शेतकऱ्यांना सरसकट विमा नुकसान भरपाई देण्यात यावी-पत्रकार परिषदेतून मागणी


सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामणी : 'पंतप्रधान पीक विमा योजना' ही शेतकऱ्यांच्या हिताची नसून केंद्र सरकार या योजनेला 'विमा कंपनी बचाव योजना' या धर्तीवर राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. तुम भी जियो और हमे भी जिने दो अशी केंद्र सरकारची भूमिका असून शेतकऱ्यांना हरताळ फसण्याचा प्रयत्न या योजनेतून करण्यात येत आहे. पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होत नसून याचा सर्वात जास्त फायदा विमा कंपनीला होत आहे असा आरोप सुध्दा पत्रकार परिषदेतून करण्यात आला. पीक विमा योजनेत झरी जामणी तालुक्यातील ८ हजार ७४ शेतकऱ्यांनी विमा काढला त्यापैकी १ हजार ६८ शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहेत. या योजनेत विमा कंपनीने कापूस व सोयाबीन साठी ४२ हजार २०० रुपये इतकी विम्याची रक्कम संरक्षित केली आहे. ती रक्कम सरसकट सर्व शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई देण्यात यावी.

सततच्या अतिवृष्टीमुळे परिसरातील कापूस, सोयाबीन, तुरीसह सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. आता शुक्रवार पासून विमा पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करीत आहे. काही शेतकऱ्यांना एक हजार ते तीन हजार रुपयापर्यंतची तुटपुंजी भरपाई विमा कंपनी कडून शनिवारी (ता.३१ डिसेंबर) खात्यात जमा झाली आहे. या प्रकारे विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टाच केली जात आहे. पिकाच्या संरक्षण विमा रकमेचा भरणा केला तोही मिळाला नाही. असा आरोप पत्रकार परिषदेतून संदीप बुर्रेवार, निलेश येल्टिवार, राहुल धांडेकर व हरिदास गुर्जलवार यांनी पीक विमा कंपनीचा व केंद्र सरकारचा पत्रकार परिषदेतून निषेध केला आहे.

रौप्य महोत्सव: श्री दर्शन भारती विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : आज यशस्वीरित्या कार्यरत असलेल्या श्री दर्शन भारती विद्यालयने नुकतेच रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले. रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर या रौप्य महोत्सवी उपस्थित होते. या सोहळ्याला अध्यक्षस्थानी मा श्री अंकुशजी रामगडे (अध्यक्ष श्री द.भा.वि. गोंडबुरांडा) हे होते, उदघाटक मा श्री अनुपजी कटारिया, तर प्रमुख अतिथी मा श्री आनंदजी ठाकरे (उपाध्यक्ष श्री द.भा.वि. गोंड बुरांडा) यांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी विद्यालयाचे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा प्रथम क्रमांक प्राप्त स्थापनेपासून ते आज रोजी पर्यंत च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आले. दरम्यान, संस्थेतर्फे सुरज गमे यांचा गुणगौरव करण्यात आला आहे. तसेच माजी विद्यार्थी महेंद्र पुंडलिकराव सयाम, धिरज उत्तमराव गमे, अतुल विलासराव बोन्धरे, विद्या रतन मानकर, स्वप्नील रविंद्रजी त्रिवेदी, संध्या विठ्ठलराव गेडाम, सुरेंद्र मोहनराव गेडाम, शीतल विठ्ठलराव खोके, अर्चना विठ्ठलराव नागरकर, कल्पना उत्तमराव देऊळकर, आशिष भैय्याजी राजुरकर, अक्षय सुरेशजी बोन्दरे, धनंजय मनोहरराव गेडाम, अनामिका दिनकरजी उईके, अश्विनी हनुमान पंधरे, प्राजक्ता प्रल्हादराव राजूरकर, अनिकेत अशोकराव देऊळकर, जया अरुणजी लांबट, आचल सुरेशजी दानखेडे, पूनम रमेशजी सपाट, श्रुती मनोहरराव सपाट, स्वेता संतोषराव गमे यांचाही या रौप्य महोत्सव व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यशाळेत समावेश होता, अशी माहिती संस्थेने दिली. शनिवार दि.31-12-2022 रोजी झालेल्या कार्यक्रमात रौप्यमहोत्सवी वर्षाच्या उपक्रमांना प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला मारेगाव तालुक्यातील आजी माजी विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी माजी विद्यार्थी श्री सुरज गमे (कंत्राटी यंत्रचालक) त्यांनी संस्थेचे कौतुक केले व आभार मानले. संस्थेच्या आजी माजी रौप्य महोत्सव व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यशाळाचे आवर्जून लाभ घ्यावा, असे गमे बोलतांना म्हणाले. संस्थेचे अध्यक्ष अंकुश पाटील यांनी रौप्य महोत्सवी वर्षात व नववर्षाभिनंदन विद्यार्थी मान्यवर तसेच उपस्थितीतांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला यशस्वीकरण्यासाठी श्री दर्शन भारती विद्यालयातील मुख्याध्यापक,शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी अथक मेहनत घेतली.

विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार    

सावली : स्थानिक विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे दिनांक २९, ३० आणि ३१डिसेंबर २०२२ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला.
        
वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मान.अनिलभाऊ स्वामी उपाध्यक्ष,भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बौद्धिक आणि शारीरिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शालेय स्तरावर करणे महत्त्वाचे असते असे त्यांनी उद्घाटन पर मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय राजाबाळ पाटील संगीडवार, सचिव भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ.विजयभाऊ शेंडे,अंकेक्षक श्री सुनीलजी बल्लमवार, सदस्य रितेशजी जिडगलवार, सदस्य रामभाऊजी येनुगवार, नगरसेवक गुणवंत सुरमवार, प्रीतम गेडाम, साधनाताई वाढई, ज्योतीताई शिंदे, अंजलीताई देवगडे, सीमाताई संतोषवार, पर्यवेक्षक राऊत सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रवींद्र मुप्पावार सर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.               
तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धा, बचाव स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा अंताक्षरी स्पर्धा कबड्डी स्पर्धा, रनिंग स्पर्धा, गोळा फेक स्पर्धा, अशा विविध मैदानी आणि बौद्धिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर स्नेहसंमेलनात विद्यालयाच्या स्काऊट व गाईड च्या पथकाने सहाय्यक शिक्षक जीवतोडे सर आणि सहाय्यक शिक्षिका उर्मिला बारेकर यांच्या मार्गदर्शनात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
         
दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रामध्ये सायबर क्राईम, पोस्को ॲक्ट, आणि स्पर्धा परीक्षा यावर सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय आशिषजी बोरकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आली.         
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय संदीप भाऊ गड्डमवार,अध्यक्ष भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली हे होते. शालेय कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुद्धा तेवढ्याच उत्साहाने सहभाग नोंदवावा त्यामुळे विद्यार्थ्याच्या उत्साहात पुन्हा भर पडेल असे ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते, प्रमुख पाहुणे म्हणून माननीय राजाबाळ पाटील संगीडवार सचिव भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली, कार्याध्यक्ष माननीय सौ. रमाताई गड्डमवार,अंकेक्षक माननीय सुनीलजी बल्लमवार, शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद्र मुप्पावार, पर्यवेक्षक राऊत सर उपस्थित होते. विविध स्पर्धेमध्ये क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी तर्फे शौर्य दिन साजरा

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : शहरातील धम्म राजीका बुद्ध विहार येथे 1 जानेवारी भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. अविनाश घरडे हे होते. तर बक्षिक वितरक म्हणुन ठाणेदार राजेश पुरी तर, प्रमुख अतिथी भारतीय बौद्ध महासभाचे तालुका अध्यक्ष धर्मराज सातपुते, समता सैनिक दलाचे तालुका संघटक मार्शल प्रकाश ताकसांडे, भालशंकर सर उपस्थित होते.
आज रविवारला सकाळी 9.30 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. व सकाळी 10.30 वाजता धम्मराजीका बुद्ध विहार येथे सामूहिक बुद्ध वंदना. तसेच सकाळी 11.30 वाजता आंबेडकर मार्चचे प्रणेते तथा प्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक व लेखक रमेशजी जीवने यवतमाळ यांनी वर्तमान, राजकीय, लोकशाही, भारतीय राज्यघटना व धम्मक्रांती या विषयावर जाहीर व्याख्यान झाले. या अनुषंगाने काढण्यात आलेल्या रॅली ने शहरवासियांचे लक्ष वेधले. 4 डिसेंबर 2022 रोजी येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात घेण्यात आलेल्या 'संविधान गौरव दिन' परीक्षेचा निकाल आज दि.1 जानेवारी 2023 ला जाहीर करण्यात आला. यात 'अ' गटातून कु.तनुष्का वेणुशाम बाभळे तर 'ब' गटातून कु. खुशी प्रशांत सपाट या दोन्ही विद्यार्थ्यांनी तालुक्यातून प्रथम बहुमान पटकाविला.
तालुक्यातील एकुण 451 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेत 'अ' गटातून जि.प.उ.प्रा. शाळा कोसारा येथील विद्यार्थ्यांनी कु. तनुष्का वेणुशाम बाभळे ही प्रथम तर पियुष रुपेश्वर बाभळे हा द्वितीय तर आदर्श हायस्कूल मारेगाव येथील कु. श्रुष्टी वसुमित्र वनकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच 'ब' गटातून दर्शन भारती विद्यालय गोंडबुरांडा येथील विद्यार्थीनी कु. खुशी प्रशांत सपाट ही सर्वाधिक गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकाविला तर आदर्श हायस्कूल मारेगाव येथील कु. श्रुष्टी सुर ही द्वितीय तर युगांतर आश्रम शाळा येथील प्रथम अशोक पेंदोर हा तृतीय आला. या सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस, भारतीय संविधान प्रत, प्रमाणपत्रसह गौरव चिन्ह देवुन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे, तालुका उपाध्यक्ष संजय जिवने, रामभाऊ दरेकर, गोरखनाथ पाटील, अनंता खाडे, रमेश चिकटे, भगवान इंगळे, वसूमित्र वनकर, दिनेश करलुके, आफरोज शेख, अशोक पुसाटे, जुनेद शेख, मोरेश्वर खैरे, रवी वनकर, वर्षा जिवने, मनीषा कुमरे, रेखा जिवने, अर्चना बहादे व कांबळे आदींनी परिश्रम घेतले.
(विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस वितरण करतांना काही क्षण)

वणी'त विविध स्पर्धेचा कलामहोत्सव..!

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
 
वणी : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून वणी येथे दिनांक 3 जानेवारी (मंगळवार) ला एकल व समूह नृत्य, गितगायन, काव्य व रांगोळी स्पर्धेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.   
वणी तालुक्यात विद्यार्थ्यांना ऊर्जा मिळावी आणि विश्व भूषण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे महान कार्य समाजमनात कायम तेवत रहावी, त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी हा सामाजिक कार्यक्रम आयोजित केला आहे. 
   स्थानिक धानोजे कुणबी सांस्कृतिक सभागृह चिखलगाव, (वणी) येथे सकाळी 10 वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमाचे उदघाटक मा. रूपालीताई कातकडे (सरपंच ग्राम.पं.चिखलगाव), अध्यक्षस्थानी आमदार संजय रेड्डी बोदकूरवार,भूषविणार आहे. ना. विनोद पटोले (ता. उपविभागीय पोलीस अधिकारी, ना. प्रदीप बोनगीरवार (अध्यक्ष ओबीसी कृती समिती), ना प्रा. वसंतराव कनाके (जेष्ठ साहित्यिक यवतमाळ), ना. अरविंद ठाकरे (कुंभा सरपंच), ना संजय निमकर (बिल्डर वणी), तर प्रमुख अतिथी ना. प्रा. नलिनी भगत (वणी), ना संजय खाडे (अध्यक्ष रं. स्वा.अ. नि. लि. वणी), ना सुरेश भाऊ रायपुरे (मा. नगराध्यक्ष वणी), मा. महेंद्र लोढा (लो.म.स्पे.हॉ.सं, वणी), मा जमीर खान (बिल्डर वणी), ना किरण दिकुंडवार (बिल्डर वणी) हे आहेत.    
तालुक्यातील तमाम जनतेंनी सामाजिक मेजवानीची पर्वणी असलेल्या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रज्वलन 2023 "न्यू गाईज युवा मंच"च्या वतीने करण्यात आले आहे.