भाजपा पदाधिकारी तबसुम बेग यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

लखन लोंढे | सह्याद्री चौफेर 

महागांव : भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या तालुका सचिव तबसूम निसार बेग यांचं अल्पशा आजाराने काल सायंकाळी नांदेडच्या खासगी रुग्णालयात दु:खद निधन झाले. त्या आपल्या मधून निघून गेल्या आहेत यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, परंतु हे वास्तव शेवटी भारतीय जनता पार्टीला स्वीकारावं लागत आहे. चार दिवसांपूर्वीच त्यांना ताप आला होता. ताप अंगामध्ये तसाच राहुन दुर्लक्ष झाल्यामुळे तापाचे रूपांतर 'हेपेटाइटिस-बी' मध्ये झाल्याने त्यांना सावरता आले नाही. जेमतेम परिस्थिती मधून त्यांनी आपला संसार चालवत असतांना भारतीय जनता पार्टी साठी पूर्ण वेळ कार्यकर्त्या म्हणून सातत्याने योगदान देत राहिल्या. नांदेड येथे खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ भुतडा आणि आमदार नामदेव ससाने यांनी डॉक्टरांशी बोलून, होणाऱ्या बिलाची काळजी न करता शर्तीचे उपचार करायला लावले होते. मात्र डाॅक्टरांना यश आले नाही. दि.28 सप्टेंबर रोजी सायंकाळी नांदेड येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची वार्ता डॉक्टरांनी कळवली आहे. तबसूम बेग यांच्या पश्चात दोन मुले पती व बराच आप्त परिवार आहे. 
तबसुम बेग ह्या भाजपा च्या दिर्घकाळ स्मरणात राहतील. भारतीय जनता पार्टी महागांव च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ : सुधीर मुनगंटीवार


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मुंबई : जीव धोक्यात घालून वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आता पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या विषयीच्या प्रस्तावाला मान्य़ता देण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की देशातील नागरी संपत्तीप्रमाणेच वने व वन्य़जीव ही वन संपत्ती फार महत्वाची आहे. नागरी संपत्तींचे आणि मनुष्यांचे संरक्षण करतांना जीव धोक्यात घालण्याऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना शासनातर्फे विविध लाभ देण्यात येतात. तसेच लाभ वनांचे संरक्षण करतांना जीव धोक्यात घालणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना मिळावेत ही वन कर्मचाऱ्यांची मागणी काही वर्षे प्रंलबीत होती. वन कर्मचाऱ्यांनाही अनेक धोक्यांना तोंड द्यावे लागते. वणवे विझवताना, शिकार रोखताना, वनांतील वृक्षचोरी वा अन्य़ प्रकारची चोरी रोखताना, जखमी किंवा मानवी वस्तीत शिरलेले वन्य़ प्राणी वाचविताना वन कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका असतो. अनेकदा नैसर्गिक आपत्तींना वन कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागते. अशा प्रकारात अनेकदा वन कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका असतो किंवा ते गंभीर जखमी होवून कायमचे दिव्यांगत्व़ येण्याचा धोका असतो. 
वन विभागाच्या प्रस्तावानुसार वनांचे व वन्य़ प्राण्यांचे संरक्षण करताना दुदैवाने वन कर्मचारी मृत्युमुखी पडल्यास अशा मृत वन कर्मचाऱ्याच्या वारसास रू.२५ लाख सानुग्रह अनुदान देण्यात येईल. त्याचप्रमाणे अशाप्रकारे कर्तव्य़ बजावताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर प्राधान्याने नोकरी देण्यात येईल. जर वारस नोकरी करण्यास सक्षम नसेल किंवा वारसाने नोकरी नाकारली तर सदर मृत वन कर्मचाऱ्याच्या नियत सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतचे वेतन सदर कुटुंबाला देण्यात येईल. तसेच कर्तव्य़ बजावताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या पार्थिवाचे कुटुंबाने ठरवलेल्या ठिकाणपर्यंतचे रस्ते/रेल्वे/विमान इत्या. मार्गे वहन करण्याचा वाहतुक खर्च शासनातर्फे करण्यात येईल.
कर्तव्य़ बजावताना वन कर्मचारी जर कायमचा दिव्यांग झाला तर सदर वन कर्मचाऱ्यास श्रेणी प्रमाणे रू.३ लाख ६० हजार ते रू. ३ लाख इतकी रक्क़म सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येईल. अशा प्रकारे कर्तव्य़ बजावताना जखमी झालेल्या वन कर्मचाऱ्याचा उपचारांचा संपूर्ण खर्च शासन करेल.
मंत्री मंडळाच्या आजच्या निर्णयामुळे वन कर्मचाऱ्यांना आता भरीव लाभ मिळणार आहे. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांचे नीतीधैर्य वाढेल असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

चांदलीच्या मेंढपाळावर वाघाचा हल्ला!


उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

सावली : तालुक्यातील अनेक गावांमध्ये मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना सातत्याने घडत असून, हिरापूर, राजोली, नवेगावनंतर किसाननगरच्या जंगलात बुधवारी एका मेंढपाळावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. परंतु, त्याचा मुलगा सोबत असल्याने मेंढपाळाचे प्राण वाचले.
मागील तीन दिवसांपासून या परिसरात वाघाची दहशत सुरू असून, हिरापूर - नवेगाव रस्त्यावर दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वी वाघाने चार शेळ्या फस्त केल्या होत्या. बुधवारी . बंडू धोंडू मद्रेवार (७०) रा. चांदली बुज. हा मेंढपाळ आपल्या मुलासोबत मेंढ्या घेवून संरक्षित जंगलातील कक्ष क्रमांक १५५९ मध्ये गेला होता. दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने
अचानक हल्ला केल्याने बंडू मुद्रेवार हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर हल्ला करताच सोबत असलेल्या मुलाने आरडाओरड करीत वडिलांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. शेवटी वाघाने पळ काढल्याने व मूलाच्या समयसुचकतेने वडिलाचे प्राण वाचले.. किसाननगरच्या जंगलातील घटनेची माहिती मिळताच सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर, व्याहाड खुर्दचे वनपाल सूर्यवंशी, वनरक्षक सुषमा मेश्राम यांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. गंभीर जखमी असलेल्या मेंढपाळाला सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
मेंढपाळ बंडू मद्रेवार यांच्या मानेला व पोटाला वाघाने ओरबडल्याने गंभीर जखमा झाल्या असून, सावली तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे.तरी याची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी परीसरातील लोकांनी केली आहे.

महिलांनी पकडली दारू; दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवार कठोर कार्यवाहीची मागणी

उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

सावली : येथूनच जवळ असलेल्या हिरापूर येथिल महिलांनी अवैध दारू विकणाऱ्या इसमांची दारू पकडली हिरापूर येथिल काही इसम अवैध मोहफूल व देशी दारू विकत असल्याची माहिती महिलांनी मिळाली होती घटना स्थळावर जाऊन महिलांनी वेगवेगड्या तीन ठिकाणाहून दारू जप्त केली. व झालेल्या घटनेची माहिती सावली पोलीस स्टेशन चे ठाणेदार आशिष बोरकर यांना देण्यात आली. तत्काळ सावली पोलीस स्टेशनंचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी आपली चमू घटनास्थळी पाठविली व महिलांनी पकडलेल्या दारूचा पंचनामा केला व आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
दरम्यान हिरापूर येथे सन 1995 पासून दारूबंदी आहे या काळात कुणीही दारू विकत नव्हते मात्र किसान नगर येथिल काही व्यक्ती या हिरापूर परिसरात दारू विक्रीचा व्यवसाय करतात यामुळे गावातील शांतता व सुव्यावस्था धोक्यात येणाची दाट शक्यता आहे.

कर्तव्यदक्ष सावलीचे ठाणेदार असल्याची प्रतिक्रिया हिरापूर येथिल सरपंच प्रिती गोहणे यांनी दिली भ्रमण ध्वनी वरून संदेश देताच त्यांची चमू घटना स्थळी दाखल झाली. यापूर्वीही त्यांनी महिलांना मदत केली होती,त्याच्या सहकार्यशील वृत्तीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. सावली पोलीस स्टेशनं च्या सदर कृतीचे अभिनंदन करण्यात येत आहे.
दरम्यान,सदर अवैद्य दारू पकडन्याकरिता सरपंच प्रिती गोहणे यांचे नेतृत्वात हिरापूर येथिल उपसरपंच शरद कन्नाके, ग्रामपंचायत सदस्य सौ नीता मुनघाटे, माधुरी कन्नाके, सविता भोयर, सौ देशमुख, यांनी मोहीम राबविली सदर कृतीचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ आपल्या दारी ही योजना राबवा - उत्तमराव कांबळे (आबा)


सह्याद्री चौफेर | न्यूज 

सांगली : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ सांगली येथे आज महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे जनरल मॅनेजर राकेश भेद साहेब यांच्या उपस्थितीत मिटिंग घेण्यात आली.

यावेळी स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष उत्तमराव कांबळे (आबा) यांनी माननीय भेद साहेब यांचे स्वागत केले व आपल्या भाषणात महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ आपल्या दारी ही योजना राबवावी अशी मागणी केली त्याचबरोबर
१) महामंडळा चे पाच लाखावरील कर्ज मर्यादा दहा लाख पर्यंत करण्यात यावी.
२) सांगली जिल्ह्यासाठी पूर्णवेळ जिल्हा व्यवस्थापक नेमणूक करण्यात यावी.
३) कर्ज प्रकरणातील जाचक अटी शिथिल करण्यात याव्या
४) तालुकावार संपर्क कार्यालय करावे आदी मागण्या मिटिंगमध्ये करण्यात आल्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते नाना कांबळे, अरुण आठवले, नाना वाघमारे आदी कार्यकत्यार्चे भाषण झाले यावेळी व्यवस्थापक पवार साहेब, कुंभार साहेब, मांग गार्डी समाजाचे सांगली जिल्हा अध्यक्ष भारत चौगुले, सामाजिक कार्यकर्ता सुमन वाघमारे, समशेर चौगुले, राहुल लोंढे, प्रवीण लोंढे, प्रवीण चौगुले, वर्गीस लोंढे सांगली जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते, काही लाभार्थी उपस्थित होते.