मारेगाव तालुक्यात भव्य डोळ्यांचा साथ रोग शिबीर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : साध्य तालुक्यात डोळ्याची साथ चालू आहे, याचा नाहक त्रास जनतेला खूप होत असल्यामुळे मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने भव्य डोळ्यांचा साथ रोग शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सदर शिबीर कुंभा, मारेगाव  मार्डी व नवरगाव येथे आयोजन आहे. 
सदर शिबीरामध्ये प्रत्येक रुग्णाची डोळ्यांच्या साथीचे निदान केले जाणार आहे. तसेच आलेल्या रुग्णा पैकी कोणाचीही हेळसांड होणार नाही याकडे जातीने लक्ष घेतलं जाणार असून शिबीरांचे आयोजन करुन तालुक्यातील प्रत्येक रुग्णाच्या आरोग्याची काळजी शिबिरामार्फत घेण्याचा मानस आयोजकांच्या वतीने व्यक्त केला. रविवार दि.6 ऑगस्ट 2023 पासून या शिबिराला सुरुवात झाली असून मारेगाव  येथे 8 ऑगस्ट, मार्डी येथे 9 ऑगस्ट तर, नवरगाव (धरण) येथे 10 ऑगस्ट ला संपन्न होणार आहे, असे या भव्य डोळ्यांच्या साथ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,या शिबिरामुळे दुर्गम भागातील जनतेला खूप मोठा फायदा होणार आहे. काल रविवारी (6 ऑगस्ट) रोजी कुंभा येथील शिबीरात असंख्य नागरिकांनी लाभ घेतला.
सध्या पावसाळा सुरु आहे, अशातच डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात वाढली, यांचा जनतेला खूप त्रास होत असल्यामुळे सामाजिक जाणीवेतून तालुका काँग्रेस कमिटी, मारेगाव द्वारा आयोजित या भव्य शिबिराचा लाभ जनतेने घ्यावा असे, आवाहन काँग्रेस कमिटी च्या वतीने प्रसिद्धी पत्रकातून करण्यात येत आहे. 

शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या, गोटमार बोरी येथील घटना

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यात सतत आत्महत्येच्या घटना घडत आहे. ही मालिका थांबता थांबेना, नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार बोरी (गदाजी) येथील एका 48 वर्षीय शेतकऱ्याने विषाचा घोट घेत आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना 7 ऑगस्ट रोजी आज सकाळी घटना उघडकीस आली. या दुःखद घटनेने परिसरात पुरती शोककळा पसरली आहे.
महादेव भाऊराव बेंडे (48) रा. बोरी (गदाजी) असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. जुलै मध्ये झालेल्या अति पावसामुळे शेत पाण्याखाली आले, त्यामुळं शेती चे मोठे नुकसान झाले, आता पुढे शेती करायची कशी या विवंचनेत ते होते. कर्ज काढुन शेती केली आणि त्यातच पुन्हा पुराचा फटका बसल्याने महादेव यांचे समोर शेती उभरायची कशी असा प्रश्न उभा ठाकला. परिस्थिती अतिशय गंभीर निर्माण झाल्याने त्यांनी आज सोमवार ला पहाटे 4 वाजता विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना सकाळी उघडकीस आली. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, वृत्त लिहे पर्यंत संबंधित प्रशासन घटना स्थळी दाखल व्हायचे होते, अशी माहिती मिळाली.

महादेव यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा मुलगी असा आप्त परिवार आहे. 

सायंकाळपर्यंत राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड, ऑरेंज, यलो अलर्ट नाही


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या माहिती नुसार राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड ऑरेंज, येलो अलर्ट, देण्यात आलेला नाही अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज (दि.6 ऑगस्ट) संध्याकाळी 6:00 वाजता प्राप्त आकडेवारीनुसार हवामान सद्यस्थिती आणि अंदाज प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 65 मि मी पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग (क्युमेक्स) खालीलप्रमाणे-:

हतनूर (जळगाव) (एकूण क्षमता २५५ दलघमी) आत्तापर्यंत ४५७ क्युमेक्स विसर्ग

गोसेखुर्द (भंडारा) (एकूण क्षमता ७४०.१७ दलघमी) आत्तापर्यंत ३१२८.३५ क्युमेक्स विसर्ग

भंडारदरा (अहमदनगर) (एकूण क्षमता ३०४.१० दलघमी) आत्तापर्यंत ५४.०८ क्युमेक्स विसर्ग

दारणा (नाशिक) (एकूण क्षमता २०२.४४  दलघमी) आत्तापर्यंत ३५.४० क्युमेक्स विसर्ग

दूधगंगा (कोल्हापूर) (एकूण क्षमता ६७९.११ दलघमी) आत्तापर्यंत ३६ क्युमेक्स विसर्ग

राधानगरी (कोल्हापूर) (एकूण क्षमता २१९.९७ दलघमी) आत्तापर्यंत ४० क्युमेक्स विसर्ग

ऊर्ध्व वर्धा (अमरावती) (एकूण क्षमता ५६४.०५ दलघमी) आत्तापर्यंत १४१ क्युमेक्स विसर्ग

बेंबळा (यवतमाळ) (एकूण क्षमता १८३.९४ दलघमी) आत्तापर्यंत ४० क्युमेक्स विसर्ग

निम्न वर्धा (वर्धा) (एकूण क्षमता २१६.८७ दलघमी) आत्तापर्यंत १७.४३ क्युमेक्स विसर्ग

वारणा (सांगली) (एकूण क्षमता ७७९.३४ दलघमी) आत्तापर्यंत ४५ क्युमेक्स विसर्ग

सूर्या धामणी (ठाणे) (एकूण क्षमता २७६.३५ दलघमी) आत्तापर्यंत १८.४० क्युमेक्स विसर्ग

चासकमान (पुणे) (एकूण क्षमता २१४.५० दलघमी) आत्तापर्यंत ३१ क्युमेक्स विसर्ग

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.

पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी पहाटे ३:५३ वाजता व दुपारी ३: ५६ वाजता भरतीच्या वेळा देण्यात आल्या असून सकाळी ३.९ मीटर आणि दुपारी ४.५ मीटर पर्यंत समुद्राच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.

वीज कोसळण्याची शक्यता असणा-या जिल्ह्यातील नागरिकांनी अद्ययावत व सतर्क  राहण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये “DAMINI” हे ॲप डाउनलोड व  इन्स्टॉल करावे.  हे ॲप वापरकर्त्यांना 20 ते 40 किलोमीटर GPS नोटिफिकेशनद्वारे सतर्क करते तसेच घ्यावयाच्या खबरदारीचे उपाय देखील देते.

नागरिकांनी आपत्तीं चा इशारा आणि अधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता “SACHET” App डाउनलोड व इन्स्टॉल करावे.

राज्य शासनाद्वारे नागरिकांना CAP-SACHET या पोर्टल च्या माध्यमाने वेळोवेळी सूचना आणि संदेश पाठविण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

आपत्ती संबंधित माहिती व मदतीसाठीनागरिकांनी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खाली नमूद केलेल्यासोशल मीडिया अकाउंट फॉलो करावे:

फेसबुक: https://www.facebook.com/SDMAMaharashtra?mibextid=ZbWKwL

ट्विटर: https://twitter.com/SDMAMaharashtra

अतिरिक्त माहितीकरिता खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: 1077 (टोल फ्री क्रमांक)

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र: 022-220279900

ई- मेल: controlroom@maharashtra.gov.in


आर डी कृषी केंद्राचे संचालक राजू डावे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!


                  अ|भि|ष्ट|चिं|त|न वा|ढ|दि|व|स 

"शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा.."

सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य
आरोग्य तुम्हाला लाभो
जन्मदिवसाच्या तुम्हाला अगणित खूप खूप शुभेच्छा 

भाऊ साहेब या प्रगटदिनी वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा...!

शुभेच्छुक :- राजू डावे मित्र परिवार, वणी - मारेगाव 


नोकरी: IBPS अंतर्गत 3049 जागांसाठी भरती जाहीर; असा करा अर्ज...!


बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल (IBPS) ने नुकतीच 3049 जागांसाठी भरती जाहीर केली असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरती अंतर्गत तब्बल 3049 जागा भरल्या जाणार आहेत. प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) आणि स्पेशल ऑफिसर्स (SO) पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी 21 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे. 

पात्रता
• इच्छुक उमेदवाराने भारत सरकारने मान्यता दिलेल्या विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी
• इच्छुक उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. म्हणजेच त्याचा/ तिचा जन्म 02.08.1993 पूर्वी झालेला नसावा आणि 01.08.2003 नंतर झालेला नसावा. परंतु राखीव श्रेणीतील लोकांना भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.

अर्ज शुल्क
▪️SC/ST/PWD: 175 रुपये
▪️सर्वसाधारण प्रवर्ग - 850 रुपये

पगार
बेसिक सॅलरी 36,000/- 
(पण भत्ते, एचआरए आणि इतर भत्ते धरून सुरुवातीचा इन हॅन्ड पगार तब्बल 52,000 ते 55,000 मिळतो.)

अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया..!
१) सर्वात आधी IBPS च्या अधिकृत पेजला www.ibps.in ला भेट द्या  
२) होमपेज वरील CRP PO/MT वर क्लीक करा
३) आता अधिसूचना देणाऱ्या लिंकवर क्लिक करा- म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर्स/व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी-XIII CRP PO/MT-XIII साठी सामान्य भरती 
४) प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा-https://ibpsonline.ibps.in/crppo13jun23/
५) आता 'New Registration वर क्लीक करा
६) सर्व माहिती भरा आणि पेजच्या खाली सेव्ह आणि नेक्स्ट बटणावर क्लिक करा
७) अर्जाच्या या विभागात आवश्यक तपशीलानुसार छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा
८) आता तुमचे वैयक्तिक डिटेल्स, शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव भरा. त्यानंतर, तुम्हाला सहभागी बँकांची प्राधान्य यादी भरावी लागेल.
९) तुमचा अर्ज पुन्हा एकदा चेक करा आणि काही चुका आढळल्यास एडिट करा.
१०) ऑनलाइन मोड, क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/नेट बँकिंग इत्यादीद्वारे अर्ज फी भरा.
११) आता सबमिट बटणावर क्लिक करा