मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची वलनी येथे भेट: विविध समस्यांचे निवेदन


सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके

नागभिड : मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य यांनी वलनी ता.नागभीड येथे भेट दिली असता वलनी येथील समस्यांचे निवेदन देण्यात आले प्रमुखांने गोसावी भटक्या जमातीचे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अंतर्गत मंजुर असलेल्या घरकुलांना मंजुरी देणे,स्थायी पट्टे देणे,वलनी मेंढा येथे ४ हायमाक्स लाईट मंजुर करणे स्मशानभुमीत सौंदर्यीकरण व काॅक्रेटीकरण करणे हनुमान मंदिर वलनी चौकासमोरील जागेत काॅक्रेटीकरण करणे व अनेक विकासकामांचे निवेदन मा.होमदेव मेश्राम माजी भाजप तालुका अध्यक्ष नागभीड यांनी दिलेत.अनिल बोरकर सरपंच वलनी,प्रकाश सुरपाम उपसरपंच वलनी,अमोल बावनकर सरपंच येनोली माल, रविंद्र निकुरे सरपंच सावरगांव,पंचम खोब्रागडे,भाष्कर राऊत,विलास घोनमोडे वाढोणा,पिंकी बारड,प्रेमदास राठोड, राजेंद्र राठोड,देवानंद नरुके,प्रगती आशिष खोब्रागडे, पुनगीर पवार,लखन पवार, पटवारी ठाकरे,पटवारी बोरकर, भोजराज मेश्राम,अनिकेत झोडे, विनोद पर्वते,भागवत नरुके,उमेश नरुके,मालाबाई बारड, दिलदार बारड,सहादेव चव्हान,व अनेक कार्यकर्ते नागरीक उपस्थित होते.

बोरी येथे जागतिक दिव्यांग दिनी शिवसेनेच्या वतीने चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सह्याद्री चौफेर | चेतन पवार 

दारव्हा : तालुक्यातील बोरी अरब (चंद्रशेखर) येथे दिनांक 3/12/2022 रोज शनिवारला सकाळी 10.30 वाजता बोरी तील वार्ड क्रमांक एक मधील आठवडी बाजार येथील अंगणवाडी मध्ये चिमुकल्या बालकांना जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना बुक पेन्सिल चे वाटप करण्यात आले यावेळी बोरी चे माजी सरपंच ग्रामपंचायत अशोकराव ठाकरे, पी. एस. गिरी सर, गिरीजानंद कळंबे (युवासेना उपजिल्हाप्रमुख), आशिष सावंकार, पुंडलिक भुरे ( ठेकेदार) प्रा. मोनू सर, राजेश गुप्ता, राजेश गावंडे गुप्ता काका, सुमित हिवरकर, अविनाश क्षिरसागर, वैभव डाके, ऋषिकेश पावडे, तुषार शेंद्रे, सागर काकडे, सागर तांगडे, मंगेश नागपुरे, निलेश कराडे, प्रसाद बल्लाके, आदी शिवसेना-युवा सेना विद्यार्थी सेनेचे-पदाधिकारी उपस्थित होती. या कार्यक्रमाचे आयोजन बोरी शिवसेना युवा सेना विद्यार्थी सेना बोरी (चंद्रशेखर) यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त केले.

यावेळी उपस्थित मान्यवर तथा ग्रामस्थ व अंगणवाडी शिक्षिका तथा सेविका.. उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाचे संचालन अंगणवाडी शिक्षिका निलिमा कदम यांनी केले तर,सौ. प्रीती निकोशे तथा सौ. कांचन हरिश्चंद्र शेंद्रे यांनी परिश्रम घेतले.

तिसऱ्या दिवशी मागण्यावर तोडगा निघाला: खासदार बाळू धानोरकरांच्या मध्यस्तीने सुटले आज काँग्रेसचे आमरण उपोषण

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील विविध समस्या ह्या प्रशासकीय स्तरावर मार्गी लावण्यासाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, माजी पं स सदस्य अरविंद वखनोर उपसरपंच प्रफुल विखणकर व मिलिंद मांगूळ यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंताच्या भजनाने अनोखे बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते.

दोन दिवस स्थानिक प्रशासन उपोषणाकडे फिरकले नाहीत. मात्र, तिसऱ्या दिवशी खासदार बाळू धानोरकर यांच्या मदतीने सर्व मागण्यावर तोडगा निघाला. यावेळी तहसीलदार व मान्यवराच्या हस्ते उपोषणकर्ते मारोती गौरकार यांना लिंबू पाणी पाजून उपोषण सोडण्यात आले. त्यानंतर राष्ट्रसंताच्या भजनाने उपोषणाची सांगता झाली, दरम्यान राष्ट्रसंताच्या भाजनांनी सभा मंडप गाजला हे विशेष!
तालुक्यातील शेतकऱ्यासह सामान्य नागरिकांच्या विविध समस्या शासकीय स्तरावर प्रलंबित असताना प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या या प्रश्नाकडे डोळेझाक करते, हा सर्वसामान्यांचा अनुभव! असाच काहीसा अनुभव राजकीय पक्षांना सुद्धा येत आहे. त्यामुळे तालुक्याला विविध प्रश्नांनी ग्रासले असल्याने काँग्रेस पक्षातर्फे वारंवार निवेदन, विनंती करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा ईशारा दिला होता. यात विजेचा प्रश्न, सिंचन प्रश्न, ग्रामीण रस्त्याची दयनीय अवस्था, अतिवृष्टी अनुदान, महात्मा ज्योतिबा फुले प्रोत्साहन अनुदान, पिक विमा, वन्य प्राण्याचा धुडगूस आदी मागण्या मान्य होत नसल्याने त्यांनी १ डिसेंबर पासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते.
    
दोन दिवस प्रशासनाने या उपोषणाकडे डोळेझाक केली. अखेर खासदार बाळू धानोरकर यांनी या उपोषणाची दखल घेत आज ३ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान, उपोषण मंडपाला भेट दिली. भेट देतात सर्वच विभागातील अधिकाऱ्यांचा फौज फाटा तात्काळ दाखल झाला. खासदार बाळू धानोरकर यांनी सर्वच विभागाच्या स्थानिक व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ प्रश्न सोडविण्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. यावेळी तहसीलदार दिपक पुंडे, वीज वितरण चे उपकार्यकारी अभियंता पाटील, तालुका कृषी अधिकारी सुनील निकाळजे, वन अधिकारी शंकर हटकर सह आदी अधिकारी उपस्थित होते.
   
मारोती गौरकार, प्रफुल विखणकर व मिलिंद पांगुळ यांच्या आमरण उपोषणाला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई खंडाळकर, शंकरराव मडावी, सह आदी शेतकरी सहभागी झाले होते.
या प्रसंगी उपोषणकर्ते यांनी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा दिल्या बद्दल व शेतकरी नागरिकांचे आभार मानले. यावेळी प्रमोद वासेकर, संजय खाडे, वंदनाताई आवारी, टिकाराम कोंगरे, माजी सभापती कुत्तरमारे, शरीफ कुुरेशी, नंदू आसूटकर, शकुंतला वैद्य, सध्याताई खांदलकर, वसंत जिनिंग संचालक गजानन खापणे, वसंतराव आसूटकर, अशोक धोबे, संतोष थेरे, सुदर्शन टेकाम, समीर भाई, यादवराव पांडे, यादवराव काळे, आदी उपस्थित होते.


आजचा आमचा सुधारणावाद म्हणजे केवळ डागडुग्गी आहे - गीत घोष

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

यवतमाळ : महात्मा जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्व २०२२ यवतमाळ येथे सुरु आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात अखिल भारतीय आदिवासी संवैधानिक हक्क परिषद द्वारा आदिवासीच्या राजकारणात इतर राजकीय पक्षाची भूमिका या विषयावर प्रसिद्ध आदिवासी साहित्यिक तथा विचारवंत गीत घोष यांनी अत्यंत परखड विचार मांडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेविका सुवर्णा वरखडे होत्या. याशिवाय विचारपिठावर राजाभाऊ चांदेकर, सुरेश कनाके, शैलेश गाडेकर, अशोक मसराम, चंद्रशेखर ठाकरे, सुनंदा मडावी, डॉ विनोद डवले, मा. विनायक कुमरे,मा. शालिनी पेटेकर,मा. रमेश मडावी आदी उपस्थित होते.

सत्ताधारी होण्यापेक्षा सत्तेत बसण्यासाठीच आजचे नेते हपापलेले आहेत. महापुरुषांनी सांगितलेला परिवर्तनवाद सोडून सुधारणावाद स्वीकारला आहे. त्यामुळे आमचा सगळ्या क्षेत्रात होत आहे, झाला आहे. सत्तेचे अस्तित्व आदिवासीच्या अस्तिवाबरोबरच आहे कारण आदिवासी या देशाचा मूलनिवासी आहे, विसरून चालणार नाही. एकेकाळी राज्यकर्ता असणारे आम्ही आमचे राज्य टिकवून शकलो नाही. आमचे राजे समजाभिमुख असले तरी मुत्सदी नव्हते. त्यामुळे त्यांना राजेपद गमावून मंडलिकत्व स्वीकारावे लागले. आजचा आमचा सुधारणावाद म्हणजे केवळ डागडुग्गी आहे. आमच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करण्याचे कार्य फुले शाहू आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून १९५० सालीच केले.

१९५२ च्या सार्वत्रिक लोकसभेत आमच्या समाजाचे लोकप्रतिनिधी असूनही त्यांना समाजाच्या जाणीव नव्हती आणि आदिवासीच्या समस्या सोडवण्यात त्यांना अपयश आले आहे. त्यामुळे आजही आमच्या समस्या कायम आहेत, असे घोष यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा तिरणकर यांनी केले संचालन आणि आभार प्रदर्शन एम के कोडापे यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय प्रल्हाद सिडाम यांनी करून दिला. 

बोथली ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तापले वातावरण..सरपंच पदासाठी 7 उमेदवार रिंगणात

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक २०२२ शेवटच्या दिवशी बोथली ग्रामपंचायत करिता सरपंच पदाकरीता एकूण ०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर सदस्य पदाकरीता ३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
बोथली हे गाव लोकनेते राज्यमंत्री स्वर्गीय वामनराव पाटिल गड्डमवार यांचे मूळ गाव आहे. त्यामुळे बोथली ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. सरपंच पदासाठी थेट निवडणूक असताना सर्वसाधारण गटासाठी हे आरक्षण असल्याने सर्वच पक्षामध्ये अधिकच चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोण कोणावर भारी पडतो हे येणाऱ्या १८ डिसेंबरला होणार्‍या निवडणुकीत व २० डिसेंबरला पार पडणाऱ्या निकालानंतर कळणार आहे.