मारेगाव : वृक्ष लागवड मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाची असून वृक्षारोपण आपल्या काळाजी गरज आहे. पाऊस झाडे-वनस्पतींमुळे होतो. ज्या ठिकाणी झाडे-झाडांची कमतरता असते, तिथे पाऊस कमी पडतो. त्यामुळे वृक्षाचे महत्व जाणून युगसाक्षी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, टाकळखेडा यांच्या विद्यमाने तथा कान्हाळगांव ग्रामवाशियांच्या हस्ते कान्हाळगांव ते मारेगाव रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय जिवने, ग्रामवासी सूर्यकांत चिकटे, रवि वनकर,गणेश नैताम,भारत मडावी,हर्षद चिकटे,बबलू गेडाम, संजय गेडाम, विठ्ठल गेडाम, प्रफुल चिकटे,प्रकाश वनकर, दिनेश कामटकर,प्रदीप वनकर, मारोती शेंडे, सूरज शेंडे, विपीन चिकटे, आकाश दुर्योधन,रुपेश बदखल, गौरव चिकटे,आदींची उपस्थिती होती.
झाडे व रोपांच्या कमतरतेमुळे आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात, कारण झाडांचा थेट परिणाम पर्यावरणावर होतो. वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे मत अध्यक्ष जिवने यांनी व्यक्त केले.