पोलीस ठाण्यात "राडा" करणे भोवले; दोघांनाही केले निलंबित

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे, पोना धिरज चव्हाण यांना पोलीस अधिक्षक यांनी या दोघांना निलंबित केले आहे.

सविस्तर असे की, टिपूर्णे व चव्हाण यांचा 29 गुरुवारी रात्री किरकोळ कारणावरून वाद झाला, वादाचे रूपांतर हाणामारीt झाले. चक्क! पोलीस स्टेशन च्या आवारात दोघांनी एकमेकांना लाथाबुक्क्यानी मारहाण केली. या प्रकरणाची गावभर चर्च रंगत असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना अहवाल पाठवला होता.

कायद्याचे रक्षक व लोकसेवक या पदाला न शोभणारे कृत्य व पोलीस अधिकारी व अंमलदार या पदाला अशोभनीय गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक डॉ दिलीप भुजबळ यांनी त्या दोघांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

गेल्या कित्येक महिन्यापासून वणी पोलीस स्टेशन वादग्रस्त राहिले आहे. मोठमोठ्या गुन्ह्यात अनेकांनी आपले हात पिवळे केले आहे. कित्येक गुन्ह्याचा तपास प्रलंबित आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक काय ठोस पाऊल उचलतात का? हेही वास्तव बघणे आवश्यक असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ वणीत होणार दाखल?

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : येथील ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकांनी जमादारच्या कानखाली आवाज काढला असल्याची माहिती समोर आली असतांना वावड्या उठल्या होत्या. हे प्रकरण अधिक्षक यांच्या दारापर्यंत पोहचल्याने वणी ठाण्याचा गलथान कारभार पाहून थेट जिल्हा पोलीस अधिक्षक वणीत दाखल होत आहेत. कोण निलंबित होणार आणि उचलबांगडी कोणाची होणार? हे बघणे औचित्याचे ठरणार आहे.

गेल्या कित्येक महिन्यापासून वणी पोलीस ठाणे वादग्रस्त राहिले आहे. मोठमोठ्या गुन्ह्यात अनेकांनी आपले हात पिवळे केले आहे. कित्येक गुन्ह्याचा तपास प्रलंबित आहे. मात्र, पोलिसी खाक्या दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांनी उतमाज केला आहे. चक्क! गुरुवारी रात्री एका पोलीस उपनिरीक्षक असलेल्या अधिकाऱ्याने अमलदारच्या कानशिलात लावली आहे. म्हणजेच पोलीस जनतेच्या सेवेसाठी की,स्वतःच्या स्वार्थासाठी हे कोडेच आहे. तूर्तास याच पार्श्वभूमीवर वणीत जिल्हा पोलीस अधिक्षक येत असल्याची माहिती आहे. आता जिल्हा पोलीस अधिक्षक काय करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.

नाभिक समाज भूषण पांडरंगजी नागतुरे यांचे निधन

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्ह्य शाखा वणीचे सक्रिय कार्यकर्ते व नाभिक समाज मार्गदर्शक, समाजभल्यासाठी स्वतःताला झोकून देऊन धावपळ करणारे पांडुरंगजी नागतुरे यांचे आज दुपारी 4 वाजता निधन झाले.
गेल्या विस दिवपासुन ते एम्स रुग्णालय नागपूर येथे उपचार घेत होते.

त्यांची सामाजिक कळवळीची दखल घेऊन संत नगाजी महाराज समाज भूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
             
अंतिम यात्रा दिपक चौपाटी काळा राम मंदीर जवळील त्यांच्या निवास स्थानातून दिनांक 1 आक्टोबंर ला दुपारी 12 वाजता निघेल. मोक्षधाम वणी येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होतील असे नजीकच्या नातलगांनी सांगितले.

मैत्री कट्याचा वर्धापन दिवस साजरा: "मैत्रीचे सैल झालेले बंध पुन्हा झाले घट्ट" ...

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मैत्री कट्याच्या स्नेहसंमेलन सोहळ्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्याने एका निसर्ग रम्य ठिकाणी सर्व मित्र एकत्र येवून केक कापून वर्धापन दिवस साजरा करण्यात आला.
मैत्री कट्टा २०२१ चा अभूतपूर्व स्नेहसंमेलन सोहळा २५,२६ सप्टेंबरला २०२१ ला शहरात साजरा करण्यात आला होता. कार्यक्रमात नागपूर, पुणे, गडचिरोली, हैदराबाद, वर्धा, चंद्रपूर अशा डझनभर शहरात वास्तव्यास असलेले अनेक मित्रांनी आपल्या आठवणी ताज्या केल्या होत्या. 
          
आपण भेटूया असे वचनही एकदुसाऱ्याला दिले होते .म्हणूनच मैत्री कट्याच्या वर्धापन दिनानिमित्त शहराच्या काही अंतरावर असलेल्या मांगरूळ निसर्गरम्य ठिकाणी वर्धापन दिवस केक कापून साजरा करण्यात आला. 
दरम्यान विवेक पांडे यांनी आपल्या गोड आवाजात सदाबहार गीते सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.आणि मैत्रींचे सैल झालेले बंध पुन्हा घट्ट झाले.
        
यावेळी पप्पू जूनेजा, बिना दूपारे (हेपट) प्रतिभा डाखरे, उदय रायपुरे, खालिद पटेल, थारांगणा पटेल,गजानन जयस्वाल,विवेक पांडे, मयुरी जयस्वाल, प्रा.सूर्यकार ,साबुद्दिन अजानी, दुष्यंत जयस्वाल, माला बोढे,साधना आस्वले, बदृद्दिन काजी, सुधाकर आसुटकर , साधना आसुटकर सह अनेक मित्र मंडळी उपस्थित होते.

जगदंबा लखमाई संस्थान पाथ्रड देवी येथे उत्सव व यात्रा

जगदंबा लखमाई संस्थान पाथ्रड देवी येथे उत्सव व यात्रा.

जगदंबा लखमाई आईच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी.
चेतन पवार | सह्याद्री चौफेर

दारव्हा : तालुक्यातील पाथ्रड देवी येथे दिनांक २६/९/२०२२ ते दिनांक ५/१०/२०२२ पर्यंत भव्य यात्रेचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. सोमवार आदिशक्ती माता जगदंबा लखमाई मंदिरात सकाळी ७ वाजता घटस्थापना संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी सदस्य व समस्त गावकरी मंडळी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरला अवधुती भजनी मंडळ पाथ्रड देवी यांचा अवधुती भजनाचा कार्यक्रम राहील. रात्री ७.३० ह.भ. प नामदेव महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनी मंडळ बोरी गोसाई यांचा कार्यक्रम राहील. २ ऑक्टोंबरला रात्री ७.३० ह.भ.प कार्तिक महाराज राहणार खामलवाडी यांचे बंजारा भाषेत भजनाचा कार्यक्रम राहील. ३ ऑक्टोंबरला सायं. ६ वाजता होम पूजेचा कार्यक्रम राहील. व रात्री ७ वाजता ह भ प पवन महाराज खोडे इसापूर यांचे कीर्तन राहील. ४ ऑक्टोंबरला सकाळी आठ वाजता हरिनाम जप व दुपारी १२ वाजता दहीहंडीचा कार्यक्रम व महाप्रसादाचा कार्यक्रम राहील. व रात्री ७ वाजता महिला भजनी मंडळ बोरगाव यांचा भजनाचा कार्यक्रम राहील. ५ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता घट विसर्जन व पालखी ची भव्य मिरवणूक राहील. सोबत वारकरी भजनी मंडळ महागाव, बोदगव्हाण, पाथ्रड देवी तसेच सेवादास भजनी मंडळ पाथ्रड देवी तुकडोजी भजनी मंडळ व परिसरातील सर्व भजनी मंडळ तसेच एक दिवसीय कबड्डीचे प्रेक्षणीय खुले सामने या सामन्याचे प्रथम बक्षीस २१००० हजार मंडळातर्फे या सामन्याचे द्वितीय बक्षीस १५००० हजार रुपये मंडळातर्फे या सामन्याचे तृतीय बक्षीस १०००० हजार रुपये मंडळातर्फे या सामन्याचे चतुर्थ बक्षीस ७००० हजार रुपये कर्मचारी पाथरड देवी यांच्यातर्फे आहे. कबड्डी चे उद्घाटन ३ ऑक्टों. रोजी सकाळी १० वाजता जयसिंग राठोड सरपंच पाथ्रड देवी व सौ. पल्लवी संतोष गायकवाड पोलीस पाटील पाथ्रड देवी यांच्या हस्ते बक्षीस वितरण ३ ऑक्टोंबरेला सायंकाळी संस्थेचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी व मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.

पोलीस स्टेशनमध्येच खाकी'त बिनसली

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : येथील पोलीस स्टेशन मधील दोन खाकी'त शुल्लक कारणावरून चांगलीच फ्री स्टाईल झाली. ही घटना 29 गुरुवारी च्या रात्री घडली. या फ्री स्टाईल वर जरी सारवासारव करण्यात येत असली तरी पोलीस वर्तुळात मात्र, चर्चेला उधाण आले आहे.

ठाण्याची अब्रू चहाट्यावर आली असून वणी पोलिसांच्या सुस्तावलेल्या कारभारामुळे शहरात मोठ्या प्रमाणात विविध गुन्हेगारीत कमालीची वाढ होत असल्याने जनमानसात प्रचंड भीती पसरली असता पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्न चिन्ह उपस्थित होत असून याबाबत वरिष्ठाकडे लेखी निवेदन सादर करून खाकी चा कारभार सुधारा यासाठी मागणी होत आहे. अशातच काल रात्री 11 वाजता दरम्यान, स्टेशन डायरीच्या साजा वरून जमादार धिरज चव्हाण व पीएसआय शिवाजी टिपूर्णे यांच्यात चांगलीच फ्रि स्टाईल झाल्याचे खात्री दायक वृत्त आहे. या प्रकाराने येथील पोलीस निरीक्षक किती कर्त्यवदक्ष आहे याची प्रचिती जनतेला येत असून, चक्क! पोलीस ठाण्यामधील जनतेचे रक्षकच असुरक्षित असून शहरातील व ग्रामीण भागातील जनतेची काय परिस्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा.

शहरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असले तरी येथील पोलीस अधिकाऱ्यांचा वचक असणे अभिप्रेत आहे. तूर्तास सण उत्सवाचे दिवस आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या करिता पोलीस प्रशासनाने दक्ष राहणे गरजेचे आहे. घडलेला प्रकार आतिशय निंदनीय असून कायद्याचे रक्षकच असे कृत्य करत असतील तर पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. 

शिवसंग्राम चित्रपट व सांस्कृतिक विभागाची नागपूर येथे बैठक संपन्न

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नागपूर : शिवसंग्राम चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ अध्यक्षा मंगलाताई ठक यांच्या नेतृत्वात सुप्रसिद्ध दिग्दर्शक दीपक कदम यांच्या मार्गदर्शनात ही बैठक घेण्यात आली. या वेळी विदर्भातील नागपूर विभाग व नागपूर जिल्ह्याच्या काही नागरिकांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

यात सदस्य आदित्य कापसे, अविनाश अरोरा, लीना पाटील, निकिता पानतावणे, विद्या खोब्रागडे, कल्पेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. सोबतच नागपूर मध्ये चित्रपट सृष्टी मध्ये काम करणाऱ्या कलाकारांना काय अडचणी येतात व चित्रपट सृष्टी मध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी काय मदत करता येईल या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
             (निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी )

नागपूर येथील चित्रपट महामंडळाचे ऑफिस फारच लहान आहे आणि नागपूर विभाग हा फार मोठा आहे. यासाठी ऑफिस मोठे प्रशस्त असावे तसेच चित्रपट मंडळाचे सभासद कुठूनही ऑनलाईन कथा व गाणे, आपले लिखाण रजिस्टर करू शकले पाहिजे. ती सुविधा ऑनलाईन असावी असे विषय घेऊन आज नागपूर चित्रपट महामंडळाचे कार्यालयास भेट देवून त्यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी नागपूर चे नवनियुक्त अध्यक्ष दीपक कट्यारमल, कोष्याध्यक्ष अश्विनी धोटे, अतुल साखरे, आकाश मेश्राम हे  उपस्थित राहून नियुक्त सभासदांचे अभिनंदन केले.

भाजपा पदाधिकारी तबसुम बेग यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

लखन लोंढे | सह्याद्री चौफेर 

महागांव : भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या तालुका सचिव तबसूम निसार बेग यांचं अल्पशा आजाराने काल सायंकाळी नांदेडच्या खासगी रुग्णालयात दु:खद निधन झाले. त्या आपल्या मधून निघून गेल्या आहेत यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, परंतु हे वास्तव शेवटी भारतीय जनता पार्टीला स्वीकारावं लागत आहे. चार दिवसांपूर्वीच त्यांना ताप आला होता. ताप अंगामध्ये तसाच राहुन दुर्लक्ष झाल्यामुळे तापाचे रूपांतर 'हेपेटाइटिस-बी' मध्ये झाल्याने त्यांना सावरता आले नाही. जेमतेम परिस्थिती मधून त्यांनी आपला संसार चालवत असतांना भारतीय जनता पार्टी साठी पूर्ण वेळ कार्यकर्त्या म्हणून सातत्याने योगदान देत राहिल्या. नांदेड येथे खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ भुतडा आणि आमदार नामदेव ससाने यांनी डॉक्टरांशी बोलून, होणाऱ्या बिलाची काळजी न करता शर्तीचे उपचार करायला लावले होते. मात्र डाॅक्टरांना यश आले नाही. दि.28 सप्टेंबर रोजी सायंकाळी नांदेड येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची वार्ता डॉक्टरांनी कळवली आहे. तबसूम बेग यांच्या पश्चात दोन मुले पती व बराच आप्त परिवार आहे. 
तबसुम बेग ह्या भाजपा च्या दिर्घकाळ स्मरणात राहतील. भारतीय जनता पार्टी महागांव च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ : सुधीर मुनगंटीवार


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मुंबई : जीव धोक्यात घालून वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आता पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या विषयीच्या प्रस्तावाला मान्य़ता देण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की देशातील नागरी संपत्तीप्रमाणेच वने व वन्य़जीव ही वन संपत्ती फार महत्वाची आहे. नागरी संपत्तींचे आणि मनुष्यांचे संरक्षण करतांना जीव धोक्यात घालण्याऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना शासनातर्फे विविध लाभ देण्यात येतात. तसेच लाभ वनांचे संरक्षण करतांना जीव धोक्यात घालणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना मिळावेत ही वन कर्मचाऱ्यांची मागणी काही वर्षे प्रंलबीत होती. वन कर्मचाऱ्यांनाही अनेक धोक्यांना तोंड द्यावे लागते. वणवे विझवताना, शिकार रोखताना, वनांतील वृक्षचोरी वा अन्य़ प्रकारची चोरी रोखताना, जखमी किंवा मानवी वस्तीत शिरलेले वन्य़ प्राणी वाचविताना वन कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका असतो. अनेकदा नैसर्गिक आपत्तींना वन कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागते. अशा प्रकारात अनेकदा वन कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका असतो किंवा ते गंभीर जखमी होवून कायमचे दिव्यांगत्व़ येण्याचा धोका असतो. 
वन विभागाच्या प्रस्तावानुसार वनांचे व वन्य़ प्राण्यांचे संरक्षण करताना दुदैवाने वन कर्मचारी मृत्युमुखी पडल्यास अशा मृत वन कर्मचाऱ्याच्या वारसास रू.२५ लाख सानुग्रह अनुदान देण्यात येईल. त्याचप्रमाणे अशाप्रकारे कर्तव्य़ बजावताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर प्राधान्याने नोकरी देण्यात येईल. जर वारस नोकरी करण्यास सक्षम नसेल किंवा वारसाने नोकरी नाकारली तर सदर मृत वन कर्मचाऱ्याच्या नियत सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतचे वेतन सदर कुटुंबाला देण्यात येईल. तसेच कर्तव्य़ बजावताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या पार्थिवाचे कुटुंबाने ठरवलेल्या ठिकाणपर्यंतचे रस्ते/रेल्वे/विमान इत्या. मार्गे वहन करण्याचा वाहतुक खर्च शासनातर्फे करण्यात येईल.
कर्तव्य़ बजावताना वन कर्मचारी जर कायमचा दिव्यांग झाला तर सदर वन कर्मचाऱ्यास श्रेणी प्रमाणे रू.३ लाख ६० हजार ते रू. ३ लाख इतकी रक्क़म सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येईल. अशा प्रकारे कर्तव्य़ बजावताना जखमी झालेल्या वन कर्मचाऱ्याचा उपचारांचा संपूर्ण खर्च शासन करेल.
मंत्री मंडळाच्या आजच्या निर्णयामुळे वन कर्मचाऱ्यांना आता भरीव लाभ मिळणार आहे. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांचे नीतीधैर्य वाढेल असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

चांदलीच्या मेंढपाळावर वाघाचा हल्ला!


उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

सावली : तालुक्यातील अनेक गावांमध्ये मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना सातत्याने घडत असून, हिरापूर, राजोली, नवेगावनंतर किसाननगरच्या जंगलात बुधवारी एका मेंढपाळावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. परंतु, त्याचा मुलगा सोबत असल्याने मेंढपाळाचे प्राण वाचले.
मागील तीन दिवसांपासून या परिसरात वाघाची दहशत सुरू असून, हिरापूर - नवेगाव रस्त्यावर दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वी वाघाने चार शेळ्या फस्त केल्या होत्या. बुधवारी . बंडू धोंडू मद्रेवार (७०) रा. चांदली बुज. हा मेंढपाळ आपल्या मुलासोबत मेंढ्या घेवून संरक्षित जंगलातील कक्ष क्रमांक १५५९ मध्ये गेला होता. दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने
अचानक हल्ला केल्याने बंडू मुद्रेवार हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर हल्ला करताच सोबत असलेल्या मुलाने आरडाओरड करीत वडिलांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. शेवटी वाघाने पळ काढल्याने व मूलाच्या समयसुचकतेने वडिलाचे प्राण वाचले.. किसाननगरच्या जंगलातील घटनेची माहिती मिळताच सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर, व्याहाड खुर्दचे वनपाल सूर्यवंशी, वनरक्षक सुषमा मेश्राम यांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. गंभीर जखमी असलेल्या मेंढपाळाला सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
मेंढपाळ बंडू मद्रेवार यांच्या मानेला व पोटाला वाघाने ओरबडल्याने गंभीर जखमा झाल्या असून, सावली तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे.तरी याची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी परीसरातील लोकांनी केली आहे.

महिलांनी पकडली दारू; दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवार कठोर कार्यवाहीची मागणी

उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

सावली : येथूनच जवळ असलेल्या हिरापूर येथिल महिलांनी अवैध दारू विकणाऱ्या इसमांची दारू पकडली हिरापूर येथिल काही इसम अवैध मोहफूल व देशी दारू विकत असल्याची माहिती महिलांनी मिळाली होती घटना स्थळावर जाऊन महिलांनी वेगवेगड्या तीन ठिकाणाहून दारू जप्त केली. व झालेल्या घटनेची माहिती सावली पोलीस स्टेशन चे ठाणेदार आशिष बोरकर यांना देण्यात आली. तत्काळ सावली पोलीस स्टेशनंचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी आपली चमू घटनास्थळी पाठविली व महिलांनी पकडलेल्या दारूचा पंचनामा केला व आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
दरम्यान हिरापूर येथे सन 1995 पासून दारूबंदी आहे या काळात कुणीही दारू विकत नव्हते मात्र किसान नगर येथिल काही व्यक्ती या हिरापूर परिसरात दारू विक्रीचा व्यवसाय करतात यामुळे गावातील शांतता व सुव्यावस्था धोक्यात येणाची दाट शक्यता आहे.

कर्तव्यदक्ष सावलीचे ठाणेदार असल्याची प्रतिक्रिया हिरापूर येथिल सरपंच प्रिती गोहणे यांनी दिली भ्रमण ध्वनी वरून संदेश देताच त्यांची चमू घटना स्थळी दाखल झाली. यापूर्वीही त्यांनी महिलांना मदत केली होती,त्याच्या सहकार्यशील वृत्तीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. सावली पोलीस स्टेशनं च्या सदर कृतीचे अभिनंदन करण्यात येत आहे.
दरम्यान,सदर अवैद्य दारू पकडन्याकरिता सरपंच प्रिती गोहणे यांचे नेतृत्वात हिरापूर येथिल उपसरपंच शरद कन्नाके, ग्रामपंचायत सदस्य सौ नीता मुनघाटे, माधुरी कन्नाके, सविता भोयर, सौ देशमुख, यांनी मोहीम राबविली सदर कृतीचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ आपल्या दारी ही योजना राबवा - उत्तमराव कांबळे (आबा)


सह्याद्री चौफेर | न्यूज 

सांगली : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ सांगली येथे आज महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे जनरल मॅनेजर राकेश भेद साहेब यांच्या उपस्थितीत मिटिंग घेण्यात आली.

यावेळी स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष उत्तमराव कांबळे (आबा) यांनी माननीय भेद साहेब यांचे स्वागत केले व आपल्या भाषणात महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ आपल्या दारी ही योजना राबवावी अशी मागणी केली त्याचबरोबर
१) महामंडळा चे पाच लाखावरील कर्ज मर्यादा दहा लाख पर्यंत करण्यात यावी.
२) सांगली जिल्ह्यासाठी पूर्णवेळ जिल्हा व्यवस्थापक नेमणूक करण्यात यावी.
३) कर्ज प्रकरणातील जाचक अटी शिथिल करण्यात याव्या
४) तालुकावार संपर्क कार्यालय करावे आदी मागण्या मिटिंगमध्ये करण्यात आल्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते नाना कांबळे, अरुण आठवले, नाना वाघमारे आदी कार्यकत्यार्चे भाषण झाले यावेळी व्यवस्थापक पवार साहेब, कुंभार साहेब, मांग गार्डी समाजाचे सांगली जिल्हा अध्यक्ष भारत चौगुले, सामाजिक कार्यकर्ता सुमन वाघमारे, समशेर चौगुले, राहुल लोंढे, प्रवीण लोंढे, प्रवीण चौगुले, वर्गीस लोंढे सांगली जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते, काही लाभार्थी उपस्थित होते.


"सदर मार्गांवरून अवजड वाहन नेण्यास मनाई आहे" असे ठिकठिकाणी फलक लागले; मात्र अधिकाऱ्यांच्या आदेशाला ट्रान्सपोर्टरकडून केराची टोपली


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : जिल्हा चंद्रपूर, वरोरा तालुका येथील एकोना कोल माईन्स मधील कोळसा खदान सुरू झाल्यापासून वरोरा मार्ग चंद्रपूर व वणी जात होता. परंतु वरोरा शहरातील जनतेच्या व लोकप्रतिनिधी यांच्या दबावामुळे वरोरा प्रशासनाने वरोरा जनतेच्या हितासाठी वरोरा शहरातून जड वाहुकीस प्रतिबंध केल्यामुळे अंदाजे मागील ८ ते१० महिन्यापासून कोळशाची वाहतूक एकोना, वानोजा, माढेळी मार्गे यवतमाळ जिल्ह्यातील कोसार,खैरी,मार्डी,नांदेपेरा,मजरा,वांजारी,वणी मार्गे-चंद्रपूर, घुगुस, पुनवट कोलवासरी वणी येथे होत आहे.

एकोना, वनोजा, माढेळी हा राज्य महामार्ग ३१७ अस‌ला तरी रोड अरुंद व कमी वाहतूक क्षमतेचा असल्यामुळे येथील नागरिकानी आंदोलन केले. व स्थानिक खासदार यानी हस्तक्षेप करुन वरोरा प्रशासनावर दबाव निर्माण करून एकोना, वनोजा, माढेळी हा मार्ग जड वाहतूकीस बंद असा आदेश मा. उपविभागीय अधिकारी वरोरा यानी दि.२४-०६-२०२२ रोजी काढला त्यानंतर दि ११-०७-२०२२ पर्यंत कोळसा वाहतूक पूर्णता बंद होती पर्यायाने खदान मधला कोळसा पर्यायी मार्ग नसल्यामुळे कोळसा वाहतूक बंद होती. याचा फायदा घेत कोलमाईन्स प्रशासनानी मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कडे अपील दाखल केली. मा. जिल्हाधिकारी यांनी वीज निर्मितीसाठी कोळसा आवश्यक असल्याचे कारण दाखवत एकोना, वनोजा, माढेळी हा राज्य महामार्ग असला तरी अरुंद व जड वाळतूकीस योग्य नसल्यामुळे वाहतूकीस शर्ती व अटीवर पुन्हा वाहतूकीस परवानगी दि. ११-०७-२०२२ तारखेपासून दिली. त्यामुळे फक्त २५ टन कोळसा प्रति वाहन याप्रमाणे वाहतूक एकोना खदानमधून वनोजा, माढेळी, कोसरा, खैरी, मार्डी, नांदेपेरा, वणी, वरुन पूनवट कोलवासरी घुगुस व चंद्रपूर येथे सुरु आहे.

वरोरा प्रशासनाने वरोरा शहरातील जनतेच्या सुरक्षेसाठी व शहरातील रोडची काळजी घेण्यासाठी यवमाळ जिल्हातील खैरी, मार्डी, नांदेपेरा, वणी मार्गाचा वापर केल्यामुळे या मार्गावर ८ ते ९ आपघात झाले. त्यात ३ व्यक्ती मरण पावले व ४ ते ५ वक्ती गंभीर जखमी झाले व वणी ते नांदेपेरा हा रस्ता अरुंद असून ८ टन वाहतूक क्षमतेचा असल्यामुळे येथील परिसरातील जनता ४ ते ५ महिन्यापासून संघर्ष करित आहे. त्यामुळे सार्वजनिक बाधकाम विभाग यांनी आदेश काढून सदर मार्गावरुन अवजड वाहने नेण्यास मनाई आहे" असा बोर्ड नांदेपेरा बायपास वणी, वांजरी, मजरा व नांदेपेरा येथे लावला आहे. तरी मुजोर ट्रक मालक नियम मोडत वाहतूक करित आहे. या संदर्भात दि. २६/०९/२०२२ ला मा.आमदार, तहसिलदार, बाधकाम विभाग व ठाणेदार यांच्या सोबत मिटिंग मधील चर्चा नुसार वाहतूक रोखेन व पर्यायी मार्गाने वळविण्यासाठी सक्षम अधिकारी यांचे आदेश आवश्यक असल्याचे सागुन हा आदेश काढण्यासाठी ६/१०/२०२२ पर्यंत प्रशासनी वेळ मागितल्यामुळे दि. २७/९/२०२२ ला होणारे आंदोलन ६/१०/२०२२ पर्यंत स्थगित करण्यात आले.              
          
 वरोरा प्रशासनानी आपल्या शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी व लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे यवतमाळ जिल्हातील ३ व्यक्तीचा नाहक जीव गमावला आहे. आपल्या नागरिकाच्या सुरक्षेसाठी वणी प्रशासन योग्य व लवकर निर्णय घेतील का? व लोकप्रतिनिधी यांची दखल घेतील का? या कडे जनतेचे लक्ष लागून आहे. नाहीतर ०६/१०/२०२२ नंतर या रोडवर सुरू अवैध जड वाहतूक जनता स्वता: रोखेल व यांची जबाबदारी संबंधित अधिकारी व लोक प्रतिनिधीची राहील, अशा इशार कॉ.अनिल घाटे व सहकाऱ्यांनी दिला आहे.

महाविद्यालयात रासेयो दिन स्वच्छता अभियान व वृक्ष वाटप कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला

रवी घुमे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : स्थानिक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 24 सप्टेंबर म्हणून राष्ट्रीय सेवा योजना दिन स्वच्छता अभियान व वृक्ष वाटप कार्यक्रम राबवून साजरा करण्यात आला. कार्यक्रमा मध्ये संबोधित करत असताना प्रा. अक्षय जेनेकर यांनी विद्यार्थी दशेत समाजसेवेची जाण निर्माण झाली पाहिजे व संत गाडगेबाबांनी केलेल्या कार्याचा उल्लेख केला.

 कार्यक्रमाला आदी मान्यवर उपस्थित होते त्यात प्रामुख्याने महाविद्यालयाचे अधिक्षक श्री. रवींद्र धानोरकर, डॉ. गजानन सोडनर, डॉ. प्रवीण कुलकर्णी, प्रा. रुपेश वांढरे, डॉ. नितेश राऊत डॉ. घोडखांदे मॅडम यांच्यावतीने संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व वृक्ष वाटपाचा कार्यक्रम पार पडला.तसेच स्वच्छता अभियान राबवून महाविद्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख व सहकार्यक्रमाधिकारी प्रा. विजय भगत, प्रा. माधुरी शेंडे व रासेयो विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

पोक्सो कायद्यामध्ये सुधारणा घडवून बाल लैंगिक अत्याचार रोखता येऊ शकतो -डॉ. गोमासे

रवी घुमे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : स्थानिक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना व साक्षी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने Stop Child Sexual Abuse POCSO Act 2012 या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेला मार्गदर्शन करण्याकरिता साक्षी फाउंडेशन येथील मार्गदर्शक डॉ. भारती गोमासे मॅडम तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर उपस्थित होते.

डॉ. गोमासे मॅडम बाल लैंगिक अत्याचारा विषयी बोलत असताना आपले मूल सुरक्षित राहील त्याचे भविष्य उज्ज्वल घडेल, याकडे लक्ष देत असतानाच आपल्या मुलांवर अशा प्रकारे कोणी अत्याचार करण्यास धजावणार असेल, तर त्याला कायद्याने कडक शिक्षा देण्यास पालकांनी खंबीर राहायला हवे. तरच बालकांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या या कायद्याचा (पोक्सो कायदा 2012) हेतू सफल होईल. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत असताना डॉ. घरडे सर यांनी समाजामध्ये घडत असलेल्या बाललैंगिक अत्याचार विषयी पालकांना जागरूक राहावे लागेल आणि कायद्यामध्ये शासनाने बदल घडवून आणावा असे आपले मत व्यक्त केले.

सुंदर असे प्रास्ताविक आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. गजानन सोडणर यांनी केले तर आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. श्रीराम खाडे, डॉ. प्रवीण कुलकर्णी, डॉ. अनिल अडसरे, प्रा. प्रदीप माकडे, प्रा. अक्षय जेणेकर, प्रा. रुपेश वांढरे आदि जण प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो सह कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय भगत, प्रा. माधुरी शेंडे व रासेयो विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

अमरावती: ट्रायबल फोरम वतीने मा. नानाभाऊ पटोले यांना आदिवासी समाजाच्या विविध समस्यांचे निवेदन


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर

अमरावती : आज रविवार दिनांक 25 सप्टेंबर 2022 रोजी ""ट्रायबल फोरम जिल्हा शाखा अमरावती"" च्या वतीने मा.श्री.नानाभाऊ पटोले(प्रदेशाध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा माजी अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा)यांना आदिवासी समाजाच्या विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले. १)अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूल मधील मागील १० ते १५ वर्षापासून आदिवासी विकास विभाग (महाराष्ट्र शासनाच्या) वतीने दिले जाणारे अनुदान/ निधी त्याबाबतचे मागील 14 ते 15 वर्षापासून ऑडिट करण्यात यावे.२) अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूलच्या संचालकांनी आदिवासी विद्यार्थ्यांना आतोनात छळ केला आहे व त्यांना शैक्षणिक कामात अडथळा निर्माण करून, शासनाचे अनुदान घेऊन सुद्धा शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे, आदिवासी विद्यार्थ्यांना विविध अडचणी निर्माण करून त्रास दिल्यामुळे त्या विद्यार्थ्यांची पिडवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.३) अमरावती कॅम्प परिसर स्थित जुने आदिवासी नगर मधील सार्वजनिक ठिकाणी व वहिवाटीच्या रस्त्यावर केलेले ""ग्रँड हॉटेल महफिल इन"" च्या संचालकांनी केलेले अतिक्रमण तातळीने मोकडे करून सार्वजनिक रस्ता बांधकाम करून देण्यात यावा. तसेच अन्य मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी तिरु.शशिकांतभाऊ आत्राम (जिल्हा सचिव,ट्रायबल फोरम जि.अमरावती), सुमितभाऊ कुंमरे, मुकिंदाभाऊ ऊईके, जगदीश इवाने व जुने आदिवासी नगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ट्रकच्या धडकेत महिला ठार


उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

गडचिरोली : सुरजागड डोंगरावरुन लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्याने जाणाऱ्या जवळपास ८ ते १० टिप्पर आणि ट्रकना आग लावली.
ही घटना मंगळवारी (दि.२७) संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास आष्टी-आलापल्ली मार्गावरील शांतीग्राम गावाजवळ घडली.
मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर येथील सुभाष जयदार हे मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास पत्नीसह मोटारसायकलने गावाकडे जात असताना लगाम-शांतीग्राम गावादरम्यानच्या रस्त्यावर त्यांना लोहखनिज घेऊन येणाऱ्या ट्रकने मागून धडक दिली. या धडकेत सुभाष जयदार यांची पत्नी बिजोली सुभाष जयदार (४५) या जागीच ठार झाल्या. त्यानंतर नागरिक संतप्त झाले. त्यांनी रस्त्याने लोहखनिज घेऊन येणाऱ्या आठ ते दहा वाहनांना आग लावली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. मात्र, परिसरात तणाव कायम आहे.
सुरजागड येथील डोंगरावरुन त्रिवेणी अर्थमूव्हर्स आणि लॉयड मेटल्स कंपनीतर्फे लोहखनिज उत्खनन करण्यात येत आहे. या खनिजाची वाहतूक टिप्पर आणि ट्रकद्वारे होत असून, दररोज चारशे ते पाचशे ट्रक रस्त्यावरुन धावत असल्याने आष्टी-आलापल्ली, आलापल्ली-एटापल्ली हे दोन प्रमुख रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. यामुळे बरेचदा वाहतुकीची कोंडी होते. शिवाय अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या विरोधात मागील आठवड्यात अहेरी आणि आलापल्ली येथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंदही ठेवली होती. परंतु प्रशासनाने लोकभावना लक्षात न घेतल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

सदर मार्गांवरून अवजड वाहन नेण्यास मनाई आहे, अधिकाऱ्यांच्या आदेशाला ट्रान्सपोर्टरकडून केराची टोपली

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : नांदेपेरा मार्गाने होणाऱ्या अवजड वाहतूक संदर्भात विविध संघटनाकडून निवेदन देण्यात आली होती. यातच कॉ अनिल घाटे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना 27 सप्टेंबर 2022 आंदोलनाचा ईशारा देण्यात आला होता. याची दखल घेत या संदर्भाने दि.26 सप्टेंबर 2022 रोजी आमदार साहेब, ठाणेदार साहेब, तहसीलदार साहेब व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सोबत बैठक करण्यात आली. त्या मध्ये मा जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करण्यात आली, यात त्यांनी या समस्ये विषयी तत्परता दाखवली आणि 6/10 2022 पर्यंत वेळ मागितली, त्यामुळे आज दि.27 ला होणारे आंदोलन 6/10/2022 पर्यंत तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे कॉ अनिल घाटे यांनी सांगितले. जर 6 ऑक्टोबर पर्यंत तोडगा न निघाल्यास पुढील आंदोलनाची तारीख कळविण्यात येईल असेही कॉम्रेड घाटे म्हणाले. 

भीषण आगीत कापड दुकान भष्मसात

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : शहरातील गजबजलेल्या बाजार पेठेतील भीषण आगीत कापड दुकान जळून खाक झाल्याचे वृत्त आहे. ही घटना मध्यरात्री दोन अडीच च्या दरम्यान घडल्याचा कयास आहे.

 या भीषण आगीने रौद्ररूप धारण केल्याने वरोरा, पांढरकवडा येथून अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आल्यानंतर आगी वर पहाटे पर्यंत नियंत्रण आणण्यात आले. आग एवढी भीषण होती की, कापड दुकानातील विविध माल जळून भष्मसात झाल्याचे कळते.

ऐन सणासुदीच्या तोंडावर वणीतील मुख्य बाजार पेठेत असलेल्या प्रसिद्ध कापड शो रूम ला आग लागली. त्यामुळे सुविधा कापड केंद्र या व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाले.

ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मुंबई : विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होईल; तर मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली.

राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर 2022 रोजी 1 हजार 166 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.

 नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील, असेही आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

इरई नदीच्या ब्ल्यू लाईन मुळे शहरातील 450 हेक्टर क्षेत्र बाधित – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : इरई नदी ही चंद्रपूर शहराला सात किलोमीटर समांतर वाहते. पूर परिस्थितीमध्ये इरईचे पाणी शहरात येत असल्यामुळे नागरिकांच्या मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी होते. शहरात असेही काही भाग आहेत, जेथे ब्ल्यू लाईन आहे, मात्र वर्षानुवर्षे तेथे पाण्याचा एकही थेंब अजून पोहचला नाही. त्यामुळे याबाबत नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. ब्ल्यू लाईन मुळे शहरातील जवळपास 450 हेक्टर क्षेत्र बाधित होत असल्याची माहिती राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

नियोजन सभागृहात चंद्रपूर शहरातील पूर नियंत्रण रेषा संदर्भात आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. पाटील, कार्यकारी अभियंता श्री. काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, देवराव भोंगळे आदी उपस्थित होते.

इरई नदीच्या रेड आणि ब्ल्यू लाईनबद्दल यापूर्वी मुंबई आयआयटी यांनी सर्व्हे केला होता, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनंगटीवार म्हणाले, सध्या चंद्रपूर शहरात रेड लाईन ही 181.10 मीटर तर ब्ल्यू लाईन ही 179.6 मीटरवर आहे. ज्या जमिनीवर कधीच पाणी आले नाही, अशा ही काही जमिनी ब्ल्यू लाईनमध्ये असल्याचे निदर्शनास आले आहे. चंद्रपूर शहरातील जवळपास 450 हेक्टर क्षेत्र ब्ल्यू लाईनमुळे बाधित होते. हे क्षेत्र मोठे आहे. विनाकारण नागरिक यात भरडले जाऊ नये. त्यामुळे चंद्रपूर महानगर पालिका आणि पाटबंधारे विभागाने पुन्हा एकदा सामूहिक सर्व्हे करून व्यवस्थित टिपणी तयार करावी. याबाबत मुंबई येथे उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या प्रमुखांसोबत बैठक घेण्यात येईल. आयआयटीने केलेल्या सर्व्हेची शासनाच्या एमआर-सॅट यंत्रणेकडून पुन्हा पडताळणी करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

चंद्रपूर शहरात 3 सप्टेंबर 1891 रोजी आलेल्या पुराची पठाणपुरा गेटवर 183.06 मीटर मार्किंग आहे. यानंतर जुलै 1913 मध्ये 180.06 मीटर, ऑगस्ट 1958 मध्ये 181.33 मीटर, सप्टेंबर 1959 मध्ये 180.89 मीटर, ऑक्टोबर 1986 मध्ये 180.76 मीटर मार्किंग असल्याची माहिती अधिक्षक अभियंता श्री. पाटील यांनी बैठकीत दिली.

डिसेंबर अखेरपर्यंत उर्वरीत सर्व लाभार्थ्यांनाआयुष्यमान भारत कार्डचे वितरण करा- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही केंद्र शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत 213 आजारांवर उपचाराची सुविधा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लक्ष 98 हजार 142 नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड (गोल्डन ई कार्ड) वाटप करण्यात आले आहे. तर उर्वरीत सर्व 6 लक्ष 42 हजार 751 नागरिकांना येत्या तीन महिन्यात म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत या कार्डचे वितरण करा, अशा सुचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

नियोजन सभागृह येथे आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या प्रलंबित कार्ड वाटपबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुनील भगत, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेचे ई – गोल्डन कार्ड वाटपाबाबत मिशन मोडवर काम करून येत्या तीन महिन्यात सर्व पात्र लाभार्थ्यांना कार्डचे वाटप झाले पाहिजे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, देशात या कार्ड वाटपात चंद्रपूर जिल्हा प्रथम क्रमांकावर राहील, याबाबत आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. आरोग्य हा जनतेचा पहिला प्राधान्याचा विषय आहे. राज्यात आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना संयुक्तपणे 23 सप्टेंबर 2018 पासून राबविण्यात येत आहे. यात आयुष्यमान भारत अंतर्गत 213 आजारांवर तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 996 अशा एकूण 1209 आजारांवर उपचाराची सुविधा आहे. जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजने अंतर्गत एकूण 11 रुग्णालये असून यापैकी सहा रुग्णालये खाजगी आहेत. यात वासाडे रुग्णालय, संजीवनी रुग्णालय, गोडेगोणे रुग्णालय, मानवतकर रुग्णालय, मुसळे रुग्णालय आणि ख्रिस्ट रुग्णालयाचा समावेश आहे. या सर्व खाजगी रुग्णालयांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. यात रुग्णालयाच्या अडीअडचणी आदींबाबत चर्चा केली जाईल.
जिल्ह्यात हायड्रोसिलचे जवळपास तीन हजारांच्या वर तर हत्तीपायाच्या रुग्णांची संख्या 10 हजारांच्या वर आहे. शासकीय आणि खाजगी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक महिन्याचे विशेष आरोग्य शिबिर राबवून जिल्ह्यातील सर्व हायड्रोसिलच्या रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने करावे. तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर संबंधित रुग्णाने कोणती काळजी घ्यावी, याबाबत जनजागृतीपर माहिती रुग्णांपर्यंत पोहचवावी. तर जिल्ह्यात असलेल्या हत्तीपायाच्या रुग्णांचा समावेश दिव्यांगामध्ये कसा करता येईल, याबाबत मंत्रीमंडळात चर्चा केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेंतर्गत 2 लक्ष 15 हजार 920 कुटुंब नोंदणी झाली असून लाभार्थी संख्या 8 लक्ष 30 हजार 893 आहे. यापैकी 1 लक्ष 98 हजार 142 लोकांना कार्ड वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्रामार्फत 691 केंद्र आहे. यापैकी 385 केंद्राजवळ बायोमेट्रीक मशीन उपलब्ध आहे. तर शहरी भागात सर्व 402 आपले सरकार सेवा केंद्रात बायोमेट्रीक मशीन असून जिल्ह्यात एकूण 787 मशीन उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृती राठोड यांनी सांगितले.

रास्त धान्य दुकानदार मार्फत आधार लिंक करण्याचे आव्हान


चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : तालुक्यातील मा.सचिव,म.शा. अन्न नागरी पुरवठी व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई याचे पत्र दिनांक 21/9/2022 अन्वये, ज्या शिधापत्रीका धारकांचे आधारसिडींग झालेले नाही (कुंटूबांतील सर्व सदस्याचे) अशा लाभार्थ्याचे 100 टक्के आधार सिडींग करावयाचे आहेत. यासाठी रास्तभाव धान्य दुकानदार यांचे कडील ई-पॉस (ekycव्दारे) मशीनवरुन ज्या लाभार्थ्यांनी आधार सिर्डींग केलेले नाही अशा लाभार्थ्यांचे आधार कार्ड जमा करुन घेवुन 100 टक्के आधारकार्ड रिडींग करावयाचे आहे. सदर आधार कार्ड रास्तभाव धान्य दुकानदारां मार्फत ई-पॉस मशीनव्दारे करणे बाबतची कार्यवाही पुर्ण करावयाची आहे. यासाठी अश्या सर्व शिधापत्रीका धारकांनी बुधवार दिनांक 28/09/2022 व गुरुवार दिनांक 29/9/2022 रोजी आपल्या गावातील रास्तभाव धान्य दुकानदार यांचे कडे स्वतः जाऊन आपला आधार कार्ड क्रमांक ई-पॉस मशीनवर अंगठा लावून ekyc व्दारे समाविष्ट करून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे सर्व शिधापत्रीका धारकांना आवाहन करण्यात येत आहे. की शिधापत्रीकेमधील ज्या सदस्याचे आधार सीडिंग झालेले नाही अशा सर्व सदस्याचे आधार कार्ड सिडींग करुन घ्यावे.

आजपासून जैताई मंदिर येथे नवरात्री उत्सव व विविध कार्यक्रम

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : शहरात विविध प्रकारच्या सुश्राव्य कार्यक्रमांच्या आयोजनासाठी जैताई देवस्थान विदर्भात विख्यात आहे. जैताई माता मनोकामना पूर्ण करते असा अनेक भक्तांचा अनुभव आहे.

अश्विन व चैत्र नवरात्रातील या मंदिरातील कार्यक्रम विशेष उल्लेखनीय असतात. या वर्षी दि. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर पर्यंत मंदिरात किर्तन, जागरण, भाषण, संगीत,  इत्यादी कार्यक्रम आयोजित आहेत. आज दि. 26 ला मुकुंदबुवा देवरस यांचे किर्तन, दि.27 व 28 ला अनुक्रमे डॉ. उत्तम रूद्रवार व प्रकाश एदलाबादकर यांची पसायदान व संत मुक्ताबाई या विषयावर व्याख्याने आणि 29 तारखेला पांढरकवडा येथील स्वरसाधना प्रस्तुत सुश्राव्य सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

व्याख्यानांच्या कार्यक्रमांचे प्रायोजक विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालय या संस्था आहेत. उल्लेखनीय म्हणजे देवरस यांचे किर्तन जैताई देवस्थानचे प्रथम पुजारी स्व. साधुबुवा संताने यांच्या स्मरणार्थ आयोजित असून त्यांच्या छायाचित्राचे अनावरणही या प्रसंगी होणार आहे. दि. 2 ऑक्टोबर ला अरुणा सबाने यांना डॉ. गिरीश गांधी यांच्या हस्ते जैताई मात्रुगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दि.3 ऑक्टोबर ला विजयबाबू चोरडिया प्रायोजित कोमल निनावे, नागपूर प्रस्तुत जागरण कार्यक्रम रंगणार आहे.

सर्व कार्यक्रमांसाठी वेळ रात्री 8 वाजताची आहे. रोज सायंकाळी 6.30 वाजता सामुहिक आरतीचा कार्यक्रम राहणार आहे. या सर्व कार्यक्रमांना बंधु भगिनींनी उपस्थित राहावे अशी विनंती येथील आयोजकांनी केली आहे.

मा. आयुक्त कृषि यांची प्रक्षेत्र भेट

रुस्तम शेख | सह्याद्री चौफेर 

कळंब : मा. आयुक्त कृषि. श्री. धीरजकुमार यांनी दिनांक 24/09/2022 ला कळंब तालुक्यातील गलमगाव येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोक्रा योजने अंतर्गत भूमिपुत्र शेतकरी गट यांनी घेतलेल्या औजार बँकेस भेट दिली. गटाचे अध्यक्ष प्रशांत तेलंग यांचेकडुन माहिती घेतली. त्यानंतर शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या.

पोक्रा अंतर्गत विहिरीचा लाभ घेतलेले मानकापुर येथील शेतकरी संघपाल भगत यांच्या शेतात भेट दीली. यानंतर महीला फार्मर प्रोड्युसर कंपनीनी कृषि ऊत्तपन्न बाजार परिसरात उभारलेल्या शेतमाल क्लीनींग व ग्रेडिंग युनिटला भेट दिली. कंपनीच्या अध्यक्ष अर्चना ताई भोयर उपाध्यक्षा भीसेताई. शारदताई पिसे सरलाताई झोड व अन्य महीला संचालक यांचेशी चर्चा केली. कंपनी च्या बाळासाहेब ठाकरे ग्रामीण परिवर्तन मिशन स्मार्ट योजने अंतर्गत मंजुर दालमील व गोदाम बाबत व पुढील योजनेचे सादरीकरण ऊमेदचे विनोद मस्करे यांनी केले. पोक्रा योजने अंतर्गत लाभ दीलेल्या सौ. निशा भिमराव जाधव यांच्या रेशीम उद्योगास भेट दीली. भिमराव जाधव यांचेकडुन माहिती घेतली व समस्या जाणून घेतल्या. शेवटी अंकुश बगमारे मौजे बेलोन यांच्या शेडनेट व फुल शेतीस भेट दीली. व ऊच्च दर्जाचे व निर्यातक्षम फुल शेती निर्माण करण्याचे मार्गदर्शन केले.

सदर दौ-याचे नियोजन व मार्गदर्शन विभागीय कृषी सह संचालक श्री. किसन मुळे. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नवनाथ कोळपकर व उप विभागीय कृषी अधिकारी यवतमाळ अमोल जोशी यांनी केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी शुभ्रकांत भगत. व कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक हजर होते.

चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील त्या नदीजवळ चारचाकीने दुचाकी स्वारास उडविले


उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

सावली : चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावलीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या चिमडा नदीच्या पुलाजवळ दुचाकी व चार चाकी मध्ये भीषण अपघात होऊन त्यात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 25 ला सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडली आहे.

सावली तालुक्यातील रुद्रापूर येथील शुभम नीलकंठ नरुले (वय 22) असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव असल्याचे कळले आहे. तो मूल वरुन सावली कडे येत असतानाच गडचिरोली वरुन चंद्रपूर कडे जाणाऱ्या चार चाकी शिफ्ट गाडीने त्याला उडविले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला असून सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

वणी विधानसभा क्षेत्राचे मा. आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : वणी, मारेगाव व झरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय व लाडके आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! वणी, मारेगाव व झरी या तीनही तालुक्यातील विकासकामांकरिता पुरेपूर निधी खेचून आणणारे व या तीनही तालुक्यांचा चेहरा मोहरा बदलविण्यात सिंहाचा वाटा असलेले धडाडीचे आमदार मा. संजिवरेड्डी बोदकुरवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.. !

शुभेच्छुक :- मित्र परिवार मारेगाव तालुका 

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मारेगाव तालुका कार्यकारणी जाहीर


सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेची मारेगाव तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांच्या उपस्थितीत मारेगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी अनंतराव गोवर्धन, मारेगाव तालुका अध्यक्षपदी सचिन मेश्राम तर सचिवपदी कैलास ठेंगणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
   मारेगाव येथील विश्राम गृहात झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना भोपळे, मौनोद्दीन सौदागर, जिल्हा सरचिटणीस सचिन काकडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना संघाचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मारेगाव तालुका कार्यकारिणी अशी : तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम, कार्याध्यक्ष दिपक डोहणे, सचिव कैलास ठेंगणे, तालुका उपाध्यक्ष अमोल कुमरे, सहसचिव सुनील उताणे, संघटक रवी घुमे, पंकज नेहारे, कैलास मेश्राम, कोषाध्यक्ष जयप्रकाश वनकर, सुरज झोटींग, प्रसिध्दी प्रमुख संतोष बहादूरे, रोहन आदेवार, विवेक तोडासे, राजू पिपराडे, सुदर्शन टेकाम आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. 
पत्रकार व कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना असून पत्रकारिता करित असताना पत्रकारांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते त्या समस्या संघटनेकडे मांडाव्यात असे प्रतिपादन यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांनी केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक डोहणे तर आभार अनंतरावं गोवर्धन यांनी मानले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

गुरुकृपा सिमेंट प्रॉडक्ट चे संचालक अनंता भाऊ जुमडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : मारेगाव व मार्डी सर्कल (मनसे)चे माजी तालुका प्रमुख तथा गुरुकृपा सिमेंट प्रॉडक्ट प्रतिष्ठान चे संचालक लोकप्रिय व लाडके जनसेवक अनंता भाऊ जुमडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

मारेगाव तालुका व मार्डी या सर्कल मधील सामाजिक कार्या करिता पुरेपूर प्रामाणिक प्रयत्न करणारे व मेहनती च्या बळावर उद्योग उभारणारे व तरुण उद्योजक म्हणून तालुक्याचा नवा चेहरा म्हणून ओळख असलेले धडाडीचे कार्यकर्ते श्री. अनंता भाऊ जुमडे यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !

शुभेच्छुक :- मित्र परिवार मारेगाव व मार्डी सर्कल 

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,

चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव

दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत-परभणी,

उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,

अतुल सावे - जालना, बीड,

शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

गणपती विसर्जनाचा ट्रॅक्टर पलटी; 1 महिला ठार, 27 जण जखमी, 6 महिला गंभीर

उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

नागभीड : चिमूर तालुक्यातील काजळसर येथील नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर मिरवणूकीतील भक्तगण परत येत असताना ट्रॅक्टर पलटी होवून झालेल्या अपघातात 1 महिला ठार तर 35 जण जखमी झल्याची घटना आज शनिवारी दूपारी बाराच्या सुमारास घडली. प्रेमीला गुलाब श्रीरामे (वय ४०)असे मृतक महिलेचे नाव आहे. या अपघातामध्ये शाळकरी मुलीसह अनेक महिला जखमी झाल्या असून 6 जणांची प्रकृती चिंताजणक आहे. त्यांना नागपूरला हलविण्यात आले. चिमूर तालुक्यातील काजळसर येथील नवयुवक गणेश मंडळाने गणेशाची स्थापना दहा दिवस पूजाअर्चा करून आज शनिवारी (24 सप्टेंबर) निरोप दिला. वाजतगाजत मिरवणूक काढीत दूपारी बाराच्या सुमारास घोडाझरी शाल्यात गणेशाचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर भाविक भक्तगण घरी ट्रॅक्टरवर बसून घरी परत येत होते. यामध्ये शाळकरी मुलींसह महिलांचा समावेश होता. जंगल नाक्याजवळील घोडाझरी नाल्याजवळ ट्रॅक्टर ट्रालीने पलटी घेतल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये प्रेमीला गुलाब श्रीरामे (वय 45) या महिलेचा जागेच दबून मृत्यू झाला. तर 35 जण जखमी झाले त्यामध्ये 6 गंभीर जखमी आहेत.घरी परत येणा-या ट्रॅक्टर मध्ये शाळकरी मुलींसह महिला व विज पुरवठा करणारा जनरेटर ठेवण्यात आला होता. ट्रक्टर ला ब्रेक लावल्यामुळे जनरेटर व महिला एका बाजूला झाल्याने एकाच बाजूला वजन वाढले. ट्रक्टर ट्राॅलीने पलटी घेतली. अनेक जखमींना डोके,हात, पायाला मार लागला आहे. काहींचे हात, पाय तुटले आहे तर काहींना छातीला जबर मार लागला आहे. या अपघाताची माहिती होताच काजळसर गावात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी घटनास्थळकडे धाव घेतली. या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला देताच पोलीस घटनास्थळी येवून जखमींना रूग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका बोलाविली. दोन रुग्णवाहिकांनी जखमींना चंद्रपूर, नागपूर, ब्रम्हपुरी रेफर करण्यात आले. मृतकाच्या शवाचे पंचनामा करून उत्तरणीय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले सदर ट्रॅक्टर उद्धव निकोडे यांच्या मालकीचे असून नरेश नावाचा व्यक्ती वाहन चालवित होता.

केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत अडीअडचणी असल्यास त्वरित कळवा – पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : केंद्र सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजना राज्यांमार्फत चालविल्या जातात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मात्र यात काही अडचणी निर्माण होत असतील, तर त्या निदर्शनास आणून द्याव्यात. जेणेकरून संबंधित यंत्रणेशी बोलून त्या सोडविल्या जातील व त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले.

नियोजन सभागृहात केंद्रीय योजनांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम आदी उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये विविध विभागामार्फत केंद्र पुरस्कृत योजना राबविल्या जातात, असे सांगून केंद्रीय मंत्री श्री. पुरी म्हणाले, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. जेथे कुठे अडचण निर्माण होत असेल, अशा बाबी विभाग प्रमुखांनी तात्काळ निदर्शनास आणून द्याव्यात. जेणेकरून संबंधित यंत्रणेशी बोलून त्यावर तोडगा काढता येईल. केंद्र सरकारने दिलेला 15 व्या वित्त आयोगाचा निधी कसा खर्च केला, काही निधी शिल्लक आहे का, आदींबाबत त्यांनी विचारणा केली.
कोणत्याही योजनेच्या तीन – चार ठळक मुद्यांवरच चर्चा व्हायला पाहिजे. सर्व योजना सांगत बसणे योग्य नाही. या योजनांची माहिती संबंधित मंत्रालयाकडे असतेच. योजनेचे जे उद्दिष्ट कार्यान्वयीन यंत्रणा पूर्ण करू शकली नाही, त्याबाबत अधिका-यांनी माहिती द्यावी. जेणेकरून त्यावर लक्ष केंद्रीत करून त्याची सोडवणूक करता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता शहरी स्वराज्य संस्थेला थेट निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचे योग्य नियोजन करावे. पुढील भेटीत यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला जाईल. त्यामुळे अधिका-यांनी पूर्ण तयारीने आणि ठळक मुद्यांवर चर्चा करावी, अशा सुचना केंद्रीय मंत्र्यांनी दिल्या.

यावेळी मनपा, जिल्हा परिषद यांनी केंद्र पुरस्कृत योजनांचे सादरीकरण केले. बैठकीला विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

शेतक-यांना बियाणे वाटप : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत कृषी विभागातर्फे केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते शेतक-यांना ज्वारीच्या बियाणांचे वाटप करण्यात आले. यात चकबोर्डा येथील गौतम सागोरे, बोर्डा येथील सुधाकर खोब्रागडे, पिपरी येथील देविदास देवतळे, देविदास येरगुडे आणि बेलसनी येथील आकाश पोले यांचा समावेश होता.

नरसाळा हद्दीतील मुरमाचे अनधिकृत उत्खननाबाबत तंटामुक्त अध्यक्षाची जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यात अवैध मटका, अवैध दारू हा विषय नसून आता अवैध गौण खनिजाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. गौण खनिजासाठी प्रसिद्ध असलेल्या नरसाळा येथील नेहमीच गौण खनिजाची राजरोसपणे लूट होते. याचा प्रत्यक्ष अनुभव नरसाळा येथील जनतेला आला. 

धामणी येथील तलावाच्या हद्दीतील शेकडो ब्रास मुरुम चव्हाण स्टोन केशर संचालकांने वाहन क्रमांक एम एच २९ बी ई ४१५५, व वाहन क्रमांक एम एच बी ई ०१५३ सहाय्याने गायब केला आहे. या मुरमाची लूट नरसाळा येथील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सुरू असल्याची तक्रार तंटामुक्ती अध्यक्ष रवी बाभळे यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केली आहे.

शेकडो ब्रास मुरमाचे उत्खनन राजरोसपणे होत असून यावर प्रशासनाचे एवढी डोळेझाक का, असा सवाल रवि बाभळे कडुन होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धामणी येथील असलेल्या तलावाच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून अवैध उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन महसूल विभागाच्या मेहेरबानीने सुरू असल्याची चर्चा आहे. याच मेहरबानीच्या वरदहस्ताने मुरूम पळवला जात असून विना रॉयल्टी तलावाच्या जमिनीवर अवैध मुरम उपसा होत आहे.  
एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुरमाच्या उत्खननावर ना पाटबंधारे विभागाचे लक्ष आहे, ना महसूलचे. यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडवला जात तर आहेत परंतु, दमडी खिशात घालण्याचे काम जोमात सुरू आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत अवैध मुरम उपसा केलेल्या जागेचे मूल्यमापन करून चव्हाण स्टोन केशर संचालकावर कारवाई करावी तसेच अशा अवैध प्रकाराला खतपाणी घालणाऱ्या व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी तंटामुक्ती अध्यक्ष रवी बाभळे यांनी केले आहे. तरी या अवैध मुरूम उपसा करणाऱ्यावर शासन काय कारवाई करतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पोलीस भरती एनसीसी आरक्षणावरून पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी दिले निवेदन

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : पोलीस भरतीत एनसीसी आरक्षणावरून पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी 23 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी (sdo) यांना निवेदन दिले. पोलीस भरतीत एनसीसी (ncc) च्या विद्यार्थ्यांना पाच टक्के जास्त गुण मिळण्याबाबत या विरुद्ध विद्यार्थ्यांनी निवेदनातून मागणी केली.


अनेक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एनसीसी युनिट नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना एनसीसी (ncc) घेता येत नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. परिणामी इतर मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा सरासर अन्याय होतो यासंदर्भात विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीतील एनसीसीच्या विद्यार्थ्यांना पाच टक्के मार्क न वाढवून देता त्यांना स्वतंत्र आरक्षण कोटा द्यावे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय याची गृह खात्याने दखल घ्यावी या संदर्भात विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय वणी येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी पोलीस भरती करणारे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.

विलासराव जाधव याची ४९ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी सलग पाचव्यांदा निवड

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : आतापर्यंत असंख्य वणीकरांनी शहराचे नाव अटकेबार नोंदवले आहे. असे म्हणायला हरकत नाही. नुकतेच शैक्षणिक सञ २०२१-२२ चे ४९ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक १८ सप्टेंबर व १९ सप्टेंबर २०२२ रोजी शिक्षणाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे घेण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात अनु.जाती मुलांची शासकीय निवाशी शाळा परसोडा वणी येथिल प्रयोगशाळा सहाय्यक श्री.विलास किसनराव जाधव यांनी दिव्यांग भोजन यंत्र तयार केले होते. हे यंञ ज्या दिव्यांग विद्यार्थ्याला दोन्ही हात नाहीत त्या विद्यार्थ्यांना भोजन करण्यासाठी हे यंत्र अतिशय महत्त्वाचे ऊपयोगी आहे. दिव्यांग भोजन यंत्र या प्रतिकृतीला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेली आहे. विलास यांच्या निवडीचा सर्वच वणीकरांना अभिमान आहे.

विलास जाधव प्रयोगशाळा सहाय्यक यांची जिल्ह्यातून सलग पाचव्यांदा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेली आहे. विलास जाधव प्रयोगशाळा सहाय्यक यांनी अनु.जाती मुलांची शासकीय निवाशी शाळा परसोडा वणी येथे मानाचा तुरा खोवला आहे. या नैञदिपक यशाबद्दल सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यवतमाळ मा.श्री.भाऊराव रामसिंग चव्हाण साहेब यांनी भरभरून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या व महाराष्ट्रातून आदर्श प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून समाज कल्याण विभागातर्फे गौरवण्यात येईल अशी ग्वाही दिली.तसेच प्रादेशिक ऊपायुक्त समाज कल्याण विभाग अमरावती मा.श्री.वारे साहेब यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. मा.आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे मा.श्री.प्रशांत नारनवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात ९० निवाशी शाळा कार्यरत आहे. परंतु अनु.जाती मुलांची शासकीय निवाशी शाळा परसोडा वणी जि.यवतमाळ यांनी आतापर्यंत सलग सहाव्यांदा नेतृत्व करणारी अव्वल निवाशी शाळा ठरली आहे.

सामाजिक न्याय विभागात अप्रतिम कार्य करणारे ऊत्कृष्ट प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून एक वेगळी ओळख आहे. प्रयोगशाळा सहाय्यक विलास जाधव हे सलग विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोगातुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. अतिशय प्रेरणादाई प्रवास या प्रयोगशाळा सहाय्यक यानी केलेला आहे. सतत विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा यासाठी प्रयत्नशिल असलेला ऊत्कृष्ट प्रयोगशाळा सहाय्यक यांनी यावर्षी युनिक असा प्रयोग तयार केला आहे.जो आपण कल्पनाही करु शकत नाही. दोन्ही हात नसलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना हा भोजन यंञ खूप कामी येणार आहे. या अप्रतिम कलाकृतीला महाराष्ट्रातुनच नाही तर गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र ईत्यादी कानाकोपऱ्यातुन प्रयोगशाळा सहाय्यक यांना अभिनंदनाचा वर्षाव आणि शुभेच्छा दिल्या जात आहे.

श्री.विलास किसनराव जाधव हे समाजसेवक आहे. आज पर्यंत निवासी शाळा परसोडा वणी च्या निवाशी शाळेत मानाचा तुरा रोवल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.प्रविण ठमके सर, श्री.संदीप सातपुते सर, श्री.रविंन्द्र चव्हाण सर, श्री.दत्ताञय पूलेनवार सर, श्री.प्रविण खडसे सर, श्री.वैभव दहीकर सर, श्री.दत्ताञय प्रधान भाऊ, श्री.निखाडे सर,श्री.थाटे सर, श्रीमती.माथनकर मॅडम व सर्व शिक्षकेतर सर्व कर्मचारी आणि सर्व स्तरावरून शुभेच्छा व अभिनंदन केले जात आहेत.

नांदेपेरा परीसरातील नागरीकांच्या आंदोलनाला यश..जड वाहतुक खैरी वडकी करंजी मार्गे वळविण्याचा आदेश निघाला


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : नांदेपेरा वणी मागाॆवर मागील 10 महीण्यापासुन कोळशाची जड वाहतुक सुरु होती.ज्यामुळे नागरिकांना ये जा करतांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.वारंवार निवेदन दिल्यानंतरही प्रशासन त्याची दखल घेतांना दिसत नव्हते. 21 सप्टें. ला सायं.7 वाजता हि जड वाहतुक चिखलात फसल्याने वाहतुक खाेळंबली नागरिकांचे येणे जाणे ‌बंद झाले राज्य परिवहन बसेस अडकुन बसल्या. 22 सप्टें. आले‌ तरीही मागॆ खुला झाला नाही. मग नागरिकांनी आक्रमक होत sdo कार्यालयावर धडक दिली.नागरीकांचा तिव्र रोष बघता बंद वाहतुक खूली करण्यात आली.आणि युध्द पातळीवर कार्यवाही करीत उपरोक्त वाहतुक खैरी वडकी करंजीं मागेॆ वळविण्याचा आदेश काढण्यात आला. आजच्या धडकेत काॅ.अनिल घाटे,राकेश खामनकर,सारंग घाटे,अथवॆ निवडींग,अनिल देऊळकर,चंद्रकांत धोपटे,शंकर केमेकर,भारत केमेकर,विलास चिखटे,सुरेश शेंडे यांचे नेत्रुत्वात शेकडो नागरिक उपस्थित होते.

सत्रारंभ सभेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : स्थानिक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉ. गजानन सोडणर, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप केलोड सर व वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रवीण कुलकर्णी सर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचा उद्देश हाच की नवीन सत्रामध्ये प्रवेश घेतलेला राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेची संकल्पना आणि कार्याची माहिती मिळाली पाहिजे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संदीप केलोडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय आणि उद्दिष्टे यावर आपला प्रकाश टाकला तर डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून संत गाडगेबाबांनी केलेल्या कार्याची दाखले देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच डॉ. गजानन सोडणर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थीदशेत राष्ट्रउभारणीमध्ये युवकांचे योगदान या विषयावर आपले मत व्यक्त केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घरडे सर यांनी शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जाव्यात असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख यांनी केले तर रासेयो सह कार्यक्रमाधिकारी प्रा विजय भगत व रासेयो विद्यार्थिनी कु. खुशी खैरे यांनी 'खरा तो एकची धर्म' ही प्रार्थना म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पौर्णिमा काळे हिने केले तर आभार प्रदर्शन वसुधा देवाळकर यांनी मांडले. महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद डॉ. अनिल अडसरे सर, प्रा. शैलेश आत्राम सर, प्रा. अक्षय जेनेकर सर, रासेयो महिला सहकार्यक्रम अधिकारी प्रा. माधुरी शेंडे मॅडम व रासेयो विद्यार्थी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

सीए हर्षद विजय डाखरे याचे दुःखद निधन

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : एसपीएम महाविद्यालयाचे माझी प्राचार्य विजय डाखरे यांचे सुपुत्र हर्षद डाखरे याचे अल्पशा आजाराने 21 सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथे दुखत निधन झाले.अतिशय मनमिळावू सुस्वभावी अभ्यासू वयाच्या 33 व्या वर्षी दुखत निधन झाले.

 हर्षदच्या अशा अकाली जाण्याचे दुःख त्याच्या परिवाराला व मित्र परिवाराला झाले. आज सायंकाळी 9 वाजता वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार झाले.

त्याच्या मागे आई-वडील व बहीण असा मोठा आप्तपरिवार आहे.

जिबगाव येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन...

उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

सावली : तालुक्यातील जीबगांव येथे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगांव येथे दिनांक १/१०/२२ रोज शनिवार ला आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहेत. या आरोग्य शिबिरामध्ये नेत्र तपासणी, बालरोग तपासणी,स्त्री रोग तपासणी व विविध आजाराची तपासणी सकाळी १० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत होणार आहे, तरी जास्तीत जास्त संख्येने प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव येथे उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे, आव्हान या शिबिराचे आयोजकांच्या वतीने केले आहे.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवर मा. खासदार अशोक जी नेते चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्र मा. आमदार बंटी भाऊ भागंडीया चिमूर क्षेत्र मा. माजी आमदार अतुल भाऊ देशकर ब्रह्मपुरी सावली विधानसभा क्षेत्र मा संतोष भाऊ तंगडपल्लीवार माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर, मा भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष अविनाश पाल,मा भारतीय जनता पार्टीचे तालुका महामंत्री सतीश बोमावार, देवराव सावकार मुद्दमवार,प्रकाश पाटील गडमवार, आधी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.

आयोजित शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थीत राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे, आवाहन राकेश गोलेपल्लीवार ग्रामपंचायत सदस्य,राजु देशमुख सेवा सह का सोयायटी अध्यक्ष जिबगांव,अशोक पाल,दिलीप चुदरी,नथ्थुजी राऊत प्रभाकर डायकी पुरुषोत्तम भोयर, विक्रांत भोयर आदिनी केली आहे.

महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठांमध्ये प्रशिक्षणाचा समारोप संपन्न


रुस्तम शेख | सह्याद्री चौफेर 
      
मारेगाव : यवतमाळ स्थित धामणगाव रोडवर असलेल्या महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ यवतमाळ ' येथे दिनांक :14/9/ 2022 ते 18 /9/2022 पर्यंत यवतमाळ ,चंद्रपूर ,गडचिरोली अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातले 55 ते 60 विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. या पाच दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये " जिंदगीमे ना मिले दोबारा " डॉ. ज्ञानेश्वर गोरे," "मानवनिर्मिती विकास" माळी सर "कौशल्य विकास व गटचर्चा" "अनापान- जीवन जगण्याची कला " प्राध्यापक लाहोरे ." सामाजिक क्रांती व प्रतिक्रांतीचा इतिहास "ओबीसी आरक्षणाची" संकल्पना प्रा. सविता हजारे " वैदिक धर्म वैदिक धर्म आणि त्याची सामाजिक आर्थिक सांस्कृतिक व्यवस्था" अरविंद माळी सर" मनुस्मृती नंतरचा भारत" ओबीसी व सर्व जातींची जनगणना" विलास काळे ."ओबीसी आरक्षणाची संकल्पना , भारतीय संतांचे जागृती कार्य "सावित्री आईचे जीवन कार्य "मायाताई गोरे ."महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष" सकारात्मक दृष्टिकोन व कायझेन तंत्र "स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारत "भारतातील प्रचलित विचारधारा" करियर मार्गदर्शन व उद्योजकता" पवन सोनटक्के ."हम होंगे कामयाब ,महात्मा फुले पर्यायी संस्कृतीची जनक "आकाशी झेप घे रे पाखरा "संघटन नेतृत्व. "नवभारतासाठी भूमिका व योगदान "या व इतर विषयावर पाच दिवस प्रदीर्घ चर्चा चिंतन आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रिया करता युवकांनी तयार व्हावे ही भूमिका या प्रशिक्षणामध्ये मांडण्यात आली याच पद्धतीचे प्रशिक्षण महिन्यातून दोन वेळा घेण्याचे महात्मा सत्यशोधक विद्यापीठाची एम.डी. डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त भावना व्यक्त केलेली आहे.

मारेगाव येथे जागृती विचार मंच ची स्थापना- अध्यक्षपदी जितेंद्र नगराळे, ॲड.मेहमुद खान सचिव

रवी घुमे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : शहरात सांस्कृतिक,सामाजिक वैभव समृद्ध करण्यासाठी आणि मनमानी,अन्यायकारक प्रश्नांची सडेतोड उत्तरे देण्यासाठी आता सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिक एकत्र आले आहे. जनतेच्या हिताचे 'सोंग' घेऊन शहरात एका संघटनेचा मनमानी कारभार सुरु आहे. स्वतःचे व्यापारिक हित साधणाऱ्या या उतावीळपणाला शह देण्यासाठी मारेगाव येथे जागृती विचार मंचची स्थापना करण्यात आली.
     
स्थानिक जीत निवासी झालेल्या बैठकीत संघटनेच्या अध्यक्षपदी जितेंद्र नगराळे यांची तर सचिव म्हणून ॲड.मेहमुद खान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
    
या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून आकाश बदकी, विशाल किन्हेकर, संतोष रोगे सहसचिव, चांद बहादे , कोषाध्यक्ष - करण किंगरे, संघटक विप्लव ताकसांडे, मार्गदर्शक - उदय रायपूरे, खालीद पटेल, राजू मोरे, प्रशांत नांदे, अभय चौधरी, बदरुद्दीन सय्यद प्रसिद्धी प्रमुख - दीपक डोहणे, कैलास ठेंगणे, पंकज नेहारे तर इकबाल सैय्यद, प्रविण काळे, महेंद्र पुरडकर, लाभेश खाडे, विनीत जयस्वाल, जुनेद पटेल, शाहरुख शेख यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

नांदेपेरा वणी रोड जड वाहतुकीस बंद करावा- नागरिकांची ेमागणी


चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : वणी ते नांदेपेरा हा रोड साधारणतः 8 ते 10 टन वाहतुकीसाठी क्षमतेचा आहे. असे असूनही 'एकोना' कोळसा खदान मधुन निघालेला कोळसा गेल्या 10 महीन्यापासून क्षमतेच्या जास्त 20 ते 50 टनापर्यंत कोळसा भरुन 16 ते 20 चाकी मोठे ट्रकची वाहतुक सुरु आहे. ज्यामुळे रोडवर मोठे खड्डे पडले आहे,रोड पूर्णतः उखडला आहे. नेहमी रोड जाम व अपघात झालेले आहे. या वाहतुकीला परीसरातील नांदेपेरा,मजरा,वांजरी,शेलु,भुरकी,रांगना,सोनापुर,वनोजा (देवी),मच्छिन्द्रा येथील नागरिकांचा विरोध आहे.वारंवार लेखी स्वरुपात प्रशासनाला निवेदन दिले आहे. करीता उपरोक्त वाहतुक दि.26/9/22 पर्यंत तात्काळ बंद करण्यात यावे. अन्यथा दि.27 सप्टेंबर पासुन नांदेपेरा बसस्टाॅप समोर बेमुदत रास्ता रोको आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन दि.16 सप्टेंबर 2022 रोजी वणी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. निवेदन देतांना काॅ.अनिल घाटे,अथर्व निवडिंग,शुभम खाेंडे,साहील बोधे,नयन निवडिंग,पवन पिंपळशेंडे,अमित डोंगे,राकेश खामनकर,रोशन गोबाडे,प्रज्वल कोल्हे,यांचे नेत्रुत्वात परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

चर्म व्यवयसाय करणारे मारेगांव येथील नामदेवराव खोले यांचे निधन


रवी घुमे | सह्याद्री चौफेर

मारेगाव : मुळचे वेगाव येथील प्रसिद्ध चर्मोद्योग करणारे व चर्मवाद्य तयार करणारे तालुक्यातील एकमेव कारागीर नामदेवराव खोले यांचे पक्षाघात विकाराने आज दि.17/09/22 ला सकाळी 8वा. निधन झाले.
अंदाजे सहा महिन्यांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी व नातवंड असा आप्तपरिवार आहे.
    
त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली.
त्यांच्या पार्थिवावर दुपारी 3 नंतर वेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याचे नजिकच्या नातेवाईकांनी सांगितले. 

धोत्रा येथे अपघातात एकाच मृत्यू दोन गंभीर

रुस्तम शेख : सह्याद्री चौफेर 

कळंब : तालुक्यातील धोत्रा येथे राळेगांव रोड वर अपघात झाला असुन या मध्ये एक व्यक्तीचा मृत्यु झाला असुन दोन व्यक्ती गभीर जखमी झाले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आज रोजी सांय ६-०० वा दरमान यवतमाळ येथुन राळेगांव कडे जाणारी महेंद्र XUV -3०० ( गाड़ी क्र MH-29-BP9110 )या चार चाकी वाहणाने धडक दिल्याने रोही ठार झाले तर राळेगांव वरून कळंब कडे जाणाऱ्या TVS लुना (गाडी क्र MH-29AX95o9) चालक नामे प्रदीप नारायण पेंदरे वय ४८ वर्ष रा पारवेकर नगर कळंब याला सुद्धा धडक लागल्याने जागीच ठार झाला . तर चार चाकी गाडीचे चालक व सोबत असलेले एक व्यक्ति गंभीर जखमी झाले असुन उपचारा करीता यवतमाळ येथे शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आले.

पुढील तपास पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजीत राठोड यांच्या मार्गदर्शन खाली सुरू आहे.

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात शासन सकारात्मक – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : महिला व बालविकास विभागात अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढ व इतर मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून लवकरच याबाबतीत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

मंत्रालयातील दालनात एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल, उपसचिव वि. रा. ठाकूर, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम.ए.पाटील, दिलीप उटाणे, आरमाइर इराणी, अतुल दिघे, राजेश सिंग, संगीता कांबळे, दत्ता देशमुख यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, राज्यातील एक लाख 10 हजार अंगणवाड्यांच्या माध्यमातून राज्यातील बालके व गरोदर महिलांची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका करत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढ तसेच विविध प्रश्नांबाबत शासन संवेदनशील आहे. मानधन वाढीचा निर्णय हा धोरणात्मक निर्णय आहे याबाबतीत विभागाने प्रस्ताव पाठवावा त्यावर मंत्रिमंडळात निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव येथे मानव विकास शिबिर संपन्न....


उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

सावली : तालुक्यातील 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिबगाव येथे मानव विकास शिबिर घेण्यात आले यावेळी गरोदर माता.स्तनदा माता.व 0 ते 6 वयोगटातील मुले-मुली उपस्थित होते.त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्य विषयी मार्गदर्शन करण्यात आले त्यावेळी उपस्थित डॉ.ओम सोनकुसरे साहेब.डॉ.रंजित पावरा साहेब..डॉ.ऐश्वर्या गेडाम वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव.चौधरी साहेब पं.समिती सावली.भिमनवार साहेब .सि.ए चो.राउत मॅडम. मा. शेख साहेब कनिष्ठ लिपिक तपासे सर.ठाकरे सर. गदेकार सर .यम्पलवार सिस्टर.राउत सिस्टर.नितीन राउत.कैलास कंकलवार.उमेश गोलेपल्लीवार नागेश बारसागडे सुरज मंडोगडे.वैशाली गेडाम.भुमिकाताई उईके.व आशा वर्कर उपस्थित होते.

चिल्ली ईजारा येथे वन कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्याना वृक्षसंवर्धनाची माहिती


नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर 

महागांव : झाड लावणे काळाची गरज आहे. झाडांपासुन मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन फुले फळे मिळतात पर्यावरणाचे संतुलन टिकविण्यासाठी वृक्ष हा महत्वाचा घटक आहे प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावलं पाहीजे,असा संदेश वन कर्मचाऱ्याकडून देण्यात आला.

यावेळी वाघ,चित्ता व इतर प्राण्यांबद्दल माहिती देण्यात आली. वन्यजिव प्राण्यापासुन स्वताचे संरंक्षण कसे करावे ह्या बाबतची सविस्तर माहिती विद्यार्थ्याना देण्यात आली.

या प्रसंगी वाय.बि.गायकवाड (वनरक्षक दगडथर बिट), आय.टी.फोफसे (वनरक्षक चिल्ली बिट), कुमारी ए.डि.मोतेवार (वनरक्षक काळी बिट), गणेश जाधव व उच्च प्राथमिक मराठी शाळा चिल्ली ईजारा शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.