राज्य सरकार करणार जि. प. च्या 30 हजार शिक्षकांची मेगा भरती, 'या' महिन्यात होणार 'टेट' परीक्षा..

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

मुंबई : जिल्हा परिषद शाळांमध्ये 29,600 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या शिक्षक भरतीसाठी फेब्रुवारी-2023 मध्ये शिक्षक पात्रता चाचणी (टेट) होणार असून, निकाल मार्चमध्ये जाहीर केला जाईल. मेरिटनुसार पात्र उमेदवारांना पवित्र पोर्टलद्वारे जूनपूर्वी थेट नियुक्ती दिली जाईल.

राज्यात गेल्या चार वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने लवकरच शिक्षक भरती करण्याचे नियोजन केले आहे.
फेब्रुवारीत होणार 'टेट'

पहिली ते आठवीच्या शाळांवरील शिक्षकांसाठी 'टीईटी', तर नववी ते अकरावीपर्यंत शाळांवरील शिक्षकांसाठी ‘टेट’ परीक्षा घेतली जाणार आहे. फेब्रुवारीत ही परीक्षा होईल. त्यासाठी सहा हजारांहून अधिक केंद्रांवर ही परीक्षा होईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.

परीक्षेच्या नियोजनासंदर्भात शालेय शिक्षण विभाग उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. परीक्षेचा निकाल जाहीर होताच, भरती प्रक्रिया सुरु होईल,परंतु त्यासाठी वित्त व नियोजन विभागाचा ‘हिरवा कंदिल’ मिळणे आवश्यक आहे.


गायरान जमिनीवरील घरे अतिक्रमण म्हणून काढणार नाही

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : गायरान जमिनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत, असा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने चर्चेअंती घेतला. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आग्रहानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडून मंजूर करून घेतला. त्याबद्दल श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले. राज्यातील सुमारे सव्वादोन लाख कुटुंबांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत कार्यवाही करण्यात येणार होती. परंतु, या गरीबांची घरे निष्कासित करणे योग्य नाही, असे श्री. मुनगंटीवार यांनी आग्रहपूर्वक मांडले. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत एकाही व्यक्तीचे अतिक्रमण काढले जाणार नाही, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. यासंदर्भात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल करेल, असेही श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

राज्यात 2 लाख 22 हजार 382 व्यक्तींची घरे शासनाच्या गायरान जमिनीवर आहेत. परंतु, या गरीबांची घरे निष्कासित करणे शक्य नसल्याने त्याठिकाणी गावठाणचे पट्टे तयार करता येतील का याची चाचपणी करण्याचे सरकारने ठरवले आहे. गाव किंवा शहराजवळील गायरान जमिनीवर अनेक वर्षांपूर्वी हातावरील पोट असलेल्या निराधार व्यक्तींनी घरे बांधली आहेत. त्यातील अनेकांना राहायला स्वतःची जागादेखील नाही. त्यामुळे त्यांचे गायरान जमिनीवरील अतिक्रमण न काढण्याबाबत राज्य सरकार अनुकूल आहे. या लोकांसाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

अतिक्रमणासंदर्भात ज्यांना ज्यांना नोटीस दिली आहे, त्या नोटीसा मागे घेण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. परंतु, यापुढील काळात शासकीय जमिनीवर अतिक्रमण होणार नाही, यादृष्टीने देखील स्वतंत्र धोरण आखले जाणार आहे.

मारेगाव: अतिवृष्टी निधीची यादी बँकेत पाठवल्याची मनसेने खात्री करून लेखी घेतली

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

मारेगांव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन दिवसापूर्वी प्रशासनाला निवेदन दिले होते, त्यात निधी तात्काळ खात्यात जमा करण्याची मागणी सह ईशारा दिला होता, निवेदनाची दखल घेत तहसिलदार पुंडे यांनी संबंधित बँकेकडे लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादया पाठवून मनसे पदाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले.

मागील जुलै-ऑगष्ट महिन्यात अतिवृष्टीने व महापूरात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, प्रशासन व राजकिय नेत्यानी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली मात्र शेतकऱ्याना नुकसान भरपाई मिळण्यास होणारा विलंब पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांच्या नेतृत्वात तहसिल प्रशासनाला निवेदन देण्यात आले, यात त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा निधी तातडीने खात्यात जमा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देताच तहसिलदार दिपक पुंडे यांनी कर्मचार्‍याना आदेश देत उर्वरीत शेतकऱ्यांच्या यादया दुरस्त करून बँकेत पाठवल्या, आज बुधवार दि ३० नोव्हेबरला मनसे कार्यकत्यानी तहसिलदार पुंडे यांची भेट घेत यादया बँकेत पाठवल्याची खात्री करत तहसिलदार पुंडे यांचेकडून बँकेत निधी पाठवल्याचे लेखी पत्र घेतले.

यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, शहर अध्यक्ष नबी शेख, चांद बहादे, विलास रायपुरे, गजु चंदनखेडे, किशोर मानकर, संतोष राठोडसह असंख्य मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

उमरखेड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मंजूर करा


सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के

उमरखेड : उमरखेड महागाव - तालुक्यातील यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा कंपनीने अत्यल्प पैसे जमा करून शेतकऱ्यांची विमा कंपनीने फसवणूक केली. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी कंपनीकडे क्लेम केलेला असतांना काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रिमियम पेक्षाही कमी पैसे जमा करण्यात आले. व काही शेतकरी वंचित राहीले आहेत. 

त्यामुळे तहसीलदार यांनी बाबींचा विचार करून उमरखेड महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मंजूर करून आठवड्यात शेतकन्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात यावी. व तालुक्यातील जे शेतकरी पीक विम्यापसुन वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात यावे अन्यथा 'प्रहार' शेतकरी संघटनेच्या जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा 'प्रहार' शेतकरी संघटना यांच्या वतीने देण्यात आला, विश्वास पतंगे, (प्रहार शेतकरी ता.अध्यक्ष) बंडू हामंद (प्रहार ता.प्रमुख) लालजी पतंगे, आशिष हामंद, अंकुश पानपट्टे, विवेक जळके, सावन हिंगमिरे, संतोष माने, बबलू जाधव, बालाजी माने, संतोष माने, गोविंदराव सावंत, फकीरराव श्रोते, आबाराव वाघमारे, प्रमोद दवणे, व उमरखेड तालुक्यातील इतर शेतकरी उपस्थित होते.
   (तहसीलदार यांना निवेदन देतांना प्रहार पदाधिकारी)

तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा कंपनीने अत्यल्प पैसे जमा करण्यात आले आहे. यासंदर्भात मी जिल्हाधिकारी येडगे यांना तात्काळ उमरखेड तालुक्यातील पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जी अत्यल्प पैसे जमा करण्यात आले आहे.    
  तालुक्यातील अशा शेतकऱ्यांना विमा कंपनीने पैसे जमा करण्यात यावेत व वंचित शेतकरी आहेत. त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी यासंदर्भात अहवाल सादर करण्यात येईल असे सांगितले.

   - आनंद देऊळगावकर

"ए..आपण चहा घ्यायचा?.. दोन अंकी नाटक प्रियदर्शिनी नाट्य गृह चंद्रपूर इथे सादरीकरण

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत अंजना उत्तम बहूऊद्देशिय संस्था चिखलगांव वणी यांनी प्राचार्य हेमंत चौधरी निर्मित च.प्र.देशपांडे लिखित व राधा सोनटक्के दिग्दर्शित नाटक "ए..आपण चहा घ्यायचा? हे दोन अंकी नाटक प्रियदर्शिनी नाट्य गृह चंद्रपूर इथे सादर करण्यात आले.
या नाटकाला चंद्रपूर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला प्रेक्षकांच्या सारख्या टाळ्यांच्या कडकडाटात हे नाटक दोन तास हसवत आणि सामाजिक संदेश देऊन गेलं.
                     (नाट्य प्रयोग सादरीकरण)

या नाटकात मुख्य भूमिका प्राचार्य हेमंत चौधरी,सौ.सिमा सोनटक्के, उमाकांत म्हसे,सौ.मिना वानखडे तसेच वणीचे जेष्ठ कलावंत अशोकराव सोनटक्के यांनी भुमिका उत्कृष्टपणे पार पाडल्या आणि पुन्हा एकदा वणीच्या नाट्य परंपरेला उच्च शिखरावर पोहचवले.

राष्ट्रीय संगीत अकादमीचे कार्य उल्लेखनीय – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : संगीत नाटक क्षेत्राच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय अकादमीच्या माध्यमातून सुरू असलेले काम उल्लेखनीय आहे. डॉ. संध्या पुरेचा येणाऱ्या काळात राष्ट्रीय संगीत अकादमीच्या माध्यमातून नव्या पिढीला या क्षेत्राची ओढ लावण्यात यशस्वी ठरतील असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांनी काल संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी बांबू निर्मित तिरंगा भेट देऊन डॉ संध्या पुरेचा यांचा सांस्कृतिक मंत्री यांनी सत्कार केला.

संगीत नाटक क्षेत्रातील प्रतिष्ठित मानले जाणारे 3 विविध गटांतील 17 पुरस्कार गेल्या तीन वर्षात महाराष्ट्राने पटकावले ही बाब गौरवास्पद असून राज्यात संगीत नाटकास प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यासाठी राज्य शासन कलावंतांच्या पाठीशी उभे राहील असा विश्वास श्री.मुनगंटीवार यांनी डॉ संध्या पुरेचा यांच्याशी बोलताना व्यक्त केला. यावेळी अकादमीचे कार्यकारी सदस्य डॉ विद्याधर व्यास, डॉ. उमा डोगरा, डॉ. प्रकाश खांडगे उपस्थित होते.

अतिक्रमणधारकांना हक्काची जागा मिळवून देण्याकरीता सावली तहसिल कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

 सावली : आज दिनांक 30/11/2022 ला अतिक्रमण धारकांना हक्काची जागा मिडवून देण्याकरिता सावली तहसील कार्यालयावर धडक मोर्च्या काढण्यात येणार आहे या मोर्च्यात जनतेनी सहभागी होण्याचे आवाहन सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी केले आहे.

याबाबत सविसतर वृत्त असे की, तहसील प्रशासनाने सावली तालुक्यातील जनतेला नोटीस पाठवून सरकारी व गायरान जागेवरील अतिक्रमण त्वरित हटवीण्याबाबत बाजवले होते त्यामुळे सावली तालुक्यातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
सावली तालुक्यातील अनेक गावामध्ये सरकारी व गायरान जागेवर लोकांनी पक्के घरे बांधलेली आहेत सदर घरे ही अनेक वर्षापासून आहेत या जागेवर सरकारच्या माध्यमातून पक्के रस्ते, नाली बांधकाम, विज व्यवस्था, या सारख्या अनेक सोई उपलब्ध झाल्या आहेत मात्र शासनाच्या पत्रामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

दरम्यान,सदर अतिक्रमण बाबत सावली तालुका काँग्रेस कमिटीने राज्यचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सदर बाब लक्ष्यात आणून दिली असता ततकाळ त्यांनी लोकांच्या मागणी बाबत चर्चा करून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. जनतेची घरे पाडू नयेत, व अतिक्रमण धारक गरीब जनतेला घराची कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावीत अश्या प्रमुख मागण्या या मोर्च्यात करण्यात येणार आहेत सावली तालुक्यातील जनतेनी सदर मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन सावली तालुका काँग्रेस चे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी केले आहे.
सदर मोर्च्याचे नेतृत्व माजी मंत्री आमदार विजय भाऊ वडेट्टीवार हे करणार असून जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष प्रकाश देवतले, संदीप गड्डमवार, दिनेश चिटनूरवार, लता लाकडे, संदीप पुण्यपवार, विजय कोरेवार, यांची उपस्थित राहणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडुन आदिवासी गोंड गोवारींच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब - माधव कोहळे


सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

यवतमाळ : सर्वोच्च न्यायालयाने सिविल आपिल 4096/2020 दिनांक 18डिसेंबर2020 नुसार ऐतिहासिक निर्णय दिला आहे.यामध्ये मुद्दा क्रमांक 31 व 75 नुसार कालेलकर आयोगाने गोवारींची शिफारस केली असताना संसदेच्या संमतीने नोंद गोंड गोवारी झाल्याचे स्पष्ट नमुद आहे.परंतु मुद्दा क्रमांक 83 व मुद्दा क्रमांक 92 नुसार तेच गोवारी ' गोंड गोवारी' च्या सवलती साठी पाञ आहेत जे ढाल, वाघोबा, नागोबा, भिवसन, मोठा देव यांना पुजतात. ही संस्कृती आपलीच असल्याने आपण त्या सवलतीस पाञ असुन आपल्या गोंड गोवारीं च्या आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. असे प्रतिपादन आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष माधव कोहळे यांनी केले.ते चोंदी ता.राळेगाव येथे आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समितीच्या नामफलकाचे उद्घाटन प्रसंगी  प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.सर्वोच्च न्यायालयाचे असे स्पष्ट निर्देश असतांना व शासनाची कोणतीही लेखी मनाई नसताना जिल्ह्यातील प्रशासन गोंड गोवारी जात प्रमाणपञाचे प्रस्ताव व यवतमाळ येथील अनुसुचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समिती जात वैधता प्रस्ताव रद्द करुन गोंड गोवारींची मुस्कटदाबी करीत आहे.परंतु प्रशासनाची ही मुजोरी जास्त दिवस चालणार नाही व आम्ही कायदेशीर मार्गाने ती हानुन पाडू असे कोहळे यांनी यावेळी म्हटले.यावेळी गजानन ठाकरे व प्रविण नागोसे यांनी मनोगत व्यक्त केले.
        
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शरद शेंद्रे हे होते तर धनराज खंडरे, पुंडलिक फुन्ने, सरपंच निता कोवे, किशोर कोवे, दिनेश पेंदोर, रमेश कोवे, विवेक नागापुरे, शंकर रीठे, निखिल नागापुरे, सुनिल नेहारे, राजू राउत, कवडुजी दुधकोहळे, अनिल चांदेकर, देवांगना आडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्तविक दिनेश पेंदोर यांनी केले तर सुञसंचालन धनराज राठोड यांनी केले.आभार  प्रशांत बोटरे यांनी मानले.कार्यक्रमाचे  यशस्वीतेसाठी किशोर शेंद्रे,वाल्मिक बोटरे,उत्तम बोटरे,विजय राऊत,ज्ञानेश्वर राऊत,महादेव शेंद्रे,योगेश वाघाडे,प्रदीप वाघाडे,वासुदेव बोटरे,सुरेश मुरखे,प्रविण बोटरे,,ञ्यंबक ऊईके,पांडुरंग राऊत,शालू शेंद्रे,दुर्गा वाघाडे,गीता वाघाडे यांनी परिश्रम घेतले.

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीयस्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना दुप्पट अनुदान देण्यात येणार — सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

मुंबई : गेल्या काही वर्षात मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीयस्तरावर पुरस्कार मिळत आहेत. अशा पुरस्कार प्राप्त मराठी सिनेमांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे चित्रपट उद्योगातील चित्रपट/टिव्ही/ओटीटी प्लॅटफॉर्म निर्माते, तंत्रज्ञ यांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, कोल्हापूर चित्रनगरीचे संजय पाटील, दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक, लेखक आणि दिग्दर्शक संतोष आयाचित, निर्माते सुनील भोसले, निर्माते संदीप घुगे, अभिनेत्री सुषमा शिरोमणी, शामाशिष भट्टाचार्य, शेमारू कंपनीचे केतन मारू, चैतन्य चिंचलीकर यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
श्री.मुनगंटीवार म्हणाले की, प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यामागे हा हेतू आहे की, महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीयस्तरावरील पुरस्कार विजेते चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत आणि या चित्रपट निर्मात्यांनी भविष्यात अधिक चांगल्या सिनेमाची निर्मिती करावी. मराठी सिनेमांना प्राईम स्लॉट मिळावा यासाठी लवकरच महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स मालकांसोबत बैठक घेण्यात येईल.

गेल्या अनेक वर्षांपासून गोरेगावच्या चित्रनगरीत अनेक मराठी मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. या मालिका निर्मात्यांना पहिल्या वर्षी चित्रीकरण भाड्यात ५० टक्के तर दुसऱ्या वर्षी २५ टक्के सूट देण्यात येते. यापुढे मालिका पहिल्या वर्षानंतर चालू राहिल्यास त्यांना चित्रीकरण भाड्यात २५ टक्के सूट देण्यात येईल. चित्रनगरीत चित्रीकरण करण्यासाठी दर आकारण्यात येतात, हे दर किती असावे, ते कधी नेमके वाढवण्यात यावे याबाबत धोरण ठरविण्यात येणार असल्याने श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
चित्रनगरीमध्ये एक खिडकी योजना सुरू असून यामध्ये चित्रीकरणाची परवानगी दिली जाते. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे पर्यटन क्षेत्रात चित्रीकरण करावयाचे असल्यास पूर्वी ५४ हजार प्रती दिवस शुल्क होते. मात्र, यापुढे मराठीसाठी ३० हजार रुपये आणि अन्य भाषेसाठी ३५ हजार रुपये प्रती दिवसाचे चित्रीकरण शुल्क असेल, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

दादासाहेब फाळके चित्रनगरीचा परिसर ५२१ एकरने व्यापलेला आहे. चित्रनगरी परिसरात एकूण १५ कलागारे असून ७० बाह्य चित्रीकरणस्थळे आहेत. आजपर्यंत चित्रनगरीत अनेक मराठी, हिंदी अन्य भाषांच्या चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात येत असून आजही अनेक चित्रपट, मालिका तसेच प्रसिद्ध कथाबाह्य कार्यक्रमांचे चित्रीकरण होत आहेत. आगामी काळात या चित्रनगरीचे अत्याधुनिकीकरण करण्याबाबत आराखडा करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ६५ जागांचे नूतनीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील नाट्यगृहांचे अत्याधुनिकीकरण याबाबतही नियोजन करण्यात येत आहे, असेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

अधिसंख्य कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देणार; अनुसूचित जमातीची रिक्त पदे तत्काळ भरणार

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच सेवानिवृत्ती विषयक लाभ देण्याचा त्याचप्रमाणे मानवतावादी दृष्टीकोनातून तांत्रिक खंड देऊन पुन्हा ११ महिन्यांच्या कालावधीकरिता त्यांच्या सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

अनुसूचित जमातीची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही देखील तत्काळ सुरू करण्यात यावी, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले.

अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे ३ हजार ८९८ कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे.

आज घेण्यात आलेल्या निर्णयामुळे अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या शासनाच्या प्रचलित धोरण व नियमानुसार लाभ मिळतील. या अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती, वेतनवाढ मिळणार नाही तसेच अनुकंपा धोरण लागू राहणार नाही.

डिजिटल इंडियाला वेग देण्यासाठी ग्रामीण भागातील मनोऱ्यांकरिता मोफत जागा

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या डिजिटल इंडिया मोहिमेस वेग देण्याकरिता राज्यातील २३८६ गावांमध्ये बीएसएनएलला मनोरे उभारण्यासाठी २०० चौ.मी. जागा मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

केंद्र शासनातर्फे सर्व गावांमध्ये ४ जी सेवा उपलब्ध करण्यासाठी ९ डिसेंबर २०२३ चे उद्दिष्ट असून त्याअनुषंगाने बीएसएनएलने प्रस्ताव दिल्यावरुन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये निवडक गावांमध्ये २०० चौ.मी खुली जागा अथवा गायरान जमीन विनामुल्य देण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे आलेल्या प्रस्तावाला मनोरा उभारणीस १५ दिवसात मंजूरी देणे आवश्यक आहे. याठिकाणी महावितरण कंपनीने दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत वीज पुरवठा व जोडणी देणे आवश्यक आहे. केबल टाकण्यासाठी या ठिकाणच्या रस्त्याचा वापर विनामुल्य करण्यास मान्यता देण्यात येत असून या ऑप्टीकल फायबर केबल साठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कुठलेही भाडे आकारण्यात येणार नाही.

बल्लारपूर रेल्वे दुर्घटनेतील दोषींवर पोलिस अहवालानुसार कारवाई 

उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रविवारी अचानक पादचारी पूल कोसळल्याने एकाचा दुर्देवी मृत्यू होवून अनेक प्रवासी जखमी झाले. या घटनेच्या चौकशीसाठी पोलिस विभागामार्फत गुन्हा नोंदविण्यात आला असून चौकशी अहवालानंतर दोषीवर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.



घटनेच्या दिवशी (रविवारी) रेल्वे स्थानकाला भेट दिल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी देखील (सोमवारी) पालकमंत्र्यांनी बल्लारपूर रेल्वे स्थानकास भेट देवून रेल्वे प्रशासनाचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, रेल्वे प्रशासनच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे, लोहमार्ग पोलिस अधिक्षक वैशाली शिंदे, रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक कृष्णा पाटील, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी, बल्लारपूर स्टेशन प्रबंधक ए.यु.खान, तसेच नॅशनल रेल्वे युझर्स कौन्सिलचे सदस्य अजय दुबे, चंदनसिंह चंदेल, डॉ. मंगेश गुलवाडे, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, ब्रिजभूषण पाझारे, राहुल पावडे, प्रज्वलन कडू, सुरज पेदूलवार, नीलेश खरवडे आदी उपस्थित होते.

रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षा यंत्रणेची काय सुविधा आहे, याबाबत पालकमंत्र्यांनी विचारणा करून माहिती घेतली. स्टेशनवरील सध्याचे दोन्ही पूल तातडीने दुरूस्त करून घेण्याचे तसेच नवीन पादचारी पुलाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून तेथे प्रवाशांसाठी लिफ्टची सुविधा सुरू करावी, असे त्यांनी निर्देश दिले. तसेच बल्लारपुर व चंद्रपूर या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या नूतणीकरणासाठी प्रत्येकी 10 कोटी रुपये आणि वयोवृद्ध प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मवर सीएसआर फंडमधून बॅटरी ऑपरेटेड कार देण्यात येईल. या गाड्यांवर जिल्ह्यातील प्रेक्षणिय स्थळांचे ‘क्यूआर कोड’ विकसीत करावेत. जेणेकरून बाहेरून येणाऱ्या नागरिकांना जिल्ह्याची माहिती उपलब्ध होईल.

स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या संख्येत वाढ करून ती 40 वरून 60 करण्यात येईल. आंध्रप्रदेशाकडून येणाऱ्या गाड्यासाठी बल्लारपूर हे महाराष्ट्रातील पहिलेच महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून या ठिकाणी रेल्वे पोलिस ठाणे सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. बल्लारपूर रेल्वे स्थानकावर येणाऱ्या गाड्यांचे नियोजित प्लॅटफॉर्म वेळेवर बदलत असल्याबाबत प्रवाशांची तक्रार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांकाबाबत वेळेवर घोषणा होत असल्याने नागरिकांची धावपळ होते. ते त्यांच्या जीवावरही बेतू शकते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी व येणाऱ्या गाडीचा प्लॅटफार्म निश्चित करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

चंद्रपूर जिल्ह्याशी संबंधीत रेल्वेचे सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी रेल्वेमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे. चंद्रपूरबाबत विशेष बैठक घेवून ते आढावा घेणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच या बैठकीचा पाठपुरावा करण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले. याप्रसंगी रेल्वे प्रशासनातर्फे गंभीर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये व किरकोळ दुखापतग्रस्तांना 50 हजार रुपये रोख अदा करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

बैठकीला जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

एकोना खाण बाधितांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील एकोना खाण व्यवस्थापनाबद्दल परिसरातील गावकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. स्थानिकांना रोजगार, रस्त्यांची दुरुस्ती, कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) परिसराचा विकास अशा अनेक प्रश्नांसाठी 24 नोव्हेंबर पासून गावकऱ्यांनी जनआंदोलन पुकारले आहे. गावकऱ्यांच्या या मागण्या त्यांच्या हक्काच्या आहेत. त्यामुळे एकोना कंपनीच्या व्यवस्थापनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन गावकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्या, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

नियोजन भवन येथे एकोना बाधितांच्या संदर्भात कंपनीच्या व्यवस्थापनाशी आणि गावकऱ्यांशी चर्चा करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, वरोराचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, एकोनाचे सरपंच गणेश चवले, पाटाडाचे सरपंच विजेंद्र वानखेडे, वनोदाच्या सरपंच शालू उताणे, उपसरपंच सचिन बुरडकर, चंद्रकला नरसिंगे, योगिता पिंपळशेंडे व गावकरी उपस्थित होते.
एकोना खाणीमुळे बाधित झालेल्या गावकऱ्यांचे प्रश्न अतिशय रास्त आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने परिसरातील 24 ग्रामपंचायतींची बैठक घ्यावी. एवढेच नाही तर जिल्ह्यात विविध खाण परिसरात असलेले सर्व रस्ते शोधावे. या रस्त्यासांठी डब्ल्यूसीएल, सीएसआर फंड, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच खनिज विकास प्रतिष्ठानमधून निधी दिला जाईल. ब्लास्टिंगमुळे नागरिकांच्या घराला तडे गेले आहेत. याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने त्रयस्त यंत्रणेद्वारे (एनआयटी) तडा गेलेल्या घरांचे सर्वेक्षण करुन त्याचा अहवाल 30 दिवसात सादर करावा.

कपंनीमध्ये वाहतूक करण्यासाठी ट्रक कंत्राटदारकाकडे स्थानिकांचे ट्रक लावावे. ट्रक कंपन्यांशी बोलणी करून सवलतीच्या दरात ट्रक उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच याबाबत स्थानिक नागरिकांना चालकाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे. जेणेकरून त्यांना रोजगार उपलब्ध होईल. खाणीमध्ये सद्यस्थितीत सुरू असलेल्या ट्रकची आरटीओ यांनी तपासणी करावी. वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरील ताडपत्री अतिशय चांगली असली पाहिजे. कंपनीने दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात. याबाबत ग्रामपंचायतीने त्वरीत प्रस्ताव देऊन त्याचा पाठपुरावा करावा.
सीएसआर फंडामधून विकासकामे करण्यासाठी सरपंचांकडून कामाची यादी घ्यावी. यात प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, रस्ते, पिण्याचे स्वच्छ पाणी आदींचा समावेश असावा. या प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्या कुटुंबाच्या सदस्यांना कंपनीने नोकरी दिलीच पाहिजे. परिसरातील अशा तरुण – तरुणी शोधून त्यांची यादी तयार करावी. सध्या खाणीमध्ये जे कार्यरत आहेत, ते स्थानिक आहेत की नाही, त्यांच्याकडे स्थानिक परिसरातील रेशनकार्ड आहे की नाही, ते तपासावे. एवढेच नाही तर एकोना खाणीमध्ये रोजगाराची नियुक्ती देणाऱ्या कंपन्यांची जिल्हा प्रशासनाने चौकशी करावी. परिसरातील मुलींच्या शिक्षणासाठी मानव विकास योजनेतून चार बसेस देण्याचे नियोजन करावे. परिसरातील महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या उत्पादनाची यंत्रे कंपनीने उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. यावेळी एकोना, पाटाडा, वनोदा व परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कळमगाव (गन्ना) येथे संविधान सन्मान दिन तथा महात्मा फुले स्मृतिदिन सोहळा संपन्न

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सिन्देवाही : तालुक्यातील कळमगाव गन्ना येथे ग्रामिण फुले-शाहु आंबेडकर विचार मंच व नगर बौध्द पंच कमेटी यांच्या संयुक्त विद्यमानाने संविधान सन्मान दिन समारोह तथा राष्ट्रपिता महात्मा फुले स्मृतिदिन सोहळा दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ ला राजा बिंबीसार बुध्दविहार कळमगाव गन्ना येथे संपन्न झाला.

             सदर कार्यक्रमाचे नियोजन दिवसभरात चार सत्रामध्ये करण्यात आले होते. पहिल्या सत्रामध्ये सकाळी ६ ते ९ पर्यंत गावामधुन संविधान सन्मान दिवसानिमित्य रॅली काढण्यात आली. त्यात नवेगाव लोन व पळसगाव जाट येथील समता सैनिक दलाचे पथसंचालन व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी १ ते ५ पर्यंत संविधान सन्मान दिन तथा राष्ट्रपिता महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा.प्रताप नगराळे सर,प्रमुख मार्गदर्शक निखिल ठमके सर, बळीराज निकोडे सर, प्रमुख अतिथी बाबुरावजी गेडाम, डाॅ. राजपाल खोब्रागडे, गेंदबाजी खोब्रागडे, डाॅ. रविन्द्र शेंडे, मोटघरे सर, सेमस्कर सर यांचे वैचारीक भाषणे झालीत.

          तिसऱ्या सत्रामध्ये सायंकाळी ५ ते ७ पर्यंत सस्नेह भोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. चवथ्या सत्रामध्ये सायंकाळी ७ वाजतापासुन भव्य एकल नृत्य स्पर्धा खुला गट घेण्यात आला. त्यात प्रथम पारितोषिक ७०००/- व्दितीय ५०००/- व तिसरे ३०००/- ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटक अरविंद जैस्वाल, दीपप्रज्वलन मदारे सर, अध्यक्ष अशोक खोब्रागडे, प्रमुख अतिथी प्रभुदास चौधरी, हटवादे मॅडम, मुकेश बन्सोड, दशरथ मडावी, सुदाम खोब्रागडे, शिरीष चांभारे, राजु चांभारे, राजु सरपाते, लताताई गेडाम हे उपस्थित होते.

          या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कळमगाव ग्रामिण फुले-शाहु आंबेडकर विचार मंच, समता जनकल्याण प्रतिष्ठाण, रमाबाई महिला मंडळ, बौध्द समाज कळमगाव गन्ना यांनी केले होते. यात भारत शेंडे, अमरदिप मेश्राम, प्रविण मेश्राम, कोमल गेडाम, अमित जुंबळे, राहुल खोब्रागडे, अमित मेश्राम, प्रफुल्ल वाकडे, अनिल जुंबळे, अक्षय रामटेके, अतुल जुमळे, वैभव वाकडे, रुंदन गेडाम, रोशन खोब्रागडे, प्रशांत अलोणे, विक्की गेडाम, शिलानंद रामटेके, संतोष वाकडे, शाहुर खोब्रागडे, राहुल गेडाम, राष्ट्रपाल रामटेके, प्रणय गेडाम, मंगेश वाकडे, स्वप्निल जुंबळे, भगवान जुंबळे, शुभम निमगडे, प्रणित गेडाम, प्रफुल्ल गेडाम, पियुष शेंडे, भारत गेडाम, स्नेहल गेडाम, जगदिश खोब्रागडे, सुरज खोब्रागडे, हिनयान खोब्रागडे, प्रफुल्ल खोब्रागडे, संघपाल खोब्रागडे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

जातीमुक्त भारत होणे गरजेचे आहे, त्याशिवाय भारत जोडता येणार नाही- अपेक्षा एन. पिंपळे

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

चंद्रपूर : संविधानिक संस्कृती संवर्धन समिती जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने विकास नगर, बाबुपेठ येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान सन्मान दिवस या राष्ट्रीय समारंभाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मान. अपेक्षा पिंपळे ह्या होत्या.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अॅड. वैशाली टोंगे आणि प्रा. योगेश दूधपचारे हे होते. आपल्या भाषणात प्रा. दुधपचारे यांनी संविधान सर्व भारतीय लोकांचे, भारतीय लोकांसाठी आहे आणि म्हणुन भारतीय लोकांनी संविधानाचे संवर्धन करावे असे प्रतिपादन केले. अॅड. वैशाली टोंगे यांनी ओबीसी समाजानी संविधान समजुन घेण्याची गरज आहे, कारण संविधानाने ओबीसी, एस. टी., एस. सी. आणि इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षण दिले आहे आणि सर्व भारतीयांसाठी हक्क प्रदान केले आहे म्हणूनच तर ओबीसी समाजाला सन्मानाने जगता येत आहे.
नव्हे तर भारतीय स्त्रीयांना मताचा अधिकार काही न कर्ता संविधानाने दिला आहे. तेंव्हा भारतीय स्त्रियांनी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कधीही विसरु नये असे वक्तव्य केले. संघटनेच्या शहर महासचिव कोमल बोरकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. संविधान सन्मान दिवस या राष्ट्रीय समारंभाच्या अध्यक्ष मान. अपेक्षा पिंपळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारत ह्या लोकशाही राष्ट्राला एका धर्मापूरते मर्यादित करु नये ते संविधान विरोधी असेल. कारण भारतीय संविधानाने धर्मनिरपेक्षता स्विकारली आहे. ती कायम रहावी असे सांगून त्या अशाही म्हणाल्या की, भारत जातीमुक्त झाल्याशिवाय भारत जोडो अभियान यशस्वी होणार नाही.

अलीकडे विरोधी पक्ष मुक्त भारत करण्याच्या प्रयत्नात काही पक्ष आहेत मात्र विरोधी पक्ष मुक्त भारत केल्याने फार तर लोकशाही नष्ट करता येईल असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेच्या जिल्हा महासचिव प्रतिक्षा पाटील तर सुत्र संचालन उपाली अलोने यांनी केले. संविधान सन्मान या राष्ट्रीय समारंभाची सुरवात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन करण्यात आले तर समारंभाचा समारोप राष्ट्रीय गीतांनी करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धिरज रासेकर, प्रशांत रामटेके, संबोधी भडके, रितीक ढवळे, ममता खोब्रागडे, विदीना अलोने, क्विटन थूल, रितु अलोने, लक्की पिंपळे, आदित्य धोटे, आयुष धाकडे, नवज्योत जांभुळे, अमर आमटे यांनी प्रयत्न केले.

शेतात रानडुकराने घातला धुडगूस; पिकांचे केले नुकसान

सह्याद्री चौफेर | नितेश वनकर 

मारेगाव : मच्छिन्द्रा शिवारातील राज्य मार्गांलगत असलेल्या शेतात रानडूधुडगूस घालून कपाशी चे मोठ्या प्रमाणात नासधूस करून नुकसान केली आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला असून, झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यामधून होत आहे.

मारेगाव तालुक्यात सध्या वाघाचा धुमाकूळ असतांना रानडुकरांनी धुडगूस घालणे सुरु केल्याने उभ्या पिकांचे नासाडी करतांना दिसत आहे. रामदास गणपत वडस्कर यांच्या शेतातील जवळपास अर्धा ते एक एकर खाण्यासाठी कपाशी चे मोठे नुकसान करून जमीनदोस्त करून खात असल्याने उभ्या असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.


रान डुकराच्या उपद्रवामुळे परिसरातील शेतकरी मेयकुटीस आला आहे. शेतकरी आपल्या शेतात रान डुकराचा त्रास होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या कलप्त्या लढविताना दिसत आहे. गावातील शेतात लोकांनी राखण करण्याचे उपाय केले आहेत. रात्री पिपा वाजवणे,फटाके फोडतात, विविध आवाजाची म्युजिक वाजवण्यात येतात तरीही शेतकऱ्यांची नजर चुकवून शेती फस्त केली जाते. संबंधित विभागाने शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी रामदास गणपत वडस्कर यांनी केली आहे.

मायबाप सरकार बेघर नका करु हो; गरीबाच्या समस्येकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष....


सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : शासनाच्या कल्याणकारी ध्येय धोरणानुसार गोरगरिब,सामान्य लोकांना निवा-याची व्यवस्था व्हावी म्हणुन भरपूर योजना राबविण्यात आल्या, जागा नाही अशांना पट्टे वाटप केले, ज्याना घरे नाही अशांना पक्के घरे दिलीत, सोबतच त्यांच्या वास्तव्यासाठी रस्ते, नाली, वीज, आरोप आदीची सुविधा केली. या सर्व कल्याणकारी योजनेचे सवागत आभिनंदन केले जात असले तरी गेली 60 ते 70 वर्षापासून गावराण, महसूल जागेत वास्तव्यात असलेल्या अतिक्रमणावर आता मात्र अतिक्रमन हटाव मोहिमे अंतर्गत बुलडोजर चालविण्याचा फर्मान घेतल्याने हतबल झालेली गोरगरिब जनता आता आमचा वाली कोण? अशा केविलवाणी नजरेने पाहत असुन आर्त हाक लोकप्रतिनिधिना देत असल्याचे दिसत.आहे मात्र गोरगरिबाचे रान पेटत असताना गरिबांच्या अशा ज्वलंत समस्येकडे लोकप्रतिनिधि चुप्पी साधुन असल्याचे दिसुन येत आहे मात्र, गरिबाचा वाली कोण? यावर प्रश्न चिन्ह निर्माण केल्या जात आहे.
राज्यासह जिल्हा भरात मा.उच्च न्यायालय यांच्या कडील पीआय एल नं.2/2022 मधील दि 15 सप्टेंबर व 6 आक्टोंबर 2022 चे आदेश महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966कलम 53 (1-अ) अन्वये ,तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966कलम 53(1-अ) अन्वये शासनाकडे.विहीत असलेल्या कोणत्याही जमीनीचा अनाधिकृत पणे भोगवाटा करणाऱ्या व्यक्तिस निष्कासित करण्याची तरतुद.असताना,उपरोक्त नमुद केलेल्या शासकीय जमीनीमध्ये केलेल्या अनाधिकृत कब्जा निष्कासित करावा अन्यथा सदरचे अतिक्रमण शासनातर्फ हटविण्यात येईल.असा फर्मान महसूल विभागामार्फत अतिक्रमण धारकांना बजावला आहे, अशा अतिक्रमण हटाव मोहिमेत सावली तालुक्यातील 14 गावाचा समावेश असुन 464 कुटुंबाना नोटीस बजावण्यात आला आहे.

यात पेंढरी, मुडांळा, चकपिरंजी, खेडी, पाथरी, भारपायली, चारगांव आदी 14 अशा समावेश असून 464 कुटुंबियाना तहसीलदार सावली यांनी परत दुस-यांदा नोटीस बजावले आहे. त्यामुळे बेघर.होण्याच्या धास्तीने अनेक कुटुब भयभीत असुन निवेदनाच्या माध्यामातुन अतिक्रमण न हटवता कायम स्वरुपी पट्टे द्या अशी केवीलवाणी विनंती कार्यालयात निवेदनन देऊन करीत आहेत, मात्र गरिबांच्या अशा बेघर होण्याच्या समस्येकडे कुण्याही लोकप्रतिनिधिचे लक्ष असु नये ,याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

सावली तालुका धान उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असुन तालुक्याच्या एकुण भौगोलिक क्षेत्रापैकी 9451.12 हेक्टर हे जंगलाखालील क्षेत्र असुन या भागालगत मोठ्या प्रमाणात शेतजिमिनी आहेत,आणि त्याला लागुनच लोकवस्ती निर्माण झालेली आहे.या मध्ये अकृषक क्षेत्र 141.46 हेक्टर,गावराण क्षेत्र.491 12 हेक्टर, गायरान क्षेत्र 584.63हे.,सरकारी पडीत जमीनेचे क्षेत्र 9734.74 हे.असून अशा भागातील काही गावात गेली अनेक वर्षांपासून गरीब जनतेचे वास्तव्य आहे, या वास्तव्यात.सदर कुटुंबाच्या.तीन.पिढ्या निघुन गेल्या ,निवारा आणि जागेच्या शोधात अनेक गरीब जनतेने अशा भागात आपला संसार.थोटला असताना नुकतेच शासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेचा फतवा दिल्याने. या भागातील गरीब जनता हैराण झाल्याचे दिसून येत आहे.अशा गंभीर समस्येकडे.शासन काय निर्णय घेते? की गरिब जनतेला बेघर करते.याकडे सर्वांचे.लक्ष लागले असून गरिबांच्या अशा ज्वलंत समस्येकडे लोकप्रतिनिधी मात्र चुप्पी साधुन असल्याचे दिसून येत आहे. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचा शंकर कोडापे सुवर्ण व रजत पदकाचा मानकरी

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : गोंडवांना विद्यापीठांतर्गत वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयात सुरू असलेल्या आंतर महाविद्यालयीन मैदानी खेळ स्पर्धेत स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा बि.ए. व्दितीय वर्षाचा विद्यार्थी शंकर मल्लेश कोडापे या विद्यार्थ्यांने हातोडा फेक या स्पर्धेत सुवर्ण पदक आणि गोळा फेक स्पर्धेमध्ये रजत पदक प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. सावली तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या शंकर कोडापे या विद्यार्थ्यांने विद्यापीठाच्या स्पर्धेत क्रमशा सुवर्णा व रजत पदक प्राप्त करणाऱ्या शंकरला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. भास्कर सुकारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शंकर कोडापे यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष संदीप गड्डमवार, सचिव राजाबाळ संगीडवार आणि महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

शेलू पुरड शिवारात वाघांचे दर्शन, शेतकरी मजूर भयभीत

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : तालुक्यात मागील काही दिवसापासून वाघांचे दर्शन होऊ लागले असून,वन्यजीवावर झडप घेता घेता आता मानवावर हल्ला करून ठार करू लागले. याचे ताजे उदाहरण कोलार येथील गुराख्याला ठार मारले,ब्राम्हणी येथील टॉवर चे काम करणाऱ्या मजुराला गंभीर जखमी केले तर, गेल्या आठवड्यात भुरकी येथील 25 वर्षीय युवा शेतकरी असे अनेक प्रकरण लक्षात घेता येईल. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष होण्यापूर्वी या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेलू येथील सरपंच उमेश आसुटकर, राजु मालेकर, शंकर मोहितकर, विनोद आसुटकर, तुकाराम वासेकर यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत वनपरीक्षेत्र अधिकारी वणी यांना दिलेल्या निवेदनातून केली.

तालुक्यातील वरील घटना ताज्या असतांना आज दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी सहा वाजता शेलू येथील शेतकऱ्यांना शेलू पुरड शिवारात दोन वाघांचे दर्शन झालेत. त्यात एक वाघ एक पिलू असा समावेश असून पुन्हा दहा ते अकरा वाजता त्याच परिसरात टॉवर चे काम करणाऱ्या कामगारांना तीन वाघ दिसले. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांना हातातील कामं सोडून वाघाच्या भीतीपोटी घराची वाट धरावी लागली. दिवसेंदिवस वाघांचे हल्ले वाढले असून शेलू (बु), पुरड येथील गावकरी भीतीच्या सावटात आले आहेत.

परिणामी या मुक्त वावर असणाऱ्या नरभक्षी वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी वनपरीक्षेत्र अधिकारी यांना करण्यात आली आहे. यावेळी शेलू (बु) पुरड परिसरातील नागरिक उपस्थित होते. 

सरपंच, सदस्य होण्यासाठी 'इतकं' शिक्षण लागणार, ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय..!

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : मुंबई ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच होण्यासाठी उमेदवार किमान सातवी पास असावा, असा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. गावगाडा चालवण्यासाठी शैक्षणिक अर्हतेची मर्यादा घालण्यात आली आहे.

राज्याच्या ग्रामविकास विभागाने सरपंच अथवा सदस्यांचा शैक्षणिक अर्हतेबाबत आदेश जारी केला आहे. त्यानुसार, 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेली व्यक्तीस सरपंच अथवा सदस्य होण्यासाठी किमान सातवी पास असणे आवश्यक आहे.
प्रमाणपत्र द्यावं लागणार

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना, सातवी पास असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र इच्छूक उमेदवारांना सादर करावे लागणार आहे. अर्थात, ज्यांचा जन्म 1995 पूर्वी झालेला असेल, त्यांना मात्र ही शैक्षणिक अट लागू नसेल.

दरम्यान, राज्यात सध्या सुमारे 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरु असून, सध्या उमेदवारी अर्ज भरण्याची रणधुमाळी चालली आहे. त्यामुळे ऐन थंडीत गावचे राजकीय वातावरण तापले आहे. सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याने चुरस आणखी वाढली आहे.

पहिली ते आठवीचे अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी शिष्यवृत्तीला मुकले

सह्याद्री चौफेर | न्यूज 

नवी दिल्ली : पहिली ते दहावीपर्यंतच्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेतून केंद्र सरकारमार्फत दरवर्षी एक हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. यंदा नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अर्ज भरून घेणे व पडताळणी करून केंद्राकडे पाठविण्याची जबाबदारी शिक्षण संचालक (योजना) कार्यालयाकडे दिली होती. सुरुवातीला अत्यल्प अर्ज भरले गेल्याने संचालनालयाने ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवून दिली. त्यानंतर पुन्हा ५ नाेव्हेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली. 

मात्र, आता विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज शाळास्तरावर प्रमाणित झाल्यानंतर नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अचानक अर्ज रद्द करण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले. या परिपत्रकानुसार पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना आरटीईनुसार मोफत शिक्षणाचा लाभ दिला जातो. त्यामुळे त्यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाऊ शकत नाही. केवळ नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांचेच अर्ज प्रमाणित करून केंद्र शासनाकडे पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या. यामुळे महाराष्ट्रातील पहिली ते आठवीचे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी शिष्यवृत्तीला मुकले आहेत.

मुस्लिम, बौद्ध, जैन, शीख विद्यार्थ्यांना फटका

अल्पसंख्याक वर्गवारीतील मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारसी व जैन समाजातील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीकरिता धर्मनिहाय कोटा दोन लाख ८५ हजार ४५१ इतका निश्चित करून देण्यात आला आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत या योजनेत 'फ्रेश' विद्यार्थ्यांचे ३ लाख ८२ हजार ५१४ अर्ज प्राप्त झाले.

मागील वर्षी तब्बल ७ लाख ८४ हजार १५१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर केली होती. त्यांना यावर्षी 'रिनिवल'मधून अर्ज करणे आवश्यक होते. नूतनीकरणासाठी यंदा सात लाख २४ हजार ४९५ अर्ज एनएसपी पोर्टलवर भरण्यात आले. ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर अशी मुदतवाढ मिळाल्यानंतर अर्जांच्या संख्येत आणखी वाढ झाली. मात्र यातील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक अर्ज नामंजूर करण्यात येत आहेत.


बल्‍लारपूर येथील दुर्घटनेतील मृतकेच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री निधीतून ५ लाखाचे अर्थसहाय्य जाहीर


सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

बल्लारपूर : बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवर पादचारी पुल कोसळल्‍याने झालेल्‍या दुर्घटनेतील मृत शिक्षिका श्रीमती रंगारी यांच्‍या कुंटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्‍याचप्रमाणे जखमींवर योग्‍य उपचार शासकीय खर्चाने करण्‍याचे निर्देश त्‍यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिले आहेत.
रविवारी दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्‍थळाला भेट दिली व सामान्‍य रुग्‍णालय चंद्रपूर येथे भेट देत जखमींची विचारपूस देखील केली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याशी संपर्क साधुन मृतकाच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रु.चे अर्थसहाय्य प्रदान करण्‍याची विनंती केली. त्‍यानुसार मुख्‍यमंत्र्यांनी ५ लाख रु.चे अर्थसहाय्य मृतकेच्‍या कुटूंबियांना जाहीर केले आहे.

पत्रकारांवर हल्ला केल्यास ३ वर्षाचा तुरुंगवास : डी. टी. आंबेगावे


सह्याद्री चौफेर | न्यूज 

महाड, रायगड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची महाड तालुका कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे व कोकण युवाध्यक्ष सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच जाहीर करण्यात आली.
महाड तालुका अध्यक्ष ॲड. स्वप्नील ढवण, तालुका उपाध्यक्ष विशाल मोहिते, सचिव समीर पवार, खजिनदार अभिजित ढाणीपकर, संघटक राकेश देशमुख, सहसंघटक सुयोग जाधव, कार्याध्यक्ष मिलिंद पवार, सदस्य नितेश पवार, सुमेध साठे, आदेश प्रसाद, सौरभ बनकर, सचिन चांदोरकर, सतीश मेहता, निलेश शिंदे, संदेश चौधरी आदी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करून त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

 याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, कोकण युवा संपर्क प्रमुख सागर पवार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष रिजवान मुकादम, माणगाव तालुका अध्यक्ष सचिन पवार, उपाध्यक्ष मंगेश मेस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी पत्रकारांची आचारसंहिता व पत्रकारांच्या अंगी कोणते गुण असावेत? या विषयावर मार्गदर्शन केले. पत्रकारांवर हल्ले करणाऱ्याला, हिंसाचार करणाऱ्याला अथवा तशी चिथावणी देणाऱ्याला 3 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड अशी पत्रकार संरक्षण कायद्यात तरतूद करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या एकाही पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल होऊ देणार नाही. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबासाठी संघटना अहोरात्र कार्य करीत आहे त्यामुळे पत्रकारांनी नेहमी निःपक्षपातीपणे बातमी प्रसिद्ध करावी असे प्रतिपादन केले.
यावेळी कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, कोकण युवा संपर्क प्रमुख सागर पवार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष रिजवान मुकादम यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. महाड तालुका अध्यक्ष ॲड स्वप्नील ढवण यांनी आभार मानले.

गुराख्यावर वाघाची झडप, चराई करिता घेऊन गेलेला इसम वाघाच्या हल्ल्यात ठार

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : तालुक्यात मागील काही दिवसापासून वाघांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हे वाघ वन्यजीव तर गिळू लागलेच मात्र, आता नरभक्षी झाले असून त्यांच्या हल्ल्यात निष्पाप जीवांचे बळी जाऊ लागले आहेत. गाव खेड्यालगत असलेल्या जंगलव्याप्त भागात वाघांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसून येत आहे. अनेकांना या वाघांचे दर्शन सुद्धा झालेले असताना ब्राह्मणी या गावात टॉवर चे काम करणाऱ्या मजुरावर वाघाने हल्ला केल्याची घटना ताजी असतांनाच आज गुरे चराईचं काम करणाऱ्या इसमावर झडप घेत त्याचा जीव घेतला. पहाटेच्या सुमारास कोलेरा गावा जवळील जंगलव्याप्त भागात ही घटना उघडकीस आली. त्याचं अर्ध शरीरचं वाघाने फस्त केलं होतं. रामदास जगन्नाथ पिदूरकर रा. कोलेरा (वय अंदाजे ६५ वर्ष) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. रामदास हे नेहमी प्रमाणे काल (२७ नोव्हेंबर) ला गुरे चारण्यासाठी घेऊन गेले होते. परंतु रात्री उशिरा पर्यंत जनावरं राखण करणारे गुराखी पिदूरकर घरी न परतल्याने त्यांचा सर्वत्र शोधाशोध घेण्यात आला. जंगलव्याप्त भागातही गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. पण रात्र असल्याने शोध कार्य थांबवावं लागलं. आज सकाळी गावकऱ्यांनी परत त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. गावापासून काही अंतरावरच जंगल भागात झुडपाआड त्यांचा वाघाने अर्धे शरीर फस्त केलेला मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला. दिवसेंदिवस वाघांचे हल्ले वाढले असून तालुक्यातील गावकरी भीतीच्या सावटात आले आहेत. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष होण्यापूर्वी या वाघांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. 

राशीभविष्य - 28 नोव्हेंबर सोमवार..!

 
            🔯 राशीभविष्य - 28 नोव्हेंबर सोमवार..!

🐏 मेष
राशीच्या लोकांसाठी आज कौटुंबिक वाढीचे संकेत असतील. म्हणजेच आज तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात. एवढेच नाही तर आज सरकारी कामात यश मिळू शकते. तसेच तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सतत नवीन अडचणींमुळे त्रास होईल.

🦬 वृषभ :
राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुम्हाला परदेश आणि गुंतवणुकीच्या बाबतीत अचानक लाभ देणारा असेल. एवढेच नाही तर आज सर्व संकटातही तुमचे मित्र तुम्हाला साथ देतील. आज तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याची अधिक काळजी घ्यावी लागेल कारण पोटाशी संबंधित आजारामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. तसेच, वजन उचलण्याचे काम करू नका आणि पाठदुखीच्या तक्रारी असू शकतात.
👩‍❤️‍👨 मिथुन :
राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उदरनिर्वाहाशी संबंधित मूलभूत समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची शक्यता देणार आहे. आज तुम्हाला वैवाहिक जीवनात खूप सावध राहण्याची गरज आहे. जोडीदाराप्रती काही उदासीनता असू शकते.

🦀 कर्क :
राशीच्या लोकांसाठी आज कोणतीही योजना करा, परंतु ती गुप्त ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आज तुमचा खर्च जास्त असेल. त्यामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
🦁 सिंह :
राशीच्या लोकांसाठी आज सर्जनशील कार्यात भाग घ्या. आज काही नवीन लोकांशी तुमची ओळख होईल. यामुळे हे लोक आगामी काळात तुमच्या कामात येऊ शकतात आणि तुम्हाला तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी मदत करू शकतात.

👩🏻‍🦰 कन्या :
राशीच्या लोकांसाठी या दिवशी तुमची आर्थिक स्थिती वाढेल आणि तुमच्या रखडलेल्या कामात प्रगती होईल. सध्यातरी तुमच्या जोडीदाराशी सलोख्याचे संबंध ठेवा. तरच तुम्हाला अपेक्षित खेळ मिळेल. काही काळासाठी, तुम्हाला कर्ज देखील घ्यावे लागेल.
⚖️ तूळ :
राशीच्या नोकरदार लोकांसाठी टॅरो कार्ड्सनुसार आजचा दिवस पद, प्रतिष्ठा इत्यादी फायदे देणारा असेल. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर काळ अनुकूल आहे, कामामुळे व्यवसायाला गती मिळाली तर अपेक्षित नफा मिळेल.

🦂 वृश्चिक :
राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस गुंतवणूक आणि परदेशात अचानक यशाची बातमी घेऊन येईल. यासोबतच आज आर्थिक सुविधा वाढतील. आनंदात वाढ होईल. यासोबतच तुम्हाला लोकांचा पाठिंबाही मिळेल.
🏹 धनु :
राशीच्या लोकांसाठी, या दिवशी योजनांना गती देण्यासाठी उच्च अधिकार्‍यांमध्ये चर्चा होऊ शकते. जमीन आणि इमारतीशी संबंधित व्यवसाय फायदेशीर होईल. यासोबतच तुमचे आरोग्यही चांगले राहील.

🦌 मकर :
 राशीच्या लोकांसाठी तुम्हाला कामात अपेक्षित गुणात्मक बदल दिसतील. तसेच, आज तुमच्यावर क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव असेल. तसेच, आज तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही आनंददायी बातमी मिळू शकते.
🧉 कुंभ :
राशीच्या लोकांसाठी, भांडवल गुंतवण्यापूर्वी वैयक्तिक पातळीवर कंपनीची कायदेशीरता तपासण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. आज तुम्हाला वारंवार व्यवसायातील चढ-उतार, घरगुती वाद आणि सामंजस्याचा अभाव यामुळे मानसिक तणाव जाणवेल.

🐟 मीन :
राशीच्या लोकांसाठी नवीन कार्य सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. आपल्या सामाजिक जीवनातील मित्रांसह खाजगी किंवा गुप्त रहस्ये सोडवू शकता. आज तुम्हाला तुमच्या मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
बातमी वर जाहिरातसाठी अवश्य संपर्क करा : 7218187198

मच्छिन्द्रा येथील संतापलेल्या महिलांनी पकडली अवैध दारू


• एकाला घेतले ताब्यात तर दोन फरार

सह्याद्री चौफेर | न्यूज 
9011152179

मारेगाव : तालुक्यातील मच्छिन्द्रा येथे गेल्या काही दिवसापासून अवैध दारू विक्री जात आहे. अगदी शाळे च्या लगत तळीरामांची रेलचेल असते त्यामुळे विद्यार्थ्यावर परिणाम होईल, आमच्या मुलांचे भविष्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. गावात भांडण तंटे होतील, गावाचे वातावरण बिघडत असल्याने याबाबत मारेगाव ठाण्यात असंख्य महिलांच्या उपस्थितीत दि. 24 नोव्हेंबर 2022 ला तक्रार दिली होती, कायम दारू विक्री बंद करा अशी मागणी येथील महिलांनी लावून धरली असतांना विक्रेत्याला बिट जमादार रजनीकांत पाटील यांनी त्याला गावातून उचलले आणि कारवाई करून सोडले असे तक्रारकर्त्या महिलांनी सांगितले. मात्र, तरी देखील अवैध दारू गावात खुलेआम विकली जातच होती. गावातच पव्वा मिळत असल्यामुळे पिण्याऱ्यांची संख्या वाढली, साहजिकच मागणी वाढल्याने पुरवठा वाढला, यावर पोलिसांची थातूर मातुर कार्यवाही होत असल्याचे पाहून महिलामध्ये गरम वातावरण निर्माण झाले, "आमचं ठरलं" म्हणत असंख्य महिला आक्रमक झाल्या, दारू पकडायचीच आणि अखेर पोलिसांच्या नाकावर टिचून आज रविवारी सायंकाळी गावालगत असलेल्या शेताच्या धुऱ्यावर दारूची पेटी घेवून येणाऱ्या मारोती घाटे व रमेश पेंदोर याला पकडले. महिला व दारू घेवून येणाऱ्यात झटापट झाली महिलांचा जोर कमी पडल्याने रमेश नामक याने घटना स्थळावरून पोबारा केला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तात्काळ बिट जमादार पाटील व वाभीटकर यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. व आरोपीना ताब्यात घेतले, परंतु दुसऱ्या साथीदाराला व मुख्य विक्रेत्याला पकडा अशी आक्रमक भूमिका घेत नागरिकात गरम वातावरण निर्माण झाल्याने दोघांची शोधाशोध केली, परंतु ते काही हाती लागले नसल्याने अखेर दुचाकी क्र. एम एच 29 ए ई 2117 व मारोती घाटे याला पकडून नेण्यात आले. यावेळी गावातील शेकडो महिला,पुरुष, युवक व बालगोपाल जमली होती.

देशातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकावर सर्वात मोठी दुर्घटना...


सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

बल्लारपूर : मध्य रेल्वेचे शेवटचे जंक्शन असलेले व भारतीय रेल्वेकडून आदर्श रेल्वेस्थानक असा बहुमान मिळविणाऱ्या बल्लारशाह रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली असून प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून इतर प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याने जवळपास 8 ते 10 प्रवासी पुलावरून थेट रेल्वे रुळावर कोसळले.

हा अपघात इतका भयंकर होता की कोसळलेल्या काही जणांचा रेल्वेच्या 2500 केव्हीं इलेक्ट्रिक लाईनला स्पर्श झाल्याने ते प्रवासी गंभीररित्या भाजल्या गेले असून उंचावरून कोसळल्याने सर्व प्रवसी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी पैकी सर्व प्रवासी अत्यवस्थ असल्याचे आढळुन आलें असुन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन कामाला लागले असुन घटना कळताच स्थानकावर रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या आहे. वृत्त लिहिस्तोवर कुठलीही प्राणहानी झाल्याची माहिती मिळाली नसून जखमींचा संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मच्छिन्द्रा येथील महिलांनी पकडली अवैध दारू

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : तालुक्यातील मच्छिन्द्रा येथे गेल्या काही दिवसापासून अवैध दारू विक्री होत होती. याबाबत ठाण्याला तक्रार दिली होती, मात्र तरी देखील अवैध दारू विकली जात असल्याने अखेर महिलांनी स्वतः दारूची पेटी व दारू विक्रेता मारोती घाटे (अंदाजे 25) याला पकडून ठेवले आहे. तर रमेश नामक पोबारा केला आहे. 

वृत्त लिहेपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल व्हायची होती, मात्र मुख्य विक्रेता अद्याप महिलांच्या गळाला लागला नसल्याचे महिलांनी सांगितले.