मारेगाव पोलिसांनी पकडली अवैध दारू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील कानडा येथे दारूची अवैध विक्री होत असल्याने येथील महिलामध्ये संतापाची लाट आहे. मागील वर्षी देखील येथील शेकडो महिलांनी एकत्रित येत दारू पकडून या बाबत पोलिसांना अवगत केले, गावातील दारू बंद करण्यात यावी अशी मौखिक तक्रार पोलिसांना असताना मात्र, गावातीलच 'फाले' नामक हा पोलिसांच्या आणि गावातील नागरिकांच्या, पदाधिकारी यांच्या नाकावर टिचून अवैध दारूची विक्री गाव शिवारात करित असल्यामुळे आज (ता.5 फेब्रु.) रोज मंगळवारला सकाळी 8 वाजताच्या दरम्यान, गावातील महिलांनी 'तो' दारू विकत असल्याची माहिती देत त्याची पोलिसांनी अवैध दारू पकडली. यात 180 मिली, देशी दारूचे 76 पव्वे,90 मिली देशीचे 86 पव्वे, तर विदेशी 180 मिली एम डी नं -1चे सात निपा असा एकूण 10,570 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राजू टेकाम यांनी केली. यावेळी पंच म्हणून गावातील महिला होत्या. ह्या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध धंदे उजागर होत असल्याने आता असले धंदे पुन्हा फोफावणार नाही, याकडे नव्या साहेबांना विशेष लक्ष घालावे लागणार आहे.

अखेर क्रिडा संकुलाचा मार्ग मोकळा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील रखडलेल्या क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी मारेगाव येथे येऊन जागेची पाहणी केली. तसेच त्वरित काम सुरू करण्याच्या संदर्भात हालचाली सुद्धा सुरू केल्याने अखेर मारेगावकरांनी मोकळा श्वास सोडलेला आहे.

मारेगाव तालुक्यातील क्रीडा संकुलाचा प्रश्न अधांतरीच होता. मागील अनेक वर्षापासून येथील क्रीडा संकुल काही कारणामुळे प्रलंबित होते. यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळ्या अधिकारी पदाधिकाऱ्यांमार्फत तसेच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे मार्फत प्रयत्न करण्यात आले.

टाकळखेडा रोडवर नवीन वसतिगृहाचे बाजूला प्रस्तावित असलेल्या तालुका क्रीडा संकुलासाठी 10 एकरची मागणी केली होती. त्यापैकी 5 एकर जागा मंजूर झाली आहे. त्यासाठी एकूण रक्कम 5 कोटी मंजूर झाले आहे. आणि या क्रीडा संकुलाचे त्वरित काम करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी दिले.अखेर क्रीडा संकुलाचा निधी मंजूर झाला असून जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी मारेगाव तालुक्यातील क्रीडा संकुलाची पाहणी केली.

यावेळी तालुका क्रीडा अधिकारी चैताली लोखंडे, मनीष डोळसकर, तालुका क्रीडा संयोजक बंडू काकडे,धनराज ठेपाले उपस्थित होते.

संजय खाडे यांचा पुणे येथे सन्मान

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : काँग्रेस नेते तथा कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांचा पुणे येथे सामाजिक कार्यातील योगदानासाठी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

रविवार दिनांक 3 मार्च रोजी यशदा येथील सभागृहात हा सोहळा पार पडला. पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते त्यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी मानद डॉक्टरेट देऊन गौरव करण्यात आले. ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
श्री. खाडे हे जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष असून गेल्या अनेक वर्षांपासून ते काँग्रेस च्या माध्यमातून कामगार चळवळ, कृषी चळवळ इत्यादींशी जुळलेले आहेत. त्यांच्या विविध सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांचा पुण्यात सन्मान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचे सर्वत्र अभिनंदनासह कौतुक होत आहे.

'साहेब' चुगलीखोरांपासून सावधन!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुका शांतता प्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, या तालुक्यात गेल्या काही काळापासून शांत वातावरण गढूळ कसं करता येइल किंबहुना हे चुगलीखोर आपल्या चौफेर घिरट्या घालण्याची शक्यता आहे. 'सद रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रिद वाक्याप्रमाणे अंमलाबजावणीची अपेक्षा शांतता प्रिय जनतेची आहे.

आर्थिक,तथा राजकीय फायदा लाटण्यासाठी चमचेगीर नव्या ठाणेदाराशी मैत्रीचा हातपुढे करतात. हा त्याचा पूर्व इतिहास असून हातमिळवणी नंतर ते शिकार शोध सुरु करतात. त्यामुळे चरित्र्यवान व्यक्तीही या चमचेगिरीला बळी पडत असल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. वर्चस्वाच्या लढाईने तालुक्याचे वातावरण गरम आहे. वचपे काढण्यासाठी ते आपल्याशी संबंध प्रस्थापित करण्याची शक्यता असून प्रस्थापित झालेल्या संबंधाचा त्यांचे कडून दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सच्चाई कृतिम संकटात सापडेल अशी भीती सामान्यात आहे.

तालुक्यात विविध राजकीय पक्ष अस्तित्वात असून वर्चस्वाच्या लढाईत कृत्रिम गुन्हे नोंदी साठी काही जण माहीर आहेत. यासाठी आपला वापर कसा करून घ्यायचा ते यामध्ये प्रशिक्षित आहेत. त्यामुळे ठोस निर्णय घेताना चमचेगिरांपासून सावधगिरी बाळगण्याचे आपल्या समोरील आव्हान आहे. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सामान्य माणूस आपल्यामार्फत निपक्ष,निर्भय सुरक्षा मिळेल अशा मदतीच्या रास्त अपेक्षा बाळगून आहेत.

भयमुक्त व शांततामय वातावरणासाठी चमचेगीरांच्या कटकारवाईवर बारीक लक्ष ठेवण्याची आवश्यकता असून, हे आव्हान आपण कसे पेलणार याकडे नागरिकांच्या नजरा खिळल्या आहे.

आज मारेगावत राष्ट्रीय सुरक्षा दीन

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

मारेगाव : भारत सरकारच्या आदेशान्वये सर्व खाजगी व सरकारी विद्युत क्षेत्रातील लाईनमनच्या सेवेची दखल घेऊन त्यांच्या कामाप्रती संवेदना व्यक्त करण्याकरिता आज 4 मार्च हा दिवस 'लाईनमन दिवस' मानून राष्ट्रीय सुरक्षा दिन रॅली मारेगावात काढण्यात आली. 

मारेगाव महावितरण कंपनी च्या वतीने शहराच्या मुख्य रस्त्याने रॅली सकाळी ठिक 10.00 वाजता निघाली. दरम्यान, शहरातून सुरक्षिततेची माहिती देऊन 11.15 ला परत ही रॅली आली. या रॅली मध्ये अधिकारी कर्मचारी, महिला कर्मचारी सहभागी झाले होते.

या अनुषंगाने मारेगाव उपविभागामार्फत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आज सायंकाळी 7 वाजता उपविभागीय कार्यालय महावितरण मारेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.अशी माहिती उपअभियंता शैलेशकुमार पाटील यांनी दिली.