्यमांतून परिवर्तन चौक, राजीव गांधी नगर, चंद्रपूर येथे मागील १५ वर्षापासून सदर खुल्या जागा जंगल स्वरुपात असतांना समाजाने साफ सफाई करून त्या ठिकाणी धम्मध्वज उभारण्यात आला व त्याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच इतर समाज प्रबोधन कार्यक्रम घेऊन समाज जागृतीचे काम गेल्या १५ वर्षापासून येथील बौद्व बांधव करीत आहेत.


दरवर्षी बौद्ध समाज बांधवाकडून त्या ठिकाणी थोड्या-थोड्या प्रमाणात त्या जागेचा विकास करणे सुरु आहे. दिनांक २३.०८.२०२१ रोजी सोमवारला प्रभुजी मेश्राम यांचे निवासस्थानी मंडळाची सभा घेण्यात आली व चबुतरा निर्माण करण्याचे ठरविण्यात आले, निळा झेंडाच्या नियोजित जागेच्या बाजूचे घर असलेले विकृत मानसिकता असलेले समाजकंटक झेंड्याला विरोध करुन बौद्ध समाजाबद्धल अपशब्ध बोलून झेंडा चबूतरा बांधकामासाठी आणलेल्या विटा फेक-फाक केल्या या ठिकाणी काही करायचे नाही अशा प्रकारे बोलून दाखविले.

दिनांक २९/०८/२०२१ रविवारला सकाळी १०.०० ते १२.०० वाजताच्या दरम्यान शांतीदुत परिवर्तन बौद्ध मंडळाच्या धम्म ध्वजाची अवमानना करण्याचे कृत्य करीत दिनेश पोरशेट्टीवार व त्यांचे वडील नितेश भक्त व इतर समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चबुतल्यावर चप्पल, जोडे ठेऊन बौद्ध समाजातील बांधवाना मारण्याची धमकी दिली. त्यामुळे बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. व जातीय तेढ निर्माण केली जात आहे. गुंड प्रवृत्तीने वागून बौद्ध समाजातील लोकांना मारण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या लोकांवर कायदेशीररित्या कार्यवाही करण्यात यावी, या बाबत एक निवेदन रामनगर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना देण्यात आले.

निवेदन देताना ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा सल्लागार संतोष डांगे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, ऑल इंडिया पँथर सेनेचे कार्यकर्ते भैय्याजी मानकर, शांतीदुत परिवर्तन बौद्ध मंडळाचे अध्यक्ष प्रभु मेश्राम, उपाध्यक्ष राजेद्र गेडाम, नामदेव बोधुले, नंदकुमार कांबळे आदींची उपस्थिती होती.