युगसाक्षी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे अंतर्गत वृक्षारोपण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वृक्ष लागवड मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाची असून वृक्षारोपण आपल्या काळाजी गरज आहे. पाऊस झाडे-वनस्पतींमुळे होतो. ज्या ठिकाणी झाडे-झाडांची कमतरता असते, तिथे पाऊस कमी पडतो. त्यामुळे वृक्षाचे महत्व जाणून युगसाक्षी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, टाकळखेडा यांच्या विद्यमाने तथा कान्हाळगांव ग्रामवाशियांच्या हस्ते कान्हाळगांव ते मारेगाव रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय जिवने, ग्रामवासी सूर्यकांत चिकटे, रवि वनकर,गणेश नैताम,भारत मडावी,हर्षद चिकटे,बबलू गेडाम, संजय गेडाम, विठ्ठल गेडाम, प्रफुल चिकटे,प्रकाश वनकर, दिनेश कामटकर,प्रदीप वनकर, मारोती शेंडे, सूरज शेंडे, विपीन चिकटे, आकाश दुर्योधन,रुपेश बदखल, गौरव चिकटे,आदींची उपस्थिती होती.

झाडे व रोपांच्या कमतरतेमुळे आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात, कारण झाडांचा थेट परिणाम पर्यावरणावर होतो. वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे मत अध्यक्ष जिवने यांनी व्यक्त केले.

रस्त्यासाठी लाखापूर ग्रामस्थांचे श्रमदान

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगांव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या लाखापूर गावातील रस्ते, तसेच लाखापूरहून देवी फाट्या कडे जाणारा रस्ता आणि रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली काटेरी झाडे, या रस्त्यांवरून गावाकऱ्यांना आणि पायदळ चालणेदेखील शक्य होत नसल्याने अखेर गावातील तरुण आणि नवं युवकांनी आज बुधवार (ता.6) ला पूर्ण दिवस आपला मजुरी शेतातील काम बंद ठेऊन रस्त्यावर उतरून श्रमदानातून हे रस्ते चालण्यायोग्य तयार केले.

संबंधित विभाग व गट ग्रामपंचायतकडून या रस्त्यांची कामे दुर्लक्षित असून, ही कामे करण्यात यावी अशी मौखिक मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येत असून यामध्ये फक्त दुर्लक्षितपणा दिसून येत आहे. लाखापूर वरुन बाहेर जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले काटेरी झाडे रस्त्यावर डोलत होती, यामुळे या पावसाळ्यात प्रवास करताना तसेच गावातील रस्ते पाणी रस्त्यावरून वाहून न जाता रस्त्यावरून साचत होते. यामुळे या रस्त्यांना चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, गावातील रस्त्यांची दैना झाली आहे. या रस्त्यावर सर्व दगड गोटे वर आले असून, रस्त्यावरून नागरिकांना भांदेवाडा तिर्थक्षेत्र व पायदळदेखील चालणे फारच कठीण झाले आहे. यामुळे या मार्गांवर अपघात होण्याची शक्यता बळावली जात होती. किंबहुना किरकोळ अपघात झाल्याचे येथील नागरिकांनी "सह्याद्री चौफेर" ला बोलताना सांगितले आहे.

या संदर्भात येथील स्थानिक जेष्ठ नागरिक तथा युवकांनी झोपलेल्या स्थानिक प्रशासनाला तसेच संबंधित विभागाला जागे करण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून गावातील रस्ते व लाखापूर ते वनोजा देवी मार्ग झूडूपाने वेढले होते त्याला येथील तरुणांनी बुधवारला सकाळी आठ वाजेपासून दुपार पर्यंत येथील रस्त्यावर मुरूम, माती व फवारणीचे काम श्रमदानातून पूर्ण केले. दरम्यान,पावसाच्या रिपरिप मुळे पूर्ण दिवस भर काम होऊ शकले नाही, त्यामुळे श्रमदानातून होणारे काम बंद ठेवावे लागले असे अशी माहिती नागरिकांनी दिली. सदर रस्त्यावरील कचऱ्यावर फवारणी, दगड गोटे खड्डे त्यावर माती, मुरूम टाकून रस्ता सुस्थितीत, चालण्याजोगा करण्यात आला. यात गावातील असंख्य तरुणांनी सहभाग घेतला होता.

एवढी दिरंगाई का? आणि कशासाठी?; गोंड बुरांडा येथील निवड झालेल्या आशा वर्करला नियुक्तीची प्रतीक्षा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गोंड बुरांडा येथील सीमा सुरज गमे यांची शासन निर्णयानुसार आशा वर्कर म्हणून निवड करण्यात आली. मात्र,गेली पाच ते सहा महिने लोटली तरी देखील संबंधित विभागाने त्या निवड झालेल्या आशा वर्करला कामावर घेत नसल्याने एवढी दिरंगाई का? आणि कशासाठी? असा प्रश्न सौ सीमा गमे ह्या उमेदवाराने प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केला.

गोंडबुरांडा ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये ठराव क्र.2 च्या दि. 5/6/2023 ला घेण्यात आलेल्या मासिक सभे मध्ये दोन अर्ज प्राप्त झाले होते. त्या प्राप्त झालेल्या दोन अर्जा पैकी ठरवानुसार एकमताने सीमा सूरज गमे यांची निवड करण्यात आली. ठरवानुसार सूचक व अनुमोदक ह्या मासिक सभेचे प्रस्थापक होते. ह्या बाबी पुर्ण केल्या असताना संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणापासून दूर कां ठेवण्यात आले. असा आरोप केला आहे.

गोंड बुरांडा ग्रामपंचायत सचिव यांनी नियुक्ती पत्र न देता अचानक आशा निवड बाबतचा वरील नमूद ठराव रद्द करण्याबाबत पत्रक जारी केल्याने निवड झालेल्या सीमा गमे यांनी याबाबत निवड का? रद्द करण्यात आली, याबाबत लेखी अर्ज स्वरूपात माहिती दि.20/08/2023 ला  मागितली असता त्याचे आज रोजीपर्यंत माहिती पुरवली नाही,याबाबत गटविकास अधिकारी पं स व मुख्य अधिकारी जि प यांना प्रतिलिपी देण्यात आल्या.त्यानंतर त्यांना अशा आशयाचे स्मरणपत्र दिलेल्या 21/082023 रोजी च्यापत्रा बाबत 29 /3/2023 ला देण्यात आले. मात्र, अजूनही या प्रकरणात ग्रामपंचायत सचिव यावर कोणतेही सकारात्मक पाऊल उचलण्यात नसल्यामुळे या संदर्भात त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्यासाठी ग्रामपंचायत, तालुका आरोग्य विभाग यांना विचारपूस केली असता कोणीही बोलायला तयार नसून त्यांची नियुक्ती जाणूनबुजून देण्यास दिरंगाई केली जात आहे, अशी निवड झालेल्या उमेदवाराची तक्रार आहे.

शासनाच्या अटी आणि शर्ती नुसार त्यांची निवड योग्य असताना सुद्धा नियुक्ती पत्र देण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विलंब व टाळाटाळ का?करीत आहे. ह्या आशा वर्कर निवड प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. तरीही गोंड बुरांडा ग्रामपंचायत सचिवाकडून कामावर रुजू करून घेण्यासाठी दिरंगाई होत असल्याने नेमके यांना कोण पाठीशी घालीत आहे तर नाही ना! असा सवालही उपस्थित होत आहे.

बंद खाणीत आढळले अज्ञात तरुण महिलेचे प्रेत


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या मोहदा खाण परिसरात आज मंगळवार ला सकाळी एका बंद पडलेल्या खाणीत एका अज्ञात तरुणीचे प्रेत आढळून आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वणी तालुक्यातील मोहदा येथील बंद पडलेल्या खाणीत एका अज्ञात महिलेचे प्रेत आज सकाळ सात वाजता च्या सुमारास आढळून आले. ही बाब निदर्शनास येताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, तोबा घटनेच्या ठिकाणी गर्दी जमली होती. घटनेची माहिती शिरपूर पोलीस स्टेशन ला देण्यात आली, घटनेचे गंभीर बाब लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. 

सदर मृतक माहिलेचा मृतदेह खाणीतून पोलीस व गावातील नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला असून मृतकाची ओळख पाठवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. 

जल्लोष,भक्तिमय वातावरणात गायिका शहनाज अख्तरासह थिरकली संपूर्ण वणीकर नगरी


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : काल सोमवार 4 सप्टेंबर ला प्रतिष्ठित उद्योजक तथा जनसेवक विजय चोरडिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात "मुझे चढ गया भगवा रंग" फेम प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचा वणीमध्ये पहिल्यांदाच सदाबहार भक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत भजनसंध्याचे आयोजन करण्यात आले होते. हा अविस्मरणीय जल्लोष संपूर्ण आनंददायी, भक्तिमय क्षण वणीकरांनी आपापल्या पॉकेट कॅमेऱ्यात टिपला आहे.
भजन गायिका शहनाज अख्तर यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या जन्मदिन निमित्ताने अख्तर यांच्या गाजलेले भजन त्यांच्याच सुमधुर आवाजातून प्रेक्षकांना थेट थिरकायला मिळाली. या भजनसंध्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवार व हजारोंच्या संख्येने भजनप्रेमींची उपस्थिती पाहायला मिळाली होती, दरम्यान रामभक्तांनी या भजन संध्याचा भक्तीमय वातावरणात उत्स्फूर्तपणे आनंद घेत जल्लोष साजरा केला. 
शहरातील प्रतिष्ठित विजय चोरडिया यांच्या वाढदिवस निमित्ताने सतत सहा दिवसाचे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असताना मारेगाव, कायर वणी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला वणी उपविभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास दोन हजाराच्या वर नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. आज सोमवार (ता.4) सप्टेंबर ला सायंकाळी येथील शासकीय मैदान, पाण्याच्या टाकी जवळ भजन गायिका शहनाज अख्तर यांचा सदाबहार भक्ती गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रावणात असंख्य रामभक्तांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. 
वणी विधानसभा क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्याचा वारसा जपत जनसेवक विजयबाबू चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यांच्या अभिष्टचिंतन निमित्ताने श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती व विजय चोरडिया मित्र परिवाराच्या विद्यमाने मा.विजयबाबू चोरडिया भाजपा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांच्या सुमधुर भक्ती गीतांचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी येथील शासकीय मैदान, पाण्याच्या टाकी जवळ आयोजन करण्यात आला.
या करायक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवून भजन संध्याचा आनंद घेत वाढदिवसाचा जल्लोष साजरा केला, यावेळी अनेकांनी सामाजिक कार्यकर्ता विजयबाबू यांना निरोगी,दीर्घायुष्याच्या शुभेच्छा सह प्रार्थना केल्या. श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती, बजरंग दल व विश्वहिंदू परिषद तसेच विजय चोरडिया मित्र परिवार यांनी उपस्थित सर्व जनतेचे आभार मानले.