सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
पहिल्या टप्प्यात होऊ घातलेल्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत 15 उमेदवार रिंगणात आहे. आणि कालपासून प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. परंतु पाहिजे तसा प्रभाव प्रचारातून दिसून येत नाहीये. फक्त सोशलच्या माध्यमातून विजय आपलाच असं भासवलं जात आहे. तर काटे कीं टक्कर वैगेरे वैगेरे..असं आभासी वातावरण जरी असलं, तरी मात्र प्रत्यक्षात अस काहीच चित्र दिसत नाहीये. सध्या चर्चेत असलेल्या एकाही उमेदवाराकडे जनतेचे प्रश्नच नाही, उलट जनतेचे प्रश्न बाजूला सारून आपला विजय आणि पक्षाच्या सिटा कशा निवडून येईल, इतकाच कल दिसत आहे. तूर्तास हुकूमशाही व चारशे पार एवढंच. शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न हद्दपार झाल्याने बेरोजगारी,महागाई ह्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने प्रचारात दम नाही अशी चर्चा रंगू लागल्या आहे. मात्र,राजकीय जाणकाराकडून ही निवडणूक फार अत्यंत महत्वाचे आहे असं म्हटलं जातं. आणि चंद्रपूर वणी आर्णी तर फार अटी तटीची निवडणूक होणार आहे असे देखील चर्चील्या जात आहे. त्यामुळे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले असून कोण बाजी मारतो अशी रंगतदार चर्चा मतदार संघातील गल्लोगल्ली सुरु आहे.
विशेष म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण जागतिकीकरण या धोरणाचा फटका नागरिकांना बसला आहे. अशी ओरड मतदारात असून याबाबत देशभरात आवाज उठवला गेला होता. परंतु राज्यकर्त्यांना साधा पाझरही फुटला नसल्याचे जनतेत तीव्र संताप यानिमित्ताने उमटत आहे. निवडून आलेला लोक प्रतिनिधी देश हितापेक्षा स्वहीत साधण्यात धन्यता मानत असून ईडीच्या धाकाने आपली निष्ठा धुळीत मिसळत असल्याचे उदाहरण ताजे आहेत. सामान्यांचा वाली कोणी नाही. त्यामुळे हा बनवाबनवीचा खेळ मतदार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.