नांदेपेरा परीसरातील नागरीकांच्या आंदोलनाला यश..जड वाहतुक खैरी वडकी करंजी मार्गे वळविण्याचा आदेश निघाला


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : नांदेपेरा वणी मागाॆवर मागील 10 महीण्यापासुन कोळशाची जड वाहतुक सुरु होती.ज्यामुळे नागरिकांना ये जा करतांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.वारंवार निवेदन दिल्यानंतरही प्रशासन त्याची दखल घेतांना दिसत नव्हते. 21 सप्टें. ला सायं.7 वाजता हि जड वाहतुक चिखलात फसल्याने वाहतुक खाेळंबली नागरिकांचे येणे जाणे ‌बंद झाले राज्य परिवहन बसेस अडकुन बसल्या. 22 सप्टें. आले‌ तरीही मागॆ खुला झाला नाही. मग नागरिकांनी आक्रमक होत sdo कार्यालयावर धडक दिली.नागरीकांचा तिव्र रोष बघता बंद वाहतुक खूली करण्यात आली.आणि युध्द पातळीवर कार्यवाही करीत उपरोक्त वाहतुक खैरी वडकी करंजीं मागेॆ वळविण्याचा आदेश काढण्यात आला. आजच्या धडकेत काॅ.अनिल घाटे,राकेश खामनकर,सारंग घाटे,अथवॆ निवडींग,अनिल देऊळकर,चंद्रकांत धोपटे,शंकर केमेकर,भारत केमेकर,विलास चिखटे,सुरेश शेंडे यांचे नेत्रुत्वात शेकडो नागरिक उपस्थित होते.